August 15 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 15 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
National flag Day
भारतीय स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट 1936 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हक्काचा लढा राजकीय पातळीवर लढण्यासाठी "स्वतंत्र मजूर पक्ष " या राजकीय पक्षाची स्थापना केली व त्या माध्यमातून 1937 च्या निवडणुकीत मजूर पक्षाने 13 जागा जिंकल्या.
15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले.
X X
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले भाषण "ट्रीस्ट विथ डेस्टिनी" आकाशवाणीच्या संग्रही आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी स्वामी रामानंद तीर्थ, कृष्णाचार्य जोशी,डॉ. जी. एस. मेलकोटे यांच्यासोबत सुलतान बाजारात खांद्यावर तिरंगा ध्वज होऊन घेऊन गेले. तेव्हा यांना पकडून चंचलगुडा जेलमध्ये टाकण्यात आले. संपूर्ण हैदराबाद संस्थानातून त्यावेळी दोन महिन्याच्या अवधीत 21,000 लोक झेंडा सत्याग्रह करून तुरुंगात गेले होते.
15 ऑगस्ट 1965 रोजी दूरदर्शनचे दिल्लीमध्ये नियमित प्रसारण सुरू झाले.
15 ऑगस्ट 1979 रोजी केंद्र सरकारने "ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना" ची सुरुवात केली. या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार करता यावा. यासाठी त्यांना शेती व शेतीशी संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.
15 ऑगस्ट 1997 रोजी भारत सरकारने कस्तुरबा गांधी शिक्षण योजना ची सुरुवात केली.
15 ऑगस्ट 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडून राबविण्यात आली. याचे ब्रीदवाक्य शांततेतून समृद्धीकडे.
X X
15 ऑगस्ट 2008 पासून पंतप्रधान रोजगार योजना व ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजना एकत्रित करून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम तयार करण्यात आला.
15 ऑगस्ट 2008 चे किर्ती चक्रा चे मानकरी रवी दादा मेहता, कौन्सिलर वेंकटेश्वर राव ,अजय सिंह पठानिया, रूपसिंग, कर्नल मनीष कदम, कॅप्टन सुनील कुमार या शहीद जवानांना कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
15 ऑगस्ट 2016 रोजी संयुक्त राष्ट्र संघात कर्नाटकातील ज्येष्ठ गायिका एम .एस. सुब्बलक्ष्मी यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन ठेवण्यात आले व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. 19 ऑगस्ट रोजी समारोप संपन्न झाला.
15 ऑगस्ट 1969 रोजी इस्त्रो संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे काम केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित चालते व त्याचे मुख्यालय कर्नाटकातील बंगळूर या ठिकाणी आहे.
15 ऑगस्ट 2023 रोजी भारत सरकारने स्मारक मित्र योजना अंतर्गत आजादी का अमृत महोत्सव संपेपर्यंत स्मारक मित्र योजनेअंतर्गत 500 स्थळे खाजगी क्षेत्राकडे सपूर्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही पर्यटन स्थळे पूर्वी पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली होती.
X X
15 ऑगस्ट 1519 रोजी पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
15 ऑगस्ट 1664 रोजी कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्यांदा) पराभूत केले.
15 ऑगस्ट 1824 रोजी अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
15 ऑगस्ट 1862 रोजी मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
15 ऑगस्ट 1914 रोजी पनामा कालव्यातुन एस. एस. अॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.
15 ऑगस्ट 1929 रोजी ग्राफ झेपेलिन हा संशोधक ’झेपेलिन’ बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना झाले l.
15 ऑगस्ट 1945 रोजी दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.
X X
15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्त्त्त्वात आला.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.
15 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.
15 ऑगस्ट 1948 रोजी दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
15 ऑगस्ट 1960 रोजी कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
15 ऑगस्ट 1971 रोजी अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
15 ऑगस्ट 1971 रोजी बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
15 ऑगस्ट 1975 रोजी बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.
15 ऑगस्ट 1982 रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.
X X
15 ऑगस्ट 1988 रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.
15 ऑगस्ट 1769 रोजी नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 मे 1821 रोजी सेंट हेलेना येथे झाला.
15 ऑगस्ट 1798 रोजी भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 जानेवारी 1831 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1865 रोजी रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मार्च 1926 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1867 रोजी गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेतेयांचा जन्म झाला. शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. त्यांचा मृत्यू 7 मार्च 1922 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1872 रोजी योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू पाच डिसेंबर 1950 मध्ये पाँडिचेरी या ठिकाणी झाला.
X X
15 ऑगस्ट 1873 रोजी भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 मार्च 1942 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1904 रोजी मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म झाला. त्यांचा त्यांचा मृत्यू 4 नोव्हेंबर 1922 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1912 रोजी ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 फेब्रुवारी 1947 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1913 रोजी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ‘फुलारी’ ऊर्फ ‘बी. रघुनाथ’ – लेखक व कवी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 सप्टेंबर 1953 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1915 रोजी इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 ऑक्टोबर 1991 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1917 रोजी अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्या लेखिकायांचा जन्म झाला. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला 1975 मध्ये राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा मृत्यू 13 नोव्हेंबर 2001 मध्ये झाला.
X X
15 ऑगस्ट 1922 रोजी वामनदादा कर्डक – लोककवी यांचा जन्म झाला.
15 ऑगस्ट 1929 रोजी उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 ऑक्टोबर 1999 मध्ये झाला.
15 ऑगस्ट 1945 रोजी बेगम खालेदा झिया – बांगला देशच्या पंतप्रधान यांचा जन्म झाला.
15 ऑगस्ट 1947 रोजी राखी – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म झाला.
15 ऑगस्ट 1961 रोजी भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म झाला.
15 ऑगस्ट 1964 रोजी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म झाला.
15 ऑगस्ट 1971 रोजी भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म झाला.
15 ऑगस्ट 1992 रोजी भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म झाला.
X X
15 ऑगस्ट 1942 रोजी महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक जानवारी 1892 मध्ये झाला .
15 ऑगस्ट 1974 रोजी स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1903 मध्ये झाला होता.
15 ऑगस्ट 1975 रोजी शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली. त्यांचा जन 17 मार्च 1920 मध्ये झाला होता.
15 ऑगस्ट 2004 रोजी अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 31 जुलै 1941 मध्ये झाला होता.
15 ऑगस्ट 2005 रोजी भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1927 मध्ये झाला होता.
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/07/august-14-day-of-special-dinvishesh-14.html
👆
August 14 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 14 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/12/aurobindo-indian-philosopher-yogi.html
👆
Sri Aurobindo: Indian Philosopher, Yogi, Maharishi, Poet, Indian Nationalist and Journalist
ऑरोबिंदो ऊर्फ महायोगी अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद:
विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ,महायोगी,स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ
15 ऑगस्ट : जन्मदिन
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
15 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
X X
XX
View, Comments and share
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/bindeshwar-pathak.html
👆
Bindeshwar Pathak:
सुलभ शौचालय योजनेचे जनक डॉ. बिंदेश्वर पाठक
मृत्युदिन: 15 ऑगस्ट 2023
XX
View, Comments and share
3 Comments
Nice information sir
ReplyDeleteVery nice information sir
ReplyDeleteबहुत बढ़िया प्रस्तुति।
ReplyDelete