Ganesh Vasudeo Joshi (Sarwajanik Kaka): Lawyer, Social reformer
गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका: कायदे तज्ञ व समाज सुधारक
1 मे : जन्मदिन
25 जुलै: स्मृतिदिन
बालपण आणि शिक्षण:
सार्वजनिक काका यांचे संपूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी असे होते. त्यांचा जन्म 1 मे 1828 मध्ये सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव जोशी व आईचे नाव सावित्रीबाई जोशी हे होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर हे होते. पण त्यांचे पूर्वच हे देशावर चरितार्थासाठी सातारा या ठिकाणी येऊन राहिले. त्यांचे सातवीपर्यंत इंग्रजी शिक्षण हे सातारा या ठिकाणी पूर्ण झाले.
नोकरीच्या निमित्ताने 1848 मध्ये ते पुण्यात आले व न्यायालयात कारकून म्हणून ते रुजू झाले पण अंतर्गत मतभेदामुळे त्यांनी न्यायालयीन कारकून या पदाचा राजीनामा 1856 मध्ये दिला व त्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा 1865 मध्ये दिली व ते वकील झाले आणि पुणे येथेच त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सुरू केला.
x x
सार्वजनिक सभा' या संस्थेची स्थापना:
सार्वजनिक काका व न्यायमूर्ती रानडे या दोघांच्या पुढाकारानेच सार्वजनिक स्वरुपाची कामे करण्यासाठी बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर त्यांनी 2 एप्रिल 1870 मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या 'सार्वजनिक सभा' या संस्थेचे ते एक प्रमुख संस्थापक व आधारस्तंभ होते. त्यांनी स्वतःस या संस्थेच्या कार्याला संपूर्णपणे वाहून घेतले होते. म्हणून ते 'सार्वजनिक काका' या नावाने प्रसिद्ध पावले.
सार्वजनिक सभेचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते आणि औंध संस्थानादीपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी अध्यक्ष होते पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सहभागामुळे सार्वजनिक सभेचे काम राष्ट्रीय पातळीवर 1871 पर्यंत सभेचे नाव झाले.
इ.स. 1870 मध्येच 'सार्वजनिक सभा' या संस्थेची स्थापना झाली. सार्वजनिक सभेला न्यायमूर्ती रानडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. पण तिच्या प्रत्यक्ष कार्याची जबाबदारी सार्वजनिक काकांनीच उचलली होती. म्हणून सार्वजनिक सभेला नावारूपाला आणण्याचे श्रेय या दोघांकडेच जाते.
महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकन्यांना मदत:
1873 मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ 1876-77 मध्ये पडला होता. या दुष्काळात लोकांवर अन्नावाचून उपाशी मरण्याची पाळी आली होती. सामाजिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकन्यांना दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या व शेतकऱ्यांना त्या काळात केलेली मदत खूपच मोलाची ठरली. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने आपल्या पब्लिक वर्क्स खात्यामार्फत कामे सुरू करावी म्हणून सार्वजनिक काकांनी लढा दिला त्यामुळे दुष्काळग्रस्तांकडे लक्ष पुरविण्यास सरकारला भाग पाडले. या कार्यात वेळी काकांचा महत्त्वाचा वाटा होता.
x x
स्वदेशी चळवळीत सहभाग:
न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्लामसलत करून सार्वजनिक काकांनी 1972 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केला ही स्वदेशी चळवळ त्यांनी लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या अगोदर केलेली स्वदेशी चळवळ होती त्यांनी 12 जानेवारी 1872 रोजी खाली वापरण्याची शपथ घेतली व आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी खाली वापरून आपली शपथ पूर्ण केली.स्वदेशीचे आद्य प्रवर्तक सुद्धा सार्वजनिक काकांना म्हटले जाते.
खादीचा वापर व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे देशातील पहिले दृष्टी देशभक्त होते. त्यांनी खादीचा पोशाख करून 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. या दरबारामध्ये 1877 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला 'हिंदुस्थानची सम्राज्ञी' ही पदवी अर्पण करण्यासाठी दिल्ली येथे हा दरबार भरविण्यात आला होता. त्यावेळी सार्वजनिक सभेने आपल्या वतीने राणीला एक मानपत्र अर्पण करण्यासाठी सभेने आपला प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक काकांना दिल्लीला पाठविले होते. या मानपत्रात हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राच्या बरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा, त्यांना स्वावलंबी बनविणारे शिक्षण द्यावे व त्यांना राजकीय हक्क द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
देशी व्यापरोत्तेजक मंडळाची स्थापना:
ब्रिटिश पार्लमेंट मध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत अशी मागणी एका स्वतंत्र अर्थाने केली होती.
हिंदी लोकांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतःचे उद्योग सुरू केले पाहिजेत असे त्यांचे मत होते. त्याच दृष्टीकोनातून त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. सार्वजनिक काकांनी ठिकठिकाणी स्वदेशी मालाची दुकाने काढून स्वदेशीच्या प्रसाराचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः स्वदेशीचे व्रत स्वीकारून ते अखेरपर्यंत चालविले.देशी व्यापरोत्तेजक मंडळाची स्थापना करून साई साबण मेणबत्ती छत्र्या इत्यादी स्वदेशी वस्तूचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले.
सार्वजनिक काका यांच्या प्रयत्नामुळे आग्रा या ठिकाणी कॉटन मिल्स सुरू करण्यात आली.
x x
स्त्रीविचारवती' सामाजिक संस्था स्थापन :
सार्वजनिक काकांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 मध्ये पुण्यात 'स्त्रीविचारवती' या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत त्यांनी समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी 'हळदी-कुंकू' समारंभासारखे उपक्रम हाती घेतले होते. या कार्यक्रमात सर्व जाती-जमातीच्या स्त्रिया सामील होत असत.
ब्रिटिशांची लवाद न्यायालयाची स्थापना:
ब्रिटिशांच्या वेळ खाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना ब्रिटिशांसमोर मांडली व सार्वजनिक काकांच्या प्रयत्नाने पुणे या ठिकाणी 1876 मध्ये ब्रिटिशांनी लवाद न्यायालयाची स्थापना केली.
मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध:
लॉर्ड लिटन याने 1878 मध्ये जेव्हा मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध घालून वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासंबंधीचा कायदा केला, तेव्हा त्या कायद्याला त्यांनी विरोध केला. या कायद्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी मुंबईत वृत्तपत्रकारांचे एक संमेलन इंदूप्रकाश चे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली 29 मार्च 1878 रोजी भरविले. तसेच कलकत्ता येथे भरविण्यात आलेल्या अशाच प्रकारच्या संमेलनालाही ते उपस्थित राहिले व मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध लागणाऱ्या कायद्याला कडाडून विरोध केला.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे 1879 मध्ये वकीलपत्र काकांनी स्वीकारले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. वासुदेव बळवंत फडक्यांना त्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
निधन:
स्वदेशीचे आद्य प्रवर्तक सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे निधन हृदयविकाराच्या आजाराने पुण्यात वयाच्या 52 व्या वर्षी 25 जुलै 1880 रोजी झाले.
XX
https://www.insearchofknowledge.org/2024/04/may-1-day-of-special-dinvishesh-1.html
View, Comments and share......
X X
1 Comments
👍👍
ReplyDelete