Subscribe Us

header ads

Birsa Munda: Popular Indian tribal freedom fighter and religious leader

Birsa Munda:

Popular Indian tribal freedom fighter and religious leader

बिरसा मुंडा:

लोकप्रिय भारतीय आदिवासी स्वातंत्र्यसैनिक व धार्मिक नेता 

जन्मदिन :15 नोव्हेंबर

स्मृतीदिन: 9 जून


बालपण आणि शिक्षण

भारतीय आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या छोट्याशा गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्याच्या वडिलांचे नाव सुगन मुंडा व आईचे नाव कर्मी हे होते. 

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यांचे वडील आपल्या गावात व दुसऱ्या गावात जाऊन मोलमजुरी करत असत त्यांना दोन भाऊ दोन बहिणी होत्या त्यांचे बालपण सर्वसामान्य आदिवासी मुलाप्रमाणे जंगलात गुरांना चारायला घेऊन जाणे बासरी बाजूने मातीत खेळणे असे शाळा सामान्य झाले.

 बिरसा चे शिक्षण व्हावे असे त्यांच्या आई-वडिलांना वाटत होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या मामाच्या घरी आयुबहातू गावी पाठवले. त्या ठिकाणी गुरं बकऱ्या चारत असतानाच त्या ठिकाणी त्यांना जयपाल नाथ या शिक्षकाकडून अक्षर ओळख व त्यांचे गणिताचे शिक्षण प्राथमिक पूर्ण झाले.त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. 

X X

त्यांचे प्राथमिक शिक्षण शाळेत बर्जू येथे पूर्ण करून पुढील अभ्यासासाठी नथुरेन मिशन शाळेत दाखल झाले.

बिरसा हे शाळेच्या वस्तीगृहात असताना जेवणात त्यांना गोमास वाढले जात असे कुटुंबात गायीची पूजा गोमातेची पूजा स्वरूपात पूजन करण्यात येत असे नकार दिला व ख्रिस्ती पादऱ्यांना त्यांनी अतिशय कडकविरोध केला.

 त्यावेळी नेत्रेत पादरी यांना हा पंधरा वर्षाचा बिरसा ठणकावून सांगू लागला,

 "हे साहेब लोक सगळ्यांना टोप्या घालतात जसे हे इंग्रज पादरी तसेच भारतीयांवर अत्याचार करणारे इंग्रज अधिकारी आता मी एक दिवसही चौबास मध्ये राहणार नाही." असा दृढ निश्चय केला.

बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे.

 त्यामुळे सुगन मुंडा यांनी शाळेतून आपला मुलाचे-बिरसाचे नाव काढून घेतले होते. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला.

X X

इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात लढा:

आदिवासी समाजातील बिरसा मुंडा या माहानायकाच्या चरित्रापासून आजही आपल्याला आपल्या देश धर्म व संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करण्यास प्रेरणा मिळते त्यांची जयंती आजही आदिवासी समाजासाठी एक अभिमानाची व आत्मगौरवाची बाब आहे.

1891 मध्ये चौबासा येथून परतल्यावर बिरसाण बंद गाव येथे आला तिथे त्यांची ब्राह्मणी गावातील वैष्णव पंथी आनंद पांडे यांच्याशी संबंध आला आनंद पांडे यांनी बिरसा मुंडा यांना रामायण व महामार्गातील कथा सांगितल्या त्याच वेळेस ते चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यात भजन कीर्तन भगवद्गीतेने भागवत भक्तीने अतिशय प्रभावीत झाले व त्यांना आपली संस्कृती धर्म इतिहासाची ओळख झाली त्यांनी मासाहार त्यागला जाणवे परिधान करू लागले डोक्यावर पांढरी पगडी परिधान करू लागले तुळशीची पूजा करू लागले त्यांची बिरसाईत ह्या नव्या पंथाची मुहूर्त वेळ त्यांनी रोवली व अधिकाधिक लोक त्यांचे अनुयायी झाले.

X X

बिसाईयतची मुख्य तत्त्वे

1. ईश्वर म्हणजेच सिंगबोंगा एकच आहे. 

2. गोमातेची सेवा करून सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करा.

3. नशापाणी करू नका.

4. अशुद्ध भोजन करू नका.

5. घर सदैव स्वच्छ ठेवा व अंगणात तुळशीचे झाड लावा.

6. ज्येष्ठांचा आदर करा व सत्संगात रहा.

7. स्वधर्मावर श्रध्दा ठेवा. आपला धर्म, संस्कृती व पूर्वजांवर अतूट विश्वास ठेवा.

8. आपली एकजूट सदैव टिकवून ठेवा.

9. आठवड्यातून एक दिवस म्हणजेच गुरुवारी सिंगाबोंगाची पूजा करा व नांगर फिरवू नका.

10. आपला धर्म, संस्कृती व परंपरा विसरू नका. अन्यथा आपला समाज ओळख हरवून बसतो.

11.ख्रिश्चन पाद्र्यांच्या जाळ्यात व मोहात अडकू नका.

X X

संघटनेच्या माध्यमातून आंदोलन:

बिरसा मुंडा या तरुणांनी एक संघटना स्थापन केली जातो सामाजिक सुधारणांच्या सोबत राजकीय शोषणाच्या बाबत त्यांनी जनजागृती सुरू केली आदेश वाशी बांधवावर अत्याचार करणारे जमीनदार यांच्या विरोधात व इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तरुणांनी एकत्र यावं अशी त्याची धारणा होती.

संघटनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना ची जनजागृती करण्यासाठी त्याचे भाषण अतिशय प्रसिद्ध आहे तो म्हणतो, "ब्रिटिश शासक व ख्रिस्ती पादरी हे देश लुटायला आणि भ्रष्ट करायला टाकलेले आहेत पहिला आमचा धर्म बदलून ते ख्रिश्चन धर्माची स्थापना करतात आमची शेंडी व जाणाऱ्यांच्या ऐवजी क्रूस गळ्यात बांधायला सांगतात आमची मंदिरे व पूजा स्थाने दिवसेंदिवस उजाड होत चालली आहेत आमचे नाव पोशाख ओळख मिटवायला हॅलो टपलेलेच आहेत असेच होत राहिले तर आदिवासी जमाती आपली जगभरातील ओळख गमावून बसतील."

बिरसा यांच्या ह्या आंदोलनाने आदिवासी युवक पेटून उठला चलकद गावात एक आश्रम एक आरोग्य मंदिर व एक क्रांती केंद्र स्थापन झाले बिरसा धरणे मातेलाच देवता मानू लागली व आपले संघर्षाचे काम चालू ठेवले.

1894 मध्ये, बिरसा एक शक्तिशाली तरुण, हुशार आणि बुद्धिमान बनले आणि बऱ्याचदा गारबरा येथील डंबरी टॅंक दुरुस्त करण्याच्या कामाचे कार्य केले.

भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात जमीनदारी प्रथा महसूल व्यवस्था भारतीय वन कायदा 1882 व धर्मांतरांच्या विरुद्ध ब्रिटिश पादऱ्यांच्या विरोधात जोरदार संघर्ष केला बिरसा मुंडा हे आदिवासींची धार्मिक व्यवस्था संस्कृती परंपरा अस्तित्व व अस्मितेचे प्रतीक होत.

बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्या ने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स 1895 साली लढा उभारला.

1890 मध्ये चैबासा सोडून दिल्यानंतर बिरसा आणि त्याचे कुटुंबाने जर्मन मिशनचे सदस्यत्व सोडून दिलेली.

 सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

X X

जडणघडणीचा कार्यकाळ:

बिरसा मुंडा यांचे 1886 ते 1890 या काळात चैबासा येथे वास्तव्य होते. हा कालावधी जर्मन आणि रोमन कॅथोलिक ख्रिश्चन आंदोलनासाठी ओळखला जातो.  

चैबासा हे तत्कालीन सरदारांच्या राज्याच्या राजधान्यांपासून फार दूर नव्हते. सरदारांच्या आंदोलनांत इंग्रज शिपायांनी बिरसाला अशा प्रकारे पकडले की त्याच्यावर धर्मविरोधी आणि सरकारविरोधी शिक्का मारला गेला. 

 सरदारांच्या विरोधात आदिवासी ख्रिश्चन होऊ लागले आणि त्यामुळे भारत छोडो आंदोलनाबरोबरच बिसा मुंडा त्याच्या मूळ पारंपरिक आदिवासी धार्मिक व्यवस्थेकडे वळला.वाढत्या सरदार आंदोलनामुळे त्यांनी कोर्बेरा सोडला.

X X

आंदोलनात सहभाग:

 पोराहाट परिसरातील पेरींगच्या गिडियूनच्या नेतृत्वाखालील संरक्षित जंगलात मुंडाच्या पारंपारिक अधिकारांवर केलेल्या निर्बंधांवर लोकप्रिय असहिष्णुतेमुळे झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. 

 1893-94 च्या दरम्यान गावांमध्ये सर्व कचऱ्याची जमीन, ज्याची मालकी सरकारमध्ये निहित होती, 1882 च्या भारतीय वन अधिनियम 7 च्या अंतर्गत संरक्षित जंगलात गृहीत धरली गेली. 

 सिंहभाममध्ये पलामू आणि मानभूमप्रमाणे जंगल वस्ती सुरू करण्यात आली आणि उपाय योजण्यात आले. वन-निवासी समुदायांचे हक्क निश्चित करण्यासाठी घेतले. जंगलातल्या गावांना सोयीस्कर आकाराच्या ब्लॉकमध्ये ठळक केले गेले आहे ज्यामध्ये फक्त गावांचीच नव्हे तर खेड्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागवड योग्य आणि कचरा जमीन देखील आहे. 

बिरसा यांनी आपल्या जीवनात नंतरच्या एका टप्प्यावर एकाग्रतावर भर दिला. बिरसा शेतकऱ्यांमधील सर्वात कमी दर्जाच्या गुलाबांमधून उगवला, जो त्यांच्या नावे इतरांपेक्षा वेगळा होता, मुंदारी खुंटकट्टी व्यवस्थेमध्ये फारच कमी अधिकारांचा आनंद घेतात; संस्थापक वंशाच्या सदस्यांनी सर्व विशेषाधिकारांचे एकाधिकार केले होते, परंतु शेती-उत्पादकांपेक्षा ही रित्या चांगली नव्हती. 

नोकरीच्या शोधात ठिकाणाहून चालत असलेल्या लहान मुलाच्या रूपात बिरसाचा स्वतःचा अनुभव, त्याला शेतीविषयक प्रश्न आणि वनविषयक बाबींमध्ये अंतर्दृष्टी देण्यात आली; तो निष्क्रिय नसलेला प्रेक्षक होता परंतु अतिपरिचित चळवळीत सक्रिय सहभागी होता.

X X

25 वर्षांच्या अल्प कालावधीसाठी तो जगला तरी त्याने आदिवासींच्या मनोदशाला उत्तेजन दिले आणि त्यांना छोटानागपुरच्या एका छोट्याशा शहरात आणले आणि ब्रिटीश शासकांना दहशतवादाचा सामना करावा लागला. त्याच्या मृत्यूनंतर चळवळीचा नाश झाला. तथापि, चळवळ किमान दोन मार्गांनी महत्त्वपूर्ण होती.

 सर्वप्रथम तो औपनिवेशिक सरकारला कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडत असे जेणेकरून आदिवासींची जमीन दिक्कस (बाहेरील) द्वारे सहजपणे काढून घेतली जाऊ शकत नाही. 

दुसरे म्हणजे पुन्हा एकदा दाखवून दिले की आदिवासी लोकांना अन्यायविरोधी निषेध आणि औपनिवेशिक नियमांविरुद्धचा राग व्यक्त करण्याची क्षमता आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने आणि संघर्षांच्या चिन्हे शोधून काढल्या.

सिंघममधील शंकरा गावातील शेजारच्या परिसरात त्याला एक उपयुक्त साथीदार सापडला, त्याने तिच्या पालकांना दागदागिने घातली आणि विवाहाच्या कल्पनाबद्दल समजावून सांगितले. नंतर, तुरुंगातून परतल्यावर तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. 

चळकड येथे त्याची सेवा करणाऱ्या आणखी एक महिला माथीस मुंडाची बहीण होती. 

तुरुंगातून सोडल्यानंतर कोळी मुंडा यांनी ठेवलेल्या कोनेसरच्या मथुरा मुदा यांची मुलगी आणि जिरीच्या जगगाव मुंडे यांच्या पत्नीने बिरसाची पत्नियां बनवण्याचा आग्रह धरला. त्याने त्यांना धमकावले आणि जगगाव मुंडे यांची बायको आपल्या पतीला दिली. बिरसा बरोबर राहिलेली आणखी एक सुप्रसिद्ध स्त्री बरुदीहची साली होती.

X X

बिरसा मुंडा यांना अटक:

बिरसा मुंडा यांचा वाढणारा प्रभाव पाहून ख्रिस्ती पादरी आश्चरचकीत होऊन त्यांनी लगेच इंग्रज अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि बिरसा हिंदू संन्याशी आदिवासींचा राजा होऊ पाहतो. 

ब्रिटिशांच्या विरुद्ध तो आदिवासी जनतेला भडकतो अशी चुकली त्यांनी केली. ब्रिटिश सरकारने बिरसा यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश काढले व त्यांना 15 ऑगस्ट 1895 रोजी अटक केली. त्यांना हजारीबाग कारागृहात ठेवण्यात आले.

ख्रिस्ती पादरीच्याच पत्रानुसार, 15 वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 460 आदिवासींना आरोपी बनवण्यात आले होते, त्यापैकी 63 जणांना शिक्षा झाली होती. 

एकाला मृत्युदंड, 39 जणांना जन्मठेपेची आणि 23 जणांना चौदा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 



X X

डोंबारी हत्याकांड: कारागृहातून सुटका व ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन

बिरसा मुंडा यांची 30 नोव्हेंबर 1897 मधून मध्ये कारागृहातून सुटका झाली त्यांचे मन  आदिवासी भागाला स्वतंत्र्य करण्याच्या इच्छेने पेटून उठले धनुष्यबाण हाती घेऊन आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी केला.

 इंग्रजांच्या हस्तक असणारे जमीनदारांना लगाना देण्याचा निर्णय जमिनी मालगुजारीतून मुक्त करण्याचा निर्णय मुंडा जमीतेला त्यांचे वनाधिकार परत देण्याचा व ब्रिटिश राज्यकर्ते व ख्रिश्चन पात्री यांनी भारत सोडून जाण्यासाठी आंदोलन करण्याचा निश्चय त्यांनी केला.

 यामुळे ब्रिटिश राज्यकर्ते व ख्रिश्चन पादरी त्यांच्याविरुद्ध असलेला असंतोष वसंता वाढत गेला बिरसा मुंडा यांचे मुख्य सेनापती गया मुंडा यांच्या नेतृत्वाखाली गुरुजी आणि बंदगाव मिशनवर हल्ला करण्यात आला रांची येथील जर्मन मिशनवर सुद्धा हल्ला करण्यात आला.

बिरसा मुंडा यांनी 9 जानेवारी 1900 रोजी जोजोहातूच्या जवळील डोंबारी टेकड्यांमध्ये एक सभा आयोजित केली. या सभेत हजारो स्त्री पुरुष समान झाले होते व त्यांनी कपाळावर गंध तिलक लावून हातात लाल व पांढऱ्या पताका घेतल्या होत्या. 

आयुक्त स्ट्रीटफिल्ड यांनाही खबर मिळाल्यावर त्यांनी संपूर्ण डोंगर भिडून टाकला आंदोलनावर निर्धृन गोळीबार केला. 

ब्रिटिशांकडे बंदूक आणि आधुनिक शस्त्रास्त्रे होते तर आदिवासींकडे धनुष्यबाण हेच अस्त्र होते.

 डोंबारी टेकड्यांमध्ये ब्रिटिशांनी केलेले हत्याकांड हे जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे रक्तरंजित आणि निर्गुण होते.

  अंतिमतः ब्रिटिश पोलिसांनी शोध मोहीम हाती राबवून बिरसा यांना अटक केली त्यांनी बिरसांना अटक करण्यासाठी ब्रिटिशांनी 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

3 फेब्रुवारी रोजी फंदफितुरी करून बागदाव मधून त्यांना अटक करण्यात आली. हातकड्या घालून त्यांना रांचीच्या कारागृहात आणण्यात आले.

X X

बिरसा मुंडा यांच्यावर साहित्य निर्मिती:

महाश्वेता देवी रामन मॅगसेसे पुरस्कार विजेते लेखक-कार्यकर्ते यांची ऐतिहासिक कथा "अरण्यर अधिकारी" (1977 चा अधिकार) 1979 मध्ये त्यांनी बंगालीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जिंकला. त्यांचे बिरसा मुंडा यांच्या आयुष्यावर आणि मुंडा विद्रोहांवर उपन्यास आधारित आहे.

X X

सन्मान:

1. बिरसा मुंडा यांना लोकांनी "जननायक" हा किताब बहाल केला.

2. बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस 15 नोव्हेंबर हा दिवस भारतात जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.

3. 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणारा विश्व आदिवासी दिन ही आदिवासींची होत असलेली निवड फसवणूक आहे हा गौरवदेव नसून श्लोक किंवा दुःखदिन आहे कारण इंग्रजांनी अमेरिकेस अन्य देशातील मूळ व स्थानिक आदिवासी समाजाचा नरसहार केला या टिकीट पासून स्वतःला बचाव करण्यासाठी ब्रिटिशांनी ही विश्व आदिवासी दिनाची सुरुवात केली आता बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव देऊन म्हणून साजरा केला जातो.



X X

निधन:

इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना अटक केली व तुरुंगात खटल्यांदरम्यान अतोनात छळ केला. 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. कारागृहात असताना त्यांना कावीळ झाला असे सांगण्यात आले. पण त्यांना विष देऊन ठार मारण्यात आले होते अशी अनेक लोकांचे ठाम धारणा होती आणि एका ओढ्याच्या किनारी त्यांचे शव गुपचूप दहन करण्यात आले. झारखंडच्या कोकर रांची येथे बिरसा मुंडा यांचे समाधीस्थळ आहे.

X X

सन्मानार्थ:

1. बिरसा मुंडा विमानतळ रांची

2. बिरसा इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी सिंधरी

3. बिरसा मुंडा वानवासी छत्रवस, कानपूर

4. सिद्धो कान्हो बिर्षा विद्यापीठ, पुरुलिया

5. बिरसा कृषी विद्यापीठ.

6. बिहार रेजिमेंटचे युद्ध रोख म्हणजे बिरसा मुंडा की जय.

7. 1988 च्या भारतीय पोस्ट स्टॅंम्पवर बिरसा मुंडा यांचा फोटो छापण्यात आला व पोस्ट स्टॅंम्प प्रसिद्ध केला.


X X

बिरसा उत्सव:

बिरसा मुंडा यांच्या 15 नोव्हेंबरला दरवर्षी होणाऱ्या बिरसा जयंतीचा उत्सव झारखंड मध्येच नव्हे तर इतर अनेक राज्यात व दरवर्षी कर्नाटकातील म्हैसूर आणि कोडागू जिल्हे येथपर्यंत सर्वत्र आदिवासी लोक उत्सव साजरा करतात.

X X

बिरसा मुंडा यांच्यावर आधारित चित्रपट निर्मिती:

 1. बिरसाच्या जीवनावर आधारीत 2008 मध्ये हिंदी चित्रपट "गांधी से पेहेल गांधी" बिरसा मुंडा नावाने कादंबरीवर आधारित इक्बाल दुर्रान यांनी निर्देशित केले.

2. एक हिंदी चित्रपट, "उलुलन-एक क्रांती (द क्रांती)" 2004 मध्ये अशोक सरन यांनी तयार केला .ज्यामध्ये 500 बिरसाईट्स किंवा बिरसाच्या अनुयायांनी या चित्रपटात अभिनय केला.



View, Comments and share.......



X X



Post a Comment

3 Comments

  1. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  2. क्रांतीकारक, देशभक्त, आदिवासी समाजाचे दैवत, संत श्री.बिरसाजी मुंडा यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांना खुप खुप शुभेच्छा, अभिनंदन..!

    ReplyDelete