Subscribe Us

header ads

Sane Guruji: Marathi author

Sane Guruji: 

Marathi author, Teacher, Social activist and Freedom fighter


साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने): 

एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक

24 डिसेंबर: जन्मदिन

11 जून: स्मृतीदिन 


बालपण आणि शिक्षण:

साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. 

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीही अत्यंत कष्ट घेऊन व माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. 

त्यांचे पालगड, दापोली, औंध, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झाले. 

1917 ला इंग्रजी सहावी ची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाले व तसेच 1918 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या न्यू पूना कॉलेजात प्रवेश घेतला. 

त्यासाठी पांडुरंग ने उत्तम प्रकारे इंटरची परीक्षा सुद्धा पास केली. गुरुजींचे इंग्रजी, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र हे आवडीचे विषय होते. 

याच कॉलेजातून त्यांनी बी. ए. व एम. ए. च्या पदव्या संपादन केल्या. एम ए साठी त्यांनी मराठी व संस्कृत हे विषय निवडले होते 1925 मध्ये येणे परीक्षा पास झाले मास्टर ऑफ आर्ट या सन्मानास पांडुरंग सानेने स्वतःला पात्र केले.

X X

सामाजिक व देश कार्यातील सहभाग:

अमळनेरला के. ई. एस. हायस्कूलचे संचालक मंडळ देशभक्तीचे विचार जोपासणारे होते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर साने गुरुजी अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. 

तेथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था पाहू लागले. विद्यार्थ्यांचा अभ्यास, त्यांची आजारपणे यांत ते आईप्रमाणे त्यांची काळजी घेत. त्यांच्यात देवभक्ती व देशभक्ती यांची बीजे पेरत शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांना अत्यंत प्रिय झाले.

 समाजाचा विकास साधायचा त्यांना होता देश कार्यात आपला सहभाग द्यायचे त्यांनी ठरवले आणि त्याचा आम्हालाही त्यांनी करून दाखविला त्यासाठी त्यांनी 1930 मध्ये के इ एस हायस्कूल मधील शिक्षक पदाचा राजीनामा दिला. 

समाज बांधवांमध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी खानदेशाचा भाग या कार्यासाठी निवडला व जळगावपासून जवळ पिंपराळा या ठिकाणी एका गावात देशभक्तांचे देश कार्यात उपयोगी पडू शकणाऱ्या तरुणांना एकत्र करून त्यांची एक फौज तयार केली त्यासाठी त्यांनी एक आश्रम चालविला होता.

साने गुरुजी हे नाव गावागावात पोहोचले मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्यांचे विचार मोठे जनजागृती खानदेशात साने गुरुजींनी सुरू केली.

 " भारत माता की जय ", 

"अंग्रेजो, भारत छोडो", 

" गांधीजी की जय ", 

"साने गुरुजी आगे बढो हम आपके साथ है", 

" वंदे मातरम" 

अशा जयघोषाने खानदेश दुमदुमून लागला.

X X

 विद्यार्थिदशेपासूनच साने गुरुजींवर महात्मा गांधीजींच्या राजकीय विचारांचा प्रभाव होता. 

नोकरी करीत असता 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. तेव्हा नोकरीचा त्याग करून त्यांनी त्या चळवळीत उडी घेतली व दोन वर्षांची कारावासाची शिक्षा भोगली. 

धुळ्याच्या तुरुंगात असताना त्यांना विनोबा भावे यांचा सहवास लाभला. तेही त्याच तुरुंगात शिक्षा भोगत होते. त्या तुरुंगात ते गीतेवर प्रवचने देत. ती साने गुरूजींनी लिहून घेतली. 

तीच पुढे 'गीता-प्रवचने' या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली व भारतातील अनेक भाषांमध्ये त्या मराठी पुस्तकाची भाषांतरे झाली.

 जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या खेडेगावी 1936 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील अधिवेशन भरले. ते सफल होण्यासाठी साने गुरुजींनी अपार कष्ट घेतले.

 त्यांनी 'काँग्रेस' या नावाचे एक साप्ताहिक 1938 मध्ये सुरू केले. दुष्काळात खानदेशातील 1938 मध्ये शेतकऱ्यांची पिके बुडाली. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा सारा माफ करावा, या मागणीसाठी साने गुरुजींनी जळगावला शेतकन्यांची एक परिषद भरविली होती. 

साने गुरुजी यांनी स्त्रियांच्या तोंडी असलेल्यांपैकी चारशे ओव्या त्यांनी गावोगावी जाऊन संकलित केल्या. हे लोकवाङ्मयाचे मराठीतील पहिले संकलन म्हणता येईल.

 'पत्री' हा साने गुरुजींचा पहिलाच काव्यसंग्रह छापून होताच तो ब्रिटिश सरकारने जप्त केला. 

1942 च्या 'चले जाव' आंदोलनात भाग घेतला व तुरुंगवास पत्करला. पुढे 1945 मध्ये ते सुटले. 

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून 1946 मध्ये त्यांनी प्राणांतिक उपोषण केले. त्यांच्या उपोषणास यश येऊन हे मंदिर 10 मे 1947 ला हरिजनांना खुले झाले.

काँग्रेसची धोरणे न पटल्यामुळे तो पक्ष 1948 नंतर सोडून ते समाजवादी पक्षात गेले व त्या पक्ष्याच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी 'साधना' हे साप्ताहिक सुरू केले. 

राष्ट्रसेवा दल, आंतरभारती वगैरे अनेक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.

X X

चले जाव चळवळीतील सिंहगर्जना:

1930 नंतर हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला खरा वेग आला. 

मीठ सत्याग्रह नंतर गांधीजींनी सिंहगर्जनात उठविली साने गुरुजींना देश कार्याचे जणू वेडच लागले होते सभा प्रचार जोरात सुरू झाले होते. 

1934 ला साने गुरुजींना तिसऱ्यांदा चाळीसगावला अटक झाली. यावेळेस त्यांना चार महिन्याचा तुरुंगवास बघावा लागला या तुरुंगवासात त्यांनी "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" हे सर्वांच्या परिचयाची असलेले उत्कृष्ट कविता लिहिली.

1940 मध्ये एका भाषण सभेत साने गुरुजींना चौथ्या वेळेस अटक झाली व त्यावेळेस दोन वर्षाचा तुरुंगवास मिळाला त्यांना प्रथम नाशिक येथे तुरुंगात ठेवण्यात आले. 

तिथे त्यांची भेट सेनापती बापट या देशभक्त क्रांतिकारक अशी झाली नंतर काही दिवस धुळे येथील तुरुंगवासात त्यांना ठेवण्यात आले. 

त्यावेळेस त्या ठिकाणी मधु लिमये या समाजवादी नेत्याशी गुरुजींचा परिचय झाला.

10 ऑगस्ट 1942 ला गुरुजींचा हा चौथा तुरुंगवाद संपला दोन दिवस आधी आठ ऑगस्टला गांधीजींनी भारत छोडो ही गर्जना केली होती. 

गुरुजी या कामास जोमाने कामाला लागले भूमिगत राहून संपूर्ण खानदेशात गुरुजी फिरू लागले व गुप्तपणे कार्यकर्त्यांना चळवळीला प्रभावी करण्याबद्दल सांगू लागली. 

24 तास फक्त चळवळीचे कार्य हेच त्यांचे ध्येय होते. गुरुजी आठ महिने भूमिगत राहून चळवळीला सहकार्य करत होते. 

1943 च्या एप्रिल महिन्यात त्यांना अटक करण्यात आली व पाचव्यांदा तुरुंगवास झाला यावेळेस गुरुजींना येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले व त्यांचा तुरुंगवास 1944 रोजी संपला त्यानंतर पुन्हा स्वातंत्र्यलढ्याचं कार्य सुरू झाले.

X X

श्यामची आई:

1930 मध्ये गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचे राण उठविले. 

संपूर्ण भारतभर त्यात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड गाव मीठ सत्याग्रहात खूप गाजले. त्यात चळवळीत स्त्रियांनीही खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या सत्याग्रहाच्या चळवळीत गुरुजींनी झंझावात अधिक स्फूर्तीने केला. 

इंग्रजांनी पुढाऱ्यांचे अटक सत्र सुरू केले. त्यात साने गुरुजींनाही अटक करण्यात आली व त्यांना धुळे येथील तुरुंगवासात ठेवण्यात आले. 

या तुरुंगवासात गुरुजींना विनोबा भावे, अण्णासाहेब दास्ताने यांचा सहभास लाभला. 

विनोबा भावे तर रविवारी गीतेतील एकेक अध्याय तुरुंगात कैद्यांना सांगत असत व गीता प्रवचनेही लिहीत असत. 

या तुरुंगातून साने गुरुजींना सहा महिन्यांनी नाशिकच्या तुरुंगात हलविण्यात आले. 

त्या ठिकाणी त्यांनी "श्यामची आई" हे छोट्या मुलांना आवडणारे प्रसिद्ध पुस्तक लिहिले.

नाशिक येथे तुरुंगात असताना त्यांनी 'श्यामची आई' ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली. 

आचार्य अत्रे यांनी त्या कादंबरीवर पुढे चित्रपट काढला व तो राष्ट्रपतिपदकाचा मानकरी ठरला.


X X

मासिक/ साप्ताहिक:

1. 1928 मध्ये त्यांनी 'विद्यार्थी' या नावाचे मासिक सुरू केले.

2. तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी 'साधना' हे साप्ताहिक सुरू केले.

3. 1938 मध्ये काँग्रेस हे राष्ट्रीय बाण्याचे साप्ताहिक अमळनेर येथे सुरू केले.

X X

ग्रंथसंपदा:

1. श्यामची आई

2. भारतीय संस्कृती

3. क्रांती

4. समाजधर्म, स्त्री-जीवन

5. सुंदर पत्रे

6. आपण सारे भाऊ

7. पत्री (काव्यसंग्रह) 

8. सती

9. स्वर्गीय ठेवा

10. आस्तिक

11. स्वप्न आणि सत्य

12. मंदिर प्रवेशाची भाषणे व इतर

13. गोड निबंध

X X

विशेषता:

"अमृताचा पुत्र" ''मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी' असे आचार्य अत्रे म्हणत असत.

X X

निधन:

साने गुरुजींचे 11 जून 1950 रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. 

त्यांचा परिचय म्हणजे त्यांनी लिहिलेली" श्यामची आई" हे पुस्तक फक्त खानदेशातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात त्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून लोक ओळखतात.





X X

View, Comments and share.....

Post a Comment

6 Comments