Subscribe Us

header ads

Vinayak Damodar Savarkar: Veer Savarkar

Vinayak Damodar Savarkar: Veer Savarkar, Indian politician and writer

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक

28 मे: जयंती

26 फेब्रुवारी : स्मृतिदिन


बालपण व शिक्षण:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भगूर या गावी 28 मे 1883 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर व आईचे नाव राधाबाई सावरकर हे होते.दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. 

वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ . सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील 1899 च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. 

विनायक सावरकरांनी शालेय शिक्षण घेत असतानाच सन 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली हीच संघटना पुढे 1904 मध्ये मित्रमेळ्याचे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर करण्यात आले.

सावरकरांनी 1905 मध्ये मुंबई विद्यापीठातून बी ए ची पदवी संपादन केली व ते 1906 मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांचे शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले ते कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सुद्धा क्रांतिकारक असल्याकारणाने बॅरिस्टरची पदवी देण्याचे लांबवण्यात आले होते.


यमुनाबाई (माई) यांच्या सोबत मार्च 1901 मध्ये विवाह झाला. त्यांना प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास अपत्ये झाली.

X X

सावरकर यांच्या जीवनावरील प्रभाव:

छत्रपती शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी, चापेकर बंधू.

चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे 

"देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" 

अशी शपथ घेतली.

जोसेफ मॅझिनी या नावाचे मॅझिनी या इटालियन देशभक्ताचे चरित्र वाचन केले होते.


इंडिया हाऊस:

सावरकर लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी गेलेले असताना लंडनच्या इंडिया हाऊस मध्ये भारतीय क्रांतिकारकांच्या अनेक सभा होत होत्या. त्या सभांचे आयोजन सावरकर स्वतः करू लागले.

लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत-हसत फाशी स्वीकारली.

शास्त्रे जमिनीची मोहीम बॉम्ब बनविण्याचे तंत्र भारतात गुप्तपणे पिस्तूल पाठविणे इत्यादी कार्यामुळे इंडिया हाऊस भारतीय क्रांतिकारकाच्या चळवळीचे जनक केंद्र बनले होते.



सावरकरांनी या काळात जोसेफ मॅझिनी या नावाचे मॅझिनी या इटालियन देशभक्ताचे चरित्र वाचन केले होते.

1857 चे भारतीय स्वातंत्र्यसमर इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथ ही त्यावेळी सावरकरांनी लिहिले.

1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट काँग्रेस भरली. तिला सावरकरांच्या प्रेरणेने मादाम कामा गेल्या व भारताच्या तीन रंगी स्वतंत्र ध्वज त्यांनी तेथे प्रथमच फडकवला. ह्या ध्वजावर तांबड्या, केशरी व हिरव्या रंगाचे तीन आडवे पट्टे होते. मधल्या पट्ट्यावर 'वंदे मातरम्' हे शब्द लिहिलेले होते. वरच्या पट्ट्यावर आठ कमळे होती व तळच्या पट्ट्यावर सूर्य व चंद्रकोर काढलेली होती.

रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकण्यासाठी त्यांनी हेमचंद्र दास आणि सेनापती बापट यांना फ्रान्सला पाठविले. त्यांच्यामार्फत ही विद्या भारतात आली.



जॅक्सनची हत्या व सावरकर यांना शिक्षा:

इकडे नाशिकला त्यांचे वडील बंधू गणेशपंत ऊर्फ बाबा सावरकर यांना अभिनव भारताच्या 'मित्रमेळ्या 'तीळ देशभक्तीपर गीतांबद्दल 1909 साली जन्मठेपेची शिक्षा जॅक्सन या इंग्रज न्यायाधिशाने सुनावली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या 3 सदस्यांना फाशी झाली.

सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरूवात केली. 

जॅक्सनच्या हत्येचा संबंध सरकारने विनायक दामोदर सावरकरांशी जोडला. सावरकरांना लंडनला पकडून मोरिया बोटीने भारतात पाठविण्यात आले. वाटेत फ्रान्समधील मार्सेलिसजवळ त्यांनी बोटीतून समुद्रात उडी मारली आणि फ्रान्सचा किनारा गाठला. 

पण फ्रेंच पोलिसांनी त्यांना आश्रय देण्याऐवजी इंग्रजांच्या ताब्यात दिले. सावरकरांची ही उडी त्रिखंडात गाजली.

भारतात सावरकरांना आणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षांची (दोन जन्मठेपेची) सश्रम कारावासाची शिक्षा ती भोगण्यासाठी त्यांना अंदमानला पाठविण्यात आले. 

X X

अंदमानच्या काळकोठडीत सावरकर:

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. त्यांना हरप्रकारे छळले. 

खड्या बेडीत काय टांगले. तेलाच्या घाण्याला काय जुंपले. 

नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम काय दिले. या मरणप्राय यातना, वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, 

मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी, दगडांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला.

तेथे त्यांना अमानुष शिक्षा भोगावी लागली. सुरुवातीला वर्षभर अंधारकोठडीत ठेवण्यात आले. 

तुरुंगात त्यांच्यावर अनेक बंधने होती आणि रात्रंदिवस कष्टाची कामे करावी लागते होडी, तरीपण अशा परिस्थितीतही सावरकरांनी विविध प्रकारची साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबर तुरूंगात असताना त्यांनी शुद्धीकरणाची चळवळही सुरू केली होती.

अंदमानातून दिनांक 6 जानेवारी 1924 सुटका झाली.



सामाजिक बांधिलकीची कामे:

1924 मध्ये सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध म्हणून ठेवण्यात आले. राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत राहायचे या अटीवर सुटका झाली. तेरा वर्षे हिंदुसंघटन अस्पृश्यता निवारण, शुद्धीकरण या चळवळी केल्या. 

हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अधःपतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (1190 नोव्हें. ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले.

त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. 



रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. सुमारे 15 आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.


नेताजी सुभाषचंद्र बोस व सावरकर भेट:

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी सैनिकीकरणाची चळवळ केली. तिचा फायदा आझाद हिंद सेनेला मिळाला. त्या सेनेचे निमति नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना मुंबईला भेटून गेले होते.



अखंड भारता'चे पुरस्कर्ते:

15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आपण ज्यासाठी झगडलो ते भारताचे स्वातंत्र्य 'याच देही याची डोळा' पाहायला मिळाल्याबद्दल त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. 

सावरकर हे 'अखंड भारता'चे पुरस्कर्ते होते. देशाच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता. पाकिस्तानच्या निर्मितीबद्दल त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले होते.

10 मे 1952 रोजी पुण्याला त्यांनी 'अभिनव भारत' ही संस्था विसर्जित करून टाकली. कारण तिचा स्वातंत्र्य मिळविणे हा हेतू साध्य झाला होता.



संघटना स्थापन:

1. अभिनव भारत

2. अखिल भारतीय हिंदू महासभा


कविता संग्रह/पोवाडा :

1. "सागरा प्राण तळमळला" ( 'सागरा प्राण तळमळला' या कवितेला 2009 साली 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत..)

2. "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", 

3. "जयोस्तुते",

4. "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.

5. 'कमला' हा काव्यसंग्रह


ग्रंथ संपदा:

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहलेले 41 पुस्तके:

1. अखंड सावधान असावे

2. 1857 चे स्वातंत्र्यसमर (1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला.)

3. अंदमानच्या अंधेरीतून

4. अंधश्रद्धा भाग 1

5. अंधश्रद्धा भाग 2

6. संगीत उत्तरक्रिया

7. संगीत उःशाप

8. ऐतिहासिक निवेदने

9. काळे पाणी

10. क्रांतिघोष

11. गरमा गरम चिवडा

12. गांधी आणि गोंधळ

13. जात्युच्छेदक निबंध

14. जोसेफ मॅझिनी( इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले.)

15. तेजस्वी तारे

16. नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन

17. प्राचीन अर्वाचीन महिला

18. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

19. भाषा शुद्धी

20. महाकाव्य कमला

21. महाकाव्य गोमांतक

22. माझी जन्मठेप


23. माझ्या आठवणी - नाशिक

24. माझ्या आठवणी - पूर्वपीठिका

25. माझ्या आठवणी - भगूर

26. मोपल्यांचे बंड

27. रणशिंग

28. लंडनची बातमीपत्रे

29. विविध भाषणे

30. विविध लेख

31. विज्ञाननिष्ठ निबंध

32. शत्रूच्या शिबिरात

33. संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष

34. सावरकरांची पत्रे

35. सावरकरांच्या कविता

36. स्फुट लेख

37. हिंदुत्व

38. हिंदुत्वाचे पंचप्राण

39. हिंदुपदपादशाही

40. हिंदुराष्ट्र दर्शन

41. क्ष - किरणें



इतिहासविषयक पुस्तके:

1. 1857 चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. 1857च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)


2. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

3. हिंदुपदपादशाही


कथा:

1. सावरकरांच्या गोष्टी भाग - 1

2. सावरकरांच्या गोष्टी भाग - 2


कादंबऱ्या:

1. काळेपाणी




2. मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.



सन्मान व पुरस्कार:

1. 1937 मध्ये सावरकरांची हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 


2. 1938 मध्ये मुंबई येथे भरलेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 

3. नागपूर विद्यापीठाद्वारे 'डी.लिट' पदवी प्रदान करण्यात आली.



विशेषता:

'भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी बजावलेल्या महान कामगिरीबद्दल त्यांना 'स्वातंत्र्यवीर' म्हणून गौरविले जाते.


मृत्यू:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुमारे 60 वर्षे स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. 

1966 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. 

1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. 



अन्नत्याग केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी दादर, मुंबई, महाराष्ट्र येथे त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

X X

साहित्य:


1.  ने मजसी ने


ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता

मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू

तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें

मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन

विश्वसलो या तव वचनी । मी

जगदनुभव-योगे बनुनी । मी

तव अधिक शक्त उध्दरणी । मी

येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी

भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती

गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें

जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता । रे

नवकुसुमयुता त्या सुलता । रे

तो बाल गुलाबही आता । रे

फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा

प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या

भुलविणें व्यर्थं हें आता । रे

बहु जिवलग गमतें चित्ता । रे

तुज सरित्पते । जी सरिता । रे

तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी

तरि आंग्लभूमी-भयभीता । रे

अबला न माझिही माता । रे

कथिल हें अगस्तिस आता । रे

जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला.



2. जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे


जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे


राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची

स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची

परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी

स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे


गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली

स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली

तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची

स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे


मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती

स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते

स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे


हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते

तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण

तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे.



3. हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा


हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा

हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री सौभाग्य भूतिच्या साजा

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरणज तुज, अभिनंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी

ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहलीं राजधान्यांची । जंगले

परदास्य पराभविं सारीं । मंगले

या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी

जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा


सावरकरांचे विचार:









View, Comments and share....... 

Post a Comment

4 Comments