February 10 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 10: दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.
व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस (टेडी दिवस)
10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो.
X X
10 फेब्रुवारी 1803 रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक आर्थिक राजधानी मुंबई चे शिल्पकार म्हणून जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. त्यांचा जन्मदिवस होय त्यांचे आडनाव मुरकुटे हे होते. त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली .एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले.
10 फेब्रुवारी 1846 मध्ये ब्रिटिश आणि शीखांचे युद्ध सतलज च्या तीरावर सुब्राऊ या ठिकाणी झाले. यात शिखांचे सेनापती तेजसिंगाने या लढाईचे नेतृत्व केले. पण शिखांचा या युद्धात पराभव झाला.
10 फेब्रुवारी 1921 रोजी ड्यूक ऑफ़ कनॉट ने भारतातील इंडिया गेट चा पाया आजच्या दिवशी रचला गेला. एक राष्ट्रीय स्मारक आहे. हे नवी दिल्ली या ठिकाणी असून एडमिन लुटेन्स यांनी याची रचना केली. या स्मारकाची प्रेरणा पॅरिस येतील "आर्क दे ट्रायमफे" या स्मारकावरून घेण्यात आली इंडिया गेट 1931 मध्ये बांधले सुरुवातीला ते "ऑल इंडिया वॉर मेमोरियल" या नावाने ओळखले गेले पहिल्या महायुद्धात व अँग्लो -अफगान युद्धात मरण पावलेल्या 90 हजार ब्रिटिश इंडियन आर्मी मधील सैनिकांसाठी हे स्मारक बनवले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाईट दगडापासून बनवलेले आहे. या परिसरात सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा गेट समोरील मंडपात होता. त्यानंतर तो कोरोनेशन पार्क येथे हलवण्यात आला. भारतीय सैन्य दलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ सध्या त्या ठिकाणी अमर जवान ज्योती प्रज्वलित केली जाते.
इंडिया गेट
10 फेब्रुवारी 1921 रोजी भारतातील उत्तर प्रदेश मध्ये वाराणसी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली.
10 फेब्रुवारी 1923 रोजी टेक्सास मध्ये टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
X X
10 फेब्रुवारी 1929 रोजी भारतातील पहिले अधिकृत भारतीय वैज्ञानिक म्हणून सुप्रसिद्ध टाटा ग्रुपचे जेआरडी टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे बनले. यांचा जन्म 29 जुलै 1904 मध्ये फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी झाला. काही वर्ष ते मुंबई या ठिकाणी शिकले त्यानंतर त्यांचे बालपण फ्रान्समध्ये गेले कारण त्यांची आई ही फ्रेंच होती. त्यांना 1929 साली वैमानिकाचा परवाना मिळाला आणि ते पहिले भारतीय परवाना मिळणारे ठरले. त्यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे 1946 मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया असे ठेवले. वयाच्या 34 व्या वर्षी 1938 मध्ये ते टाटा सन्स उद्योग समूहाचे चेअरमन झाले त्यावेळेस टाटाच्या 14 कंपन्या होत्या त्यांच्या काळात 91 कंपन्यांची भर पडली. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी 1936 मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची स्थापना केली 1945 मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना केली आणि आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय त्यांनी 1941 मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू केले. भारतीय केंद्र शासनातर्फे त्यांना 1957 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले त्यानंतर त्यांना 1992 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. "द ग्रेटेस्ट इंडियन" या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये आउटलॉक इंडियाच्या या सर्वेक्षणात टाटा सहाव्या क्रमांकावर 2012 मध्ये होते. त्यांचे निधन वयाच्या 89 व्या वर्षी स्विझरलँड मधील जिनेव्हा या ठिकाणी 29 नोव्हेंबर 1993 रोजी झाले.
10 फेब्रुवारी 1931 रोजी ब्रिटिश सरकारने भारताची राजधानी पश्चिम बंगाल येथील कोलकत्याहून नवी दिल्ली या ठिकाणी हलविण्यात आली व राजधानीचे ठिकाण नवी दिल्ली हे झाले.
10 फेब्रुवारी 1933 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा 13 व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
10 फेब्रुवारी 1937 रोजी " मराठवाडा " साप्ताहिकाची स्थापना आ. कृ. वाघमारे यांनी केली.
10 फेब्रुवारी 1948 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे या ठिकाणी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला मुख्य परिसर एकूण 411 एकर आहे मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. सुरुवातीला बारा जिल्हे या विद्यापीठाला जोडल्या गेले होते 1962 मध्ये काही जिल्हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ला जोडल्या गेले आणि 1990 मध्ये दोन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याला जोडल्या गेले सध्या पुणे अहिल्यानगर आणि नाशिक हे तीन जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. या विद्यापीठाची स्थापना मुंबई सरकार मधील मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री बाळासाहेब खैर यांच्या काळात झाली. या नामांतर व्हावी म्हणून काही जणांनी एक 2004 मध्ये मागणी केली. त्यानंतर वेळोवेळी आंदोलन झाली. शासनाकडे प्रस्ताव गेले. पुण्यात सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण आयुष्य गेले. त्यांनी शिक्षणाची गंगा पुण्यातून सुरुवात केली स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यामुळे भारताच्या पहिल्या शिक्षका व मुख्याध्यापिका म्हणून त्यांचे नाव जोडण्यात चा निर्णय शासनाने घेतला. 7 जून 2014 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला आणि पुणे विद्यापीठाला सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अशी ओळख आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे
10 फेब्रुवारी 1949 रोजी महात्मा गांधी वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निष्कलंक सुटका करण्यात आली.
10 फेब्रुवारी 1979 रोजी भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानीचे शहर म्हणून इटानगर हे घोषित करण्यात आले. इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेशच्या दक्षिण भागात हिमालयाच्या पायथ्याशी असून 1911 साली या इटानगरची लोकसंख्या 35000 अशी होती. राष्ट्रीय महामार्ग 52 ए हा इटानगरला आसाम राज्यासोबत जोडला जातो. अरुणाचल प्रदेश हे राज्य आसाम राज्याचे विभाजन करून 1987 मध्ये स्थापन करण्यात आले. सूर्य हा या राज्यात प्रथम उगवतो म्हणून या प्रदेशास सर्वप्रथम सूर्य उगवणारा प्रदेश असे म्हणतात. मोनपा व मिजी या येथील प्रमुख भाषा आहेत. 66.95% येथील साक्षरतेचे प्रमाण आहे आदिवासी समाजाचे याच्यामध्ये जास्त प्रमाण आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये एकूण 13 जिल्हे आहेत. डिसेंबर 14 मध्ये पहिले मुख्यमंत्री म्हणून नाबाम तुकी यांनी पदभार स्वीकारला. येथे तांदळापासून तयार केलेले अपांग नावाचे मध्य हे येथील मुख्य लोकप्रिय पेय आहे.
X X
10 फेब्रुवारी 1996 रोजी आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या “डीप ब्लू” या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
10 फेब्रुवारी 2005 रोजी जगात उत्तर कोरियाने अण्वस्त्र तयार करूआपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर घोषणा केली.
10 फेब्रुवारी 2009 रोजी भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबईचे निर्माते दानशूर व शिक्षण तज्ञ जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 31 जुलै 1865 मध्ये झाला.
10 फेब्रुवारी 1894 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 29 डिसेंबर 1986 रोजी झाला.
10 फेब्रुवारी 1910 रोजी भारतातील सुप्रसिद्ध साहित्यिका व मानव वंश शास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म झाला. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी लावली त्यावेळेस त्यास विरोध करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध त्यांचं मूळ गाव महाराष्ट्रातील पंढरपूर हे 129 मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला त्यानंतर 1935 मध्ये त्या एम ए भारतातील साहित्य क्षेत्रातील खूप सन्माननीय व्यक्ती होत्या म्हणून त्यांना रशिया भेटीचे सुद्धा निमंत्रण आले होते त्या कराड येथे 1975 मध्ये 51 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले. रवींद्र टागोर यांनी लिहिलेल्या गीतांजली या साहित्याची निर्मिती त्यांनी संस्कृतात अनुवादित केली ही अतिशय खूप मोलाची बाब होती. त्यांना ऋतुचक्र, डूब, प्रेस, भावमुद्रा, व्यासपर्व, रूपरंग या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. पैस या पुस्तकासाठी त्यांना 1971 चा साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळालेला आहे. पद्मश्री आणि ज्ञानपीठ पुरस्कारासाठी त्यांचे निवड झाली होती पण इंदिरा गांधी यांनी लाभलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ सरकारने घोषित केलेले पुरस्कार त्यांनी स्पष्टपणे नाकारले. त्यांचा मृत्यू 7 मे 2002 रोजी झाला.
X X
10 फेब्रुवारी 1945 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म झाला. ते भारतीय वायुसेनेमध्ये पायलट म्हणून होते. त्यांनी 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वायुसेनेमध्ये पार पाडली. त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन राजकारणामध्ये प्रवेश केला. 1980 मध्ये भरतपुर मधून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर डौसा राजस्थान मधील या लोकसभा मतदारसंघातून पाच वेळेस निवडून आले. 1984 मध्ये पहिल्यांदा राजीव गांधी सरकारमध्ये ते भूतल राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. एका सडक दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू 11 जून 2000 रोजी झाला.
10 फेब्रुवारी 865 रोजी सुप्रसिद्ध जर्मन भौतिक शास्त्रज्ञ हेन्रिक लेन्झ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1804 मध्ये झाला होता.
10 फेब्रुवारी 1912 रोजी वैज्ञानिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी म्हणजे निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन झाले. 1895 ते 1900 पर्यंत रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट 2009 मध्ये मिळाला होता. 1960 मध्ये लिस्ट ग्लास को विश्वविद्यालयात शल्य चिकित्सक चे प्रोफेसर म्हणून काम त्यांनी केले. त्यांचा जन्म 5 एप्रिल 1827 रोजी झाला होता.
सर जोसेफ लिस्टर
10 फेब्रुवारी 1923 रोजी सुप्रसिद्ध जर्मन भौतिक शास्त्रज्ञ यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला असे विलहेम राँटजेन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 27 मार्च 1845 रोजी झाला होता.
10 फेब्रुवारी 1982 मध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक विद्वान टीकाकार आणि लेखक नरहर अंबादास कुरुंदकर यांचे निधन झाले. हे मराठी भाषा व साहित्याचे सुप्रसिद्ध समीक्षक होते. तसेच एक समाजचिंतक म्हणून आणि प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. यांचा जन्म महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात नांदापूर जिल्हा हिंगोली गावांमध्ये झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंद हे त्यांची मुळगाव. सुरुवातीला प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज नांदेड या ठिकाणी त्यांनी प्राचार्य पद भूषविले. त्यांची उल्लेखनीय बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद दोनदा झाले आणि दोन्ही वेळेस ते बिनविरोध अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. कुरुंदकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ नांदेड शहरांमध्ये "नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान" ची स्थापना करण्यात येऊन त्यांची कन्या शामल पत्की ह्या त्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानने 2010 वर्षी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात "नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र" सुरू केले. यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक आरतीची अट नसल्यामुळे या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून नवे नवे प्रकल्प हाती घेतले जातात व ते पूर्ण केले जातात. त्यात पूर्ण झालेले प्रकल्प "दासोपंतांच्या पदरचनांचा सांगितिक व वांग्मयीन अभ्यास", "मराठ्यांचा इतिहास -कुरुंदकर यांची भूमिका" इत्यादी. कुरुंदकरांचे निवडक साहित्य प्रसिद्ध झाले त्यात अभयारण्य, आकलन, जागर, धार आणि काठ ,मागोवा, शिवरात्र, हैदराबाद: विमोचन आणि विसर्जन इत्यादी. त्यांनी काही महत्त्वपूर्ण साहित्य निर्मिती प्रस्तावना लिहिलेली आहे त्यात जनार्दन वाघमारे यांचे "अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती", रणजीत देसाई यांची "श्रीमान योगी"(70 पानी प्रस्तावना), वसंत कानिटकर यांची "हिमालयाची सावली" इत्यादी प्रसिद्ध साहित्य निर्मिती. त्यांच्या "धार आणि काठ" या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी झाला होता.
10 फेब्रुवारी 2001 मध्ये भारतातील राजस्थान राज्यातील जयपूर -अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका सुप्रसिद्ध गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन झाले त्यांचा जन्म 15 जुलै 1904 मध्ये झाला होता.
10 फेब्रुवारी 2012 रोजी एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन झाले त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1957 रोजी झाला होता.
जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ : मुंबईचे शिल्पकार,मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती
https://www.insearchofknowledge.org/2023/02/jagannath-shankarsheth-murkute-alias.html
👆 Open link
10 फेब्रुवारी: जयंती
Jagannath Shankarsheth Murkute alias Nana Shankarsheth : Indian Philanthropist and Educationalist
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-9-day-of-special-dinvishesh.html
👆
February 9 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 9: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-11-day-of-special-dinvishesh.html
👆
February 11 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 11: दिनविशेष
X X
View, Comments and share...
0 Comments