Subscribe Us

header ads

March 1 - Day of Special (Dinvishesh)

March 1 - Day of Special (Dinvishesh)

मार्च 1 : दिनविशेष




महत्त्वाच्या घटना

मार्स या युध्ददेवतेवरुन या महिन्याला मार्च असे नाव आहे. एके काळी मार्च हा रोमन दिनदर्शिकेत पहिला महिना होता. त्यामुळे इ. स. पू. ७१२ पर्यंत तो नववर्षदिन म्हणून साजरा केला जात असे.


जागतिक नागरी संरक्षण दिवस

बोस्‍निया व हेर्झेगोविनाचा स्वातंत्र्यदिन


1 मार्च 1565 रोजी रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.


1 मार्च 1803 रोजी ओहायो हे अमेरिकेचे 17 वे राज्य बनले.

X X

1 मार्च 1815 रोजी एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.


1 मार्च 1818 रोजी महाराष्ट्रातील सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.


1 मार्च 1851 रोजी " प्रबोधन चंद्रोदय" या वृत्तपत्राने ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मांतराची चळवळ चालू ठेवली होती, त्यास मराठी वृत्तपत्रांनी प्रखर विरोध केला या रोजीच्या अंकात "ढोंगी ख्रिस्ती लोक " असे शीर्षक देऊन त्यांच्यावर टीका केली होती.


1 मार्च 1872 रोजी ’यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली. हे पार्क पश्चिम युनायटेड स्टेट्स मध्ये स्थित एक राष्ट्रीय उद्यान आहे. 42 व्या यु एस काँग्रेसने येलो स्टोन नॅशनल पार्क प्रोटेक्शन ॲक्टसह त्याची स्थापना केली गेली आणि 1 मार्च 1872 रोजी राष्ट्राध्यक्ष युलीसीस एस ग्रँड यांनी कायद्यात स्वाक्षरी केली. येल्लो स्टोन हे अमेरिकेतील पहिले राष्ट्रीय उद्यान होते आणि ते जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मोठ्या प्रमाणावर मानले जात होते. या उद्यानात वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यासाठी ओळखले गेले आहे. विशेषता ओल्ड फेतफुल ग्रीझर त्यातील सर्वात लोकप्रिय आहे. अनेक प्रकारच्या बायोम्सचे प्रतिनिधित्व करत असले. तरी सबलपाइन जंगल हे सर्वाधिक विपुल प्रमाणात आहे. हा दक्षिण मध्य रॉकीज वन इकोरिजन चा भाग आहे. उद्यानाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हे यूएस डिपार्टमेंट ऑफ द इंटिरियर च्या आत्यारीत होते कोलंबस बेलानो या उद्यानाचे पर्यवेक्षण करणारे प्रथम आंतरिक सचिव होते. 1917 मध्ये उद्यानाचे प्रशासन राष्ट्रीय उद्यान सेवेकडे हस्तांतरित करण्यात आले. येलो स्टोन नॅशनल पार्कचे क्षेत्रफळ 3468.5 चौरस मैल आहे. त्यामध्ये सरोवरे घाटी नद्या आणि पर्वत हे येतात. येलो स्टोन कॅलडेरा या खंडातील सर्वात मोठ्या सुपर ज्वालामुखी वर केंद्रित आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावा प्रवाह आणि खडक येल्लो स्टोनच्या बहुतेक भूभागाला व्यापतात हे उद्यान ग्रेटर यल स्टोन इकोसिस्टीमचे केंद्रबिंदू आहे. येल्लो स्टोन ला युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळाचे नाव देण्यात आले. या पार्कमध्ये सस्तन प्राणी पक्षी मासे सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी असे शेकडो प्रजातीचे प्राणी समावेश आहे. तसेच विस्तीर्ण जंगले आणि गवताळ प्रदेशात वनस्पतींच्या अद्वितीय प्रजातींचा ही समावेश आहे. युनायटेड स्टेट मधील हे सर्वात प्रसिद्ध मेगा फौना स्थान आहे. 1988 च्या लागलेल्या जंगलातील मोठ्या आगीत उद्यानाचा एक तृतीयांश भाग जळून खाक झाला होता. पार्कमध्ये येलो स्टोन नदीचे मुख्य पाणी आहे. त्यावरून त्याचे ऐतिहासिक नाव पडले. येल स्टोन च्या ग्रँड कॅनोन मध्ये दिसणाऱ्या पिवळ्या खडकावरून या नदीचे नाव देण्यात आले असावे असे काहींचे मत आहे.




1 मार्च 1873 रोजी ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.


1 मार्च 1893 रोजी अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.

X X

1 मार्च 1896 रोजी हेन्री बॅक्वरल अणुकिरणोत्सर्जीचे किरणे शोधले. युरेनियमचे क्षार छायाचित्रपट्टीवर (photo graphic plate) ठेवले असताना ती काळी पडते. असे हेन्री बॅक्वरल यांना आढळून आले. किंबहुना छायाचित्र पट्टी काळ्या कागदावर गुंडाळून त्यावर युरेनियमचे क्षार ठेवले असले. तरीही छायाचित्रपट्टी काळी पडते. असे त्यांना आढळून आले. त्यामुळे यूरेनियमच्या क्षरातून बाहेर येणारे किरण त्यावेळी माहीत असलेल्या क्ष किरणाहून भिन्न असतात. आणि हे किरण पदार्थ भेदून जाऊ शकतात. असा निष्कर्ष त्यांनी काढला हे किरण अदृश्य असून ते युरेनियम अनुमधून बाहेर पडतात. असे लवकरच समजले. या किरणांना सुरुवातीस  बॅक्वरल किरण असे म्हणण्यात आले. आणि या किरणांच्या उत्सर्जनास किरणोत्सर्ग (radioactivity )असे नाव मारी क्युरी यांनी दिली.

               हेन्री बॅक्वरल

1 मार्च 1901 रोजी ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापन करण्यात आले.


1 मार्च 1907 रोजी टाटा उद्योग समूहाने नवीन टाटा आर्यन अ‍ॅन्ड स्टील कंपनीची स्थापना केली.




1 मार्च 1919 रोजी रॉलट अ‍ॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला आरंभ केला.


1 मार्च 1923 रोजी आजच्या दिवशी ग्रीसांनी ग्रेगोरियन कॅलेंडर ला स्वीकारले.

X X

1 मार्च 1927 रोजी रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.


1 मार्च 1930 रोजी महाराष्ट्रातील मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. यु. म. पठाण उर्फ युसुफखान मोहम्मद खान पठाण यांचा जन्म झाला. त्यांनी भाषा विज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रातही कार्य केले. फारशी मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषा अध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरव वृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांनी 1953 ते 1959 मध्ये दयानंद महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 1960 ते 1990 मध्ये त्यांनी मराठवाडा विद्यापीठ सध्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा व वांग्मय विभागात प्राध्यापक म्हणून काम केले. 1973 पासून ते मराठी विभागाचे प्रमुख होते. त्यांनी संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद सुद्धा भुषविले आहे. त्यांनी एकूण 42 पुस्तके लिहिली त्यात संशोधन पर लेख ललित लेख संपादन कथासंग्रह समीक्षा इत्यादी विषयावर त्यांनी लिखाण केले. त्यातील ठळक साहित्य अलबिणीचा भारत, नंदादीप, नामयची अभंगवाणी, भाऊसाहेबांची बखर मध्ययुगीन संत साहित्य काही आयाम मराठवाड्यातील शिलालेख, संत संघ, संत साहित्य चिंतन, सभासद बखर, इत्यादी महत्त्वपूर्ण साहित्य प्रसिद्ध आहे. 1972 मध्ये मराठी बकरीतील फारशीचे स्वरूप या ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श शिक्षक 1976 चा राज्य शासनाचा पुरस्कार, 1984 मध्ये संत साहित्या चिंतन यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, 1988 मध्ये 16 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, 1990 मध्ये 63 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष , 1998 मध्ये आचार्य अत्रे पुरस्कार, 2001 मध्ये दलित मित्र पुरस्कार, 2002 मध्ये देहू संस्थांचा जगद्गुरु पुरस्कार, 2007 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.


1 मार्च 1936 रोजी अमेरिकेतील महाकाय 'हूव्हर धरण' बांधून पूर्ण झाले.


1 मार्च 1942 रोजी भारत मिलाप (1965), नौनिहाल (1967), शादी समरोह (1962), धरमवीर (1977) आणि घोभ्या (1981) यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंद्राणी मुखर्जीचा जन्म अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत येथे झाला. इंद्राणी मुखर्जीने 1960 आणि 1970 च्या दशकात हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 20 वर्षांच्या कारकिर्दीत मुखर्जींनी त्यांच्या कारकिर्दीत 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती बहुतेक बाजू-पात्र भूमिकांसाठी ओळखली जात होती, परंतु तिने काही चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकाही केल्या आहेत. उसने कहा था (1960), आखरी खत (1966), परवरिश (1977), धरमवीर (1977), आणि देश विदेश (1978) या चित्रपटांमधील तिच्या सर्वात उल्लेखनीय भूमिका होत्या, ज्यापैकी प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. 1960 मध्ये, बिमल रॉय यांनी तिची स्क्रीन टेस्ट केली होती, ज्यामुळे तिने मोनी भट्टाचार्जी दिग्दर्शित आणि रॉय निर्मित सुनील दत्त आणि नंदा यांच्यासोबत उसके कहा था (1960) मध्ये पदार्पण केले. त्याचा पुढील चित्रपट होता धरमपुत्र (1961), शशी कपूर अभिनीत आणि यश चोप्रा दिग्दर्शित, आणि ज्याने हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. त्याचा पुढचा मोठा चित्रपट हा चेतन आनंद दिग्दर्शित वॉर चित्रपट हकीकत (1964) होता. ), ज्याने नंतर तिला आखरी खत (1966) मध्ये नवोदित राजेश खन्ना विरुद्ध मुख्य भूमिकेत कास्ट केले, या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि अकादमी पुरस्कारांमध्ये भारताचा प्रवेश होता. पुढच्या दशकात, मेरे लाल (ज्यावर "पायल की झंकार रास्ते रास्ते" हे प्रसिद्ध गाणे प्रदर्शित झाले होते), गृहस्थी, हीरारांझा (1970), परवरिश बनले यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून तो हिंदी चित्रपटांमध्ये नियमित वैशिष्ट्य बनला. . (1977) आणि धरम वीर (1977), धर्मेंद्र अभिनीत, ज्यामध्ये तिने राजमाता (राणी आई) ची प्रमुख भूमिका केली होती. त्याने काही मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले, ज्यात क्राइम आणि लगी नहीं छोटे राम (1963) यांचा समावेश आहे. इंद्राणीने 1984 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. इंद्राणीने कृष्णलाल खन्ना यांच्याशी लग्न केले आणि 1992 मध्ये नाशिकला राहायला गेली.

                इंद्राणी मुखर्जी

1 मार्च 1946 रोजी 'बँक ऑफ इंग्लंड' चे राष्ट्रीयीकरण झाले.


1 मार्च 1947 रोजी आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.


1 मार्च 1948 रोजी भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना

X X

1 मार्च 1954 रोजी प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा 600 पट जास्त शक्तिशाली होता. तो दिवसासुद्धा 150 किलोमीटर पेक्षा जास्त दूरवर दिसला. या स्फोटामुळे आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग झाला.


1 मार्च 1958 रोजी महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात झाली.

         कोयना जलविद्युत प्रकल्प


1 मार्च 1961 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.


1 मार्च 1961 रोजी युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडणुकी झाल्या.


1 मार्च 1992 रोजी बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.

X X

1 मार्च 1998 रोजी दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुंजम्मा हे त्यांचे बालभारतीचे लाडाचे नाव होते मदुराई षण्मुखवडीवो सुब्बालक्ष्मी हे त्यांचे पूर्ण नाव आहे. त्या लहानपणी अर्धवट शिक्षण सोडून श्रीनिवास अय्यंग मुसिरी सुब्रमण्यम अय्यर सेंमनगुड्डी श्रीनिवास यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्यासाठी गेल्या. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांचा पहिल्या कॅसेटचे उद्घाटन केले. मीरा या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपले संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केले त्यांनी चित्रपटात अभिनही केला. सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजातील काही गीते, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे, भज गोविंदम, मोरे आंगन में, मोरे तो गिरधर लाल गोपाल, विष्णुसहस्त्रनाम, हनुमान चालीसा इत्यादी. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण 1954 मध्ये, पद्मविभूषण 1975 मध्ये आणि भारतरत्न 1998 मध्ये पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना संगीत नाटक आकारणीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर कालिदास सन्मानही त्यांना प्राप्त झाले आणि रमण मॅगसेस 1974 मध्ये पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केले.


1 मार्च 1998 रोजी एकूण 1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.


1 मार्च 2002 रोजी पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.



1 मार्च 2006 रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी भारत दौरा केला होता.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर फोर्स वनचे आगमन झाल्यावर भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे भारतात स्वागत केले. पाकिस्तानला जाण्यापूर्वी राष्ट्रपती आणि प्रथम पहिले तीन दिवस देशात घालविले.



1 मार्च 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नवीन चावला यांना देशाचे निवडणूक आयुक्त बनविण्याची घोषणा केली.


1 मार्च 2010 रोजी भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तान च्या संघाला 4-1 ने हरविली.


1 मार्च 1917 रोजी भारतातील प्रसिद्ध हिंदी करतार सिंह दुग्गल यांचा जन्म झाला.


1 मार्च 1919 रोजी भारतीय अर्थशास्त्रज्ञ पृथ्वी नाथ धर यांचा जन्म झाला. ती एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि इंदिरा गांधींच्या सचिवालयाचे प्रमुख व सल्लागार होते. त्यांचा जन्म कश्मीरमध्ये झाला भारतातील श्रीनगर येथील टिंडेल डिस्को स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाल्यानंतर ते दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी व पदव्युतर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1973 ते 77 या कालखंडामध्ये आणीबाणीच्या वेळेस इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले. ते इंद्रा गांधीजींचे सल्लागार होते नंतर त्यांना काश्मिरी माफी या म्हणन ओळखले जात असे. दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि नवी दिल्लीतील आर्थिक विकास संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 1978 ते 86 या काळात त्यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राचे सहाय्यक महासचिव संशोधक आणि धोरण विश्लेषक म्हणून काम केले. भारत सरकारने त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. त्यांचे निधन 19 जुलै 2012 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झाले.

X X

1 मार्च 1922 रोजी इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 नोव्हेंबर 1995 रोजी झाला.


1 मार्च 1922 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म झाला. त्यांना दासबोध चे निरूपणकार म्हणून ओळखले जातात बोला. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव सांडलेले असे होते. त्यावेळी दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने धर्माधिकारी ही पदवी दिली तेव्हापासून ते धर्माधिकारी हे आडनाव लावतात. त्यांनी 1943 मध्ये रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला देशात आणि आज देशाबाहेर त्याच्या अनेक शाखा आहेत. त्यांना 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी 40 लाखापेक्षा अधिक लोक जमा झाले असल्यामुळे लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 2010 मध्ये नोंद झाली. गुजराती महाराज भूषण पुरस्कार 2000 मध्ये त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार 1997 यांना प्रदान करण्यात आला. 1999 मध्ये समर्थ रामदास स्वामी भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांचे निधन आठ जुलै 2008 मध्ये झाले.


1 मार्च 1930 रोजी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती रामप्रसाद गोयंका यांचा जन्म झाला. ते बहुक्षेत्रीय भारतीय औद्योगिक समूह आरपीजी समूहाचे संस्थापक अध्यक्ष होते. ते सर बद्री प्रसाद गोयंका यांचे नातू होते ते इम्पेरियल बँक ऑफ इंडिया सध्याची स्टेट बँक ऑफ इंडिया चे चेअरमन म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय होते. त्यांनी 1989 80 मध्ये आरपीजी इंटरप्राईजेसची स्थापना केली. त्यांचे शिक्षण कलकत्ता विद्यापीठ हावर्ड युनिव्हर्सिटी मध्ये झाले. भारतीय संसदेच्या राज्यसभेत गोयंका हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरचे अध्यक्ष होते. ते खरगपर येथील आयआयटी बोर्ड चे अध्यक्ष होते. गोयंका यांना जपानच्या सम्राट ने दोनदा अवार्ड ऑफ द सेक्रेड ट्रेझरने सन्मानित केले होते.  त्यांचा मृत्यू 14 एप्रिल 2013 मध्ये झाला.


1 मार्च 1944 रोजी भारतातील पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म झाला. त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सहा नोव्हेंबर 2000 ते 13 मे 2011 पर्यंत मुख्यमंत्री या पदावर काम केले. त्यांचा पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हा होता. त्यांना भारत सरकारने जानेवारी 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

               बुद्धदेव भट्टाचार्य 

1 मार्च 1949 रोजी भारतातील बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा बिहार मधील भक्तियारपूर येथे जन्म झाला. त्यांनी बिहार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून 1972 मध्ये पदवी प्राप्त केली. राजकारणी म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळात राम मनोहर लोहिया कर्पूरी ठाकूर यांच्यासोबत काम केले. सत्येंद् नारायण सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षात प्रवेश घेतला. नितीश कुमार जनता दल (संयुक्त) ह्या राजकीय पक्षाचे पक्षाध्यक्ष आहेत. भारतीय जनता दलातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्द सुरुवात केली. 1994 मध्ये त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी केंद्र सरकारमध्ये रेल्वेमंत्री, कृषी मंत्री, वाहतूक मंत्री इत्यादी अनेक मंत्रीपदे सांभाळले. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ 3 मार्च 2000 ते 10 मार्च 2000 असा होता. दुसऱ्यांदा 24 नोव्हेंबर 2005 ते 17 नोव्हेंबर 2014 हा कालखंड मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सांभाळला. सध्या 22 फेब्रुवारी 2015 पासून बिहारचे 22 व मुख्यमंत्री सध्या विद्यमान आहेत. अटल बिहारी वाजपेयी सरकार मध्ये असताना त्यांनी रे केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून काम केले त्यांनी त्यांच्या 2002 मध्ये काळात इंटरनेट तिकीट बुकिंग सुविधा विक्रमी संख्येने वाढवली. तिकीट बुकिंग काउंटर उघडले आणि तात्काळ योजना सुरू केली. अशा व्यापक रेल्वे संदर्भातील सुविधा उपलब्ध करून दिल्या.

                   नितीश कुमार

1 मार्च 1968 रोजी भारतीय वेटलिफ्टर कुंजारानी देवी यांचा जन्म झाला.


1 मार्च 1955 रोजी महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा 'केवलानंद सरस्वती' यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1877 रोजी झाला होता.


1 मार्च 1988 रोजी भारतातील हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी सोहनलाल द्विवेदी यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 1969 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने पुरस्कृत केले. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1906 रोजी उत्तर प्रदेशातील फतेहपुर जिल्ह्यातील बिंदकी या गावांमध्ये झाला. त्यांनी हिंदी या विषयांमध्ये एम ए पूर्ण केले. तसेच ते संस्कृतचे सुद्धा गाढे अभ्यासक होते. 1941 मध्ये देशाच्या प्रेमाबद्दल त्यांनी लबरेज भैरवी ही पहिली रचना प्रकाशित केली. त्यानंतर त्यांनी पूजा गीत युगाधार विशपान वासंती चित्रा अशा अनेक काव्य लिहिले. लखनऊ मध्ये त्यांनी 1937 मध्ये अधिकार नावाचे दैनिक पत्र सुरू केले. चार वर्षानंतर त्यांनी नंतर बाल सखा या मासिकाचे संपादन केले देशातील बालसाहित्याचे  ते महान आचार्य होते. ऊर्जा आणि चेतना मिळणाऱ्या सारख्या अशा भरपूर त्यांनी रचना  आपल्या कवितेतून केल्या त्यामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून सुद्धा संबोधले जाते. राष्ट्रीय भावनेला महत्त्व देत त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत देश ध्वज राष्ट्रप्रेम आणि राष्ट्र नेत्याबद्दल त्यांनी खूप मोठ्या कविता लिहिलेले आहेत. महात्मा गांधी यांच्यावर तनी अनेक रचना केल्या.

तैयार रहो मेरे वीरो फिर टोली सजने वाली है l 

तैयार  रहो मेरे शुरू रणभेरी बजने वाली है ll 

इस बार बढो सम रांगन मे लेकर वह मिटाने मिटणे की ज्वाला l 

सागर तटसे आ स्वतंत्रता, पहना दे तुझको जयमाला ll

.


1 मार्च 1994 महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पाचवे व नववे मुख्यमंत्री सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ असलेले वसंतदादा पाटील यांचे निधन मुंबई येथे झाले. वसंतदादा प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला आढळतो. वसंतदादा 1977 ते 1985 या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर 2 फेब्रुवारी 1983 ते 6 मार्च 1986 या काळात सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळली होती. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 1972 मध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यांनी 25 वर्ष सांगलीचे प्रतिनिधित्व केले लोकसभेत व विधानसभेत त्यांच्या राजकीय जीवनात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस इत्यादी संस्थेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 1983 मध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन महाविद्यालय विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली. वसंतदादा 1930 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले 1940 पासून त्यांनी लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. दादा काही दिवस भूमिगत होते व सुमारे तीन वर्ष तुरुंगवासही भोगला. त्यांनी 1956 ते 57 या काळात शेतकरी सहकारी कारखान्याची स्थापना केली. तसेच खत कारखाने सूतगिरण्या, तेल गिरण्या कागद कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, हे तर सहकारी तत्त्वावर दादांनी सुरू केले. सहकार क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना 1967 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. दादा 1965 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष होते. 1970 ते 72 या काळामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे संचालक व अध्यक्ष व त्यांच्याकडे होते. 1970 ते 71 या काळात साखर निर्यात मंडळाचे ते अध्यक्ष होते. राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ इत्यादी संस्थांचे ते अनेक वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. 1971 मध्ये अमेरिकेमध्ये लुएझियना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेत भारतीय शिष्ट मंडळाचे नेते म्हणून दादा हजर राहिले होते. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पदमाळे या ठिकाणी झाला होता.


X X

1 मार्च 1991 रोजी पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 7 मे 1909 रोजी झाला होता. 


1 मार्च 1994 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 रोजी झाला होता.


1 मार्च 1999 रोजी भारतातील वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा "दत्तमहाराज" कवीश्वर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1910 रोजी झाला होता.


1 मार्च 2003 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कादंबरीकार लघुकथा लेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1942 रोजी झाला होता.


1 मार्च 2016 रोजी AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1939 रोजी झाला होता.


1 मार्च 2017 रोजी भारतातील सुप्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन झाले.








X X

View, Comments and share..

Post a Comment

0 Comments