June 9 - Day of Special (Dinvishesh)
जुन 9 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
जागतिक ऐंटिफॉस्फोलिपिड सिंड्रोम (एपीएस) दिवस (World Antiphospholipid Antibody Syndrome (APS) Day)
डोनाल्ड डक डे (Donald Duck Day): नॅशनल डोनाल्ड डक डे दरवर्षी 9 जून रोजी एका मजेदार ॲनिमेटेड कार्टून पात्राच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. डोनाल्ड डकने 9 जून 1934 रोजी द वाईज लिटल हेन या चित्रपटातून पहिले पडद्यावर पदार्पण केले.
9 जून रोजी प्रवाळ त्रिकोण दिवसाची स्थापना करण्यात आली. कोरल त्रिकोण दिवस (Coral Triangle Day): सागरी जैवविविधतेचे जगाचे केंद्रबिंदू असलेल्या कोरल ट्रँगलवर, विशेषत: सागरी जैवविविधतेचे केंद्रबिंदू असलेल्या सागरी संवर्धन आणि संरक्षणाविषयी जागरुकता साजरी करण्यासाठी आणि जागरुकता वाढवण्यासाठी
9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात त्यांचा अतोनात छळ केला. मृत्यूनंतर लोकांनी "जननायक" हा किताब बिरसा मुंडा यांना बहाल केला.
9 जून 1980 मध्ये महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री म्हणून अब्दुल रहमान अंतुले यांनी पदभार स्वीकारला ते 12 जानेवारी 1982 पर्यंत मुख्यमंत्री होते.
9 जून 1964 रोजी लालबहदूर शस्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात 1965 सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना 11 जानेवारी 1966 रोजी विषप्रयोग झाल्यामुळे मृत्यू झाला.त्यांनी "जय जवान जय किसान" नारा दिला.
X X
9 जून 68 रोजी रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.
X X
9 जून 1959 रोजी दादर येथील बलुची प्रमुख जीवन खान यांनी दारा शिकोह यांना फितुरीने औरंगजेब यांच्या हवाली केले.
9 जून 1665 रोजी मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
9 जून 1696 रोजी छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव "शिवाजी" असे ठेवले.
9 जून 1700 रोजी दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
9 जून 1866 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
X X
9 जून 1890 रोजी गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य होऊन साप्ताहिक सुट्टी सुरुवात झाली.
9 जून 1906 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण
9 जून 1907 रोजी नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ 12 धावांत सर्वबाद.
9 जून 1923 रोजी बल्गेरियात लष्करी उठाव झाला.
9 जून 1931 रोजी रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्या रॉकेटचे पेटंट मिळाले.
X X
9 जून 1935 रोजीएडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
9 जून 1946 रोजी राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
9 जून 1917 रोजी अॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
9 जून 1974 रोजी सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
X X
9 जून 1975 रोजी ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
9 जून 1986 रोजी मुंबई येथे पहिला एड्स रुग्ण सापडला.
9 जून 1997 रोजी सुखोई-30 के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
सुखोई-30
9 जून 2001 रोजी भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
9 जून 2004 रोजी कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
9 जून 2006 रोजी 18 वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.
9 जून 2007 रोजी बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे 130 लोक ठार झाले.
9 जून 1672 रोजी रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 फेब्रुवारी 1725 मध्ये झाला.
X X
9 जून 1781 रोजी जॉर्ज स्टिफन्सन, आगगाडीचा जनक यांचा जन्म झाला.
9 जून 1845 रोजी भारताचे 36वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म झाला. त्यांचा प्रत्येक मार्च 1914 मध्ये झाला.
9 जून 1897 रोजी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म झाला.
9 जून 1909 रोजी भारतीय राज्य छत्तीसगढचे स्वातंत्र्य सेनानी व युनानी चिकीत्सक व वैद विशारद लक्ष्मण प्रसाद दुबे यांचा जन्म झाला.
9 जून 1912 रोजी संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 डिसेंबर 1975 मध्ये झाला.
9 जून 1913 रोजी प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकीय नेता चौधरी दिगंबर सिंह यांचा जन्म झाला.
9 जून 1931 रोजी भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 ऑगस्ट 2006 मध्ये झाला.
X X
9 जून 1947 रोजी प्रख्यात भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस अधिकारी व पंदुचेरी येथील विद्यमान उपराज्यपाल किरण बेदी यांचा जन्म झाला.
9 जून 1949 रोजी सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म झाला.भारतीय प्रशासकीय सेवेची सर्वोच्च परीक्षा वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी उत्तीर्ण होऊन आयपीएसमध्ये दाखल होणारी पहिली भारतीय महिला किरण बेदी अशी ओळख आहे. त्यांचा जन्म 9 जून 1949 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. माहेरच्या किरण पेशावरिया म्हणजेच किरण बेदी. किरण बेदी यांना बालपणी टेनिस खेळ खूप आवडायचा. किरण बेदी या राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनिअर लॉन टेनिस खेळाडू होत्या. किरण बेदी यांनी अमृतसरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन येथून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर चंदिगड येथील पंजाब विद्यापिठातून सोशल सायन्स मध्ये मास्टर्स पूर्ण केले. 1988 साली दिल्ली विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली.16 जुलै 1972 रोजी भारतीय पोलीस दलात 'पहिला महिला अधिकारी' म्हणून प्रवेश केलेल्या किरण बेदींनी 1973 च्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व केले होते. अनेक पोलीस शौर्य पदकांबरोबर राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळवले. एशिया रिजन अवार्ड, जवाहरलाल नेहरू सॉलिडॅरिटी अवॉर्ड, रेमन मॅगसेसे अवार्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एक कठोर पोलिस अधिकारी अशी त्यांनी ख्याती होती. तिहार तुरुंगात अधिकारी असतानाही त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखविल्या. एक महिला पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण कारकिर्दीत प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कार्यकर्तृत्वासाठी नवी क्षेत्रे स्वीकारण्याची हिंमत किरण बेदींनी दाखवली आहे.
किरण बेदी
9 जून 1981 रोजी इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म झाला.
X X
9 जून 1716 रोजी बंदा बहादुर, शीख सेनापती यांचा मृत्यू झाला.
9 जून 1834 रोजी अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन झाले. यांचा जन्म 17 ऑगस्ट 1761 मध्ये झाला.
9 जून 1870 रोजी इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 812 मध्ये झाला.
9 जून 1931 रोजी भारतीय स्वातंत्र्य सेनानी हरि किशन सरहदी यांचे निधन झाले.
9 जून 1946 रोजी थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन झाले. यांचा जन्म 20 सप्टेंबर 1925 मध्ये झाला.
9 जून 1988 रोजी अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन झाले.
9 जून 1991 रोजी राज खोसला, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता यांचे निधन झाले.
9 जून 1993 रोजी बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1916 मध्ये झाला.
9 जून 1995 रोजी स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1900 मध्ये झाला.
9 जून 1997 रोजी इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन झाले.
9 जून 2000 रोजी कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन झाले.
9 जून 2011 रोजी चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन झाले.
9 जून 2024 मध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी T-20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाला.
9 जून 2024 मध्ये आयोध्येमध्ये महाराष्ट्र सदनाला दोन एकर जागा शरयू नदीच्या किनारी ही जागा केंद्र सरकारने दिली. महाराष्ट्र सरकारने या जागेची मागणी केली होती. भारतातील कॅबिनेट मंत्री यांनी या मागणीला मान्यता दिली.
9 जून 2024 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ सायंकाळी 7:15 वाजता दिल्ली या ठिकाणी घेतली. त्यांना पंतप्रधान पदाची शपथ भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म यांनी दिली. हा शपथविधी राष्ट्रपती भवन या ठिकाणी संपन्न झाला. त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुका पार पडल्यानंतर भाजपा व मित्र पक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या त्यामुळे एनडीए- मित्र पक्षांनी नरेंद्र मोदी यांना आपला संसदीय नेता निवडला. त्यानंतर मागील सरकारमध्ये असलेले गृहमंत्री तथा रक्षाबंधन राजनाथ सिंग यांनी शपथ घेतली. मागील सरकारमध्ये असलेले गृहमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष राहिलेले अमित शहा यांनी सुद्धा शपथ घेतली. मागील सरकारमध्ये असलेले हायवे मंत्री म्हणून ओळखले जाणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातून सतत तिसऱ्यांदा निवडून आलेले. माजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन जयराम गडकरी यांनी सुद्धा मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर हिमाचल प्रदेश कोट्यातून मधून तथा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उर्फ जगात प्रसाद नड्डा यांनी शपथ घेतली. त्यानंतर शिवराज सिंह चव्हाण यांनी शपथ घेतली हे मध्य प्रदेशचे अनेक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मध्यप्रदेशचे चार बार मुख्यमंत्री राहिलेले. खासदार म्हणून सहा वेळेस निवडून आले आणि आमदार म्हणून विदिशा विधानसभा मतदारसंघातून सहा वेळेस निवडून आलेले शिवराज सिंह चव्हाण आहेत. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी शपथ घेतली. मागील सरकार मध्ये त्या वित्तमंत्री म्हणून कार्यरत होत्या. त्या कर्नाटक राज्यातील राज्यसभा सदस्य आहेत. मध्यंतरीच्या काळात मागील सरकारमध्ये रक्षामंत्री आणि वाणिज्य मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. त्यानंतर डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांनी शपथ घेतली. मागील सरकार मध्ये विदेश मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. गुजरात राज्यातून ते राज्यसभेवर निवडून आलेले आहेत. मागील सरकारमध्ये काही काळ विदेश सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. त्यानंतर मनोहर लाल यांनी शपथ घेतली. कर्नाल लोकसभा मतदारसंघ हरियाणा मधून ते निवडून आले. ते मागील काळात हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये निवडून आलेले एचडी देवेगौडा यांचा मुलगा एच डी कुमार स्वामी यांनी शपथ घेतली. दक्षिण कर्नाटक मांड्या या विधान लोकसभेतून निवडून आलेले आहेत देवेगौडा. त्यानंतर नॉर्थ मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार पियुष वेदप्रकाश गोयल यांनी शपथ घेतली.मागील सरकारमध्ये वाणिज्य उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मागील सरकारमध्ये राज्यसभेचे सदस्यत्व त्यांच्याकडे होते. यावेळेस ते 2024 मध्ये पियुष गोयल पहिल्यांदा लोकसभेचे खासदार झालेले आहेत. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा लोकसभेवर मध्य प्रदेशातून खासदार म्हणून निवडून आले. मागील पहिल्या सरकारमध्ये हे पेट्रोलियम मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यानंतर काही काळ त्यांनी दुसऱ्या सरकारमध्ये केंद्रीय शिक्षा मंत्री म्हणून काम केले. त्यावेळेस ते ओरिसा राज्यातून संबल्पुर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर हिंदुस्तानी आवाज मोर्चाचे मागील सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले बिहार गया मधून लोकसभा संघातून निवडून आलेले जिताम राम मांझी यांनी शपथ घेतली. त्यानंतर राजीव रंजन सिंह यांनी शपथ घेतली. ते बिहार मधील मुंगेर या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. ते जे डी यु या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर सर्वानंद सोनेवाल यांनी शपथ घेतली ते आसाम राज्याचे माजी मुख्यमंत्री असून दिब्रुगड लोकसभा मतदारसंघातून ते बीजेपी चे खासदार आहेत. त्यानंतर डॉ. वीरेंद्र कुमार यांनी शपथ घेतली डॉक्टर वीरेंद्र कुमार हे टिकमगड मध्य प्रदेशातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये ते प्रोटेन स्पीकर म्हणून त्यांनी काम केले. प्रथम आणि द्वितीय मोदी सरकारमध्ये ते मंत्री म्हणून राहिलेले आहे. 1996 पासून ते सतत टीकामगड या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर राममोहन नायडू यांनी शपथ घेतली. ते तिसरी बार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. श्रीकाकुलाम लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहे. त. ते टीडीपी या पक्षाचे आहेत. त्यानंतर कर्नाटक मधून धारवाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले प्रल्हाद जोशी यांनी शपथ घेतली. या मतदारसंघातून ते सतत पाच वेळेस भाजपा या पक्षाकडून निवडून आलेले आहेत. मागील मोदी सरकारमध्ये ते खदान व कोयला मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर जुवेल कोराव यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. ते सहा वेळेस सुंदरगड आसाम लोकसभा खासदार म्हणून आसाम राज्यातून निवडून आलेले आहेत. पहिल्या मोदी सरकारमध्ये ते आदिवासी समाजाचे कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेले आहेत. बिहार राज्यांमधून बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले गिरीराज सिंग यांनी शपथ घेतली, ते तिसऱ्यांदा खासदार झालेले आहेत. मोदी सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी शपथ घेतली अश्विनी वैष्णव हे ओरिसा राज्यातून राज्यसभा खासदार खासदार म्हणून निवडून आलेले आहे. दुसऱ्या मोदी सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यानंतर मध्य प्रदेशातून निवडून आलेले खासदार ज्योतीरादित्य माधवराव शिंदे यांनी शपथ घेतली, ते मध्यप्रदेशातील गुना या लोकसभा मतदारसंघातून पाच वेळेस निवडून आलेले आहेत. 2021 मध्ये ते नागरी उड्डायन मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर भूपेंद्र यादव यांनी शपथ घेतली. अलवार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून ते निवडून आले. भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते. मोदी सरकार द्वितीय मध्ये ते केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. राजस्थान जोधपुर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आलेले गजेंद्रसिंह शेखावत यांनी शपथ घेतली. मोदी सरकार द्वितीय मध्ये ते जलशक्ती मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. जोधपुरून ते सतत तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. झारखंड राज्यातून कोडर्मा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी शपथ घेतली. दुसऱ्या मोदी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. किरण रेजीजू यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली, ते अरुणाचल प्रदेश मधून चौथ्यांदा निवडून आले होते. मोदी सरकार एक आणि दोन मध्ये ते मंत्री म्हणून कार्यरत होते. हरदीप सिंह पुरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दोन्ही मागील मंत्रिमंडळामध्ये शहर विकास मंत्री म्हणून काम केले. ते बीजेपी चे राज्यसभा खासदार आहेत. युपी उत्तर प्रदेश मतदारसंघातून. मोदी सरकार मध्ये त्यांनी पेट्रोलियम मंत्री म्हणून सुद्धा काम केले आहे. डॉ. मनसुख मांडविया यांनी अंदमान निकोबार मधील लोकसभा मतदारसंघ पोर्ट ब्लेअर मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी शपथ घेतली. 2012 पासून ते सतत राज्यसभा खासदार म्हणून राहिलेले आहेत. मोदी सरकार द्वितीय मध्ये ते स्वास्थ्य मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. जी. किशन रेड्डी यांनी शपथ घेतले तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. त्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. मोदी सरकार द्वितीय मध्ये त्यांनी मंत्री पद सांभाळले होते. 2012 ते 18 या दरम्यान ते सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघाचे आमदार होते. लोक जनशक्ती पार्टी राम विलास पासवान यांच्या पार्टीचे चिराग पासवान हाजीपुर एल जे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. गुजरात राज्यातून नवसारी विधान लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आलेले सीआर पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. बीजेपी चे अध्यक्ष म्हणून त्यांनी गुजरात राज्याचा कार्यभार सांभाळला होता. नवसारी लोकसभा मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये देशात सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले खासदार होते. गुडगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले खासदार राव इंद्रजीत सिंग यांनी शपथ घेतली. ते गुडगाव लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून आले. पहिल्या मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. डॉक्टर जितेंद्र सिंग उधमपुर लोकसभा मतदारसंघातून सतत तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले खासदार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते मोदी सरकार प्रथम आणि द्वितीय मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार सांभाळला होता. उधमपुर या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. अर्जुन राम मेघवाल हे बिकानेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे 2009 मधून सतत चारबार निवडून आलेले खासदार आहेत. मागील मोदी सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले होते. मोदी सरकार मध्ये संसदीय कार्य मंत्रि म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर प्रतापराव गणपतराव जाधव महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली. ते पहिल्यांदा मंत्री होत आहेत. आरएलडी चे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ते 2024 मध्ये एनडीए मध्ये सामील झाले. 2022 मध्ये ते राज्यसभेचे खासदार होते. जितेंद्र प्रसाद पिलीभीत लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे खासदार माजी केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेश यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते तीन वेळेस लोकसभा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. श्रीपाद यशो नाईक यांनी नॉर्थ गोवा या लोकसभा मतदारसंघातून सहा वेळेस लोकसभेवर निवडून आलेले खासदार आहेत. ते मोदी सरकार एक आणि दोन मध्ये मंत्री राहिलेले आहेत. पंकज चौधरी हे उत्तर प्रदेशातील महाराज गंज असे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत. 2024 मध्ये ते सातव्या वेळेस खासदार झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे. कृष्णपाल गुज्जर फरीदाबाद लोकसभा मतदारसंघातून तीन वेळेस निवडून आलेले खासदार आहेत. ते मोदी सरकार एक आणि दोन मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. ते बीजेपी चे हरियाणा राज्याचे अध्यक्ष म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेचे खासदार म्हणून असलेले रामदास आठवले यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरपीआय आठवले गटाचे ते अध्यक्ष आहेत. तीन वेळेस लोकसभेचे खासदार म्हणून ते राहिलेले आहेत. मोदी सरकार दोन मध्ये ते मंत्रि म्हणून कार्यरत होते. रामनाथ ठाकूर यांनी मंत्रीपदाचे शपथ घेतली. ते राज्यसभेचे दोन वेळेस खासदार राहिलेले आहेत. मागील काळात ते बिहार सरकार मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून होते. मोदी सरकार प्रथम मध्ये ते मंत्री म्हणून कार्यरत होते. नित्यानंद राय बिहार मधील ओझियापुर लोकसभा मतदारसंघातील खासदार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. तिसऱ्यांदा बिहार मधून खासदार म्हणून निवडून आलेले आहे त. मोदी सरकार मध्ये ते गृहराज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. चार वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते बिहार मधून. बिहार मधून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. अनुप्रिया पटेल मिर्झापूर या मतदार संघातून आपणा दल एस या पक्षातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या. त्या तिसऱ्यांदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्या मागील सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत होत्या. वी सोमन्ना यांनी राज्यमंत्रीपदाचे शपथ घेतली. ते कर्नाटक राज्यातून पाच वेळेस भारतीय जनता पार्टीचे आमदार राहिलेले आहेत. दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. डॉ. चंद्रशेखर पेनास्वामी हे पहिल्यांदा खासदार झालेले आहेत. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते गुंटूर आंध्र प्रदेश या मतदार संघातून टीडीपीचे खासदार आहेत. प्रो. बघेल यांनी राज्यमंत्री पदची शपथ घेतली.एस पी सिंह बघेल हे उत्तर प्रदेशातील आग्रा मतदार संघातून खासदार आहेत. हे मागील मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते. शोभा करांदलजे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ही तिसऱ्यांदा लोकसभा खासदार म्हणून कर्नाटक राज्यातून बेंगलोरु उत्तर मधून निवडून आल्या आहेत. .त्या मोदी सरकार दोन मध्ये मंत्री होत्या . कीर्तीवर्धन सिंग चे उत्तर प्रदेशातील गोंडा लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीतून भाजपमध्ये येऊन खासदार झाले. लोकसभेचे ते पाचव्यांदा खासदार आहेत. ते 2014 मध्ये समाजवादी पार्टीतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बनवारीलाल वर्मा यांनी उत्तर प्रदेश मधून बीजेपी चे राज्यसभा खासदार आहेत. मोदी सरकार दोन मध्ये ते मंत्री म्हणून कार्यरत होते. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी या गटाचे ते उप अध्यक्ष आहेत. शांतनू ठाकूर पश्चिम बंगाल मधून बनगाव या बीजेपी चे संसद म्हणून निवडून आलेले आहेत. ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत लोकसभेवर. 2021 मध्ये ते मंत्री म्हणून कार्यरत होते ते मतूवा या समाजाचे नेतृत्व करतात. 2021 मध्ये मोदी सरकार मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. दुसऱ्यांदा खासदार म्हणून ते निवडून आले आहेत लोकसभेवर. सुरेश गोपी केरळ मधून त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून ते एकमेव बीजेपीचे खासदार आहेत. त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मल्याळम फिल्म सिटी मध्ये हे अभिनेते म्हणून सुपरस्टार होते. एल मुरुगन हे मध्य प्रदेश मधील राज्यसभा खासदार आहेत तामिळनाडूतील निलगिरी मोदी सरकारमध्ये सूचना प्रसारण राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी राज्यमंत्री पदची शपथ घेतली. अजय टमटा उत्तराखंड राज्यातील अलमोडा या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. हे पहिल्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते. बंडी संजय कुमार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेलंगणा राज्यातील करीमनगर या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. ते लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2020 ते 23 या कालखंडात हे बीजेपी चे तेलंगणा राज्य अध्यक्ष म्हणून होते. कमलेश पासवान उत्तर प्रदेशातील बासगाव या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले. 2009 पासून चार वेळेस ते लोकसभेचे खासदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत 2002 ते 7 या कालखंडामध्ये दे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. भागीरथ चौधरी राजस्थान मधील अजमेर या ठिकाणाहून लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून आलेले आहे. त्यापूर्वी ते दोन वेळेस विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. सतीश दुबे बिहार राज्यातील दोन वेळेस राज्यसभेतील सांसद म्हणून निवडून आलेले खासदार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये ते चार वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते. संजय शेठ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली हे राज्य लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते 2019 पासून सलग दुसऱ्यांदा खासदार झालेले आहेत. त्या मतदारसंघातून. रवनीत सिंह बिट्टू यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लुधियाना पंजाब येथून निवडून आलेले आहेत. तीन वेळेस काँग्रेसचे खासदार राहिलेले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियंत सिंग यांचे ते पोते आहेत. दुर्गादास उईके यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे मध्य प्रदेशातील बैतूल या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. रावेर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील खासदार रक्षाताई खडसे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. श्रीकांत मजुमदार पश्चिम बंगालमधील बलूर घाट या मतदारसंघातून निवडून आलेले दुसऱ्यांदा राज्यमंत्री पदची शपथ घेतली. सावित्री ठाकूर 2014 मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मध्य प्रदेशातील धार या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या खासदार झालेले आहेत. धार या मतदार संघातून त्या दुसऱ्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. कोखन साहू बिलासपूर छत्तीसगड राज्यातील या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. ते मंत्री पदा पदाची शपथ घेतली. राज भूषण निषाद यांनी मुजफ्फर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे लोकसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवून निवडून आले. भूपती राजू श्रीनिवास शर्मा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. नरसापुरम या सीट वरून ते खासदार झाले. हर्ष मल्होत्रा पूर्व दिल्ली या ठिकाणाहून खासदार झालेले आहेत. निमो बनभामिया यांनी भावनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. त्या खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी पुणे मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खासदार म्हणून निवडून आले. जॉर्ज कोरियन केरळ मधून लोकसभेवर निवडून आलेले गेल्या चार दशकापासून भाजपमध्ये कार्यरत असलेले बीजेपी चे खासदार आहेत. बीजेपीच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे ते उपाध्यक्ष आहेत. बीजेपीचे प्रदेश महासचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. पवित्रा मार्ग रीठा आसाम मधील मुखर या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. ते पहिल्यांदा 2022 मध्ये राज्यसभेचे खासदार होते. एकूण 75 लोकसभा सदस्यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांना शपथ भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी दिली.
X
X
👆
June 8 - Day of Special (Dinvishesh)
जुन 8 : दिनविशेष
www.insearchofknowledge.org
👆
Visit the blog for some intresting of " General and Scientific Knowledge" for UPSC /MPSC/SSC and Other Competitive exams.
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधीX
X
👆
Birsa Munda:
Popular Indian tribal freedom fighter and religious leader
बिरसा मुंडा:
लोकप्रिय भारतीय आदिवासी स्वातंत्र्यसैनिक व धार्मिक नेता
स्मृतीदिन: 9 जून
X
X
View, Comments and share
0 Comments