Subscribe Us

header ads

Ancient History -3 प्राचीन इतिहास

Ancient History -3

प्राचीन इतिहास-3


★ भारतीयांना सिंधु संस्कृतीचा वारसा मिळालेला आहे.

★ सिंधु संस्कृतीचे संशोधन कार्य डॉ. आर. डी. बॅनर्जी यांनी केले.

★ जॉन मार्शल पुराणवस्तू संशोधन खात्याचे डायरेक्टर जनरल होते.

★ पंजाबमधील मॉंटगोमेरी जिल्हयातील हरप्पा येथे पुराणवस्तू संशोधन खात्यातर्फे खोदकाम चालू झाले होते.

★ इ.स. १९२२ साली सिंध प्रांतातील तारकाना जिल्हयातील मोहेंजोदारो येथे खोदकामास सुरूवात झाली.

★ मोहनजोदारो हे सिंधु संस्कृतीतील उत्खननात सापडलेले पहिले शहर होय.

★ सिंधु संस्कृतीत सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य नगररचनेत दिसून येते.

★ सिंधु संस्कृतीत सुमेरियन संस्कृतीत इष्टिकालेख सापडले.

★ सिंधु संस्कृती ही नागरी संस्कृती या वैशिष्ट्याने ओळखली जाते.

★ भूमिगत गटारे हे सिंधु संस्कृतीचे वैशिष्टय आहे.

★ आर्य हे अतिप्राचीन अशा नर्डिक वंशाचे होते असे मानतात.

★ आशिया मायनर हे आपचे मूळ वसतिस्थान मानले जाते.

★ आशिया मायनरमध्ये बोधोजकोई या ठिकाणी एक शिलालेख सापडला आहे.

★ वेद हा शब्दाचा अर्थ ज्ञान आहे.

★ आजच्या आपल्या भारतीय संस्कृतीचे मूळ वेदांमध्ये आहे.

★ आर्य वेद ग्रंथसंपतीस अपौरूषेय मानतात.

★ ऋग्वेद हा आर्यांचा सर्वात मोठा वेद आहे.

X X

★ ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. 

★ ऋग्वेद हा आर्यानी निर्माण केलेला ग्रंथ आहे.

★ ऋग्वेदात १,०२८ सूक्ते आहेत.

★ ऋग्वेदाची एकूण दहा मंडले आहेत.

★ विविध देवतांचे स्तवन यजुर्वेदात आहे.

★ आर्यसंस्कृतीच्या आगमनानंतर भारतात एका तेजस्वी संस्कृतीची सुरूवात झाली.

★ यज्ञसंस्था आर्याची पहिली धार्मिक संस्था आहे.

★ उत्तर भारतात आर्याच्या ज्या वसाहती झाल्या त्यांना 'आर्यावर्त' म्हटले जाऊ लागले. 

★ आर्य संस्कृतीत आश्विनीकुमार हे पहिले वैद्य होवून गेले.

★ आर्य समाजात वर्ग व्यवसायावरून ठरत असे. 

★ लढाई आणि राष्ट्रसंरक्षण ही कार्य क्षत्रिय करत असत.

★ नद्यांच्या परिसरात स्थिर झालेल्या सर्व प्राचीन संस्कृती या प्रामुख्याने शेतीप्रधान संस्कृती आहे.

★ भारतात ॠग्वेद काळानंतर उदयाला आलेल्या काळास 'उत्तर वैदिक काळ' नावाने संबोधण्यात येते.

★ द्रविड संस्कृतीत मातृसत्ताक प्रकारची कुटुंबपद्धती होती. 

★ वरूण हा आर्यांचा आवडता देव आहे.

★ द्रविडांची शिव देवता आर्यांना आवडली.

★ द्रविडांच्या नगरांची तटबंदी दगड व विटांची होती. 

★ ब्रम्हचर्याश्रमात प्रमुख कर्तव्य विद्यार्जन हे असे.

★ संन्यासाश्रम ही आश्रमधर्माची शेवटची पायरी आहे.

★ वैदिक धर्मात यज्ञ विधीला फार महत्त्व होते.

★ वैदिक धर्म हा आर्य लोकांचा अतिप्राचीन धर्म होय.

★ गौतम बुद्ध, भगवान महावीर वगैरेंची मते वैदिक धर्माविरूद्ध मूळ धरू लागली होती. 

★ जैन धर्मानुसार धर्म प्रसार करणाऱ्यास 'तीर्थकर' म्हणतात.

★ जैन धर्माचा प्रसार प्राकृत भाषेतून केला गेला.

★ नंद घराण्यातील काही राजांनी जैन धर्माचा स्वीकार केला होता. 

★ महावीर हा जैन धर्मातील चोवीसावा तीर्थकार आहे.

★ जैन धर्मातील लोक वेदप्रामाण्य मानत नाहीत.

★ दिगंबर व श्वेतांबर हे जैन धर्मातील दोन प्रमुख पंथ होत. ★ वर्धमान महावीरांचे महानिर्वाण ख्रिस्तपूर्व, ४६७ साली झाले.

★ गौतम बुद्धाने बौध्द धर्म प्रसारासाठी पाली लोकभाषेचा उपयोग केला.

★ गौतम बुद्धांनी बहुजन समाजास आपली शिकवण पाली भाषेत दिली.

★ सती कोळी हा गौतम बुद्धांचा शिष्य होता.

★ अनाथपिंडक हा श्रीमंत मनुष्य गौतम बुद्धांचा शिष्य होता.

★ सार्थवाहक हा मंगी गौतम बुद्धांचा शिष्य होता.

★ आम्रपाली ही गणिका गौतम बुद्धांची शिष्या होती. 

★ उपाली हा न्हावी गौतम बुद्धांचा शिष्य होता.

X X

★ धुंद हा लोहार गौतम बुद्धांचा शिष्य होता.

★ पुन्ना व पुर्णिका ह्या गुलाम स्त्रिया गौतम बुद्धांच्या शिष्या होत्या. 

★ बौद्ध तत्वज्ञानाचा बादविवादात पाडाव केला तरी त्यातील अहिंसा व सर्वसंगपरित्याग ह्या तत्त्वांचा शंकराचार्यांनी स्विकार केला होता.

★ गौतमास सर्व जगाच्या दुःखाच्या कारणांच्या ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यामुळे बुद्ध नावाने संबोधले जाऊ लागले.

★ गौतम बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी स्थापन केलेल्या मोठमोठ्या मठांना ' विहार' म्हणतात.

★ गांजलेल्या माणसांना बौद्ध धर्म हा आपल्या मुक्तीचा महान मार्ग वाटू लागला.

★ भिक्षु व भिक्षुणी यांच्या संघटनेस 'बौद्ध संघ' म्हणतात. ★ प्राचीन भारतातील पहिल्या साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होय.

★ चंद्रगुप्त मौर्य हा ग्रीक इतिहासकारांच्या मते प्राचीन भारताचा पहिला सम्राट होय.

★ प्राचीन भारतीय इतिहासाला प्रथमतः मान्य झालेला कालखंड मौर्य कालखंड होय.

★ अलेक्झांडरचा सेल्यूकस निकेटर हा सैन्याधिकारी काबूल, कंदाहार, हीरात व बलुचिस्तान या प्रांतात प्रबळ होता.

★ सातवाहन राजवंश सर्वात प्राचीन आहे.

★ बौद्ध धर्म स्वीकारून त्यास राजाश्रय देणारा सम्राट अशोक होय.

★ सम्राट अशोकाने पाली भाषेला राजभाषेचा मान मिळवून दिला. 

★ सम्राट अशोकाने विजय मिळत असतानाही राजवैभवाचा त्याग करून धर्मप्रसार केला.

★ सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला.

★ आलेख हा अशोककालीन इतिहासाचे बहुमोल साधन होय.

★ गुप्त काळास भारतीय इतिहासातील सुवर्णयुग म्हणतात.

★ समुद्रगुप्तास भारतीय नेपोलियन म्हणून संबोधले जाते.

★ फाहेन हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला.

★ आर्यभट्टाचा जन्म इ. स. ४७६ साली पाटलीपुत्र येथे झाला. 

★ आर्यभट्टीय, आर्यष्टशत आणि दशगीतिका सूत्र हे तीन ग्रंथ आर्यभट्टाने लिहिले.

★ आर्यभट्ट या गणिततज्ञाने बीजगणिताचा शोध लावला.

★ आर्यभट्ट या गणिततज्ञास दशांश पद्धतीचा जनक म्हणतात. 

★ दशांश पद्धती ही पूर्णपणे भारतीय आहे.

★ कनिष्कची राजधानी पुरूषपूर (पेशावर) येथे होती.

★ गुप्तांच्या अस्तानंतर कनोजचे वर्धन राजघराणे स्थापन झाले.

★ कनोजचे हर्षवर्धनाचे साम्राज्य महत्वाचे मानले जाते.

★ हर्षवर्धन हा प्रारंभी शैव पंथ धर्माचा अनुयायी होता.

★ सम्राट हर्षवर्धन प्रयाग येथे धार्मिक मेळावे भरवित असे.

★ बाणभट्ट हा सम्राट हर्षवर्धनचा राजकवी होता. 

★ सु-एन-त्संग हा चीनी प्रवासी सम्राट हर्षवर्धनच्या काळात भारतात आला.

★ सम्राट हर्षवर्धनच्या काळात विद्येसाठी नालंदा व वल्लभ ही प्रसिद्ध विद्यापीठे होती.

★ भास्कराचार्य हा प्रसिद्ध गणिती होता.

X X

★ भास्कराचार्य यांना काही नक्षत्रांची वार्षिक जनगणनेची माहिती होती.

★ भास्कराचायांची प्रसिद्धी ज्योतिषी व गणिती म्हणून आहे. 

★ भास्कराचार्यांनी बीजगणितावरील 'लिलावती' हा मौलिक ग्रंथ लिहिला.

★ भास्कराचार्य हे इ. स. बाराव्या शतकातील भारताचे सर्वश्रेष्ठ गणिती म्हणून ओळखले जातात. 

★ भास्कराचार्यांनी बाराव्या शतकाच्या मध्यास सिद्धांतशिरोमणी आणि करणकुतूहल हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले.











View, Comments and share......



Post a Comment

1 Comments