March 3 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 3 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
3 मार्च जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 2013 च्या 68 व्या अधिवेशनात 3 मार्च हा दिवस जागतिक वन्य जीव दिन म्हणून घोषित केला गेला. वन्यजीव म्हणजे वनात जंगलात राहणारे जीव, प्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी, वृक्ष आणि एकूण सर्व जीव मात्र जगभरात तीन मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेच्या सर्वसाधारण सभेने तीन ते 14 मार्च 2013 दरम्यान बँकॉक येथे झालेल्या सीआयटीएस मधील पक्षांच्या परिषदेच्या सोळाव्या बैठकीच्या निकालाची दखल घेतली. विशेषता ठराव कॉन्फरन्स 16.1, 3 मार्च हा जागतिक वन्य दिन म्हणून नियुक्त करणे ही होती. या वन्यजीव दिनाची 2023 ची थीम होती "वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी". 2024 मध्ये याची थीम होती "लोक आणि ग्रह जोडणे वन्यजीव संवर्धनामध्ये डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोरर करणे."
जपान देशाचा हिनामात्सुरी दिन
मलावी देशाचा शहीद दिन
बल्गेरिया या देशाचा मुक्ती दिन
3 मार्च 78 रोजी शालीवाहन शक सुरू झाले.
X X
3 मार्च 1845 रोजी फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेचे सत्ताविसावे राज्य बनले.
3 मार्च 17 76 रोजी पुरंदरचा तह पेशवे आणि इंग्रज यांच्यात झाला.
3 मार्च 1865 रोजी हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
3 मार्च 1885 रोजी अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
3 मार्च 1885 रोजी अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यूयॉर्क मध्ये समाविष्ट झाले.
तीन मार्च 1923 रोजी वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते.
3 मार्च 1930 रोजी नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
3 मार्च 1938 रोजी सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला. तेव्हापासून सौदी अरेबिया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक आणि जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश बनला ज्याने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे तेल नियंत्रण केले आहे. साठा आणि चौथ्या क्रमांकाचा गॅस साठा हे राज्य जागतिक बँक उच्च उत्पन्न अर्थव्यवस्था म्हणून वर्गीकृत आहे.
X X
3 मार्च 1939 रोजी मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता.
3 मार्च 1943 रोजी दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत 143 ठार
3 मार्च 1966 रोजी डॉ. धनंजयराव गाडगीळ महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले. सध्या विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे महाराष्ट्र असे आहे. गाडगीळ हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ संस्थान निर्माते आणि भारताच्या नियोजन आयोगाची उपाध्यक्ष होते. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे चे संस्थापक संचालक. तसेच चौथ्या आणि पाचव्या पंचवार्षिक आयोग योजने दरम्यान राज्यांना केंद्रीय मदत वाटपासाठी आधार म्हणून काम करणाऱ्या गाडगीळ सूत्राचे ते लेखक होते. 10 एप्रिल 1901 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण करून केंब्रिज विद्यापीठांमध्ये प्रवेश केला मस्टर ऑफ आर्ट्स मास्टर ऑफ लिटरेचर ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यांनी सुरत येथे प्राचार्य पदावर काम केले. त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सर्वट्स ऑफ इंडिया सोसायटीसी जोडले आणि 1930 मध्ये पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ची स्थापना केली. इंडियन इकॉनोमिक असोसिएशनचे ते सदस्य होते. 1940 मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सहकार क्षेत्राशी देखील सामील होते. भारतातील सहकारी चळवळीची सर्वोच्च संस्था नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. भारतीय रिझर्व बँकेने त्यांना ग्रामीण कर्जासाठी सर्वेक्षण पॅनलचे सदस्य म्हणून घेतले आणि त्यानंतर 1952 मध्ये ते बँकेचे संचालक बनले. गाडगीळ यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाने सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 1972 मध्ये नागपूर या ठिकाणी धनंजयराव गाडगीळ इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ही प्रशिक्षण संस्था सुरू केली. जी नॅशनल कौन्सिल फॉर को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग नवी दिल्ली यांच्याद्वारे चालवली जाते. त्यांनी पहिले पुस्तक एमलीट प्रबंध "इंडस्ट्रियल इवोल्युशन ऑफ इंडिया इन रिसेंट टाइम्स" हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने 1924 मध्ये प्रकाशित केले.
पुणे विद्यापीठ
3 मार्च 1973 रोजी भारतातील ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
3 मार्च 1986 रोजी ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
3 मार्च 1991 रोजी भारतातील रेल्वे विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले.
3 मार्च 1994 रोजी भारतातील राजस्थानमधील जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना "ग्रॅमी पुरस्कार" 1993 प्रदान करण्यात आला. हे भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादक आहेत जे मोहन विना (स्लाईड गिटार) वाजवतात. हे मोर्चे राजस्थान मधील जयपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांचे अहमदाबाद अहमदाबाद येथेल सप्तक स्कूल ऑफ म्युझिक चे ते सहसंस्थापक आहेत. भट्ट हे त्यांच्या ग्रामि पुरस्कार विजेत्या अल्बम "ए मीटिंग बाय द रिवर विथ रायकुडर" साठी प्रसिद्ध आहेत. त्यांना 1998 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रप्त झाला. भारत सरकारने त्यांना 2002 मध्ये पद्मश्री आणि 2017 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
X X
3 मार्च 2003 रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या 'शरच्चंद्र चटोपाध्याय' पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड करण्यात आली.
3 मार्च 2005 रोजी स्टीव्ह फॉसेट यांनी "ग्लोबल फायर" या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता 67 तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
3 मार्च 2015 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
3 मार्च 1839 रोजी भारतातील आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका पारशी भारतीय उद्योजक यांच्या पोटी गुजरात मधील नवसारी झाला. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना मुंबईचे ताजमहल हॉटेल बंगळूर मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती म्हणून त्यांनी टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. आणि भारतीय उद्योगाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 19 मे 1904 रोजी झाला. त्यांच्या जीवनातील त्यांनी चार ध्येय समोर ठेवली होती एक पोलाद कंपनी दुसरी जागतिक दर्जाची शिक्षण संस्था स्थापन करणे त्यानंतर एक अद्वितीय हॉटेलची निर्मिती करणे आणि एक हायड्रोइलेक्ट्रिक वीज निर्मिती कंपनी निर्माण करणे. 3 डिसेंबर 1903 रोजी मुंबईतील कुलाबा वाटर फ्रंट या ठिकाणी त्यांनी ताजमहल हॉटेलचा उद्घाटनाचा समारंभ पार पाडला आणि त्यावेळेस भारतात स्वतःची वीज असणारे हे एकमेव हॉटेल होते.
जमशेदजी नसरवानजी टाटा
3 मार्च 1845 रोजी सुप्रसिद्ध जर्मन गणितज्ञ जी. कँटर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1918 रोजी झाला.
3 मार्च 1847 रोजी टेलिफोन चा जनक स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याचा जन्म झाला. ग्रहणबेलने दूरध्वनी यंत्राचा शोध 1875 मध्ये लावला आणि अमेरिकन टेलिफोन कंपनीचे सहसंस्थापक म्हणून त्यांनी कंपनी स्थापन केली. बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले दोन जून 1875 या दिवशी सहकारी वाटसन यांच्यासह काम करीत असताना दुसऱ्या खोलीतील वाटसन यांच्या हाताच्या धक्क्याने ट्रान्समीटर थरथरला. तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटर चा उपयोग करून सहकारी वाटसन यांना आपल्या खोलीत येणे विषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश वाटसन यांना ऐकू आला आणि त्यांनी प्रतिसाद दिला वर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल त्यांची खात्री पटली. त्यांनी आणखी प्रयोग केले आणि 15 फेब्रुवारी 1876 दिव्या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना पेटंट मिळाले. बेल यांनी तयार केलेल्या या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले जाऊ लागले. नोव्हेंबर 1877 मध्ये बेल यांनी बर्लिन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. आणि एक 1885 वर्षी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा मृत्यू 2 ऑगस्ट 1922 मध्ये झाला. ते नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स चे सदस्य होते. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे ते मानत सदस्य होते.
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
X X
3 मार्च 1920 रोजी महाराष्ट्रातील किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म झाला.
3 मार्च 1923 रोजी भारतातील सुप्रसिद्ध इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म झाला.
3 मार्च 1926 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार रविशंकर शर्मा उर्फ रवी यांचा जन्म दिल्ली या ठिकाणी झाला. ते एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार होते ते 1950 मध्ये मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांना सुरुवातीला हेमंत कुमार यांनी आनंदमठ मध्ये वंदे मातरम या गाण्यात कोरस म्हणून गाण्याची संधी दिली. नंतर ते संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांचे सहाय्यक बनले सहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटात पैकी नागिन हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट. देवेंद्र गोयल यांनी बनवलेल्या वचन या हिंदी चित्रपटाला त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिले आणि संगीताच्या जोरावर एकाच चित्रपटगृहात 25 आठवडे हा चित्रपट राहण्याचा विक्रम झाला. त्यांनी संगीतबद्ध केलेले काही चित्रपट अनामात, आखे ,आदमी सडक का, कौन अपना कौन पराया, खानदान, घराणा, चायना टाऊन, चौधवी का चांद, दो बदन, निकाह, प्यार किया तो डरना क्या, मेहरबान, शहनाई, हमराज इत्यादी. त्यांचा मृत्यू 7 मार्च 2012 रोजी झाला.
3 मार्च 1939 रोजी भारतातील कसोटी क्रिकेटपटू शैलीदार फलंदाज एम एल जयसिंह यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 जुलै 1919 रोजी झाला.
3 मार्च 1955 रोजी भारतातील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 ऑक्टोबर 2012 रोजी झाला.
3 मार्च 1967 रोजी भारतातील सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म झाला.
X X
तीन मार्च 1977 रोजी भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांचा जन्म झाला.
3 मार्च 1703 रोजी सुप्रसिद्ध इंग्लिश वैज्ञानिक संशोधक रॉबर्ट हूक यांचे निधन झाले. ऑक्सफर्ड मधील खाईस्ट चर्च या ठिकाणी रसायन सहाय्यक म्हणून 1653 झाली थॉमस बिलिस यांच्या हाताखाली ते काम करू लागले. 1663 मध्ये त्यांना मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळाली. रॉबर्ट खूप यांची सखोल दृष्टी आणि गणितावर असलेले प्रभुत्व यामुळे रॉबर्ट बोयल यांच्या सिद्धांताचे गणितीय विश्लेषण रॉबर्ट हूक यांनी केली. रॉयल सोसायटी च स्थापना 1660 मध्ये झाली . 5 नोव्हेंबर 1661 रोजी रॉबर्ट मोर यांनी प्रस्ताव मांडला की रॉयल सोसायटीत प्रयोगांची मांडणी व फेर तपासणी करण्यासाठी एक पूर्ण वेळ नियुक्त व्यक्ती असावा. त्यांच्या प्रस्तावाला एक मताने सर्वांनी मान्यता दिली आणि 12 नोव्हेंबर 1661 रोजी रॉबर्ट हूक यांचे नियुक्ती करण्यात आली. 20 मार्च 1664 रोजी त्यांची ग्रेशम कॉलेज ऑफ लंडन या ठिकाणी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर 11 जानेवारी 1665 मध्ये संग्रहालय प्रमुख या पदावर 30 पाउंड पगारावर त्यांचे नियुक्ती झाली या आपल्या कारकिर्दीत त्यांनी सूक्ष्मदर्शक यंत्र तयार केले. त्या खाली बुचाचा छेद बघून छेद बघून पेशीची रचना अभ्यासली. रॉबर्ट हूक हे प्रामुख्याने 1665 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या मायक्रोग्राफी या पुस्तकामुळे ती जगप्रसिद्ध आहेत त्यांनी दुर्बिणीतून मंगळ आणि गुरूचे भ्रमण बघितल्याची नोंद आहे. त्यांचे सर्वात प्रसिद्ध निरीक्षण म्हणजे बुचाच्या पातळ आडव्या छेदाचे केलेले निरीक्षण या निरीक्षणात दिसलेल्या छिद्रांना त्यांनी पेशी असे नाव संबो दिले. त्यांनी वनस्पती पेशींचा शोध लावला. त्यांनी पेशीच्या भीतीकेचे निरीक्षण केले. पेशी हा शब्दप्रयोगच मुळी त्यांनी सर्वप्रथम केला आणि पेशीसाठी त्यांनी सेल हा शब्द वापरला. पुढे तो जीवशास्त्रात रूढ झाला. त्यावेळी ल्यूव्हेनहॅक ने 1676 मध्ये सूक्ष्मजंतूंचे निरीक्षणे आणि 1677 मध्ये त्यांनी स्वतः तयार केलेले सूक्ष्मदर्शक यंत्र रॉयल सोसायटीकडे पाठविले. रॉबर्ट हूक यांनी त्याची सत्यता पडताळून पाहिली त्यामुळे 1665 मध्ये प्रसिद्ध झालेला रॉबर्ट हुकचा मायक्रोग्राफिया आणि 1676 साली प्रसिद्ध झालेली ल्यूव्हेनहॅकची सूक्ष्मजंतू विषयक ची निरीक्षणे या सूक्ष्मजीवशास्त्राच्या इतिहासातील आद्य घटना म्हणून जगभरात नोंदवल्या गेल्या. त्याचा जन्म 18 जुलै 1635 रोजी युनायटेड किंगडम मधील फ्रेश वॉटर या ठिकाणी झाला होता.
रॉबर्ट हूक
3 मार्च 1707 रोजी सहावा मोगल सम्राट औरंगजेब याचे महाराष्ट्रात निधन झाले त्याचा जन्म 4 नोव्हेंबर 1618 रोजी झाला होता.
3 मार्च 1919 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म आठ मार्च 1864 रोजी झाला होता.
3 मार्च 1965 रोजी भारतातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका व अभिनेत्री अमीर भाई कर्नाटकी यांचे निधन झाले त्यांचा जन्म 1906 मध्ये झाला होता.
तीन मार्च 1924 रोजी अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष तसेच नोबेल पारितोषकाचे विजेते वूड्रो विल्सन यांचे निधन झाले.
3 मार्च 1982 रोजी भारतातील सुप्रसिद्ध उर्दू शायर तथा साहित्यिक तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी झाला त्यांचे शिक्षण अरबी फारसी आणि इंग्रजी माध्यमातून झाले. त्यांनी 1920 मध्ये आयसीएस ची नोकरी सोडून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना दिन वर्षाचा तुरुंगवासही भोगावे लागला. तुरुंगवा संपल्यानंतर पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सचिव पद दिले. ते अलाहाबाद येथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून 1930 ते 1959 पर्यंत त्यांनी काम केले. त्यांचे प्रसिद्ध उर्दू कवितासंग्रह गुल-ए-नागमा, रोहे- कायनात, शेरी स्थान, त्यांची साधू और कुटिया ही सुप्रसिद्ध कादंबरी आहे त्यानंतर धरती की कडवट, गुलबाग हजार दास्तान हे त्यांचे सुप्रसिद्ध साहित्य. त्यांना गुल -ए -नगमा साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना गुल -ए -नगमा साठीच ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1896 रोजी झाला होता.
3 मार्च 1995 रोजी भारतातील सुप्रसिद्ध तबलावादक पंडित निखिल घोष यांचे निधन झाले.
3 मार्च 2000 रोजी महाराष्ट्रातील मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन झाले. भारताचे माजी अर्थमंत्री सीडी देशमुख यांची ती नात आहे. 1970 ते 80 या दशकात त्यांनी अनेक मराठी चित्रपटात अभिने केला. रंजना हिने ही शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून 1975 मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झुंज या मराठी चित्रपटात तिची मुख्य अभिनेत्रीची भूमिका होती. अरे संसार संसार या चित्रपटात साठी केलेल्या भूमिकेबद्दल 1980 चा उत्कृष्ट अभिनेत्री महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तिला प्राप्त झाला. 1983 मध्ये गुपचूप या चित्रपटासाठी तिला मिळाला. पहिल्यांदा तिने फक्त एकदाच या मराठी नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले होते. 1987 मध्ये तिच्या अपघात झाला आणि 2000 मध्ये मुंबई या ठिकाणी तिचे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला.
X X
View, Comments and share...
0 Comments