August 14 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 14 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
Partition Horrors Remembrance Day (INDIA)
Social Security Day
World Lizard Day
14 ऑगस्ट 2006 मध्ये मेजर जेम्स थॉमस व शिख लाईट इन्फंट्री चे विजयपाल सिंह (मरणोत्तर) यांना भारत सरकारने 2006 ची किर्ती चक्र देऊन सन्मानित केले.
14 ऑगस्ट 2016 रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेली शौर्यपदक,1) अशोक चक्र- हंगपण दादा -भारतीय लष्कर (अरुणाचल प्रदेश )(मरणोत्तर ) 2) शौर्य चक्र - लेफ्टनंट कर्नल ई. के. निरंजन (मरणोत्तर ),गुरुशेवत सिंग (मरणोत्तर) 3) नौसेना मेडल - नौसैनिक वीरसिंह व विलास कुमार नरवाल, एकूण 82 वीर जवानांना विविध शौर्य पदके प्रदान करण्यात आली.
14 ऑगस्ट 2016 पासून महाराष्ट्रातील पहिले संत शिरोमणी श्री सावता माळी आठवडी बाजार मुंबई येथे विधानभवनाच्या प्रांगणात सुरू करण्यात आला.
14 ऑगस्ट 1660 रोजी मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.
X X
14 ऑगस्ट 1862 रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
14 ऑगस्ट 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
14 ऑगस्ट 1893 रोजी मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.
14 ऑगस्ट 1943 रोजी नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
14 ऑगस्ट 1945 रोजी दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
X X
14 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.
14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
14 ऑगस्ट 1958 रोजी ’एअर इंडिया’ची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
14 ऑगस्ट 1971 रोजी बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
14 ऑगस्ट 2006 रोजी श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे 61 तामिळ मुली ठार झाल्या.
14 ऑगस्ट 2010 रोजी पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
X X
14 ऑगस्ट 1777 रोजी हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मार्च 1851 मध्ये झाला.
14 ऑगस्ट 1900 रोजी महाराष्ट्रीयन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,पत्रकार, अभ्यासक आणि वक्ते एस. के. पाटील यांचा जन्म झाला.
14 ऑगस्ट 1907 रोजी गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका यांचा जन्म झाला.. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 1996 मध्ये झाला.
14 ऑगस्ट 1911 रोजी वेदतिरी महाऋषी – भारतीय तत्त्वज्ञानी यांचा जन्म झाला.
14 ऑगस्ट 1923 रोजी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, सिंडिकेटेड स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक आणि युनायटेड किंगडमचे माजी उच्चायुक्त कुलदीप नायर यांचा जन्म झाला.
X X
14 ऑगस्ट 1925 रोजी जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार यांचा जन्म झाला. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. त्यांचा मृत्यू 16 सप्टेंबर 1994 मध्ये झाला.
14 ऑगस्ट 1957 रोजी जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’ – विनोदी अभिनेता यांचा जन्म आंध्र प्रदेश मधील प्रकाशन जिल्ह्यातील अमकम या ठिकाणी मूळचे आंध्र प्रदेश मधील हे कुटुंब त्यांचे आई-वडील मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प धारावी मध्य एका चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये राहत असत. जॉनी च वडील गिरणी कामगार होते.
ते घरामध्ये एकूण आठ जणांचे कुटुंब होते. वडील दारूच्या व्यसना पायी वारले आणि त्यांच्या नशिबाचे चक्र फिरवले. किंग सरकारच्या झोपडपट्टीत त्याचे कुटुंब राहायला आले. जॉनी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये तेलगू माध्यमाच्या शाळेत शिकत होता. सात रुपये फीस होती. पण ते सुद्धा देणे परवडत नसल्यामुळे त्याला कधी कधी वर्ग बाहेर जावे लागे. कमी वयात जॉनी लिव्हर वर जबाबदारीची जाणीव झाली आणि त्या जबाबदारीची जाणीव म्हणून त्याने नकला करणे रेकॉर्ड डान्स करणे पैसे मिळवायचे आणि रात्री उशिरा घरी येऊन दुसऱ्या दिवशी शाळेला जायचे आणि आपले कुटुंब अशा पद्धतीने ते चालवत होते. पैसे नसल्यामुळे सातव्या वर्गातच त्याला शाळा सोडावे लागले आणि देशी दारूच्या गुत्त्यात त्याला काम करावे लागले त्या गुत्त्यात खडकी मारणे ग्लास धुणे त्यानंतर त्याने रस्त्याला उभे टाकून गोळ्या विकल्या बॉलपेन विकले आणि त्याचे घर चालवत होते. पुढे बस स्टॅन्ड वर फेरीवाला म्हणून काम करायचा सिनेस्टारची नक्कल करायचा आणि आपली कुटुंबाची जबाबदारी पार पाडायचा गल्ली मधल्या गणपती उत्सवात जाहीर नेहमी विक्री करायचा ती लोकांना खूप आवडायची त्यावेळेस त्याला पैसे मिळायचे आणि कुटुंब चालवायचे. आठव्या वर्षी हिंदुस्तान लिव्हर कंपनीत जॉनी कामाला लागला. सातवी पास मुलाला काय मिळणार तर झाडू चे काम स्लीपर चे काम फरशा पुसणे इत्यादी काम करत असे. कंपनीतील रसायनाचे ड्रम उघडायचे तो साफ करायचे त्यात डोके घालून त्याने आवाज काढला आणि तो आवाज घुमला. त्याला त्याचे आश्चर्य वाटले आणि त्यामुळे तो वेगवेगळे आवाज काढायचा. त्यामुळे एका कामगाराने सुपरवायझर कडे तक्रार केली तेव्हा त्याने बोलून घेतले आणि त्याला विचारले त्यावर त्याने आपल्या नकला करून दाखवल्या त्यामुळे तो सुपरवायझर खुश झाला आणि जॉनीला गेट-टुगेदर मध्ये आपल्या नकला करायची संधी मिळाली. या संमेलनात त त्याच्या नकला ऐकायला शत्रुघ्न सिन्हा राजेश खन्ना अशोक कुमार आदींची मिमिक्री करून त्याने सभागृह हास्य मय केले. कंपनीमधील तो सर्वांच्या नकला करत असेल आणि सर्वांना हसवत असे. युनियनच्या लीडर सुरेश भोसले यांनी पाहिले व त्याला म्हणाले अरे याने तर लिव्हरचा बँड बजावला असून याला जॉनी नाही तर जावे जॉनी लिव्हर म्हणायचे. त्यादिवशी पासून त्याची ओळख ज्याने लिव्हर अशी झाली आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीमधील त्याचे व्यावसायिक नाव सुद्धा जॉनी लिव्हरच झाले. त्यानंतर त्याने आर्केस्ट्रा मध्ये काही दिवस काम केले बाहेर कार्यक्रम करायचा पैसे मिळवायचा त्यांनी नोकरी सोडली आणि त्याच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडिओ कॅसेट आली. नंतर जॉनी कल्याणजी आनंदजी यांच्या समवेत जगभर फिरला. कल्याणजी सोबत त्याने अमेरिका पहिल्यांदा पाहिली आणि त्यांच्या मदतीने 1980 मध्ये दक्षिणात्य चित्रपटांमध्ये मिमिक्री चे काम त्याला मिळाले आणि जॉनीची चित्रपटात एन्ट्री झाली. अनेक वर्ष मिमिक्रीच करायचा अभिनयाची संधी त्यांना एन. चंद्रांनी तेजाब या चित्रपटातून दिली आणि एक्टिंग कलाकार म्हणून जॉनी पुढे आला. त्यांनी दर्द का रिश्ता या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर 400 पेक्षा अधिक चित्रपटात जॉनीनी आपल्या भूमिका सादर केल्या.
14 ऑगस्ट 1962 रोजी रमीझ राजा – पाकिस्तानी क्रिकेटपटू व समालोचक यांचा जन्म झाला.
14 ऑगस्ट 1968 रोजी प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू यांचा जन्म झाला.
14 ऑगस्ट 1958 रोजी जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 19 मार्च 1900 मध्ये झाला होता.
14 ऑगस्ट 1984 रोजी कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी मृत्यु झाला. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे त्यांनी 52 किलोग्रॅम वजन गटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कुस्तीमध्ये कांसपदक जिंकले. खाशाबायने 1948 मध्ये लंडन येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये क्लायमेट वजन गटात कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतातील खेळाडू आहेत, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] त्यांचा जन्म 15 जानेवारी 1926 मध्ये सातारा जिल्ह्यातील घोडेश्वर या ठिकाणी झाला त्यांचे संपूर्ण नाव खाशाबा दादासाहेब जाधव त्यांना केडी या टोपण नावाने ही ओळखले जाते. त्यांना भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मान केले. 2000 मध्ये त्यांना भारत सरकारने कुस्ती मधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. तसेच 2010 मध्ये दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम साठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव देण्यात आले. 15 जानेवारी 2023 मध्ये गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुगल द्वारे सन्मानित केले गेले. त्यांचे वडील पैलवान होते त्यांनी आठ वर्षाचे असताना कुस्तीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पैलवानाला एक दोन मिनिटात लढवले अशी त्यांची ख्याती होती. 1940 ते 47 या कालावधीमध्ये त्यांनी कराड मधील टिळक हायस्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून बाकीचे नंतरचे जीवन त्यांनी कुस्तीकडे वळविले लहानपणापासूनच त्यांना कुस्तीचे वेड होते. त्यांचे वडील कुस्तीचे खेळाचे वस्ताद होते. त्यामुळे त्यांच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांना ते मार्गदर्शन करीत असत. शाळेमध्ये सुद्धा ते चांगले मार्क घ्यायचे त्याच्यामुळे कुस्ती साठी त्यांचे शिक्षण कधीच आडवे आले नाही. 1995 मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या मुद्द्यावर भरती झाले. त्यांनी अंतर विभागीय कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर हे स्पोर्टचे मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. त्यांनी पोलीस खात्यात 27 वर्ष नोकरी केली. असिस्टंट पोलीस कमिशनर या मुद्द्यावरून ते निवृत्त झाले.
14 ऑगस्ट 1988 रोजी एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1998 मध्ये झाला होता.
XX
14 ऑगस्ट 2011 रोजी शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला होता.
14 ऑगस्ट 2012 रोजी विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांचा यकृताच्या आजाराने चेन्नई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे मृत्यु झाला. त्यांचा जन्म 26 मे 1945 मध्ये लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला. महाराष्ट्रातील एक धुरंदर राजकारणी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देशातील एक राजकारणी होते. 1974 मध्ये त्यांनी त्यांच्या बाभूळगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. आणि त्यांच्या राजकीय कार्याचा आलेख चढत जाऊन 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 आणि 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या कालखंडा दरम्यान ते महाराष्ट्राचे दोन वेळेस मुख्यमंत्री झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीएससी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आणि वयाच्या 29 व्या वर्षापासून राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी युवक काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले. त्यानंतर उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, असे अनेक पदे त्यांनी भूषवले. 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर ते निवडून गेले. आणि 1982 मध्ये मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रात पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. त्यानंतर सतत काँग्रेसच्या सत्तेमध्ये विलासराव देशमुख कायम मंत्रिमंडळामध्ये त्यांचे स्थान राहिले. त्यामध्ये त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा महत्त्वाच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदावर सक्षमपणे कार्य केले. 13 ऑक्टोबर 1999 ला पहिल्यांदा आणि 2004 च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. पण 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. महाराष्ट्रातील सक्षम राजकारणामुळे त्यांना केंद्रामध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. 2009 मध्ये त्यांची निवड राज्यसभेवर खासदार म्हणून झाली. त्यानंतर 2009 ते 2011 या कालखंडात मनमोहन सिंग सरकारमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. जानेवारी 2011 ते 12 जुलै 2011 या दरम्यान त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. 12 जुलै 2011 पासून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणून त्यांनी काम केले.
14 ऑगस्ट 2017 रोजी प्रसिद्ध भारतीय कवी व साहित्यकार चंद्रकांत देवताले यांचे निधन झाले.
14 ऑगस्ट 1968 रोजी प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू यांचा जन्म झाला.
14 ऑगस्ट 1958 रोजी जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 19 मार्च 1900 मध्ये झाला होता.
14 ऑगस्ट 1984 रोजी कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी मृत्यु झाला. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे त्यांनी 52 किलोग्रॅम वजन गटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कुस्तीमध्ये कांसपदक जिंकले. खाशाबायने 1948 मध्ये लंडन येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये क्लायमेट वजन गटात कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतातील खेळाडू आहेत, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] त्यांचा जन्म 15 जानेवारी 1926 मध्ये सातारा जिल्ह्यातील घोडेश्वर या ठिकाणी झाला त्यांचे संपूर्ण नाव खाशाबा दादासाहेब जाधव त्यांना केडी या टोपण नावाने ही ओळखले जाते. त्यांना भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मान केले. 2000 मध्ये त्यांना भारत सरकारने कुस्ती मधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. तसेच 2010 मध्ये दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम साठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव देण्यात आले. 15 जानेवारी 2023 मध्ये गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुगल द्वारे सन्मानित केले गेले. त्यांचे वडील पैलवान होते त्यांनी आठ वर्षाचे असताना कुस्तीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पैलवानाला एक दोन मिनिटात लढवले अशी त्यांची ख्याती होती. 1940 ते 47 या कालावधीमध्ये त्यांनी कराड मधील टिळक हायस्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून बाकीचे नंतरचे जीवन त्यांनी कुस्तीकडे वळविले लहानपणापासूनच त्यांना कुस्तीचे वेड होते. त्यांचे वडील कुस्तीचे खेळाचे वस्ताद होते. त्यामुळे त्यांच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांना ते मार्गदर्शन करीत असत. शाळेमध्ये सुद्धा ते चांगले मार्क घ्यायचे त्याच्यामुळे कुस्ती साठी त्यांचे शिक्षण कधीच आडवे आले नाही. 1995 मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या मुद्द्यावर भरती झाले. त्यांनी अंतर विभागीय कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर हे स्पोर्टचे मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. त्यांनी पोलीस खात्यात 27 वर्ष नोकरी केली. असिस्टंट पोलीस कमिशनर या मुद्द्यावरून ते निवृत्त झाले.
14 ऑगस्ट 1988 रोजी एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1998 मध्ये झाला होता.
XX
14 ऑगस्ट 2011 रोजी शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला होता.
14 ऑगस्ट 2012 रोजी विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांचा यकृताच्या आजाराने चेन्नई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे मृत्यु झाला. त्यांचा जन्म 26 मे 1945 मध्ये लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला. महाराष्ट्रातील एक धुरंदर राजकारणी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देशातील एक राजकारणी होते. 1974 मध्ये त्यांनी त्यांच्या बाभूळगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. आणि त्यांच्या राजकीय कार्याचा आलेख चढत जाऊन 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 आणि 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या कालखंडा दरम्यान ते महाराष्ट्राचे दोन वेळेस मुख्यमंत्री झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीएससी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आणि वयाच्या 29 व्या वर्षापासून राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी युवक काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले. त्यानंतर उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, असे अनेक पदे त्यांनी भूषवले. 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर ते निवडून गेले. आणि 1982 मध्ये मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रात पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. त्यानंतर सतत काँग्रेसच्या सत्तेमध्ये विलासराव देशमुख कायम मंत्रिमंडळामध्ये त्यांचे स्थान राहिले. त्यामध्ये त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा महत्त्वाच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदावर सक्षमपणे कार्य केले. 13 ऑक्टोबर 1999 ला पहिल्यांदा आणि 2004 च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. पण 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. महाराष्ट्रातील सक्षम राजकारणामुळे त्यांना केंद्रामध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. 2009 मध्ये त्यांची निवड राज्यसभेवर खासदार म्हणून झाली. त्यानंतर 2009 ते 2011 या कालखंडात मनमोहन सिंग सरकारमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. जानेवारी 2011 ते 12 जुलै 2011 या दरम्यान त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. 12 जुलै 2011 पासून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणून त्यांनी काम केले.
14 ऑगस्ट 2017 रोजी प्रसिद्ध भारतीय कवी व साहित्यकार चंद्रकांत देवताले यांचे निधन झाले.
14 ऑगस्ट 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना 102 बी घटना दुरुस्ती 2018 नुसार करण्यात आली यातील तरतूद कलम 338 बी होते. या आयोगाचे पहिले अध्यक्ष आर्यन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2021 पासून ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपाचे हंसराज अहिर हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष आहेत.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/07/august-13-day-of-special-dinvishesh-13.html
XX
View, Comments and share....
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/07/august-13-day-of-special-dinvishesh-13.html
👆
दिनविशेष
August 13 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 13 : दिनविशेष
XX
View, Comments and share....
0 Comments