Modern History of India -4
आधुनिक भारताचा इतिहास -4
1857 चा स्वातंत्र्यलढा
1. 1857 च्या उठावाच्या राजकीय कारणात डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण येते.
2. 1857 च्या उठावाच्या राजकीय कारणात डलहौसीचे दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण समाविष्ट होते.
3. ब्रिटिशांचा आर्थिक साम्राज्यवाद, ऐतद्देशीय राज्यकर्त्यावरील विविध स्वरूपाचे अन्याय, इंग्रजांच्य धार्मिक धोरणाबद्दलची साशंकता 1857 च्या उठावाचे कारण म्हणून गणता येईल.
4. 1857 च्या पूर्वी डलहौसीच्या काळात हिंदी शिपायांनी तीनदा उठाव केले होते.
5. 1857 च्या बंडाच्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होता.
6. 1857 च्या उठावाची नियोजित तारीख 31 मे, 1857 होती.
7. 1857 च्या उठाव करण्याचा जो गुप्त कट शिजला होता त्याचे नेतृत्व नानासाहेब ब मौलवी अहमदशहा यांचेकडे होते.
8. 1857 च्या उठावाचा गुप्त संदेश चपाती किंवा भाकरी व लाल कमळाद्वारे पसरविला जात होता.
9. 'चलो दिल्ली' ही घोषणा 1857 च्या क्रांतीयुद्धात प्रथमच देण्यात आली.
10. 1857 च्या क्रांतीकारकांनी लाल कमळाचे फूल हे क्रांतीचे प्रतिक ठरविले होते.
11. 1857 च्या उठावाला 10 मे रोजी प्रारंभ झाला.
12. 1857 पासून 36 मैल अंतरावर असलेल्या मेरठ येथे सुरुवात झाली .
13. 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी बराकपूरच्या छावणीत रविवारच्या दिवशी पडली.
14. "34NI' या तुकडीतील मंगल पांडेने 1857 च्या क्रांतीचे रणशिंग फुंकले.
15. मंगल पांडेने 1857 च्या क्रांतीमधील पहिली गोळी 29 मार्च या दिवशी झाडली.
X X
16. मंगल पांडेने मेजर ह्युसन अधिकान्यास गोळी घालून ठार केले.
17. 18 एप्रिल, 1857 या दिवशी मंगल पहिला फाशी देण्यात आली.
18. 1857 च्या उठावाचे महत्वाचे मुख्य केंद्र बिथूर हे ठिकाण होते.
19. राजा कुंवरसिंह का बिहारमधील आराहा जवळील जगदिशपुर संस्थानाचा राजा होता.
20. राजा कुंवरसिंहने बिहारमध्ये 1857 चे नेतृत्व केले.
21.1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचे वेळी राजा कुंवरसिंहाचे वय ८० वर्षे होते.
22.1857 च्या उठावात दुसऱ्या बहादूरशहाच्या सैन्याचे नेतृत्व जनरल बख्तखानकडे होते.
23. 1857 च्या कानपूर येथील बंडाचे नेतृत्व नानासाहेबांनी केले.
24. 1857 च्या क्रांतीकारकांचे मुख्य लक्ष्य दिल्ली हे ठिकाण होते.
25. 1857 च्या क्रांतीकारकांनी 11 मे, 1857 रोजी दिल्ली ताब्यात घेतली.
26. क्रांतीकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळी सायमन फ्रेझर हा दिल्लीचा कमिशनर होता.
27. 1857 च्या क्रांतीकारकांनी 12 मे, 1857 रोजी बहादूरशहास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.
28. 1857 तीकारकांनी नानासाहेबांस पेशवा म्हणून घोषित केले होते.
29.1857 च्या उठावानंतर निकोलसनने दिल्ली पुन्हा एकदा इंग्रजांच्या ताब्यात आणली.
30. जॉन लॉरेन्स, ओर्टरमन, लहॅ,हॅवलॉकल कॅपवेल व ह्युरोज या इंग्रज अधिकाऱ्यांनी 1857 यशस्वीरित्या काबूत आणला.
31. 1857 च्या उठावाचे वेळी इंग्रजांच्या पाठीशी मराठे पूर्णपणे उभे राहिले नव्हते.
32. रणजित सिंह 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झाले नव्हते.
33. मद्रास येथे 1857 चा उठाव झाला नव्हता.
34.1857 च्या क्रांतीत अफगाणिस्तानचा राज्यकर्ता दोस्त महंमद हा ब्रिटिशांना अनुकूल राहिला होता.
35. ग्वाल्हेरचे शिंदे, होळकर, हैद्राबादचा निजाम, पंजाबातील पंजाबी फौज, गुरखे व बंगाल जमीनदार तसेच सर सालार जंग हे हैद्राबादचे मंत्री, ग्वाल्हेरचे मंत्री सर दिनकरराव, नेपाळचे मंत्री सर जंग बहादूर व भोपाळच्या बेगमा हे सर्व 1857 च्या उठावात इंग्रजांशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले होते.
36.1857 च्या उठावात 1/10 लोकांनी भाग घेतला होता.
37. तत्कालीन सर्वच सत्ताधीशांनी 1857 च्या उठावात भाग घेतला नाही, पतियाळा, जिंद, ग्वाल्हेर , बडोदा, हैद्राबाद व अफगाणिस्तान येथील सताधीश इंग्रजांशी एकनिष्ट रााहिले, पूर्वतयारी पूर्ण होण्यापूर्वीच दोन महिने अगोदर क्रांतीचा स्फोट झाला, क्रिमियन युद्ध संपवून चीनकडे चाललेले ब्रिटिश सैन्य आयत्यावेळी इंग्रजांच्या उपयोगी पडले ह्या सर्व कारणांमुळे 1857 च्या उठावात अपयश आले.
38. इंग्रज सेनापती ह्यू रोजने नानासाहेबांचा सल्लागार अजिमुल्लाखान यास ठार केले.
39. हिंदी सैनिकांनी आपल्या बरोबर येण्याची केलेली विनंती मान्य न करता बहादूरशहाने त्याच्या कुटुंबियांसमवेत हुमायून कबर या ठिकाणी आसरा घेतला.
40. 1857 च्या उठावाचे नायक बहादूरशहा द्वितीय यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी दिल्ली येथील हुमायूनच्या थडग्यात लपलेले असताना अटक केली.
41. रामचंद्र पांडूरंग टोपे हे तात्या टोपे या नावाने अधिक प्रसिद्ध होते.
42. अल्वारच्या जंगलात असलेल्या तात्या टोपेला इंग्रजांच्या हाती मानसिंहाने पकडून दिले.
43. तात्या टोपेंना शिप्री येथे 18 एप्रिल 1859 रोजी जाहिररित्या फाशी देण्यात आली.
44. राणी लक्ष्मीबाई ही राजा गंगाधरराव यांची पत्नी होती.
45. दामोधरराव हे झाशीचा राजा गंगाधररावांनी मृत्युपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव होते.
46. 'मेरी झाँशी नही दूँगी' अशी रणगर्जना राणी लक्ष्मीबाईने केली.
47. जनरल नील इंग्रज अधिकाऱ्याने राणी लक्ष्मीबाईस पाठलाग करून ठार केले.
48. 'The Ablest of the rebel Leaders' अशा शब्दात व्हिन्सेंट ए. स्मिथने झाशीच्या राणीचा गौरव केला.
49. दुसऱ्या बाजीरावास मिळणारे वर्षासन 8 लाख रु. होते.
50. नानासाहेब पेशवे हे दुसऱ्या बाजीरावाचे दत्तक पुत्र होते.
51. इ.स. 1851 साली नानासाहेब पेशवे यांना दत्तक वारसा नामंजूर केला.
52. इ. स. 1851 साली दुसरा बाजीराव पेशवा मरण पावला.
53. दुसरा बाजीराव मृत्यू पावल्यानंतर त्यांचा दत्तकपुत्र नानासाहेब यांस वर्षासन देण्यास इंग्रजांनी नकार देवून दुसऱ्या बाजीरावास मिळणारे वर्षासन इ. स. 1851 साली इंग्रजांनी बंद केले. आपणास न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करण्यासाठी नानासाहेबाने अजीमुल्लाखान यास इंग्लंडला पाठवले.
54. दुसऱ्या बहादूरशहाने जवा बाखतरखानला आपला वारस नेमण्याचे ठरविले होते.
55. इंग्रजांनी बहादूरशहाच्या नऊ मुलांपैकी मिर्झा कोयाशीला बारस म्हणून नेमण्याचे ठरविले.
56. इंग्रजांनी अकबरशहा या मोगल बादशाहाची पेन्शन बंद केली होती.
57. अकबरशहाची पेन्शन पुन्हा मिळविण्यासाठी राजा राममोहन रॉय लंडनला गेले होते.
58. रंगो बापूजी गुप्ते बहादूरशहाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते. बहादूरशहा जफर यांना इंग्रजांनी कैद केले व ब्रह्मदेशात पाठविले.
59. मोगल सत्तेचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर याचा मृत्यु रंगून येथे झाला.
60. शेवटचा मोगल बादशहा इंग्रजांच्या कैदेत असताना इ. स. 1862 साली मरण पावला.
X X
61. बहादूरशहा दुसरा यांचे मृत्यूसमयी वय 87 वर्षे होते.
62. झीनत महल ही बहादूरशहा द्वितीय (जफर) या जक्खड म्हाताच्या मोगल बादशहाची अत्यंत तरूण, देखणी व आवडती बेगम होती.
63. राजा कुंवरसिंह 1857 च्या उठावात लढतांना झालेल्या जखमेमुळे मृत्यू पावले.
64. 1857 च्या उठावानंतर नानासाहेब नेपाळमध्ये पळून गेले होते.
65. नानासाहेबांनी आपले उर्वरित आयुष्य नेपाळमध्येच व्यतीत केले.
66. 1857 च्या युद्धानंतर ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आली.
67. 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या नावाने राणीचा जाहिरनामा निघाला.
68. 1857 च्या युद्धानंतर भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसराय हे पद देण्यात आले.
69. व्हॉईसरायचे पद इ. स. 1858 साली निर्माण करण्यात आले.
70. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉईसराय होता.
71. भारताच्या राज्यकारभारावरील नियंत्रणासाठी भारतमंत्री ह्या सर्वोच्च अधिकारपदाची निर्मित इ.स. 1858 साली करण्यात आली.
72. पहिला भारतमंत्री होण्याचा मान लॉर्ड स्टॅनले यास मिळाला.
73. न. र. फाटक यांच्या दृष्टीकोनातून 1857 चा उठाव म्हणजे 'शिपाई गर्दी' होय.
74. वि. दा. सावरकरांच्या मते 1857 चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध'
75. "Causes of Indian Mutiny" हे पुस्तक सैद अहमदखानने लिहिले.
76. "1857 चा उठाव हा एक महान संग्राम होता, केवळ काडतूस प्रकरणातून अशा महान क्रांतीच जन्म होऊ शकणार नाही" हे उद्गार राणी लक्ष्मीबाई यांनी काढले होते.
77. 1857 च्या उठावाबद्दल 'ख्रिश्चन धर्माविरूद्धचे हिंदूंचे बंड' असे उद्गार डॉ. सेनांनी काढले.
78.1857 च्या उठावात भाग घेतलेल्या मौलवी लियाकत अली या मुस्लीम नेत्याने ख्रिश्चनांविरूद्ध धर्मयुद्ध पुकारला होता.
79. रियासतकार सरदेसाई यांच्या मते 1857 चा उठाव म्हणजे भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट .
80. सर जॉन लॉरेन्स यांच्यामते 1857 चा उठाव म्हणजे शिपायांचे बंड होते.
81. टी. आर. होल्मसूच्या मते 1857 चा उठाव म्हणजे सुसंस्कृतपणा (ब्रिटिश) व रानटीपणा (एतद्देशीय) यांमधील झगडा होता.
82. पंडित नेहरू 1857 च्या उठावास राष्ट्रीय आंदोलन असे म्हणतात.
83. 1857 च्या उठावानंतर भारतातील इंग्रजी राज्यकारभारात सर्वात महत्त्वाचा व त्वरित बदल ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता ब्रिटिश क्राउनकडे गेली.
84. हिंदू व मुस्लीमांची एकजूट जी नंतर कधीही बघायला मिळाली नाही ही 1857 च्या उठावाची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण व वाखाणण्याजोगी बाब होती.
85. 1857 च्या युद्धानंतर दत्तक वारसा राजकीय कारणासाठी मान्य करण्याचे धोरण स्विकारण्यात आले.
X X
19 व 20 व्या शतकातील सामाजिक व सांस्कृतिक जागृती.
86. विल्यम बेंटिकने इ. स. 1829 साली सतीप्रथा कायद्याने बंद केली.
87. संवाद कौमुदी पाक्षिकातून सतीच्या चालीविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी लिखाण केले.
88. आधुनिक भारताचा निर्माता म्हणून राजा राममोहन रॉय यांना गौरविले जाते.
90. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली.
91. राष्ट्रीय समाज सुधारणेसंदर्भात राजा राममोहन रॉय यांचे नाव घेतले जाते.
92. विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या चळवळी मुळे अस्तित्वात आला.
93. बाल विवाहाला आळा घालणारा सिव्हिल मॅरेज ॲक्ट इ. स. 1872 मध्ये संमत झाला.
94. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने सिव्हिल मॅरेज ॲक्ट संमत झाला.
95. तत्व बोधिनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोरांनी केली.
96. तत्वबोधिनी सभा इ. स. 1839 साली स्थापन झाली.
97. ब्राह्मो समाजात कार्यरत होण्यापूर्वी देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभेचे कार्य करत.
98. आदि ब्राह्मो समाजाची स्थापना देवेंद्रनाथ टागोरांनी केली.
99. इ.स. 1817 साली राजा राममोहन रॉय यांनी डेव्हिड हेअर यांच्या मदतीने कलकता येथे इंग्रजी शाळा सुरू केली.
100. भारतीय ब्राह्मोसमाजात फूट पडल्यानंतर केशवचंद्र सेन यांनी इ. स. 1880 मध्ये नवविधान सभा या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली.
101. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केशवचंद्र सेनांनी इ. स. 1866 साली केली.
102. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली.
103. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत डॉ. भांडारकर व न्या. रानडे यांचाही वाटा होता.
104. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्या. म. गो. रानडे यांनी लिहिला.
105. अमेरिकेत थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना इ. स. 1875 साली झाली.
106. अमेरिकेत थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम ब्लाटस्की व हेन्री ऑलकॉट यांनी केली.
107. थिऑसॉफिकल सोसायटीचे भारतातील मुख्य कार्यालय अडियार (मद्रास) येथे होते.
108. भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली.
109. "Go Back to Vedas" असे दयानंद सरस्वतींनी म्हटले होते.
110. दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे इ. स. 1875 साली झाली.
111. "इंडिया फॉर दी इंडियन्स " हा नारा प्रथम दयानंद सरस्वतींनी लावला.
112. पंडिता रमाबाई यांनी पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना केली.
113. मुंबईचे शारदा सदन व केडगावचे मुक्ती सदन पंडिता रमाबाई यांनी स्थापन केले.
114. नरेंद्रनाथ हे स्वामी विवेकानंदांचे नाव होते.
115. जाती प्रथेला विवेकानंदांनी प्रखर विरोध केला.
116. स्वामी विवेकानंदांनी पश्चिम बंगालमधील बेलूर मठाची स्थापना केली.
117. स्वामी विवेकानंदांनी हिमालयातील मायावती आश्रमाची स्थापना केली.
118. शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व विवेकानंदांनी केले होते.
119. स्वामी विवेकानंदांनी 4 जुलै 1902 रोजी समाधी घेतली.
120. ब्राह्मो समाज, आर्यसमाज व रामकृष्ण मिशन ह्या क्रमाने धार्मिक संस्था स्थापन झाल्या.
121. लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेजची स्थापना केली.
122. विशिष्ट द्वैताचे तत्त्वज्ञान रामानुजम यांनी सांगितले.
123. "वंदे मातरम् " हे राष्ट्रीय गीत बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
124. मद्रास महाजन सभेच्या निर्मितीत सुब्रह्मण्यम् अय्यर यांचा संबंध होता.
125. मिर्झा गुलाम महंमद यांनी पंजाबमध्ये अहमदीया आंदोलन सुरू केले.
126. तुळसी नारायण (शिवदयाळ) यांनी आग्रा येथे राधास्वामी सत्संग सभा ही सामाजिक संस्था स्थापन केली.
View, Comments and share..........
0 Comments