Subscribe Us

header ads

Chhatrapati Sambhaji Maharaj

Chhatrapati Sambhaji Maharaj 

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले 

(14 मे 1627 - 11 मार्च 1689) 


छत्रपती राजे संभाजी महाराज : हिंदवी स्वराज्य रक्षक


छत्रपती संभाजी महाराज जीवन चरित्र 

शहाजी राजे जिजाऊ यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली व रचली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तर छत्रपती संभाजीराजांनी तळहातावर प्राण घेऊन स्वराज्याचे रक्षण केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. तर छत्रपती संभाजी महाराज शौर्य, धडाडी, महत्त्वाकांक्षा, त्याग इत्यादी सद्‌गुणांचे मूर्तिमंत उदाहरण होय. जगावे कसे हे आम्हा भारतीयांना शिवाजी महाराजांनी शिकविले तर मरावे कसे ज्यामुळे लोक कल्याण होईल हे आम्हाला संभाजी महाराजांनी शिकविले. त्यांचा स्वाभिमानी आणि प्रेरक मरणाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला व 27 वर्षे तो धगधगत राहिला.

पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी संभाजी महाराजांचा जन्म झाला. 5 सप्टेंबर 1659 रोजी संभाजी राजांचे वय अवघे सव्वादोन वर्षांचे असताना माता सईबाई साहेबांचे निधन झाले. जिजाऊ साहेबांनी संभाजी राजे यांच्यावर चांगले सुसंस्कार करून त्यांना प्रतिशिवाजी निर्माण केले. शिवाजी महाराज आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा संभाजी राजे शिवाजी महाराजांसोबतच होते. त्यावेळी संभाजीराजांचे वय अवघे 9 वर्षांचे होते मरणाच्या भेटीस जाणाऱ्या पित्याबरोबर हा पुत्र होता. हा एक राजकीय पाठ होता. शिवाजी महाराजांऐवजी संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात जात असत. एकदा औरंगजेबाने संभाजीराजांना पिट्टूबरोबर कुस्ती करण्यासंबंधी विचारले. संभाजीराजांनी नकार दिला व म्हटले, "जर आपला शहजादा मैदानात उतरेल तर मी त्याच्याबरोबर कुस्ती करेल अन्यथा नाही," असे बाणेदार उत्तर दिले. शिवाजीराजे चतुराईने निसटले. संभाजी महाराजांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी मथुरेत ठेवले. शिवाजी राजे राजगडावर पोहचल्यावर संभाजीराज्यांच्या मृत्युची अफवा पसरविली. त्यामुळे मोगल सैनिक गाफील झाले म्हणून युवराज संभाजी सुरक्षित परत आले. 12 व्या वर्षी शृंगारपूरचे पिलाजीराव शिकै यांच्या कन्या 'येसूबाई' ह्यांच्याशी विवाह झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्याकडे राज्याचा काही कारभार सोपविला. 14 व्या वर्षी ते 10 हजार सेनेचे सेनापती झाले. संभाजीराजे लिहिणे, वाचणे शिकले. संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार झाले. राज्यशास्त्र, नीतिशास्त्र व धर्मशास्त्रात पारंगत झाले. वयाच्या 14 व्या वर्षी काव्यलेखन करू लागले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील ठळक घटना 

14 मे 1657 : युवराज संभाजीराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला.
5 सप्टेंबर 1659 : युवराज संभाजीराजांच्या आई सईबाईसाहेबांचा मृत्यू झाला.

स. 1665- 67 (सु.): पिलाजी शिर्के यांच्या कन्या जिऊबाई ह्यांच्याशी युवराज संभाजी राजांचा विवाह संपन्न झाला. सासरचे नाव येसूबाई असे ठेवण्यात आले.

जून 1665 : पुरंदरचा तह. मोगलातर्फे युवराज संभाजीराजास पंचहजारी मनसब, राजे मिर्झा राजा जयसिंहाच्या छावणीत आले.

5 मार्च 1665 : आपल्या पित्यासह संभाजीराजे राजगडाहून आगऱ्याकडे बादशहा औरंगजेबाच्या भेटीस रवाना झाले.

12 मे 1666 : छत्रपती शिवाजी महाराज व युवराज संभाजीराजे आगऱ्यास पोहोचले. आगऱ्याच्या औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले.

मे-ऑगस्ट 1666 : युवराज संभाजी राजे व छत्रपती शिवाजी राजे पित्यासह आगऱ्यास औरंगजेबाच्या नजरकैदेत होते.

18 ऑगस्ट 1966 : आगऱ्याच्या नजरकैदेतून युवराज संभाजी राजे हे आपल्या पित्यासह युक्तीने निसटले. परतीचा गुप्त प्रवास सुरू झाला.

ऑगस्ट-सप्टेंबर 1966 : मथुरेत कृष्णाजी विश्वासराव यांच्याकडे युवराज संभाजीराजांचा गुप्त प्रवास सुरू झाला.

20 नोव्हेंबर 1666 : युवराज संभाजीराजे उत्तरेतून राजगडावर सुखरूपपणे पोहोचले.

27 ऑक्टोबर 1667 : युवराज संभाजीराजे औरंगाबदेस मुअज्जमच्या छावणीत. मोगली मनसबीचा स्वीकार,

5 नोव्हेंबर 1667 : युवराज संभाजीराजे मोगली छावणीतून राजगडास परतले.

स. 1670 (सुमारे) : युवराज संभाजीराजांच्या राज्यकारभाराच्या प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला.

24 फेब्रुवारी 1670 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राणी सोयराबाईस राजाराम हा पुत्र झाला.

स. 1672 : युवराज संभाजीराजे युद्ध आघाडीवर जाऊ लागले. रामनगर जव्हार मोहिमेत सहभाग.

जून 1673 : इंग्रज वकील टॉमस निकल्स याची भेट.

6 जून 1674 : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक, संभाजी राजे युवराज म्हणून घोषित करण्यात आले.

17 जून 1974 : राजमाता जिजाबाईंचे रायगडावर निधन झाले. पाचाड या ठिकाणी त्यांची समाधी आहे.

4 फेब्रुवारी 1675 : स्वराज्याचे युवराज संभाजीराजांचे मौंजीबंधन झाले.
1675- 76: गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर, इ. प्रदेशात दोन मोठ्या मोहिमा झाल्या.

ऑक्टो. 1676 : छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर, त्यांच्याबरोबर युवराज संभाजीराजे रायगडाबाहेर. शृंगारपुरी प्रभावलीचे सुभेदार म्हणून नेमणूक.

23 मार्च 1678 : छत्रपती संभाजीराजांनी स्वतःस कलशाभिषेक करून घेतला.

4 सप्टेंबर 1678 : छत्रपती संभाजीराजे आणि महाराणी येसुबाई यांना भवानीबाई ही कन्या झाली.
13 डिसेंबर 1678 : संभाजीराजे सज्जनगडाहून मोगली गोटाकडे गेले. मोगलांकडून हप्त हजारी मनसब बहाल.

2 एप्रिल 1679 : छत्रपती संभाजीराजे व दिलेरखान यांनी भूपाळगड घेतला.

21 डिसेंबर 1679 : छत्रपती संभाजीराजे स्वराज्यात पन्हाळगडावर परतले.

13 जानेवारी 1680 : छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांची भेट. पितापुत्राची दिलजमाई.

15 मार्च 1680 : छत्रपती शिवाजी महाराजांचे व महाराणी सोयराबाई यांचे पुत्र राजाराम महाराजांचे रायगडावर लग्न.

3 एप्रिल 1680 : छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर कैलासवास.

21 एप्रिल 1680 : अण्णाजी दत्तो इ. प्रधानांनी राजाराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण केले आणि राजास कैद करण्यासाठी पन्हाळ्याकडे कूच.

एप्रिल 1680 : छत्रपती संभाजीराजांनी पन्हाळ्यावर राज्याची सर्व सूत्रे आपल्याकडे घेऊन स्वतःस राजा म्हणून घोषीत केले.

मे-जून 1680 : सेनापती हंबीररावाने अण्णाजी दत्तो, मोरोपंतादी प्रधानांना कैद करून छत्रपती संभाजीराजांसमोर हजर केले.

18 जून 1680 : छत्रपती संभाजीराजे पन्हाळ्याहून रायगडास आले.

20 जुलै 1680 : छत्रपती संभाजीराजांचे मंचकारोहण झाले.

30 डिसेंबर 1680 : छत्रपती संभाजीराजांची सुवर्णतुला करण्यात आली.

16 जानेवारी 1681 : छत्रपती संभाजीराजांचा रायगडावर राजाभिषेक. त्या सुमारास अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी इ. अधिकाऱ्यांची मुक्तता व पूर्वीच्या पदांवर स्थापना करण्यात आली.

फेब्रुवारी 1680 : मराठ्यांनी धरणगाव लुटले.

मे-जून 1681 : शहाजादा अकबर छत्रपती संभाजीराजांच्या आश्रयास आला.

जून-जुलै 1681 : छत्रपती संभाजीराजांवर पन्हाळ्यावर विषप्रयोग. अकबराच्या मदतीने पदच्युत करण्याचा प्रधानांचा प्रयत्न.

18 जुलै 1681 : मराठ्यांचा उंदेरीवर हल्ला.

ऑगस्ट 1681 : अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी इ. कटवाल्यांना देहान्ताच्या शिक्षा दिल्या.

21 ऑगस्ट 1681 : औरंगजेबाने शहाजादा आज्जम यास अकबराच्या पारिपत्यास दक्षिणेत पाठविले.

8 सप्टेंबर 1681 : औरंगजेब स्वतः अजमीरहून दक्षिणेकडे निघाला.

नोव्हेंबर 1681 : मराठ्यांची 25 हजारांची फौज अहमदनगरवर चालून गेली.

11 नोव्हेंबर 1681 : औरंगजेबाने हसन अलीखनास तळकोकणच्या मोहिमेवर पाठविले.

13 नोव्हेंबर 1681 : औरंगजेब बुऱ्हाणपुरास आला. त्याच दिवशी कोकणात छत्रपती संभाजीराजे अकबर यांची पहिली भेट झाली 

नोव्हें. डिसें. 1681 औरंजेबने शहाजादा आज्जम, चिनकी लिचखान, बहादुरखान यांना स्वराज्यावर चढाईस धाडले.

डिसेंबर 1681 : छत्रपती संभाजीराजे सिद्यींच्या दंडराजापुरीस वेढा दिला.

जानेवारी 1682 : छत्रपती संभाजीराजांचा दंडापुरीवर जोरदार हल्ला केला.

एप्रिल 1682 : मराठ्यांच्या फौजेची मेहेकर (बुलढाणा) जालना या प्रदेशात धामदूम.

18 मे 1682 : छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे यांचा जन्म झाला.

जून 1682 : छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात मोहिमेवर म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याच्याशी युद्ध. म्हैसुरकरांची माघार. संभाजी राजास खंडणी कबूल.

जुलै 1682 : शहाबुद्दीनखानाचा रामसेजच्या किल्ल्यास वेढा.

ऑगस्ट 1682 : सिद्यी मोगलांचे चाकर झाले.

सप्टें. 1682 : शहाजादा मुइजुद्दीन मराठ्यांचा मोड करण्यासाठी अहमदनगरकडे निघाला.

डिसेंबर 1682 : मराठी फौजा जालना परीसरात दाखल झाल्या.

जानेवारी 1683 : छत्रपती संभाजीराजे कर्नाटकातून परत. शहाजादा आज्जम कोल्हापूरच्या बाजूस. हंबीररावाकडून पाठलाग. मराठा सरदार माणको बल्लाळ पाच हजार फौजेसह नळदुर्ग प्रदेशात मोहिमेवर. हसनअलीखानाची तळकोकणात स्वारी.

मार्च 1683 : मराठे व मोगल यांची पेडगावजवळ लढाई.

15 एप्रिल 1683 : छत्रपती संभाजीराजांचा तारापूर (पोर्तुगीज) वर हल्ला केला.

एप्रिल-मे 1683 : मराठे औरंगबादेच्या परिसरात: प्रदेश उद्ध्वस्त.

जून 1683 : छत्रपती संभाजीराजे पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील राज्याच्या स्वारीवर निघाले.

ऑगस्ट 1683 : छत्रपती संभाजीराजांचा चौलच्या ठाण्यास वेढा. तोफांची मारागिरी. पोर्तुगीज शिबंदीची दयनीय अवस्था.

13 सप्टेंबर 1683 : शहाजादा मुअज्जमची द. कोकणच्या स्वारीवर रवानगी. शहाबुद्दीखानची उत्तर कोकणावरील मोहिमेवर रवानगी.

ऑक्टो. नोव्हें. 1683 : पोर्तुगीजांचा उत्तरेकडील दमन ते चौल हा प्रदेश मराठ्यांकडून काबीज करण्यात आला.

1 नोव्हें. 1683 : पोर्तुगीज व्हाईसरॉयचा फोंड्यास वेढा.

12 नोव्हेंबर 1683 : छत्रपती संभाजीराजांकडून फोंड्याच्या पायथ्याशी पोर्तु. व्हाईसरॉय पराभूत. पोर्तु. सैन्यांची दाणादाण.

24 नोव्हेंबर 1683 : गोव्याजवळचे जुवे बेट छत्रपती संभाजीराजांच्या ताब्यात. जुवे बेटावर पोर्तुगीजांचा पराभव.

डिसेंबर 1683 : छत्रपती संभाजीराजांची पोर्तुगीजांच्या साष्ट बारदेश प्रदेशात स्वारी केली.

2 जानेवारी 1684 : छत्रपती संभाजीराजे रामगडाकडे गावाला झाले.

4 जानेवारी 1684 : शहाजादा मुअज्जम कोकणात उतरला. पुढे कुडाळ इ. गावे जाळली. मराठे-पोर्तु. तहाची बोलणी सुरू. सुपे, बारामती, इंदापूर येथे मोगली ठाणी.

फेब्रुवारी 1684 : शहाजादा मुअज्जमची माघार. लष्कराचे अतोनात हाल झाले.

मार्च 1684 : गाजिउद्दीनखान बहादुर पुणे प्रदेशावर रवाना.

ऑक्टो. 1684 : मोगली फौजा पुण्याच्या प्रदेशात. शिवापूर, शिरवळ काबीज केले.

30 ऑक्टो. 1684 : मानाजी मोरे, राहुजी सोमनाथ इ. छत्रपती संभाजीराजांकडून कैद करण्यात आले. 

नोव्हे. 1684 : उत्तर कोकणात औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्यासाठी अब्दुल कादरची मोहीम पाठवितो. मराठ्यांचा प्रतिकार. मोगलांकडे कोथळागड गेला. 

जाने. 1685 : मराठ्यांची संगमनेर भागात मोहिम. काही फौजा परिंड्याकडे. शहाजादा आज्जम बेळगाव-धारवाड भागात. गाजिउद्दीन खान रायगड भागात. कवि कलशाने पळवून लावला.

फेब्रुवारी 1685 : मराठ्यांची खान्देशवर स्वारी, धरणगाव लुटले.

फेब्रुवारी 1685 ते मे 1685 : मोगल मराठ्यांच्या सातारा भागात लढाया झाल्या.

मार्च 1685 : छत्रपती संभाजीराजांनी विजापूरच्या मदतीसाठी फौज पाठविली. मराठे व आदिलशाही सैन्य एकत्र मोगलांशी लढाई.

एप्रिल 1685 : मराठे सोलापूर भागात. मोगलांचा विजापूरला वेढा.

24 मे 1685 : औरंगजेब अहमदनगरहून सोलापुरास आला,

जून-जुलै 1685 : विजापूरच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीराजांनी कवि कलशाला पाठविले. कलशाने पन्हाळ्यावरून तिकडे फौजा रवाना केल्या.

ऑगस्ट- सप्टें. 1685 : मराठे व आदिलशाही फौज यांची मोगली फौजेचा संघर्ष सुरु होता.

नोव्हें. 1685 : मराठा सरदार नागोजी बल्लाळ सात हजाराची फौज घेऊन विजापूरच्या मदतीसाठी गाजीउद्दीनखानाशी लढाई करण्यात आली.

डिसेंबर 1685 : मराठ्यांची भडोजकडे मोहीम. मराठ्यांचा उंदेरी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न.

मार्च 1686 : मिरज, कोल्हापूर इ. भागात मोगलांच्या आक्रमक हालचाली वाढल्या.

मार्च-एप्रिल 1686 : मोगलांनी मिरजेचे ठाणे घेतले.

14 जून 1686 : औरंगजेब सोलापूरहून विजापूरकडे रवाना.

3 जुलै 1686 : औरंगजेब विजापूरजवळ आला.

12 सप्टें. 1686 : औरंगजेबाने आदिलशाही खालसा केली.

30 ऑक्टोंबर 1686 : औरंगजेब विजापुरहून गोवळकोंड्याकडे कूच केली.

ऑक्टो. 1686 : छत्रपती संभाजीराजांनी मंगळवेढ्याकडे फौज पाठविली. तिचा मोड करण्यासाठी इतिकादखान रवाना.

ऑक्टो. नोव्हें. 1686: छत्रपती संभाजीराजांनी कर्नाटकात हरजीराजे महाडीक यांच्या मदतीसाठी केसो त्रिमल व संताजी भोसले यास 12 हजार सैन्यासह पाठविले.

28 जाने. 1687 : औरंगजेब गोवळकोंड्याजवळ होता.

फेब्रु. 1687 : शहाजादा अकबर इराणकडे रवाना. केसो त्रिमल व संताजी भोसले कर्नाटकात पोहोचले.

22 सप्टें. 1687 : औरंगजेब गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करतो.

ऑक्टो. 1687 : वाईजवळ सर्जाखानाशी लढताना हंबीरराव मोहिते रणांगणी ठार झाले.

नोव्हें. डिसें. 1687 : पुणे प्रांतातील पाटस, कन्हेपठार इथे मोगली अंमल. रामसेजचा किल्ला मोगलांनी फितुरीने घेतला.

जाने. 1688 : नाशिक-बागलाण भागात मातबरखानाची मोहीम. पट्टा किल्ला घेतला.

जुलै 1688 : बागलाणातील होलगड मोगलांकडून काबीज केला.
ऑगस्ट 1688: मातबरखानाचा त्रिंबक किल्ल्यास वेढा घातला.

21 ऑगस्ट 1688 : माहुली गड फितुरीने मोगलांच्या हाती आला.
ऑक्टो.-नोव्हें. 1688 : कवि कलश व शिर्के यांच्यात झगडा. कलश पराभूत. छत्रपती संभाजीराजे मदतीस. शिर्त्यांचा पराभव व पलायन.
नोव्हें.-डिसें. 1688 : छत्रपती संभाजीराजांनी प्रल्हाद निराजी इ. अधिकाऱ्यांना कैदेत टाकले.

8 जाने. 1689 : त्रिंबक किल्ला मोगलांच्या हाती लागला.

1 फेब्रुवारी 1689 : छत्रपती संभाजीराजे खेळण्याहून रायगडाकडे रवाना झाले.

3/4 फेब्रुवारी 1689 : छत्रपती संभाजीराजे व कविकलश मुकर्रखानाकडून संगमेश्वरी येथे कैद करण्यात आले.

9 फेब्रुवारी 1689 : छत्रपती राजाराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण झाले.

15 फेब्रुवारी 1689 : छत्रपती संभाजीराजे व कवि कलश यांना बहादुरगडीच्या छावणीत औरंगजेबासमोर हजर करण्यात आले.

11 मार्च 1689 : छत्रपती संभाजीराजे व कवि कलश यांची बादशाही छावणीत वढू बु।। इथे अत्यंत क्रूरपणे हत्या.

स्वराज्यरक्षक, धर्मवीर संभाजी महाराजांची विजय असो. पहिल्या भागात आपण सरदेसाई वाडा आणि नावडी बंदर तर दुसऱ्या भागात पेडगांवजवळील धर्मवीरगड पाहिला. या भागात आपण श्री क्षेत्र तुळापूर आणि श्री क्षेत्र वढू बुद्रुक पाहणार आहोत. तुळापूर येथील भिमा, भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांच्या संगमावर छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूरपणे खून करण्यात आला. आज नमस्कार नको.. 

हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातला काळा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूदिन. धर्मवीरगडावर 29 दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर शंभूराजे आणि कवी कलशांना तुळापूर येथील त्रीवेणी संगमावर आणण्यात आलं. अखेर 40 दिवसांनी याठिकाणीच महाराजांनी देह ठेवला. खरंतर तुळापूर हे धर्मवीरगडापासून 90 किमी लांब आहे मग महाराजांना इतक्या लांब का आणलं गेलं, किंवा महाराजांची समाधी नेमकी कुठे आहे तुळापूर की वढु बुद्रूक. 







View, comment and share 

Post a Comment

1 Comments