Subscribe Us

header ads

Rabindranath Tagore : Bengali Poet, Writer, Philosopher and Social reformer

Rabindranath Tagore : Bengali Poet, Writer, Philosopher and Social reformer

रवींद्रनाथ टागोर: गुरुदेव ,कादंबरीकार, बंगाली कवी, आणि समाजसुधारक, नोबेल पुरस्कार प्राप्त

7 मे: जन्मदिन

7 आगस्ट: स्मृतिदिन


बालपण आणि शिक्षण:

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथील जोडासाको मधील ठाकूरवाडी या ठिकाणी एका प्रसिद्ध आणि समृद्ध कुटुंबात 7 मे 1861 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री देवेंद्रनाथ टागोर व आईचे नाव श्रीमती शारदा देवी हे होते. हे त्यांच्या आई-वडिलांचे तेरावे आपत्य होते. त्यांना लहानपणापासून रब्बी असे संबोधले जात होते. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजाचे वरिष्ठ नेते होते. 

त्यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर हे भारताचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांची जवळचे मित्र होते. बालपणापासूनच रवींद्रनाथ टागोर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे घरीच झाले व पुढील शिक्षक त्याने शिक्षण त्यांनी कोलकत्ता येथील प्रसिद्ध सेंट जेवियर शाळेतून पूर्ण केले.

 त्यांच्या वडिलांना त्यांनी बॅरिस्टर व्हावे असे वाटत असेल त्यामुळे त्यांनी रवींद्रनाथ यांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथील विश्वविद्यालयात पाठवले. परंतु 1880 मध्ये कोणतीही पदवी न मिळवता ते बंगालला परत आले.

बालवयापासूनच त्यांना साहित्याची आवड होती गोष्टी वाचणे कविता करणे व मनातल्या भावनांना कागदावर उतरू नये त्यांना खूप आवडायचे त्यामुळे साहित्य प्रतिमा त्यांच्यात फार लवकर विकसित झाली. त्यामुळे ते एक महान कवी विचारवंत आणि लेखक म्हणून त्यांचा वेगळे अस्तित्व निर्माण झाला. 

रवींद्रनाथ टागोर यांचा विवाह मृणालिनी देवी यांच्यासोबत 9 डिसेंबर 1883 मध्ये झाला. त्यांना एकूण पाच आपत्य झाली. पण त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला 1890 मध्ये सियालदा या ठिकाणी आपली मालमत्ता सांभाळण्यासाठी पत्नीला व मुलांना घेऊन ते त्या ठिकाणी गेले व त्या ठिकाणी त्यांना जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हाच काळ रवींद्रनाथ टागोर यांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो.

X X

बालवयात साहित्य निर्मिती:

बालपणापासूनच साहित्याकडे कल असल्याने ते एक महान कवी आणि प्रसिद्ध साहित्यकार म्हणून उदयाला आले अतिशय अवघ्या कमी वयात म्हणजे आठव्या वर्षी त्यांनी आपली पहिली कविता वनफुल, ज्ञानांकुर लिहिली आणि ते जेव्हा सोळा वर्षाचे होते. त्यावेळी 1877 साली त्यांनी एक लघुकथा भानोसे या टोपण नावाने लिहिली होती.

 रवींद्रनाथांनी जवळजवळ 230 हीच रचना केल्या आहेत शिवाय भारतीय संस्कृतीत विशेषतः बंगाली साहित्यात आपलं अमूल्य योगदान साहित्याच्या माध्यमातून अतुलनीय असे दिलेले आहे.


दोन देशाचे राष्ट्रगीत:

संपूर्ण विश्वातील ते एकमेव असे साहित्यिक आहेत की ज्यांच्या दोन साहित्याच्या रचना ह्या दोन देशाच्या राष्ट्रगीत झालेल्या आहेत.

भारताचे राष्ट्रगीत "जन गण मन" आणि बांगला देशाचे राष्ट्रगीत "अमर सोनार बांगला" या दोन रचना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले आहे.

तसेच श्रीलंकेचे राष्ट्रगीत ही रचना त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झालेले आहे.

x x

शांतिनिकेतनची स्थापना:

रवींद्रनाथ टागोर 1901 मध्ये सियालदा सोडून शांतिनिकेतन येथे राहावयास गेले. रवींद्रनाथ टागोर यांना निसर्ग प्रति अत्यंत प्रेम होते. ते निसर्ग सानिध्यात खूप रमत असत. त्यामुळे त्यांनी 1901 मध्ये पश्चिम बंगालमधील ग्रामीण क्षेत्रात असलेल्या शांतिनिकेतन मध्ये प्रायोगिक स्वरूपात एक शाळा व ग्रंथालयाची स्थापना केली. 




सुंदर असा बगीचाही केला. त्या ठिकाणी त्यांनी भारतातील आणि पश्चिम संस्कृतीला एकत्र आणण्याचा अद्भुत प्रयत्न केला विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात शिकावा असे त्यांना वाटत होते.

 त्यासाठी त्यांना चांगलं वातावरण मिळावं ही रवींद्रनाथाची इच्छा असल्यामुळे ते त्याच शाळेमध्ये वास्तव्य करून देखील राहत असत. याच काळात रवींद्रनाथांच्या पत्नीचा व दोन मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे अधिकाधिक लक्ष खेचू लागले. 

1921 साली शांतीनिकेतन चे विश्वभारती विद्यालय सुरू झाले. रवींद्रनाथ व कृषी अर्थतज्ञ लिओनार्द के एल्महिस्ट यांनी शांतिनिकेतन जवळील सुरूल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली या संस्थेचे पुढे श्री- निकेतन असे नामकरण झाले. 



श्री निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधीजींच्या स्वराज्य कल्पनेच्या विचाराला या माध्यमातून सहकार्य देण्याचा प्रयत्न रवींद्रनाथ टागोर यांनी केला.

X X

नोबेल पुरस्कारा प्राप्त करणारे पहिले भारतीय
"गीतांजली" काव्यसंग्रहास नोबेल पुरस्कार:

रवींद्रनाथ टागोर यांच्या "गीतांजली" या काव्यसंग्रहास जगाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार नोबल पुरस्कार हा 1913 मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध "गीतांजली" कविता संग्रह सोबत त्यांनी 50 हुन अधिक काव्यसंग्रह साहित्य ची निर्मिती केली. 

वयाची 50 वर्ष त्यांनी आपल्या देशात घालविली 51व्या वर्षी जेव्हा ते आपल्या मुलासोबत लंडनला जात होते. समुद्रमार्गे जात असताना प्रवासात त्यांनी त्यांच्या "गीतांजली" या कवितासंग्रहाचे एका नोटबुक मध्ये इंग्रजीत भाषांतर केले. 




लंडनमध्ये जहाजातून उतरताना नोटबुक असलेली सुटकेस त्यांच्या मुलाने तिथेच विसरली. पण एवढा मोठा ठेवा ही जगाच्या ऐतिहासिक कृती घडण्यासाठी होता म्हणून ज्याला ती सुटकेस ज्याला सापडली. त्याने ती दुसऱ्या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांना देऊन टाकली आणि ही भाषांतर केलेली वही इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांचे मित्र चित्रकार रोथेन स्टाईन यांनी गीतांजली चा अनुवाद स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी केल्याचे कळल्यावर त्यांनी "गीतांजली" वाचण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांचा तो मित्र डब्लू बी एटस ला "गीतांजली" बद्दल सांगितले आणि वाचण्यासाठी ती वही दिली आणि त्यानंतर जे घडले ते म्हणजे गीतांजलीच्या मूळ इंग्रजी आवृत्तीसाठी एट्सने सप्टेंबर 1912 मध्ये स्वतः अग्रलेख लिहिला. 

इंडिया सोसायटीच्या मदतीने गीतांजली या काव्यसंग्रहाच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रती प्रकाशित करण्यात आल्या. या पुस्तकाचे लंडनच्या साहित्यिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. त्यानंतर त्यांच्या कवितेतील मधुर शब्दांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले. 

त्यावेळी पहिल्यांदाच पाश्चिमात्य जगाला भारतीय बुद्धीमत्तेची ची झलक दिसली. " गीतांजली" काव्य प्रकाशित झाल्याच्या एक वर्षा नंतर 1913 मध्ये त्यांना जगातील सर्वोच्च बहुमान असलेले साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

x x

छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता:

रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे आणि महाराष्ट्राचे नाते हे खूप जुने आहे की महाराष्ट्रात असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक कविता लिहिली आणि ही कविता पु ल देशपांडे यांनी मराठीत अनुवादित केली.


छत्रपती शिवाजी महाराज उत्सव


हे राजा शिवाजी,
कोण जाणे कधी काळी मराठ्यांच्या देशी
कडे कपरीतील राणी वनी अंधारात
विधूल्तेसारखी चमकून गेली तुझ्या मनात प्रतिज्ञा
विसकटलेल्या विदीर्ण झालेल्या भारत देशाला
मी स्वराज्य धर्माच्या सूत्रात जोडून घेईन
त्या दिवशी हा वंग देश झोपूनच राहिला.
नाही आला तो धावून बाहेर, नव्हता काही संदेश
नव्हता शुभंकर शंखनाद
बसले होते शांतमुखी ग्रामवासी सारे, निवांत, स्वस्थ
आणि तिकडे मराठ्यांच्या प्रांती
चेतवलेस अग्निकुंड तू
युगांतच्या क्षितिजावर विद्युत अग्निने
त्या प्रलयकारी समयी थरारला तूरा मोगलांच्या शिरपेचातल्या
एखाद्या पिकल्या पानाप्रमाणं


हे शिवाजी राजा
हे राज तपस्वी वीरा, तुझी ती उदात्त भावना
विधात्याच्या भांडारात जतन करण्यात आली आहे.
काळाला त्याचा एक कण देखील नष्ट करता येईल का ?
तुझा प्राण यज्ञ स्वदेश लक्ष्मीच्या मंदिरातील तुझी साधना
आज भारत देशाचं रण बनली आहे युगानुयुगांसाठी
हे राज्य संन्यासा निर्झर जसा पथर विदीर्ण करून होतो जागा
तसा तू प्रकटलास दीर्घकाळ आज्ञातात राहून
सारं जग झालं विस्मयचकित
सार्याग आकाशाला भरून टाकते ज्यांची पताका
तो हा शिवराया इतका काळ इतका लहानगा होऊन
कुठं बरं झाकून राहिला होता आजवर
मी पूर्व भारतातील कवी काही अपूर्व दृश्य पाहतोय
बंगालच्या अंगणात कशी रे दुमदुमली तुझी नौबत
तीन शतकांची गाढ अंधारातील रात्र दूर सारून
कसा रे तुझा प्रताप उगवला आहे आज पूर्व क्षितिजावर
सत्य मरत नसते कधीच
उपेक्षेने वा अपमानाने, शतकानुशतकं विस्मृतिच्या तळाशी
तळपलं गेलं तरीही
हे राजन आज आम्ही तुला ओळखलं रे ओळखलं
तू तर महाराजा आहेस आठ कोटी वंगपुत्र उभे आहेत आज
तुझे राज कर आपल्या हाती घेण्यासाठी
त्यावेळी नाही रे ऐकले तुझं सांगणं
आता मात्र शिरोधार्य मानू तुझे आदेश
सारा भारत देश आता एक होईल.
तुझ्या ध्यान मंत्रावर
फडकवू आम्ही ध्वजा बनवून वैराग्याची उत्तर्याची
तेच रे आम्हा दरिद्री लोकांचे समर्थ
या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार
या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आमचे पाथेय
हे वंग वासियांनो म्हणा आज एक स्वरात मराठ्यांसह
शिवाजी महाराजांचा विजय असो
हे वंग वासियांनो चला तर आज सजून धजून महोत्सवाला मराठ्यांसह एकत्र
आज एकाच वास्तवानी पूर्व पश्चिम एक होतील भारत देशाचे युद्धाशिवाय
करतील गौरव एका पुण्य नामाचा, एका पुण्य नामाचा 
माराठीर साजे आजे हे बंगाली
एक कंठे बोलो,
जयतु शिवाजी.


"जन गण मन " भारताचे राष्ट्रगीत:

घटना समितीने 24 जानेवारी 1950 मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे 52 सेकंदांचा वेळ लागतो.

27 डिसेंबर 1911 रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’ हे गीत सर्वप्रथम अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.

X X

जन गण मन : राष्ट्रगीत

(पूर्ण गीत)

जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||



राष्ट्रगीत कधी म्हणावे:

1. स्वातंत्र्यदिन
2. प्रजासत्ताक दिन
3. मा. राष्ट्रपती यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
4. राज्यपाल, उप राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
5. लष्करी रेजिमेंटला राष्ट्रध्वज प्रदान करताना
6. नौदलात राष्ट्रध्वज उभारण्यात येत असताना
7. शासकीय कार्यकम प्रसंगी

X X

ग्रंथ संपदा /साहित्य निर्मिती:

1. गीतांजली काव्यसंग्रह नोबल पुरस्कार प्राप्त

2. गल्पगुच्छ नावाचा 84 कथा असलेला तीन खंडी पुस्तक प्रकाशित 

3. अपूर्व संसार (अपुचे जग)

4. पुनश्च (1932) शेष सप्तक (1935) पत्र पूत 1936 आदी गद्यपद्यांचा पंधरा खंड संपादित केले.

5. दुई बोन दोन बहिणी (1933) मुलंच (1934) चार अध्याय (1934) कादंबऱ्या प्रकाशित.

6. चित्रांगदा शामा (1939) चंडालिका (1938 ) विसर्जन, राजा, माहेर खेला, नृत्य नाटिका, नाटके 

7. छत्रपती शिवाजी महाराज उत्सव कविता

8. चतुरंग, शेषर कविता (शेवटच्या कविता) कवितासंग्रह

9. चार अध्याय ,नका डुबी , घरे बाईरे लघु कादंबऱ्या

चतुरंग ही कादंबरी

10. गोरा प्रसिद्ध कादंबरी

11. 2230 गीतांचा रवींद्र संग्रह

12. वाल्मिकी प्रतिभा नावाचे संगीत नृत्य नाटक

13. "एप "कथांचा संग्रह हिबरू भाषेतील इजराइल मधील सार पब्लिशिंग हाऊसने 2006 साली प्रसिद्ध केला.

14. साधना, भारती व वंगदर्शन या मासिकांचे संपादन

15. पोस्ट ऑफिस, चित्रा, द गार्डनर, लिपिका, द गोल्डन बोट हे साहित्य निर्मिती


पुरस्कार व सन्मान:

1. गीतांजली या रचने करिता 1913 मध्ये जागतिक कीर्तीचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय.

2. अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.

3. ब्रिटिश सरकारने त्यांना 1915 मध्ये "सर" ही पदवी दिली पण 1919 च्या पंजाबातील जालियनवाला बगेत इंग्रज सरकारने निरपराध भारतीयांना गोळ्या मारून ठार केले त्याच्या निषेधार्थ "सर" ही पदवी सरकारला परत केली.

4. कलकत्ता विद्यापीठाने मानद डि.लीट. हे पदवी देऊन गौरविले.

5. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून डॉक्टरेट ची पदवी प्रदान करण्यात आली.


निधन:

नोबेल पारितोषिक विजेते, एक कवी एक लेखक आणि एक लेखक नेता, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे निधन कलकत्ता मधील जोडासाको मधील ठाकूरवाडी या ठिकाणी 7 ऑगस्ट 1941 मध्ये निधन झाले. त्यांचे आयुष्याच्या शेवटचे चार वर्ष दीर्घ आजार व दुःखात गेले.



















XX


https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/may-7-day-of-special-dinvishesh.html

👆

May 7 - Day of Special (Dinvishesh)

मे 7 : दिनविशेष


View, Comments and share......

X X


https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/nobel-prize-bhartiya.html

👆

Nobel Prize: The world's largest international award

नोबेल पुरस्कार: जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नोबेल पुरस्काराचे भारतीय मानकरी

Post a Comment

3 Comments