Subscribe Us

header ads

April 5 - Day of Special (Dinvishesh)

April 5 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 5 : दिनविशेष

महत्त्वाच्या घटना


5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
5 एप्रिल 1663 रोजी रमजान च्या दिवसात पुणे येथिल लाल महालात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी त्याच्यावर आक्रमण केले व त्याची बोटे छाटली.

5 एप्रिल 1930 ला दांडी येथे मिठाचा सत्याग्रहातील सत्याग्रही पोहोचले व सत्याग्रह समाप्त झाला साबरमती ते दांडी हे 240 मैलाचे अंतर पायी चालून जाताना महात्मा गांधींनी वाटेत अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या सभांमध्ये केलेल्या भाषणामुळे सर्वत्र जनजागृती निर्माण झाली.

5 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबाई यांचा मृत्यू झाला त्यांनी "बायबलचे मराठी भाषांतर", "स्त्रीधर्मनीती", "दि हाय कास्ट हिंदू वुमन" इत्यादी ग्रंथ लिहिले होते.

5 एप्रिल 2016 रोजी भारत सरकारने "स्टँड अप इंडिया योजना " ची सुरुवात केली.

X X
5 एप्रिल 1963 रोजी पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.


5 एप्रिल 1679 रोजी राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. 10]

5 एप्रिल 1930 रोजी 241 मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.

5 एप्रिल 1949 रोजी भारत स्काऊट गाईडची स्थापना करण्यात आली.22 फेब्रुवारी 1857 रोजी बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म लंडन येथे झाला. जगभरात पसरलेल्या स्काऊट व गाईड या संघटनेचे ते जनक होते. 1876 मध्ये ते लष्करात तेराव्यानुसार फलटणीत कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी भारत अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका अशा विविध ठिकाणी आपली कामगिरी बजावली. आफ्रिकेतील बोहर युद्धात 1899 ते 1902 मध्ये मेफेकिंग या शहराची शत्रूच्या वेढ्यापासून केलेली मुक्तता ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे त्यांना मेजर जनरल पदावर बढती मिळाली. त्या दलाचे इन्स्पेक्टर जनरल म्हणून 1903 पर्यंत त्यांनी काम केले. त्यानंतर 1907 मध्ये ते लेफ्टनंट जनरल झाले. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1941 मध्ये झाला. सैनिकी स्काऊट करिता त्यांनी लिहिलेले एडसुट स्काउटिंग हे 1899 मध्ये पुस्तक शाळेतील मुलांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे लक्षात येतात. त्यांनी इंग्लंडच्या ब्राऊन अशी बेटावर मुलांचे पहिले स्काऊट शिक्षण शिबिर भरविले. ते 1907 मध्ये व अशाप्रकारे बालवीर स्काऊटची संघटना चळवळ सुरू केली. त्यानंतर ही चळवळ अनेक देशात पसरली. 1910 मध्ये त्यांनी आपली बहीण अग्निस बेडन पॉवेल हिच्या मदतीने मुलींसाठी वीरबाला (गर्ल गाईड) ही संघटना स्थापन केली मुलांना व मुलींना जगाचे आदर्श नागरिक बनविणे या संघटने मागील प्रमुख हेतू होता 1910 मध्ये सातव्या ऍड वर्डच्या सल्ल्यानुसार ते सेवानिवृत्त होऊन त्यांनी आपले सर्व आयुष्य बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले. या दोघा बहीण भावांनी भारतामध्ये 1921 ते 1937 मध्ये भेट दिली. लंडनमध्ये भरलेल्या 1920 च्या आंतरराष्ट्रीय स्काऊट मेळाव्याच्या वेळी जगाचे प्रमुख स्काऊट म्हणून त्यांना सर्वांमध्ये बहुमान दिला .लंडनमधील गिरवेल हे बालवीर शिक्षणाचे जागतिक केंद्र बनले. त्यांनी 1908 मध्ये लिहिलेले स्काऊटींग फॉर बॉईज 1915, मध्ये एडवेंचर्स अस् ए स्पाय,1917, मध्ये गर्ल गाइडिंग 1921 मध्ये व्हॉट स्काऊटस कॅन डू ही पुस्तके लिहिली.


5 एप्रिल 1955 रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
X X

5 एप्रिल 1957 रोजी कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

5 एप्रिल 2000 रोजी
अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – 10 या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले. सह्याद्री हे नाव महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्वत शिखर रांगा ज्यांना आपण पश्चिम घाट असे म्हणतो त्यावरून देवण्यात आले. महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र मुंबई हे सुरू झाले ते सुरुवातीला फक्त दोन तास झाले त्यावेळेला दूरदर्शन हे राष्ट्रीय चॅनल कृष्णधवल रंगांमध्ये होते. त्यानंतर 15 ऑगस्ट 1994 मध्ये स्वतंत्र दिनाच्या दिवशी डी डी सह्याद्री या केंद्राचे लॉन्चिंग झाले स्वतंत्र चॅनेल तयार करण्यात आले त्याला मराठी डीडी -10 असे नाव देण्यात आले हे चॅनेल पूर्ण संपूर्ण देशात प्रसारित होत असे. 2 जानेवारी 1999 रोजी डी डी सह्याद्री चॅनेल चे नवीन स्टुडिओमध्ये उद्घाटन झाले. एक जानेवारी 2000 पासून डीडी टेन ब्रॉडकास्टिंग वेळ ही त्याची दोन तासावरून 17 घंटे करण्यात आली प्रति दिवस. डीडी सह्याद्रीच्या चैनल च्या माध्यमातून महत्वपूर्ण माहितीचे कार्यक्रम काही फिल्म कार्यक्रम नवीन आणि जुने मराठी चित्रपट. इत्यादी प्रदर्शित करण्यात येत होते डी डी सह्याद्री या उपग्रह वाहिन
ही मुंबई पुणे आणि नागपूर या ठिकाणाहून कार्यक्रमाचे प्रसारण आणि सपोर्ट देण्यात आला होता. या वाहिनीवर ठाण्यामधील दहीहंडी महोत्सव दरवर्षी दाखवल्या जात असे.

5 एप्रिल 2000 रोजी जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे उद्घाटन.

5 एप्रिल 1999 रोजी
राष्ट्रीय समुद्री दिवस भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.


5 एप्रिल 1827 रोजी निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद, प्रायोगिक पॅथॉलॉजिस्ट आणि अँटीसेप्टिक आणि शस्त्रक्रियांचे प्रणेते सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म इंग्लंडमधील वेस्ट हॅम जवळील आफ्टर हाऊस येथे झाला. त्याला त्याच्या वैद्यकीय व शल्य चिकित्सक कार्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील रॉयल मेडल 1980 मध्ये मिळाले. 1890 मध्ये येडीनबर्ग विद्यापीठाच्या उपचारासाठी कॅमेरान पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला. 1894 मध्ये अल्बर्ट पथक प्रदान करण्यात आले. कोपली त्यांच्या जिवाणू विज्ञान आणि जखमावत मधील संसर्गाच्या संशोधनाने त्याचे ऑपरेशन तंत्र एका नवीन ज्ञानात आणले जिथे त्याच्या निरीक्षणे आणि त्याच्या पद्धतीने जगभरातील शस्त्रक्रियेत क्रांती घडून आणली. 1902 मध्ये कोपली पदका ने त्याला सन्मानित केले. सर्वप्रथम ते ग्लासगो रायल इन्फर्मरीमध सर्जन म्हणून अँटीसेप्टिक च्या तत्वाला चालना दिली. शल्य क्रिया उपकरणे रुग्णांची कातडी शिवणे सर्जन चे हात आणि वार्ड साठी निर्जंतुकीकरण म्हणून कार्बोलिक ऍसिड सध्याचे फिनोल त्यांनी आणले. त्यांनी जखमा बरे होण्यासाठी जळजळ आणि टिशूपरफ्यूजनच्या भूमिकेवर संशोधन केले. त्यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून नमुन्याचे विश्लेषण करून निदान शास्त्र प्रगत केले. एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिये नंतर जगण्याची शक्यता वाढविण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची धोरणे आखली व ती यशस्वी करून दाखविली. लुई पाश्चरच्या किनवनच्या तत्कालीन कादंबरीच्या मधील जंतू सिद्धांताच्या संबंधात जखमामध्ये सडणे हे जंतूमुळे होते. हे त्याने ओळखले याचे सर्वात मोठे योगदान त्यात त्यांनी दिले. त्यामुळे लिस्टच्या शल्य चिकित्सा कार्यामुळे शस्त्रक्रिये नंतरचे संक्रमण कमी झाले आणि रुग्णांसाठी शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित झाली. म्हणून त्याला आधुनिक शस्त्रक्रियेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. मिस्टर चे शालेय शिक्षण क्वेकर स्कूल मध्ये झाले. लिस्टर चे वडील हे खूप सूक्ष्म संशोधन करत होते त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि सर्जन बनण्याचा दृढनिश्चय त्याने केला. लिस्टर हा 1845 मध्ये मॅट्रिक झाला त्याने सुरुवातीला बी ए चा अभ्यास केला. सुरुवातीला 1846 ते 1847 मध्ये त्याने शरीरशास्त्र आणि अनु सिद्धांत या विषयाचा अभ्यास केला. त्याच्या निबंधासाठी त्याला पारितोषिक मिळाले. 1849 मध्ये लिस्टर ने वैद्यकीय विद्यार्थी म्हणून नोंदणी केली. ते युनिव्हर्सिटी डिबेटिंग सोसायटी आणि हॉस्पिटल मेडिकल सोसायटीमध्ये सक्रिय झाले. शरीरशास्त्र शरीर विज्ञान आणि शस्त्रक्रिया या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना सन्मानाचे प्रमाणपत्र प्रदान केले. त्यानंतर शरीरशास्त्राने शरीर विज्ञान मध्ये त्यांना रोप्य पदक प्रदान करण्यात आले आणि वनस्पती शास्त्र त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. 26 जून 2013 मध्ये वैद्यकीय इतिहासाकार रिचर्डसन आणि आर्थोपेडिक सर्जन ब्रायन रोड यांनी एक पेपर प्रकाशित केला. ज्यामध्ये त्यांनी लिस्टच्या पहिल्या ऑपरेशनच्या शोधाचे वर्णन केले. 17 जून 851 मध्ये लिस्टर हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता त्याची नेमणूक अपघातग्रस्त वार्डात हो झाली होती त्याने पहिले ऑपरेशन आठ प्रौढ मुलांची आई असलेली जुलिया सुलीवांवर ऑपरेशन केले दारूच्या नशे तिच्या पतीने तिच्या पोटात वार केले होते. लिस्टर हा मायक्रोस्कोपी या कौशल्य त्याची इतके प्रगत होते, की जर्मन हिस्टॉलोजिस्ट फ्रेडरिक गुस्ताव ह्यांनी याचे निरीक्षण दुरुस्त करू पुनर्गठीत केले ज्याने स्नायू तंतु साठी लहान रक्तवाहिन्या समजल्या होत्या. लिस्टरला 1852 मध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन ही वैद्यक शास्त्रातली पदवी प्रदान करण्यात आली. त्याने ॲनाटोमी आणि फिजिओलॉजी तसेच शस्त्रक्रियेमध्ये चार सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचा मृत्यू 10 फेब्रुवारी 1912 झाली.

X X
5 एप्रिल 1856 रोजी बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 नोव्हेंबर 1915 रोजी झाला होता.

5 एप्रिल 1908 रोजी बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 6 जुलै 1986 रोजी झाला.


5 एप्रिल 1909 रोजी अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 जून 1996 रोजी झाला.


5 एप्रिल 1920 रोजी डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी नालासोपारा येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबईमधील इस्माईल युसुफ कॉलेज मध्ये झाले. त्यावेळेला त्यांनी कुलगुरू सुवर्णपदक एम ए च्या परीक्षेमध्ये मुंबई विद्यापीठातून प्राप्त केले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज इथून पीएचडी प्राप्त केली. त्यांच्या पीएचडी चा विषय होता "मुस्लिम इन इंडिया: पॉलिटिकल अनालिसिस (फ्रॉम 1885-1906). वकिलीचा अभ्यास करून इंग्लंडहुन परत आल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये वकिली केली. त्यांची नियुक्ती मुख्य लोक अभियोक्ता म्हणून झाली. महाराष्ट्र सरकार मध्ये त्यांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम केले त्यानंतर भारतीय पार्लमेंट मध्ये मेंबर म्हणून त्यांनी काम केले. त्यांचे नियुक्ती कुलगुरू म्हणून जामिया उर्दू अलीगड युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आली. झकेरिया यांनी महाराष्ट्र राज्यातून १९६२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली ती औरंगाबाद या ठिकाणाहून आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेले. त्यावेळी त्यांनी नगर विकास मंत्री म्हणून काम केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहराचा नवीन प्लॅन तयार करण्यात आला. नवीन शहर त्यांनी सिडको आपण करून शहराच्या विकास 1970 मध्ये केला. त्याने त्यांच्या मतदार संघात अनेक महाविद्यालयाची स्थापना केली. महिला महाविद्यालयाची सुद्धा त्यांनी स्थापना केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ची स्थापना केली. त्यांनी दि मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टची स्थापना औरंगाबाद शहरांमध्ये करून या संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा आणि महाविद्यालय चालविली जातात.
त्यांचा मृत्यू 9 जुलै 2005 मध्ये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला.


5 एप्रिल 1920 रोजी आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार त्यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 24 नोव्हेंबर 2004 रोजी झाला.

X X

5 एप्रिल 1966 रोजी भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म झाला.

5 एप्रिल 1917 रोजी शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर त्यांचा मृत्यू झाला.

5 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 मध्ये झाला.


5 एप्रिल 1940 रोजी चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते यांचे निधन झाले त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 871 मध्ये झाला.


5 एप्रिल 1964 रोजी गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार यांचे निधन झाले.
X X
5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री हिचा मृत्यू झाला तिचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 मध्ये झाला होता.

5 एप्रिल 1996 रोजी भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक यांचा मृत्यू झाला.


5 एप्रिल 2002 रोजी मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक यांचा मृत्यू झाला.


X X







👆
April 4 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 4 : दिनविशेष




👆
Pandita Ramabai Sarasvati: Indian social reformer

पंडिता रमाबाई

स्मृतिदीन: 5 एप्रिल







X X
View, Comments and share...

Post a Comment

0 Comments