Pandit Jawaharlal Nehru : Indian anti-colonial nationalist, secular humanist, social democrat and author Nehru was a principal leader of the Indian nationalist movement
पंडीत जवाहरलाल नेहरू: भारताचे पहिले पंतप्रधान
जन्मदिन -14 नोव्हेंबर- बालक दिन
स्मृतीदिन:27 मे
बालपण आणि शिक्षण:
जवाहरलाल नेहरू यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर 1889 रोजी एका उच्चभ्रू संपन्न अशा काश्मिरी ब्राह्मण घराण्यात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील होते व राष्ट्रीय चळवळीशी संबंधीत होते. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी हे होते.
जवाहरलाल नेहरूंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. फर्डिनंड टी ब्रुक्स हे त्यांचे शिक्षक होते. मे 1905 मध्ये नेहरू शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे शिक्षणाबरोबरच राजकारणातही त्यांना रूची निर्माण झाली.
विशेषतः आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे ते आकर्षिले गेले. 1907 मध्ये त्यांनी केब्रिज येथील केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
केब्रिजमधील हिंदी लोकांचे "मजलीस' नावाचे एक कॉलेज होते. तिथे राजकीय विषयाची चर्चा होत असे. 1910 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. 1912 साली इनर टेम्पल या लंडनमधील कॉलेजमधून ते बॅरीस्टर झाले.
केब्रिजच्या या वास्तव्याचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व विचारांवर कायम टिकला. 1912 मध्ये भारतात परत आले.
इंग्लंडहून भारतात परत आल्यानंतर पंडित नेहरू यांनी 1912 मध्ये आपल्या वडिलांचे जुनियर म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती. 1916 मध्ये कमला नेहरू यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता.
पंडित जवाहरलाल नेहरू व कमला नेहरू यांना इंदिरा नावाची मुलगी झाली.
X X
व्यक्तींचा व विचारांचा प्रभाव :
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंवर आई, वडील त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा प्रभाव होता.
राजकीय विचारांच्या दृष्टीने नेहरू गांधींचे शिष्य होते. तसेच त्यांच्या आर्थिक, सामाजिक विचारांवर ब्रुक्स, ॲनी बेझंट, श्यामजी कृष्णवर्मा, मानवेंद्रनाथ रॉय, कार्ल मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादाचा जे. एस. मिल, जॉन मोर्ले, बड रसेल, बर्नाड शॉ, सीडने वेष यांच्या विचारांचा त क्रांतीचा प्रभाव दिसून येतो.
या समग्र विचारवंताच्या विचारांच्या प्रभावातूनच त्यांच्या लोकशाही, समाजवाद, उदारमतवादः व्यक्तीस्वातंत्र्य, अलिप्ततावाद, शांतता या सर्व विचारांची जडण घडण झाली.
X X
स्वातंत्र्य लढ्यातील योगदान:
1916 मध्ये राजकारणात कार्य करण्याच्या उद्देशाने लखनौ काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींशी भेट झाली. आणि देशाच्या राजकारणात भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवली.
1916 मध्ये त्यांनी डॉक्टर आणि बेझंट यांच्या होमरूल लीग मध्ये प्रवेश केला व ते 1918 मध्ये या लीगचे सेक्रेटरी झाले.
त्यानंतर 1920 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत नेहरू हे सहभागी झाले त्यामुळे त्यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुद्धा झाली होती. 1923 मध्ये अलाहाबाद म्युनिसीपल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1929 मध्ये लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि याच अधिवेशनात काँग्रेसने प्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी हा ठराव पास केला या अधिवेशनाला भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सर्वानुमते पास झाला.
यानंतर नेहरू 1939, 1946, 1951 ते 1954 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषवले. 26 जानेवारी 1930 रोजी नेहरूंच्या प्रेरणेनेच काँग्रेसने स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि देशाला स्वातंत्र्याची शपथ दिली. 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली या चळवळीत पंडित नेहरू यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता.1936 मध्ये ते लखनौ काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. 1937 मध्ये काँग्रेसचे प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यामध्ये भरगोस यश मिळाले या काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सुद्धा प्रामुख्याने पंडित नेहरू यांनीच वाहिली होती.
ऑगस्ट 1942 मध्ये अ. भा. काँग्रेस कमिटीने “चले जाव' चा ठराव पास केल्यानंतर त्यांना अटक झाली व जून 1945 पर्यंत ते तुरूंगात होते. अशाप्रकारे नेहरूंना नऊ वेळा तुरुंगात जावे लागले आणि एकूण तुरुंगवास भोगावलेला कालावधी नऊ वर्ष असा होता. त्यांना महाराष्ट्रातील अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले असतानाच त्याच ठिकाणी त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.
X X
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान:
1946 मध्ये ते कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. 1946 मध्ये स्थापन झालेल्या भारताच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून नेहरू यांचीच निवड करण्यात आली. त्यांनतर नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
आयुष्याच्या अखेर पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. या नव्या सरकारपुढे प्रचंड आव्हाने होती.
अनेक समस्या व संकटे समोर होती, जातीय दंगली पेटल्या होत्या,याशिवाय जमातवाद, भाषावाद, प्रादेशिकवाद, हिंसाचार अशा अनेक शक्तीप्रवाहाशी तोंड द्यावे लागले.
नेहरूंनी या सर्व जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. या आक्रमणाला खंबीरपणे तोंड देत असतांनाच नेहरूंच्या नेतृत्वाखालील शासनाने व राष्ट्राने शांतता व लोकशाही निष्ठा यावरील आपली श्रद्धा ढासळू दिली नाही.
X X
पंडीत जवाहरलाल नेहरूंचे राजकीय विचार :
नेहरूंचे व्यक्तिमत्त्व असाधारण होते. त्यांच्या विचाराची एक विशिष्ट बैठक होती.
पाश्चात्य व भारतीय विचाराच्या प्रभावातून पं. जवाहरलाल नेहरूंनी भारतीय परिस्थितीच्या संदर्भात जे विचार मांडले आहेत. त्या विचारालाच त्यांचे राजकीय विचार म्हणतात.
त्यांनी नवीन असा सिद्धांत मांडला नाही किंवा त्यांच्या विचाराचा एखादा राजकीय गट तयार केलेला नाही.
X X
पं. नेहरूंचा राष्ट्रवाद :
'भारतीय राष्ट्रवादाच्या बाबतीत पं. नेहरूंचे विचार सुरूवातीला प्रखर जहाल स्वरूपाचे होते. या काळात त्यांच्यावर गॉरीबॉल्डीच्या विचारांचा प्रभाव होता.
अरविंद घोष, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचाही प्रभाव होता. परंतु राष्ट्रवादाविषयीचा त्यांचा विचार इतर भारतीय विचारवंतापेक्षा वेगळा आहे.
त्यांनी आपल्या "Discovery of India" या ग्रंथात राष्ट्रवादाबाबत पुढील विचार व्यक्त केले आहेत.
X X
1) गौरवशाली इतिहास:
1857 नंतर भारतीय राष्ट्रवाद गतिशील बनला. नेहरूच्या मते 1857 ची घटना राष्ट्रवादी विचाराने प्रेरीत नव्हती. यामुळे ती पुर्णतः यशस्वी झाली नाही.
यामुळे पंडीत जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेस अंतर्गत राष्ट्रवादी विचारांना आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते राष्ट्रवाद हा त्या देशाच्या गौरवशाली इतिहासाने निर्माण केलेली मानसिकता आहे आणि ही मानसिकता समाजास एका सुत्रात बांधते.
नेहरूंच्या मते, “इतिहास म्हणजे समाजाच्या भुतकाळातील स्मृती, ज्या परंपरेच्या रूपाने देशातील समाजाच्या योगदानाच्या स्वरूपात स्मृतीत असतात. त्या गौरवशक्ती इतिहासाचे आपण वारस आहोत. हा विचार राष्ट्रवादास निर्माण करतो. जेव्हा समाज संकटात येतो तेव्हा हा विचार समाजाच्या पृष्ठभागावर येतो व राष्ट्रवादी मानसिकता कार्यरत होते. भारतातील वर्तमान मानसिकता ही इतिहासाच्या स्मृतीची निर्मीती आहे.
X X
2) स्व - निर्णयाच्या अधिकार :
स्व निर्णयाचा भारतीयांना अधिकार असावा असे नेहरूंच्या राष्ट्रवादी विचाराला अपेक्षित आहे.
स्वातंत्र्य ही आधुनिक मानवी सुसंस्कृत समाजाच्या अस्तित्वासाठी पुर्वअट आहे. जोपर्यंत देश परकीय राजवटीच्या नियंत्रणाखाली आहे तोपर्यंत शोषण आहे.
26 जानेवारी 1930 रोजी राष्ट्रीय ध्वजवंदन करतांना ते म्हणाले, “आपल्या श्रमाची फळे चाखण्यासाठी भारतीयांना संपूर्ण संधीपासून वंचित केले आहे. पुन्हा ती संधी भारतीयांना मिळवून देण्यासाठी स्व निर्णयाचा अधिकार आवश्यक आहे.
X X
3) क्रांतीकारी व समाजवादी पाया:
पंडीत जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रवादास क्रांतीकारी चौकट तयार केली यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवाद ही प्रागतिक चळवळ झाली. या चळवळीने समान संधीचा आग्रह धरला.
समाजातील सर्व घटकांना शहरी, ग्रामीण गरीब, श्रीमंत या सर्वांना समान संधी व अधिकार मिळावा यासाठी आग्रह धरला, 1931 च्या कराची अधिवेशनात मूलभूत हक्काचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
समाजवादी समाजरचनेसाठी राष्ट्रवादाची त्यांना गरज वाटत होती. गरीबांना जर समाज, सरकार समान संधी देत असेल तर त्या समाजासाठी,राष्ट्रासाठ सामान्य जनतेच्या मनाला आदर निर्माण होईल.
X X
4) प्रादेशिकता व साप्रदायिकतेला विरोध :
स्वतंत्र भारताच्या राष्ट्रवादास प्रादेशिकवाद, सांप्रदायिकता व जातीयवाद यांचे फार मोठे आव्हान होते. नेहरूंनी या विरोधात अथक मोहीम चालवली. त्यासाठी संस्था निर्माण केल्या.
सांप्रदायिकतेच्या विरोधात त्यांनी समता व बंधुभावाच्या माध्यमातून भारतात धर्मनिरपेक्षता रुजविण्याचा प्रयत्न केला. भाषावार प्रांतरचनेस त्यांचा विरोध होता.
त्यांच्या मते - "भाषावार प्रादेशिकता, जातीवाद, सांप्रदायिकता, यामुळे समाजात राष्ट्रीय भावना निर्माण होत नाही, तसेच यामुळे समाजातील फुटीर प्रवृत्तीस चालना मिळते.
X X
आंतरराष्ट्वाद:
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र राष्ट्रवादाने आंतरराष्ट्रीयवादाचा स्वीकार करावा.त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा क्रम जागतिक घटनाक्रमाशी जोडला, तेव्हा त्यांचे सहकारी त्याबद्दल उदासीन होते. परंतु पं. नेहरू फॅसिस्ट प्रवृत्तीला विरोध करून भारताव्यतिरिक्त वसाहतीत चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीस पाठींबा दिला. पं. नेहरूंच्या मते - कोणताही देश एकाकी राहू शकत नाही. कोणत्याही राष्ट्रातील घटना ही आंतरराष्ट्रीय घटनांचा भाग असते.
आंतरराष्ट्रीय शांतता, परस्पर राष्ट्रामधील मैत्रीभाव आंतरराष्ट्रीय सद्भावाचे वातावरण असल्याशिवाय कोणत्याच राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती राष्ट्राच्या विकासाची साधनसामुग्री समाप्त करते. समाजाची रचनात्मक क्षमता विनाश करण्यासाठी कार्यरत होते. विकसित राष्ट्रे अविकसित राष्ट्रांना आर्थिक मदत देऊ शकत नाही. दिली तरी शस्त्रास्त्र खरेदीसाठी देतात. स्वतःच्या वर्चस्वासाठी देतात. त्यांच्या मते- जागतिक औद्योगिकरणासाठी आंतरराष्ट्रवाद आवश्यक आहे. औद्योगिकरणामुळे राष्ट्रीय सीमांना बाजुस सारून जागतिक बाजारपेठ निर्माण केली आहे. दळणवळणाचे स्वरूप जागतिक झालेले आहे. कोणताच देश पुर्णतः स्वावलंबी राहिलेला नाही कारण परस्परावलंबन झालेले आहे.
पं. नेहरूंनी जागतिक संघराज्य किंवा जागतिक सरकारची कल्पना मांडली. त्यांच्या मते, जागतिक सरकारमध्ये प्रत्येक राष्ट्रास आपले प्रश्न सोडविण्याचे स्वातंत्र्य असेल, जागतिक सरकार आज ना उद्या अस्तित्वात येईल, ती काळाची गरज आहे. असे झाले नाही तर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे जागतिक आत्मनाश होय. त्यामुळे कोणत्याही राष्ट्राने एकाकी जगण्याचा विचार सोडून द्यावा व आंतरराष्ट्रीय राजकारणात वैचारिकरित्या सहभागी व्हावे, अणुयुगात अण्वस्त्राच्या भयानक छायेत आपणास सुरक्षित रहावयाचे असेल तर सर्व राष्ट्रांनी जागतिक सरकार किवा संघराज्य हाच उपाय आहे.
X X
पं.नेहरूंची पंचशील तत्त्वे :
1954 मध्ये भारत व चीन या दोन देशामध्ये जो करार झाला होता. त्याला पंचशील करार असे म्हटल्या जाते. पंचशील म्हणजे जगा आणि जगू द्या असे होय. या तत्त्वाला राष्ट्राराष्ट्राच्या संबंधामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न पंडीत नेहरूंनी केला. या पद्धतीने व तत्त्वाने भारताचे परराष्ट्र धोरण निश्चित केले.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची आधारतत्त्वे म्हणून जवाहरलाल नेहरूंनी पंचशील तत्त्वांना प्राधान्य दिले होते. ही पंचशील तत्त्वे 1954 मध्ये जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चौ-एन-लाय यांच्यात झालेल्या चर्चेत निश्चित करण्यात आली होती.
X X
पंचशीलाच्या तत्त्वात पाच तत्त्वांचा समावेश होतो.
2. राष्ट्रांनी परस्परांच्या प्रदेशावर अतिक्रमण करू नये.
3. राष्ट्रांनी एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये.
4. राष्ट्रांनी परस्परांशी समतेची व सहकार्याची वागणूक ठेवावी.
5. राष्ट्रांनी शांततामय सहजीवनाचे व आर्थिक सहकार्याचे धोरण स्वीकारावे.
पं. नेहरू हे संयुक्त राष्ट्रसंघाचे खंदे समर्थक होते. पंचशील तत्त्वे व संयुक्त राष्ट्रसंघाची तत्त्वे मिळती जुळती आहेत. त्यांनी केलेले प्रयत्न हा त्याचा पुरावा - आहे. जर चीनला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व नाकारले तर संयुक्त राष्ट्रसंघाला जागतिक स्वरूप राहणार नाही. 1962 नंतरही त्यांनी चीनला पाठींबा दिला, यातूनच त्यांची प्रतिबद्धता प्रतिबिंबित होते. आंतरराष्ट्रीय वाद त्यांनी एक मूल्य म्हणून स्वीकारला होता. संयुक्त राष्ट्राने जागतिक शांतता निर्माण प्रक्रियेत मोठी भूमिका पार पाडावी अशी त्यांची इच्छा होती. जर संयुक्त राष्ट्रसंघाने ही भूमिका निभावली तर आंतरराष्ट्रीयवादाचा मार्ग सुकर होईल असे त्यांना वाटत होते.
X X
धर्मनिरपेक्षता :
भारतीय राजकीय विचारपंरपरेत नेहरूंचे स्थान धर्मनिरपेक्ष आहे. ते विचाराने व कृतीने धर्मनिरपेक्ष होते. भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये धर्मनिरपेक्षतेचा पाया नेहरू यांनीच घातला. नेहरूंच्या मते भारतीय राष्ट्रवादाचा खरा आधार धर्मनिरपेक्षता हा आहे. भारतात भौगोलिक एकता, राजकीय स्थिरता व राष्ट्रीय ओळख ही केवळ धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा स्वीकार केल्यासच शक्य आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांना मध्ययुगीन भारताचे रूपांतर आधुनिक भारतात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करावयाचे होते. त्यांची ही संकल्पना पुर्णतः भिन्न होती ती पुढीलप्रमाणे आहे -
X X
सामाजिक एकतेसाठी धर्मनिरपेक्षता :
भारतात धर्मनिरपेक्षतेची गरज आहे. कारण त्याशिवाय सामाजिक, धार्मीक सामंजस्य निर्माण होणार नाही, भारतात अनेक धर्म, पंथ, जीवनपद्धती आहेत, या सर्वांसाठी धर्मनिरपेक्षता गरजेची आहे.
भारतीय स्थिर समाजाची हमी धर्मनिरपेक्षताच आहे. या नेहरूंच्या आग्रही विचारामुळेच भारतीय संविधानात धर्मस्वातंत्र्याचा अधिकार समाविष्ट करण्यात आला.
मार्गदर्शक तत्त्वामध्ये समान नागरी कायद्याचा समावेश त्यांच्या प्रयत्नामुळेच करण्यात आला. सर्व धर्मांना समान स्थान असावे, सर्वांना त्यांच्या धर्माची शिकवण देण्याचा अधिकार असावा हा त्यांनी धर्मनिरपेक्षतेस दिलेला नवीन अर्थ आहे. धर्मा धर्मात भेदभाव त्यांना मान्य नव्हता. हा - भेदभाव लोकशाही विरोधी होता.
सर्व धर्मांना राज्यात समान दर्जा, समान संधी दिली तर राजकीय स्थिरता निर्माण होईल. अल्पसंख्याक व बहूसंख्याक यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
सामाजिक समतेचा पाया निर्माण होईल व हा पाया लोकशाहीस उपयुक्त ठरेल.
X X
राष्ट्रीय एकता :
राष्ट्रीय एकता व एकात्मतेची गरज म्हणून नेहरू धर्मनिरपेक्षतेकडे पाहत होते. त्यांच्या मते - भारतात आर्थिक परिस्थिती वाईट आहे. सामाजिक मागासलेपण आहे. धर्म, पंथ, जाती, भाषा, आदिवासी यात टोकात विविधता आहे. यातून भारतात राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी धर्मनिरपेक्षता हेच एकमात्र उत्तर आहे. धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक विचारपद्धतीस जन्म देते. पोथीनिष्ठता व गतिरोधास बाजूस करतो. धर्मांध दृष्टिकोनातून सामाजिक प्रश्नाकडे पाहण्यापासून वाचवते व राष्ट्रीय एकात्मतेस चालना देते.
याप्रमाणे धर्मनिरपेक्षता राजकीय व मानसिक स्थिती निर्माण करते जी राष्ट्रीय एकात्मतेस पूरक असते. नेहरूंच्या मते सार्वजनिक शिक्षण, शहरीकरण, औद्योगिकरण, - यागोष्टी धर्मनिरपेक्ष विचारांना गती देतील.
X X
पं. नेहरूचे लोकशाहीबदल विचार :
पं. नेहरू मानवतावादी होते. त्याचा बराचसा काळ इंग्लंडमध्ये गेल्यामुळे त्यांच्यावर तेथील व्यक्तिस्वातंत्र्य उदारमतवाद याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता.या प्रभावामुळे त्यांना संसदीय लोकशाहीचे आकर्षण वाटत असे.
भारतामध्ये संसदीय लोकशाही हिच योग्य आहे. असे त्यांचे मत होते. कारण भारतातील बहूसंख्य जनता ही अज्ञानी होती व राजकारणाबाबत उदासीन होती.
अशा वेळेस स्थिरता व परिवर्तन याचा सुंदर मिलाफ असलेली संसदीय लोकशाहीच भारतात उपयुक्त आहे, असे त्यांचे मत होते.
नेहरूच्या मते - लोकशाही म्हणजे एक अशा प्रकारचे सरकार की जे शासनापेक्षा व्यापक आहे व ते व्यक्तीजीवनाचे नैतिक व सर्वाना मान्य होणारे मूल्य आहे.
XX
पं. नेहरू यांनी मांडलेले लोकशाही विचार :
व्यक्तिस्वातंत्र्य :
व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा घालणे म्हणजे व्यक्तिचा विकास थांबविणे होय. लोकशाहीत उच्चार, विचार आणि आचार स्वातंत्र्य असावे. त्याशिवाय लोकशाहीचा विकास होऊ शकणार नाही. असे पं. नेहरूंचे मत होते.
X X
मूलभूत हक्क :
लोकशाहीमध्ये नागरिकांना स्वातंत्र्याबरोबर काही हक्कही आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाला लेखन, धर्म, व संघटन याबाबतीतही हक्क असले पाहिजेत. तसेच कारखान्यातील श्रमिकांना त्यांचे मूलभूत हक्क प्राप्त करून दिले पाहिजेत. सर्व नागरिकांना मोफत प्राथमिक शिक्षण, प्रौढ व्यक्तिंना मतदानाचा अधिकार असावा.
समतेवर भर :
पं. नेहरूंनी लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याबरोबर समतेवरही भर दिला आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेवर आधारित समाजव्यवस्था याचा समन्वय आवश्यक आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टिने खाजगी मालमत्तेवर निर्बंध घालायला पाहिजे. पाश्चात्य लोकशाहीत सत्तेची मक्तेदारी आर्थिक बाबतीत संपन्न लोकांची असते. श्रीमंत वर्ग कायम सत्तेत असतो. तेथे लोकशाही संस्थाचा उपयोग श्रीमंताच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी केला जातो.
X X
धर्मनिरपेक्षता :
नेहरू पुर्णतः लोकशाहीवादी होते. याच कारणामुळे त्यांना बहुमताची हुकूमशाही मान्य नव्हती. लोकशाही म्हणजे परमसहिष्णुता, जे सहमत आहेत त्यांच्याशी व जे असहमत आहेत त्यांच्याशीदेखील. भारतात धर्मनिरपेक्षता असेल तरच अल्पसंख्याकांना त्यांच्या उपासना करता येतील. भारतीय संविधानात यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. सर्वांना समान कायदा लोकशाहीचे वैशिष्टे आहे व त्याची पूर्तता केवळ धर्मनिरपेक्ष राज्यातच होऊ शकते. असे त्यांचे मत होते.
X X
सांसदीय लोकशाही :
नेहरू सांसदीय लोकशाहीच्या बाजूने होते त्यांच्या मते सांसदीय लोकशाही गतीशील व्यवस्था आहे. ही व्यवस्था सातत्य व बदल स्वीकारते. संसदीय शासन पद्धतीमुळे उद्देश प्राप्ती शांततामय मार्गाने होऊ शकते. नेहरूंना जनतेचे सार्वभौमत्व प्रतिनिधीमार्फत वापरले जावे असे वाटत होते. निर्वाचन, बहुमताचे शासन, प्रौढ मतदार, जबाबदार शासनपद्धती, जबाबदार राजकीय पक्ष, नेते त्यांना हवे होते. याद्वारेच जनतेस सार्वभौमत्वाचा वापर करता येईल, असा त्यांना विश्वास होता.
लोकशाहीचे तंत्र :
लोकशाही पद्धतीने काम करणे म्हणजे चर्चा करणे, इतरांना चर्चेद्वारे मत पटवून देणे, चर्चेनंतर अंतिम निर्णय घेणे व अंतिम निर्णय समाजातील सर्व घटकांसाठी राबविणे यावर भर दिला जावा असे त्याचे मत होते.
X X
पंडीत नेहरू यांचा लोकशाही समाजवाद :
समाजवाद नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग होता. शोषणमुक्त समाजवादी भारत हे त्यांचे उद्दिष्ट होते. राष्ट्रीय काँग्रेसनी ज्या समाजवादी विचारांना त्यांच्या कार्यक्रमात मान्यता दिली त्याचे श्रेय नेहरूंना जाते. भारतीय संविधानातील समाजवादी तरतुदी समाविष्ट करण्यात त्याचा वाटा मोठा आहे. अर्थात त्याचा समाजवाद पोथीनिष्ठ नव्हता. त्यांच्या समाजवादी विचारावर मानवतावादी उदारमतवादाची छाप होती. त्यांच्या समाजवादी विचारास मानवी भौतीकवादाची छटा आहे.
नेहरूंच्या मते, "समाजवाद म्हणजे अशी पद्धत की ज्यामध्ये भूमी आणि भूमीची फळे यांचा समाजाच्या हितासाठी उपयोग व्हावा, मिळणारा लाभ हा खाजगी मालमत्तेच्या अपघाताने न ठरता तो लोकांनी केलेल्या सेवेच्या प्रमाणात ठरावा उत्पादन व वितरण साधनांचे राष्ट्रीयीकरणाद्वारे आमुलाग्र बदल घडवून आणणे हा समाजवादाचा अर्थ आहे.
X X
नेहरूंची समाजवादाची तत्त्वे :
2) प्रत्येकाला त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाची समान संधी.
3) शांततामय आणि कायदेशीर मार्गाचा उपयोग.
X X
नेहरूचा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन:
पंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे समर्थक होते. आधुनिकतेची चावी विज्ञानातच आहे हे नेहमी विद्यार्थी दशे मधूनच अनुभवले होते. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी वैज्ञानिक व तंत्रविद्येचा ( Science and Technology) पुरस्कार केला होता. भारतीय विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी अनेक वेळा भाषणे दिली भारताच्या विभिन्न भागात स्थापन झालेली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन केंद्र नेहरूंच्या दूरदर्शीत्वाचे स्पष्ट प्रतीक सांगता येईल.
संरक्षण अवकाश क्षेत्र यातील नेत्र दीपक प्रगती चा पाया नेहरूंनीच घातला राष्ट्रीय केमिकल लॅब्रोटरीस, फिजिकल लॅबोरेटरीज, आधुनिक आयआयटी (इंजीनियरिंग), वैद्यकीय संशोधन या संस्थांनी सुरू केल्या त्यांनी ओळखले होते की भूक गरिबी निरक्षरता अंधश्रद्धा कुपोषण घातक परंपरा यांच्यावर मात करावयाची तर विज्ञान आणि वैज्ञानिक संस्कृती व दृष्टिकोनानेच शक्य आहे अन्य उपायांचा काही उपयोग होणार नाही असे ते म्हणत असत.
त्यांनी मेघनाथ सहा, पीसी महालनोबीस या शास्त्रज्ञांना नियोजन मंडळावर घेतले. भटनागर एस एस, होमी भाभा यांच्या वर सुद्धा मोठी जबाबदारी टाकली. नेहरूंनी स्थापन केलेल्या नॅशनल लॅबोरेटरीजची संख्या एकूण 17 आहे. अनुषक्ती संशोधनाचे प्रमुख म्हणून त्यांनी होमी भाभा यांची नेमणूक केली होती.
X X
ग्रंथसंपदा:
1. आत्मचरित्र (Autobiography) -1936
2. जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन (Glimpses of World History) -1939
3. भारताचा शोध (The Discovery of India)- 1946
X X
पुरस्कार:
1. 1948 मध्ये मैसूर विद्यापीठाने डि.लीट. पदवी देऊन सन्मानित केले.
2. 1955 मध्ये भारत सरकारने भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पंडित नेहरूंना देऊन सन्मानित करण्यात आले.
3. मद्रास विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, कायो (Keio) विद्यापीठ, जपान यांनी "डॉक्टरेट" देऊन सन्मानित केले.
X X
निधन:
भारताचे पहिले पंतप्रधान,आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरूंचे निधन 27 मे 1964 रोजी दिल्ली या ठिकाणी झाले.पंडित नेहरूंचा 14 नोव्हेंबर हा देशात जन्मदिन 'बालक दिन' म्हणून साजरा केला जातो.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html
👆
Bharat Ratna: India's highest honor award
भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार
X X
View, Comments and share
3 Comments
Nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice sir
ReplyDelete