March 2 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 2 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
राष्ट्रीय क्रीडा कौशल्य दिन
2 मार्च 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला.
2 मार्च 1836 रोजी आजच्या दिवशी टेक्सास ने मेक्सिको पासुन स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले.
2 मार्च 1855 रोजी अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
2 मार्च 1857 रोजी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले. सर जमशेटजी जीजी भाई स्कूल ऑफ आर्ट ही संस्था सर जेजे स्कूल ऑफ आर्ट या नावाने ओळखली जाते. ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे भारतातील सर्वात जुनी कला संस्था आणि ती मुंबई विद्यापीठाची संलग्नित आहे. शाळा पेंटिंग. सिरॅमिक. मेटल वर्क. इंटिरियर डेकोरेशन. टेक्स्टाईल डिझाईन आणि स्कल्पचर तसेच पोर्ट्रेट, क्रिएटिव्ह पेंटिंग, म्युरल आणि प्रिंट मेकिंग पदव्युत्तर पदवी प्रदान करते. सुरुवातीला वर्ग एलिफट संस्थेत आयोजित केले जात असत. जॉन ग्रेफित 1865 मध्ये शाळेचे प्राचार्य बनले.1866 मध्ये शाळेचे व्यवस्थापन भारत सरकारने ताब्यात घेतले आणि 866 मध्ये लोक उड किपलिंग जे 1865 मध्ये शाळेचे प्राध्यापक झाले. त्यांनी सजावटीच्या पेंटिंग्स मॉडलिंगसाठी तीन एतेलियार्स ची स्थापना केली. या वास्तूची वास्तू रचना जॉर्ज ट्विग मोलेसी यांनी केली. 1893 मध्ये चित्रकला शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यक्रम सुरू करण्यात आला. 1991 मध्ये लॉर्ड रे आर्ट वर्कशॉप आत्ता त्याला कला शिल्प विभाग म्हणून ओळखला जातो स्थापन करण्यात आला. 1910 मध्ये सर जॉर्ज क्लार्क अभ्यास आणि प्रयोगशाळा हस्तकलेच्या प्रगत अभ्यासासाठी बांधल्या गेल्या मातीची भांडी ही पहिली हस्तकला अभ्यासासाठी घेतली गेली. 1929 मध्ये शाळेच्या प्रमुखाचे नाव बदलून संचालक करण्यात आले आणि 1935 मध्ये व्यावसायिक कला विभाग देखील सुरू झाला. 1943 मध्ये क्लार्ड बाटली यांच्या नंतर संचालक म्हणून व्ही एस आडुळकर हे शाळेचे पहिले भारतीय प्रमुख झाले. 1958 मध्ये शाळेचे विभाजन करून आर्किटेक्चर आणि अप्लाइड आर्ट विभाग असे सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सर जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट असे दोन भाग केले. ही शाळा मुंबई विद्यापीठाशी 1981 मध्ये संलग्नित झाली.
X X
2 मार्च 1903 रोजी "मार्था वॉशिंग्टन हॉटेल" हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.
2 मार्च 1930 ला नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्या वेळेच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 रोजी सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. ताराम मंदिर प्रवेशासाठी 1929 मध्ये क अस्पृश्यता पुढार्यांची समिती स्थापन केली या सत्याग्रह समितीचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड चिटणीस होते तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर हे होते. प्रत्यक्ष तीन मार्च 1930 रोजी सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. 2 मार्च 1930 रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मध्ये एक परिषद भरली आणि सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. सत्याग्रहाचा लढा हा शांततेच्या मार्गाने करावा यश मिळेपर्यंत लढा चालूच ठेवावा असा उद्देश आंबेडकरांनी दिला. दोन मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्ते होते ही मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीत 125 पुरुष आणि 25 स्त्रिया जातील असे ठरले ते चार गटात विभागून चारही दरवाजांना धरणे धरून बसले होते. उत्तर दरवाजासाठी पतीत पावन दास, पूर्व दरवाजा जवळ कचरू साळवे, दक्षिण दरवाज्याजवळ पांडुरंग राजभोज आणि पश्चिम दरवाजाजवळ शंकरदास नारायणदास असे चार नेते चारी दिशांना आपल्या सहकाऱ्यांना घेऊन उभे होते. मंदिराच्या चारही बाजूंनी हजारो बंदूकधारी सैनिक तैनात होते.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह
2 मार्च 1958 रोजी दादर येथे भोरबाग रोडवरील बंगाली हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मिळाला होता.
2 मार्च 1930 रोजी आजच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला.
2 मार्च 1946 रोजी हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
X X
2 मार्च 1949 रोजी न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
2 मार्च 1952 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन
2 मार्च 1956 रोजी मोरोक्को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
2 मार्च 1969 रोजी फ्रेन्च बनावटीच्या "कॉन्कॉर्ड" या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या) विमानाचे यशस्वी उड्डाण
कॉन्कॉर्ड
2 मार्च 1970 रोजी ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.
2 मार्च 1972 रोजी अमेरिकेचे "पायोनिअर-10" यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले
पायोनिअर-10
2 मार्च 1978 रोजी स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
X X
2 मार्च 1992 रोजी आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
2 मार्च 2001 रोजी मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे 6000 बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
2 मार्च 2006 रोजी आजच्या दिवशी दिल्ली येथे अमेरिका आणि भारत या दोन राष्ट्रांमध्ये आण्विक करार झाला.
2 मार्च 1742 रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव पेशवे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 जानेवारी 1761 रोजी झाला होता.
2 मार्च 1925 रोजी भारतीय मराठी चित्रपट सृष्टीतील व रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 सप्टेंबर 1980 रोजी झाला होता.
2 मार्च 1926 रोजी भारतातील केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री पि. के. वासुदेवन नायर यांचा जन्म झाला.
2 मार्च 1931 रोजी सोवियत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म झाला. सरकारी यंत्रणे वरील पक्षाचे नियंत्रण कमी करण्यासाठी त्यांनी अमुलाग्र सुधारणा केल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या राजवटीत हजारो राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली. युनायटेड स्टेट्स बरोबरच्या आण्विक निशस्त्रीकरण करारासाठी ते प्रसिद्ध आहेत सोवियत युनियनचे अध्यक्षपद सोडल्यानंतर गोर्बाचेव्ह यांना जगभरातील अनेक पुरस्काराने सन्मान मिळाले. त्यांना 1990 मध्ये शांततेचा नोबल पुरस्कारही देण्यात आला शीतयुद्धाचा शेवट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. यासाठीच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मी गोर्बाचेव्ह हे युनियन ऑफ सोवियत सोशालिस्ट रिपब्लिकन चे अर्थात यूएसएसआर चे शेवटचे नेते होते त्यांनी नेहमी लोकशाही तत्त्वांच्या आधारावर नागरिकांना स्वातंत्र्य देऊन कम्युनिस्ट राजवटीत सुधारणा करायची होती. शीतयुद्धाचा शेवट करणारे तोही रक्तपाता शिवाय करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आले असे सोवियत युनियनचे माजी अध्यक्ष यांचे 30 ऑगस्ट रोजी निधन झाले.
मिखाईल गोर्बाचेव्हX X
2 मार्च 1931 रोजी मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणी झाला. कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एमए केले त्यानंतर शिक्षेची नोकरी केली वाशिम येथे शासकीय शाळेमध्ये ते शिक्षक होते. त्यानंतर यवतमाळ महाविद्यालय नांदेड मधील पीपल्स महाविद्यालय इत्यादी ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली त्यावेळेस त्यांनी संस्कृती विषयक साहित्य निर्मितीही केली. 1994 मध्ये गोव्यात पणजी या ठिकाणी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले अनुवादित केले महाकवी भास यांच्या नात्यावर आधारित अग्निमित्र हे त्यांचे विशेष पुस्तक. त्यानंतर अभिज्ञान शाकुंतल, भासाची नाटके, स्वप्नवासवदत्ता, मानविकागणीमित्र, कालिदासाची यशसृष्टी, चारुदत्त, शूद्रकृत मृच्छकटिक त्रिवेणी ही अनुदानत मराठी पुस्तके. ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, आकाशवाणी सल्लागार मंडळ, संतपिठ सल्लागार समिती, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा अनेक संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य होते. त्यांचा मृत्यू 3 मे 2009 रोजी महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी झाला. नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ते संस्थापक होते. तसेच विदर्भातील लेखकांनाही एकत्रित करून त्यांनी अभिव्यक्ती नावाची संस्था स्थापन केली. त्यांना मॅन ऑफ द इयर हा अमेरिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, साहित्य धुरंदर पुरस्कार बोस्टन येथे त्यांना प्रदान करण्यात आला, त्यानंतर श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य पीठ पुरस्कार प्राप्त झाला. विदर्भ गौरव पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार राष्ट्रसेवा पुरस्कार. जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जागतिक कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष, विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संमेलनाचे अध्यक्ष, पहिले आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, गुजरात प्रदेश मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी संत साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
2 मार्च 19 51 रोजी हॉलीवुड चित्रपटांना आवाज देणारे सुप्रसिद्ध भारतीय किशोर भट्ट यांचा जन्म झाला.
2 मार्च 1986 रोजी भारतातील भारतीय तिरंदाज म्हणून सुप्रसिद्ध असलेले जयंत तालुकदार यांचा जन्म झाला.
2 मार्च 1557 मध्ये भारतातील सुप्रसिद्ध संत श्रीकृष्णाच्या निसिम भक्त मीरा रत्नसिंह राठोड उर्फ संत मीराबाई यांचे निधन झाले. संत मीराबाई यांचा जन्म 1458 रोजी राजस्थान मधील नागोर जिल्ह्यातील कुडकी गावात राजपूत कुटुंबात झाला. तिचे कुटुंब वैष्णव भक्त होते. लहानपणी मात्र वियोग झाल्यामुळे ती अस्वस्थ राहत असे. मीरा मूर्ती प्रेमी होती. तिने कृष्णाच्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले. असेही सांगितले जाते. सुरुवातीला मीरा श्रीकृष्ण प्रेम तिचे खाजगी बाब होती. पण नंतर ती शहरात आत्या आनंदाने रस्त्यावर नाचू लागली. हे तिच्या घरच्यांना पावले नाही. म्हणून त्यांनी तिला अनेक प्रकारे रोखण्याचे विषबाधा करून मारण्याचे प्रयत्न झाले. पण ते सर्व व्यर्थ गेले. पंधराशे 38 मध्ये राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी. असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्याकाळी मिरे ने रेदास यांना आपले गुरु घोषत केले आणि वृंदावन सोडले. मेरा मन ते श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे. ती संपूर्ण उत्तर भारतात प्रश्न प्रीतीची भजने गात फिरली, गुजरात मधील द्वारका येथे तिने आयुष्याची अखेरची वर्ष घालवण्याचा अंदाज आहे. आणि द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली अशीही आख्यायिका आहे. पदावली मध्ये विरेच्या रचना एकत्रित केले आहेत राजस्थानी आणि ब्रश भाषेतील मेरे च्या रचना आढळतात. तिने जय देवांच्या गीत गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिल्या आणि राग गोविंद असा ग्रंथ ही लिहिला.
"शुल सेज राणा नय भेजी, दीज्यो मीरा सुलाय/ सांझ, भई मीरा सोवन लागी, मानो फुल बिछाय."लोक असे सांगतात की मीराला मारण्यासाठी तिच्या बिछान्यावर लोखंडाचे खेळे लावण्यात आले पण ईश्वर कृपेने खिळ्यांची जागा गुलाबांच्या पाकळ्यांनी घेतली मिरच्या वरील एका भजनात या चा उल्लेख आढळतो.
2 मार्च 1700 रोजी मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 मध्ये झाला होता.
2 मार्च 1930 मध्ये इंग्लंड मधील सुप्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकार कवी नाटककार टीकाकार आणि चित्रकार डी. एच लॉरेन्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1885 रोजी झाला होता.
2 मार्च 1938 मध्ये भारतातील उत्तर प्रदेशाचे पहिले राज्यपाल हार्कोर्ट बटलर यांचे निधन झाले.
X X
2 मार्च 1949 रोजी भारतातील स्वातंत्र लढ्यातील एक सुप्रसिद्ध नेत्या प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन झाले. त्यांनी रौलेट कायदा, मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला होता.
2 मार्च 1986 रोजी महाराष्ट्रातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता.
2 मार्च 1994 रोजी भारतातील सुप्रसिद्ध धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक करवीरभूषण वेदशास्त्र संपन्न पंडित श्रीपाद शास्त्री जेरे यांचे निधन झाले.
https://www.insearchofknowledge.org/2023/03/sarojini-naidu-indian-political.html
👆
स्मृतिदिन: 2 मार्च
Sarojini Naidu (Chattopadhyay): Indian political activist, feminist and poet.
"Nightingale of India" "Bharat Kokila"
सरोजिनी नायडू : भारताची कोकिळा, प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी
X X
View, Comments and share....
0 Comments