भाग- 1
तत्वज्ञान : उपनिषदे
Philosophy : Upanishade
प्राचीन भारतातील आर्यांचे तत्वज्ञान विषयक तत्त्वज्ञान उपनिषदात ग्रंथीत झाले आहे.
उपनिषद म्हणजे जवळ बसणे. अत्यंत भक्तिभावाने गुरु जवळ बसून परमार्थ विद्या गुरु कडून संपादन केली जाते त्या विद्याला उपनिषद् म्हणतात.
याची संख्या निश्चित सांगता येत नाहीत. पण मुक्तिक उपनिषदाच्या कथनानुसार उपनिषदांची संख्या 108 आहे. काहींनी ही संख्या 250 येवढी सांगितली आहे.
वैदिक वांड्मयात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना" वेदांत "असे ही म्हणतात. हे वेदांचे ज्ञानकांड असल्यामुळे त्यांना "ब्रम्हविद्या" हे नाव पडले.
X X
काही मंत्रात्मक असून काही गद्यात्मक आहेत.मंत्रात्मक उपनिषदात "मंत्रस्वर" आणि गद्यात्मक उपनिषदात "ब्राह्मणस्वर" म्हणतात. उपनिषदे तत्त्वज्ञान उपदेशीतात म्हणून त्यांना " ब्रह्मविद्या" म्हणतात.
प्राचीन व अर्वाचीन असे दोन विभाग पडतात.
पहिल्या विभागात ईश, केन, कठ, प्रश्न, मंडूक, मांडुक्य, तैतरेय, ऐतरेय, छंदोग्य, बृहदारण्यक ,श्वेताश्वतर ,कौषीतकी, व मैत्रयी यांचा समावेश होतो .
तर दुसऱ्या विभागात बृहज्जाबल, नारद , परिव्राजक ,महानारायण, सुबाल इत्यादी उपनिषदे येतात.
इ. स. पू. 1200 ते 600 हा कालखंड "उपनिषदकाल" म्हणून मानतात.
"बृहदारण्यक व छंदोग्य" ही उपनिषदे सर्वात प्राचीन आहेत." ईश व केन" ही उपनिषदे त्यानंतरची आहे.
मोगल सम्राट शहाजहान बादशहाचा मुलग दारा शिकोह याने दिल्ली येथे 50 उपनिषदांचा फारसी अनुवाद केला होता.
उपनिषद तत्वज्ञानाची रूपरेषा
X X
1. सृष्टीविषयक कल्पना
प्रजापतीने आपल्या तप सामर्थ्याने मायने व शक्तीने हे विश्व निर्माण केले.ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते व ज्यातच शेवटी विश्व विलीन होते ते आदीकारण असावे अशी कल्पना रूढ होऊन ब्रह्म हे विश्वाचे आदीकारण मानले गेले आहे . उपनिषदात "ब्रह्म " या कल्पनेचा विकास झाला. ब्रह्म हे सर्वत्र भरून राहिले आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे.
ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या लहानशा बियांमध्ये प्रचंड वटवृक्षाचा विस्तार निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. त्याच प्रमाणे ब्रह्माचे स्वरूप आहे.
ब्रह्म हे सर्वव्यापी व विश्वनियमक आहे. ते स्वयंभू व विद्येचे अधिष्ठान आहे .सर्व जग हे मिथ्या असून केवळ ब्रह्म हेच सत्य आहे. विश्व हे केवळ ब्रह्म मायेचा पसारा आहे. अशी विश्वाच्या विश्व निर्मितीची कल्पना उपनिषदात आहे. ब्रह्म विचाराची मुख्य बीजे 4 असून ती अथर्ववेदाच्या ब्रह्म सुक्तात निर्दिष्ट केलेली आढळतात.
2. आत्म्यासंबंधीचे विचार
आत्मा, परमात्मा, परब्रम्ह हे तिन्ही शब्द उपनिषदात सामान्यपणे एकाच तत्त्वाचा बोध करतात. शाश्वत आत्मतत्वाला उपनिषदात महत्त्व देण्यात आले आहे .
प्रारंभी जीव हे शरीराहून निराळे तत्त्व आहे. वाचारहित, नेत्ररहित व मनोरहित असा प्राणी जगू शकतो, पण प्राणा वाचून मात्र तो जिवंत राहू शकत नाही. असे कौषीतकी उपनिषदात म्हटले आहे.
छंदोग्य उपनिषदात तो तेज, आप व अन्न यांचा बनला आहे,असे म्हटले आहे. जीव हा बुद्धी व आत्मतत्त्व यांच्या मिश्रणाने बनला आहे. कारण आत्म्यानेच जीवरूपाने शरीरात प्रवेश केला आहे.असे ऐतरेय उपनिषदात म्हटले आहे. पुढे आत्मतत्वापासूनच आकाश, आकाशापासून वायू ,वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, आप पासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती , वनस्पती पासून अन्न व अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला असा क्रम आहे.
उपनिषदात म्हटले आहे की मानवाच्या भौतिक देहहापलीकडे विज्ञानमय कोश आहे. त्यांच्या आत मनोमय कोश आहे व त्यांच्या पलीकडे अंतर्यामी आनंद हेच खरे मानवी स्वरूप आहे आणि या सर्वांच्या पलिकडे परमात्मा आहे. आत्मा हा अमर असून त्याला मृत्यू नाही. देह मात्र नाशवंत आहे.
आत्मा हा मोहरिपेक्षा लहान व पृथ्वीपेक्षा मोठा आहे. ब्राह्म व आत्मा यांचे स्वरूप एकाच आहे. आत्म्याचे अमरत्व आणि देहाचा नशवांतपणा सर्वच उपनिषद कारांनी मान्य केले आहे.
X X
3. पुनर्जन्म व कर्मविषयक विचार
उपनिषदे अनेक आहेत त्यामुळे तात्विक सिद्धांत विषयी निरनिराळी मते प्रदर्शित होणे स्वाभाविक आहेत .पण माणसाचा पुनर्जन्म उपनिषदांनी मानला आहे. मृत्युने देहाचे अस्तित्व संपते. परंतु आत्म्याचे नाही आत्मा अनेक योनीतून फिरतो. मृत्यूनंतर माणसाचा देह पंचमहाभूतात्मक विलीन होतो . पापी, दुष्ट लोकांना परलोकात स्थान नाही. त्यांच्या देहा बरोबर त्यांचा आत्मा सुद्धा खोलगत जातो. पुण्य करणारे आत्मे स्वर्गलोकात जातात व पापी लोक अधोगतीला जातात. स्वर्गीय आत्म्यांना पुनर्जन्म टाळण्यासाठी यज्ञाची कल्पना उपनिषदात मानली आहे.
छांदोग्य व बृहदारण्य उपनिषदात पुनर्जन्माची कल्पना पहिल्यांदा आली. शुभ मार्गाने राहणाऱ्या जीवांचे आत्मे पितृलोकात जातात. त्यानंतर चंद्र लोकात जातात आणि नंतर ते स्त्री योनीतुन पृथ्वीवर पुन्हा येतात. संन्याशी,परिव्राजक हे ब्रम्हलोकात जातात. पापी लोक कृमी कीटकच्या रुपाने जन्म घेतात. जो चांगले कर्म करतो तो कर्माचा अधिकारी बनतो. चांगल्या वाईट कृत्य यानुसार पुनर्जन्माचे फळ मिळते.
क्रमशः....
Comment and share..
2 Comments
खूप छान
ReplyDeleteVery good information
ReplyDelete