February 8 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 8: दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
8 फेब्रुवारी 1714 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला होता.
8 फेब्रुवारी 1899 रोजी पुण्याचा इंग्रज अधिकारी रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
X X
8 फेब्रुवारी 1931 रोजी महाराष्ट्रात महादेव विठ्ठल काळे यांनी ‘आत्मोद्धार’ नावाचे पाक्षिक सुरू केले.
8 फेब्रुवारी 1936 रोजी 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज महाराष्ट्र राज्यात सुरू झाले. ही बँक राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेची स्थापना पुणे शहरांमध्ये शिवाजीनगर भागात झाली. 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झाले. या बँकेचे संस्थापक ए आर भट हे होते. या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ए एस राजीव यांनी 2 डिसेंबर 2018 रोजी कार्यभार स्वीकारला. या बँकेचे ब्रीदवाक्य "एक परिवार, एक बँक" असे आहे.
8 फेब्रुवारी 1942 रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
8 फेब्रुवारी 1943 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीतील एक धुरंदर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे नेताजी सुभाष चंद्र बोस जर्मनी मधून एका नावेच्या माध्यमाने जपान साठी निघाले.
8 फेब्रुवारी 1960 रोजी भारतीय कुस्ती क्षेत्रातील पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर "हिंदकेसरी" ची गदा मिळवली. गणपतरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात शिराळ या तालुक्यातील पुनवत या गावी 15 एप्रिल 1935 रोजी झाला. ते कोल्हापूर मधील प्रसिद्ध कुस्तीगीर होते. त्यांची उंची सहा फूट होती त्यांना लपेट, कलाजंग, एकेरी पट, एकलंगी या कुस्तीतील डावांमध्ये ते तरबेज होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत 1962 मध्ये इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. तर फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रोप्य पदक मिळवले. 1964 मध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत टोकियो जपान या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये मॅटवरील कुस्ती प्रकारात तयार करण्यास त्यांचा खूप मोठा वाटा आहे. वयाच्या ते 83 व्या वर्षापर्यंत मोतीबाग तालमीत त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. दादा चौगुले, चंबा मुतनाळ, संभाजी पाटील इत्यादी. त्यांना 1964 मध्ये अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1982 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरव करण्यात आले. 2014 मध्ये राजर्षी शाह छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट कोल्हापूरचा शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वश्रेष्ठ सौसष्ठ पुरस्कार त्यांना देण्यात आला. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले. त्यांना कोल्हापूरकरवाशीयांनी कोल्हापूर भूषण पुरस्काराने गौरविले.
गणपत आंदळकर "हिंदकेसरी"
X X
8 फेब्रुवारी 1971 रोजी NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
8 फेब्रुवारी 1986 रोजी भारताची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विमानतळावर प्रीपेड टॅक्सी ची सुरुवात.
8 फेब्रुवारी 1994 रोजी भारतातील क्रिकेट संघातील धुरंदर खेळाडू भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला. यांच्या एकूण धावा 11356 शतके अठरा अर्धशतके 56 सर्वोच्च धावसंख्या 193. त्यांनी 1999 ते 2000 पर्यंत भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणूनही काम केलेले आहे. 1983 च्या विश्वचषक दरम्यान भारताच्या नेतृत्व त्यांनी केले आणि पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. त्यांचा जन्म चंदिगड मध्ये 6 जानेवारी 1959 रोजी झाला. ते 1971 मध्ये "देश प्रेम आझाद" एक क्रिकेट क्लब मध्ये सामील झाले. क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी हरियाणा क्रिकेट संघामध्ये आपले स्थान पक्के केले. 16 ऑक्टोबर 1978 मध्ये फैसलाबाद येथे पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि त्यांनी शतक झळकवले. कसोटी पदार्पणातच शतक झळक करणारा तो पहिला फलंदाज होता. देव हे भारताचे पहिले वेगवान गोलंदाज म्हणूनही त्यांचा डंका होता. त्यांनी दोनदा पाच बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 28 विकेट सह पूर्ण केली. 1982 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कर्णधार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1984 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 1994 मध्ये सर रिचर्ड हेडलीचा विक्रम मोडून जगातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्यांचा विक्रम 1999 मध्ये वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्श मोडला होता. 4000 कसोटी धावा आणि 400 बळींचा अष्टपैलू दुहेरी पूर्ण करणारा एकमेव खेळाडू म्हणून नोंद झाली. कसोटी डावात नऊ विकेट घेणारा एकमेव कर्णधार. निवृत्ती होईपर्यंत म्हणजे 1994 पर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज एकूण विकेट 253. 1979 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित. 1982 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार तर 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 1983 मे सन्मानित आणि विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंचुरी 2000 मध्ये सन्मानित.
कपिलदेव निखंज (देव )
8 फेब्रुवारी 2000 रोजी महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी पासून घेतली जाईल.
8 फेब्रुवारी 2007 रोजी दिल्ली ते लाहोर या दरम्यान आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या समझोता एक्सप्रेस मध्ये बॉम्ब स्पोट झाला. यात अनेक जण जखमी झाले. तर 68 लोकांचा मृत्यू झाला. ही गाडी दिल्ली होऊन अमृतसर मार्गे लाहोर शहराला जोडलेली आहे. ही भारत पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या अटारी गावापर्यंत धावते. त्या ठिकाणी प्रवाशांना उतरून कष्टम व इमिग्रेशन पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर पाकिस्तान नात रेल्वे द्वारे चालवल्या जाणाऱ्या असलेल्या एका वेगळ्या गाडीत चढावे लागते. या एक्सप्रेसचा उद्घाटन 22 जुलै 1976 रोजी झाले होते. कारण सिमला करारात असे ठरलेले होते.
8 फेब्रुवारी 2008 रोजी भारतातील ओरिसा राज्यातील शिशुपालगड येथे 2500 वर्षांपूर्वीचे शहर उत्खनन करतेवेळी सापडले. ओरिसा राज्यातील खुर्द जिल्ह्यामध्ये हे शहर आढळले आहे. सुरुवातीच्या उत्खननात सापडलेल्या वास्तुशांती नमुना बीबी लाल यांनी निष्कर्ष काढला की हे किल्ले शहर इसवीसन पूर्व तिसरे शतक ते इसवी सन चौथ्या शतका दरम्यान विकसित झाले असाव. या शहराचे उत्खनन 1948 मध्ये पहिल्यांदा केले ते बीबी लाल यांनी त्यानंतर 2001 मध्ये अमेरिकन भारतीय टीमने हे काम हाती घेतले. किल्ल्याच्या मध्यभागी 19 स्तंभांची रचना लेसर स्कॅन द्वारे त्रिमितीय रेकॉर्ड केली गेली. ही जागा राष्ट्रीय स्तरावर संरक्षण असल्याने ती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या बेलीवीक मध्ये येते.
शिशुपालगड-ओरिसा
X X
8 फेब्रुवारी 2015 रोजी भारत सरकारने स्थापन केलेल्या नीती आयोगाची पहिली बैठक संपन्न झाली. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे भारताचे सर्वोच्च सार्वजनिक धोरण म्हणून काम करते. नोडल एजन्सी आर्थिक विकासाला उत्प्रेरिक करणे आणि सरकारी संघराज्यवाद वाढवणे आणि दूर जाणे यासाठी हे काम करते. निती आयोग हे एक जानेवारी 2015 रोजी तयार झाले. यापूर्वीची संस्था नियोजन आयोग अशी होती. निती आयोगाची स्थापना एनडीए सरकारने नियोजन आयोगाची जागा घेण्यासाठी तयार केली होती. नीती आयोग परिषदेमध्ये दिल्ली आणि पांडेचेरीच्या मुख्यमंत्र्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सर्व केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि प्रार्थना पंतप्रधानांनी निर्देशित केलेले उपाध्यक्ष यांचा समावेश होतो. काही आघाडीच्या विद्यापीठातून आणि संशोधन संस्था मधून तात्पुरत्या सदस्य निवडले जातात. या सदस्यांमध्ये एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. 29 मे 2014 रोजी स्वतंत्र मूल्यमापन कार्यालयाने नियोजन आयोगाच्या जागी नियंत्रण आयोग स्थापन करण्याच्या शिफारशी सह एक मूल्यमापन अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी नव्याने स्थापन झालेल्या नीती आयोग ची स्थापना करण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर करण्यात आला. नीती आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. 8 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची पहिली बैठक संपन्न झाली. 31 ऑगस्ट 2017 रोजी निती आयोगाने एक राज्य सांख्यिकी हँडबुक विकसित केले. जे प्रत्येक भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व क्षेत्रातील प्रमुख आकडेवारी एकत्रित दर्शविते. इंडियाचेन हे देशव्यापी ब्लॉकचे नेटवर्क विकसित करण्याच्या नीती आयोगाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला दिलेले नाव आहे. विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम हा उपक्रम सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. ज्याचा उद्देश अटल टिंकरिंग लॅब विद्यार्थ्यांच्या तळागाळातील नवकल्पनांना अंतिम उत्पादनामध्ये रूपांतरित करण्याचा आहे. तसेच सप्टेंबर 2019 मध्ये नीती आयोगाने बायजूच्या सहकार्याने देशातील 112 जिल्ह्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इच्छुक मोफत टेक-चलित शिक्षण कार्यक्रम प्रदान करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला.
8 फेब्रुवारी 1677 रोजी सुप्रसिद्ध फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी याचा जन्म झाला त्याचा मृत्यू 16 एप्रिल 1756 रोजी झाला.
8 फेब्रुवारी 1700 मध्ये सुप्रसिद्ध गणितज्ञ डॅनियल बर्नोलीयाचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 17 मार्च 1782 रोजी झाला.
8 फेब्रुवारी 1881 मध्ये ब्रिटिश भारतातील सिविल सर्विसेस मध्ये असलेले वी.टी. कृष्णमाचारी यांचा जन्म झाला.
8 फेब्रुवारी 1897 रोजी भारताचे 3 रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ.डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म झाला. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण व भारतरत्न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. "जमिया मिलिया इस्लामिया" या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. त्यांचा मृत्यू 3 मे 1969 रोजी झाला.
8 फेब्रुवारी 1909 रोजी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा "बाबा" बेलसरे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 1998 रोजी झाला.
8 फेब्रुवारी 1941 रोजी भारतातील सुप्रसिद्ध गझलकार जगजीत सिंग यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 10 ऑक्टोबर 2011 रोजी झाला.
X X
8 फेब्रुवारी 1963 रोजी भारतीय क्रिकेट संघातील एक भारतीय क्रिकेटपटू सुप्रसिद्ध महंमद अझरुद्दीन यांचा जन्म झाला.
महंमद अझरुद्दीन
8 फेब्रुवारी 1927 रोजी ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय सुप्रसिद्ध गायक बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 रोजी झाला होता.
8 फेब्रुवारी 1971 रोजी मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन मुंबई या ठिकाणी झाले. त्यांनी 1938 मध्ये भारतीय विद्या भवन ही संस्था स्थापन केली. त्यांनी 1937 ते 40 या काळात बॉम्बे राज्याचे गृहमंत्री म्हणून काम केले 1948 मध्ये एजंट जनरल म्हणून हैदराबाद राज्याचे काम पाहिले. ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम ते कायद्याची विद्यार्थी होते. काही काळ त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले त्यावेळेस 1915 मध्ये गांधीजीं सोबत यंग इंडियाचे सहसंपादक म्हणून काम. त्यांनी 50 हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात कथक कादंबरी कथा नाटक साहित्य ललित कला इत्यादी. 1956 मध्ये त्यांनी अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान. हंस या मासिकाच्या संपादनात त्यांनी प्रेमचंद यांना मदत केली. वन महोत्सव सुरू करणे हे त्यांचे प्रमुख म्हणून महत्त्वाचे काम. त्यांनी 1912 मध्ये भार्गव मासिकाची स्थापना केली. 1922 मध्ये गुजरात मासिकाचे प्रकाशन. त्यांनी 1954 मध्ये जागतिक संस्कृत परिषदेची स्थापना केली आणि त्या परिषदेचे ते प्रमुख होते. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1887 रोजी गुजरात मधील भरूच या ठिकाणी झाला होता.
8 फेब्रुवारी 1975 रोजी सुप्रसिद्ध वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन झाले. 1947 मध्ये वनस्पती रंगद्रव्य आणि अल्कलाइट्स वरील संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. 1947 मध्ये त्यांना सिल्वर पाम हे पदकही प्रदान करण्यात आले .त्यांनी रॉयल सोसायटीचे 48 वे अध्यक्ष म्हणून 1945 ते 1950 मध्ये काम केले. त्यांना 1932 मध्ये रॉयल पदकांनी सन्मानित करण्यात आले .1947 मध्ये अल्बर्ट पथक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ते एक प्रसिद्ध बुद्धिबळ पटू होते. त्यांनी 1950 ते 1953 या काळात ब्रिटिश बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1886 रोजी इंग्लंड मधील डर्बी शायर या ठिकाणी झाला होता.
सर रॉबर्ट रॉबिनसन
8 फेब्रुवारी 1994 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 जुलै 1902 रोजी झाला होता.
8 फेब्रुवारी 1995 रोजी भारतातील रॉयल इंडियन नेव्ही दलातील भारताचे माजी पाचवे नौदलप्रमुख, ॲडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी वयाच्या 81 व्या वर्षी झाले. त्यांनी 1965 च्या भारत – पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. त्यांनी भारताचे नौदल प्रमुख म्हणून 1962 ते 1966 या कालावधीत काम केले. त्यांनी सुरुवातीला रॉयल इंडियन मरीन मध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1932 मध्ये युनायटेड किंगडम मध्ये अधिकारी प्रशिक्षणासाठी त्यांचे निवड झाली. 1937 मध्ये ते लेफ्टनंट म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. दुसऱ्या महायुद्ध दरम्यान त्यांना 29 एप्रिल 1944 रोजी कार्यवाहक लेफ्टनंट कमांडर म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांची नौदल प्रमुख मुख्यालयात प्रशासन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 5 ऑक्टोबर 1949 रोजी त्यांनी कॅप्टन एचडी कर्मकर यांच्याकडे पदभार सोपवून पद सोडले. 1961 च्या गोवा मुक्ती दरम्यान भारताच्या नौदल ऑपरेशनचे ते प्रभारी म्हणून काम करत होते. सोमन हे भारतीय नौदलातून 22 नोव्हेंबर 1966 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा जन्म 13 मार्च 1913 मध्ये ब्रिटिश राज्य तील ग्वाल्हेर या ठिकाणी झाला होता.
ॲडमिरल भास्करराव सोमण
8 फेब्रुवारी 1995 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पश्चिम बंगाल प्रांतातील स्वातंत्र्य सैनिक सेनानी कल्पना दत्त यांचे निधन झाले.
8 फेब्रुवारी 1995 रोजी भारतातील राजस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री टीकाराम पलीवाल यांचे निधन झाले.
8 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन झाले. पश्चिम महाराष्ट्रात पुण्याजवळ कुष्ठरोग सेवा केंद्र सुरू करणाऱ्या त्या महिला पहिल्या कार्यकर्ते आहेत. 1965 मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंधक कायदा अमलात आल्यावर त्यांनी 80 रुग्णासह कुष्ठरोग्यांसाठी प्रत्यक्षात वर्ष 1965 मध्ये काम सुरू केले. पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळील डुडुळगाव येथील 1970 मध्ये स्थापलेल्या आनंदग्रामच्या संस्थापिका ज्येष्ठ समाजसेविका. वयाच्या सोळाव्या वर्षापासून गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी वाहून घेतले. सुरुवातीला मॉन्टेसरीचे शिक्षण पूर्ण करून त्या शिक्षका बनल्या. त्यानंतर ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन ॲम्बुलन्स त्या कामांमध्ये दाखल झाल्या . दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्या प्रत्यक्ष कामासाठी ब्रह्मदेश जावा या ठिकाणी गेल्या सिंगापूर जपान येथेही त्यांनी काम केले. त्यांचा जन्म 14 मे 1926 रोजी जमखंडी झाला होता.
XX
8 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा 48 जिंकून प्रथम क्रमांक वर आली. तर आम आदमी पार्टी सत्ता दिल्लीवर होती पण दिल्ली वासियांनी त्यांना फक्त 22 जागांवरच निवडून दिले. काँग्रेसच्या खात्यामध्ये एकही जागा मिळाली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे स्पष्ट बहुमत दिल्लीमध्ये प्राप्त झाले .
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-9-day-of-special-dinvishesh.html
👆
February 9 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 9: दिनविशेष
X X
View, Comments and share....
0 Comments