Sir Surendranath Banerjee: Rashtraguru, Indian Nationalist leader
सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी : भारतीय राष्ट्रवादाचे जनक व भारतीय समाजसुधारक
10 नोव्हेंबर: जन्मदिन
6 ऑगस्ट: स्मृतिदिन
बालपण आणि शिक्षण:
बंगालमधील थोर भारतीय नेते,एक प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व भारतीय समाज सुधारक अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्य सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात 10 नोव्हेंबर 1848 मध्ये कलकत्ता सध्याचे कोलकत्ता पश्चिम बंगाल या ठिकाणी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव दुर्गाचरण बॅनर्जी हे होते. त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे कलकत्त्यातच पूर्ण झाले. त्यानंतर हिंदू कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर बी.ए. ची पदवी त्यांनी 1868 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून संपादन केली. त्यानंतर ते भारतीय नागरी सेवा परीक्षेत बसण्यासाठी 1868 मध्ये इंग्लंडला गेले.
X X
इंग्लंडला गेल्यावर आय.सी.एस. ची परीक्षा दिली व त्यात ते 1869 मध्ये उत्तीर्ण झाले व आय.सी.एस. (ICS) होणारे ते पहिले भारतीय विद्यार्थी होते. परंतु त्यांचे वय कमी असल्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात आली परंतु न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ते पुन्हा एकदा परीक्षेला बसण्यास त्यांना परवानगी दिली आणि 1871 मध्ये त्यांची पुन्हा निवड झाली. आय.सी.एस. परीक्षा पास झाल्यानंतर ते भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांची नियुक्ती ब्रिटिश सरकारने सहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिल्हेट या ठिकाणी दिली. पण काम करत असताना त्यांच्या प्रशासनातील काही किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून 1874 मध्ये काढले. नोकरीवरून काढल्याच्या कारणाने त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध इंग्लंड मध्ये जाऊन इंडिया ऑफिस कडे दाद मागण्याचा प्रयत्न केला पण तो निरर्थक ठरला. त्यामुळे ते खूप नाराज झाले व त्यांनी निर्णय घेतला की आपण बार ॲट लॉ च्या परीक्षेत बसावं बॅरिस्टर व्हावे. पण बार ॲट लॉ च्या परीक्षेतही ब्रिटिश सरकारने त्यांना बसण्याची परवानगी दिली नाही.
X X
विचारांचा प्रभाव व अन्यायाविरुद्ध चळवळ:
सुरेंद्रनाथ बॅनर्जी जेव्हा इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये इंडिया ऑफिस कडे दात मागण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना दात नाकारण्यात आली त्यादरम्यान त्यांच्या वाचनामध्ये अनेक पुस्तके आली. इंग्लंडमधील मुक्कामात एडमंड बर्क, जूझेप्पे मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला.
ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अशा अन्याय्य धोरणामुळेच त्यांच्या विरुद्ध जनमत जागृत करण्याची चळवळ त्यांनी 1875 मध्ये सुरू केली.
X X
भारतात आगमन व नौकरी:
ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये त्यांना दिलेली वागणूक त्यामुळे ते परत भारतात 1875 मध्ये आले. कलकत्त्यातील मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये सध्याचे विद्यासागर महाविद्यालय मध्ये सुरुवातीस इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केली. नंतर काही दिवस त्यांनी फ्री चर्च कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य केले. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि दृष्टीस विरोधी भावना जागृत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
कोलकत्ता मध्ये त्यांनी सुरुवातीला 1882 मध्ये त्यांनी स्वतःची एक शाळा काढली व त्या शाळेचे पुढे त्यांनी रिपन महाविद्यालय सुरू केले. रिपन महाविद्यालय हे सध्याचे सुरेंद्रनाथ महाविद्यालय आहे . तेथेच अध्यापक म्हणून त्यांनी 37 वर्षे काम केले तथापि राजकारणापासून ते अलिप्त नव्हते.
X X
"द बेंगॉली" इंग्रजी वृत्तपत्र :
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जनजागृतीसाठी 'द बेंगॉली' हे इंग्रजी वृत्तपत्र 1862 मध्ये गिरीश चंद्र घोष यांनी स्थापन केलेले हे वृत्तपत्र 1878 मध्ये विकत घेतले. त्यातून त्यांनी 40 वर्षे सातत्याने लेखन केले. ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून ते आपल्या बेंगाल बंगाली या वृत्तपत्रातून लिखाण करत असत. त्यांनी अनेक चळवळींचा इतिहास राष्ट्रीय एकात्मतेसारखे विषय अशा प्रकारचे अनेक विषय त्यांनी हाताळले व आपल्या वृत्तपत्राच्या लेखनेतून समाजापर्यंत पोहोचविले.
शिखांचा इतिहास तसेच भारतीय एकात्मता यांसारखे विषय हाताळून राष्ट्रीय जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या वक्तृत्वाचा तत्कालीन बंगाली तरुणांवर व विशेषतः ब्राह्योसमाजातील अनुयायांवर एवढा परिणाम झाला की ते सुरेंद्रनाथांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले.
द बेंगॉली या वृत्तपत्रातून कलकत्ता उच्च न्यायालयाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगवास भोगणारे ते पहिले भारतीय पत्रकार होतो. तेव्हा देशभर हरताळ व निषेधाच्या सभा झाल्या. भारतीय सनदी सेवा परीक्षेचे किमान वय 21 वरून 19 वर आणण्यात आल्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी भारतभर प्रचार केला.
X X
इंडियन ॲसोसिएशन संस्था स्थापन:
सुरेंद्रनाथांनी "इंडियन ॲसोसिएशन" ही संस्था 26 जुलै 1876 मध्ये स्थापन केली. ही संघटना भारतातील सुरुवातीच्या राजकीय संघटने पैकी एक मुख्य संघटना होती. 1876 मध्ये ते कलकत्ता महानगरपालिकेमध्ये निवडून आले व महापालिकेचे सदस्य झाले.
इंडियन असोसिएशनच्या प्रसारार्थ भारतभर दौरा काढला. सुरेंद्रनाथांनी इंडिया ॲसोसिएशनतर्फे राष्ट्रीय सभा कलकत्त्यात डिसेंबर 1883 मध्ये बोलविली. यानंतर इंडियन ॲसोसिएशनची दुसरी सभा 1885 मध्ये कलकत्त्यातच घेण्यात आली.
X X
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाचे योगदान:
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उभारणीत व स्थापनेत महत्त्वाचा वाटा होता काँग्रेसच्या पहिले अधिवेशनात मुंबईला काँग्रेसचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले होते व त्यानंतर पुण्यात भरलेल्या 1895 च्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.
त्यानंतर 1902 च्या भरलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अहमदाबाद येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर पुढे त्यांनी इंडियन असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे उदारमन दाखविले व विलीनीकरण केले.
सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरुवातीपासून मवाळ पक्षात होते.1905 च्या बंगालच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला. आणि बहिष्काराचा जोरदार पुरस्कार केला.
X X
सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालच्या फाळणी बाबत लिहितात,
" बंगालच्या विभाजनाची कल्पना आमच्यावर बॉम्ब पाडावा अशी आढळली त्यामुळे आमचा भयंकर अपमान करण्यात आला असे आम्हाला वाटले या योजनेद्वारे बंगाली भाषिक जनतेत विकसित होणाऱ्या आत्मसन्मान आणि एकात्मतेवर भयंकर आघात करण्यात आला असे आम्हाला वाटते."
सुरेंद्रनाथांना लोकमान्य टिळकांचा जहालवाद किंवा गांधींचा असहकार हे दोन्ही मार्ग मान्य नव्हते.
द्विदल राज्यपद्धती असेलल्या बंगालच्या विधिमंडळावर त्यांची नियुक्ती 1921 मध्ये झाली व लवकरच त्यांना ब्रिटिश सरकारने ‘नाइट’ हा किताब बहाल केला. 1921-23 दरम्यान त्यांची स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बंगाल मधील सरकारचे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आणि पुढे 1923 च्या निवडणुकीत ते स्वराज्य पार्टीच्या विधानचंद्र राव यांच्याकडून पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली.
X X
ग्रंथसंपदा व लेखन:
1. सुरेंद्रनाथांनी स्फुट लेखन "द बेंगॉली" या इंग्रजी वृत्तपत्रातून
2. ए नेशन इन मेकिंग : बिइंग द रेमिनन्सीस ऑफ फिफ्टी यीअर्स ऑफ पब्लिक लाइफ (1925): आत्मचरित्र
3. स्पीचेस बाय बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी
4. डी ट्रंपेट वाईस ऑफ इंडिया स्पीचेस ऑफ बाबू सुरेंद्र नाथ-1909
5. स्पीचेस बाय बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी -1876 ते 1894
6. स्पीचेस अँड रायटिंग ऑफ ऑनरेबल सुरेंद्रनाथ बॅनर्जी-1925
X X
उपाधी/ गौरव/सन्मान:
ब्रिटिश सरकारने सुरेंद्रनाथांना ‘नाइट’ हा किताब बहाल केला.
सुरेंद्रनाथांनी भारतात विशेषतः बंगालमध्ये राष्ट्रवाद जागृत केला आणि आपल्या अस्खलित वक्तृत्वाने त्याचा देशभर प्रसार केला. त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना ‘बंगालचा अनभिषिक्त राजा’ ही उपाधी देऊन त्यांचा बंगाली जनतेने गौरव करण्यात आला.
X X
निधन:
भारतीय राष्ट्रवादाचे जनक,थोर भारतीय स्वतंत्र सेनानी व समाज सुधारक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन 6 ऑगस्ट 1925 रोजी बराकपूर बंगाल प्रांत सध्याचे पश्चिम बंगाल या ठिकाणी झाले.
X X
स्मरणार्थ:
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 28 डिसेंबर 1983 रोजी 50 पैसे असे त्याचे मूल्य ठेवले गेलेले एक टपाल तिकीट जारी केले.
View, Comments and share.........
X X
1 Comments
👍👍
ReplyDelete