Subscribe Us

header ads

Homi Jehangir Bhabha: Indian Nuclear Physicist

Homi Jehangir Bhabha: Indian Nuclear Physicist

भाभा होमी जहांगीर: भौतिकशास्त्रज्ञ,भारतीय अणू संशोधनाचे जनक

जन्मदिन - 30 ऑक्टोबर

स्मृतिदिन- 24 जानेवरी

बालपण आणि शिक्षण:

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व भारतीय अणू संशोधनाचे जनक  होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईत झाला होता. 

त्यांचे वडील जहांगीर होरमसजी भाभा बॅरिस्टर होते व टाटा उद्योग समूहाचे ते कायदा सल्लागार म्हणूनही काम करत होते. 

त्यांची आई मेहेरबाई ही सर दिनशा पेटिट यांची नात होती. त्यांची आत्या ही सर दोराब टाटा यांची पत्नी होती. त्यामूळे टाटा आणि पेटिट या दोन पारशी कुटुंबांशी त्यांचे जवळचे नाते संबंध होते. 

टाटा आणि पेटिट या दोन्ही कुटुंबांचा भारताच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा सहभाग होता. 

तोच वारसा भाभा यांनी देशांच्या विकासासाठी समर्थपणे आयुष्यभर चालवला. 

X X

विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणुन महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

होमी जहांगीर भाभा यांचा एका सधन, सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आलेले अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. ते शालेय शिक्षणापासूनच अतीशय हुशार होती.

मुंबई येथे शालेय व प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण सुध्दा मुंबईतच एलफिनस्टन्स कॉलेज व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई येथे पूर्ण केल्यानंतर ते पुढील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी केम्ब्रिजला गेले.

होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून 1930 साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले.

 होमी भाभा यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात केम्ब्रिजला असतानाच झाली होती. तेथे त्यांनी यंत्र अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण करुन भरतात वापस येऊन आपल्या देशात टाटा समूहातील उद्योगधंद्यांमध्ये हातभार लावावा असा विचार त्यांच्या वडिलांचा होता. 

होमी भाभा ज्या काळात ते केम्ब्रिजला होते, तो काळ भौतिकशास्त्राचा सुवर्णकाळ होता. 

जगात आधुनिक भौतिकशास्त्राची पायाभरणी त्या वेळी केली जात होती. 

इंग्लंड, तसेच युरोपात दिग्गज वैज्ञानिक विश्वरचनेसंबंधी नवनवे सिद्धान्त मांडत होते. 

अणूच्या अंतरंगात डोकावून पाहण्यास सुरुवात झाली होती. या सर्व आधुनिकतेच्या भौतिकशास्त्र विषयात होत असलेल्या संशोधनामध्ये होमी भाभा प्रभावित होऊन आपला अभ्यास व संशोधन हे भौतिकशास्त्राकडेच असल्याचे आपल्या वडिलांना सांगितले.

कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून 1933 वर्षी त्यांनी संशोधनातील डॉक्टरेट पदवी मिळवली.

X X

होमी भाभा यांचे संशोधन :

उच्च शिक्षणातील यंत्र अभियांत्रिकीमधील ट्रायपॉस म्हणजेच "पदवी" पहिल्या वर्गात मिळवून वडिलांची इच्छा पूर्ण केल्यावर होमी भाभा यांनी भौतिकशास्त्राच्या उच्च शिक्षण घेण्यास प्रारंभ केला.

वूल्फगंग पाऊली आणि एनरिको फर्मी या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या सोबत संशोधन करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचा संपूर्ण फायदा घेऊन त्यांनी काही आपले शोधनिबंध प्रकाशित केले. 

 होमी भाभा यांना काही नावाजलेल्या शिष्यवृत्त्या मिळाल्या मुळे त्यांचा फायदा झाला. 

होमी भाभा यांचा "विश्वकिरणांचा वर्षाव कसा होतो" यासंबंधीचा जर्मन शास्त्रज्ञ हाइटलर यांच्या सहकार्याने सादर केलेला सिद्धान्त झाला आणि तो खुप सर्वत्र गाजला पण होता. 

आजही तो सिद्धान्त 'भाभा हाइटलर कास्केड थिअरी' या नावानेच जगात ओळखला जातो. या अशा मौलिक संशोधनाने होमी भाभा यांना त्यावेळेस जगमान्यता मिळाली होती. 

होमी भाभा हे भौतिकशास्त्रातील संशोधना वरची नवनवीन शिखरे पार करत असताना होमी भाभा काही कलावधीसाठी सुटी घेऊन घरी आले होते. पण त्यावेळी युरोपात अचानकपणे उसळलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात निर्माण झालेल्या अडचणीमुळे त्यांची परत जाण्याची वाट बंद झाली होती. त्यामुळे होमी भाभाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही घटना ठरली होती.

 होमी भाभा यांनी बंगळुरू येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' येथे आपले संशोधन कार्य सुरू केले. आपण भारतातही या ठिकाणी उच्च दर्जाचे संशोधन अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो याची जाणीव झाली. या ठिकाणी संशोधन कार्य करत असताना त्यांना काही प्रतिभाशाली तरुण वैज्ञानिकांची साथही संशोधन कार्यात त्यांना लाभली. या ठिकाणी त्यांना वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांचा सहवास लाभला होता. 

होमी भाभा यांना वयाच्या बत्तिसाव्या वर्षी एफ.आर.एस., फेलो ऑफ रॉयल सोसायटीचा बहुमानही मिळाला. 

होमी भाभा यांनी आपल्या भारत देशात म्हणजे आपल्या मातृभूमीतच संशोधन केद्रांची मुहूर्तमेढ रोवण्याचे स्वप्न ते पाहून तसे प्रयत्नही ते स्वतः करू लागले.

X X

टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना: 

होमी भाभा यांच्या राष्ट्रप्रेमाची आणि द्रष्टेपणाची प्रचिती त्यांनी 1944 वर्षी टाटा न्यासाला लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. 

"अणू हा अविभाज्य नसून त्याचेही विघटन होऊ शकते आणि तसे ते झाल्यावर अणुकेंद्रकात बंदिस्त रुपात असलेली मोठ्या प्रमाणातली ऊर्जा मुक्त होते."

 हान आणि मिटनर या जर्मन शास्त्रज्ञांनी दाखवून दिल्याचे त्या वेळी केवळ सहा-सात वर्षेच झाली होती. 

तेच सूत्र पुढे चालवीत या अणुविभाजनाची साखळी प्रक्रिया घडवून आणली जाऊ शकते, असे भाकीत फर्मी यांनी त्यानंतरच्या दोन वर्षांत केले होते. ते केवळ सैद्धान्तिक रूपात न ठेवता, त्या शक्यतेवर आधारित पहिली प्रायोगिक अणुभट्टी फर्मी यांनीच इतर ख्यातनाम वैज्ञानिकांच्या मदतीने शिकागो विद्यापीठातल्या स्क्वाश कोर्टाच्या जागेत बांधल्यालाही दोनच वर्षे झाली होती. त्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. 

अशा बिकट परिस्थितीत अणुऊर्जेचे महत्त्व समजून घेऊन त्यासंबंधीच्या सर्वांगीण प्रकल्पाचा आराखडा बनवण्याचा विचार भाभांनी त्या पत्रातून मांडला होता.

X X

 त्यात भाभांनी म्हटले होते,

 "भौतिकशास्त्रामधील आघाडीवरच्या क्षेत्रात उच्चदर्जाचे संशोधन करणारी संस्था मुंबईत स्थापन करावी अशी कल्पना माझ्या मनात बरेच दिवस घोळत आहे. या योजनेसंबंधीचा आराखडा विश्वस्तांपुढे मांडण्यासाठी सोबत पाठवीत आहे. ही योजना मी अगदी पूर्ण विचारान्ती बनवलेली आहे. येत्या दशकात अणुशक्ती हा एक फार महत्त्वाचा घटक ठरणार आहे. या शक्तीचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी होणे जरुरीचे आहे. अशा वेळी या क्षेत्रामधील तज्ज्ञ मंडळी आपल्याकडेच तयार होणे निकडीचे आहे."

X X

यावेळेस भाभांचे वय पस्तीस वर्षांचे होते. ही केवळ सळसळत्या तारुण्यातली कल्पनेची भरारी नव्हती. तो देशाच्या विकासाच्या भविष्यातल्या जडणघडणीचा पाया होता. 

अणुउर्जानिर्मितीसाठी ज्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. अशा युरेनियमची भारतात उपलब्धतेची कमतरता आहे याचीही जाणीव त्यांना होती. 

उलट देशात थोरियमचा प्रचंड साठा उपलब्ध आहे हेही त्यांना माहीत होते. थोरियम हे विघटनशील नसल्याने त्याचा अणुऊर्जानिर्मितीसाठी इंधन म्हणून वापर करता येत नाही. हे समजून त्यांनी या थोरियमचे इंधनात रूपांतर करून त्याच्या मदतीने फार मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करण्याचा तीन टप्प्यांचा प्रकल्प त्याच वेळी तयार केला होता. इतकी दूरदृष्टी क्वचितच एखाद्या व्यक्तीमध्ये आढळून येते.

 त्यांच्या या पत्राला प्रतिसाद मिळाला तो त्यांच्याच प्रवृत्तीच्या दुसऱ्या एका तरुणाकडून जेआरडी टाटांकडून. 

त्यांनी भाभांच्या प्रस्तावाला टाटा न्यासाच्या विश्वस्तांकडून संमती मिळवली आणि त्यानंतर वर्षभरातच 1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना झाली. 

त्यानंतर दोन वर्षांमध्येच भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपल्या मनातील प्रकल्पाचा कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याची सुवर्ण संधी भाभांना मिळाली. 

भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूं यांनी भाभांच्या प्रकल्प संबंधीचे महत्त्व ओळखुन अणुशक्ती आयोगाची स्थापना केली आणि त्याची जबाबदारी भाभांकडे दिली.

X X

वैज्ञानिक प्रगती:

 भाभांनी 1956 या वर्षी 'अप्सरा' ही संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान पद्धतीने अणुभट्टी सुरु केली. तिच्या यशाने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर अणुवीजनिर्मितीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळाली. 

तारापूरचे पहिले केंद्र अमेरिकेकडून तयार रूपात मिळालेले असले तरी त्यानंतरच्या अणुवीज केंद्रांची निर्मिती करताना तेथील अणुभट्ट्या संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित तयार करण्यात आल्या होत्या. 

आज देशात सुरु असलेलले नव्वद टक्के अणुवीज केंद्रे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तसेच त्यांचे इतर घटक सुध्दा मोठ्या प्रमाणात स्वदेशी पद्धतीने बनवलेले आहेत.

अणुभट्ट्यांची बांधणी, आण्विक इंधनाची निर्मिती, आण्विक कचऱ्याची विल्हेवाट, जळित इंधनापासून तयार झालेले प्लुटोनियम शुद्ध स्वरूपात अलग करणारे कारखाने, समस्थानिकांचे उत्पादन, त्यांचा वापर शेती, उद्योगधंदे आणि आरोग्यसेवा यांच्यासाठी करणारी केंद्रे, जड पाण्याचे उत्पादन करणारे कारखाने, होमी भाभा यांनी एका पाठोपाठ एक स्थापन केले. ते चालवण्यासाठी त्यांनी परदेशी तज्ज्ञांना न बोलविता त्यासाठीचे मनुष्यबळही स्वदेशी निर्माण केले होते. 

तसेच जगातून त्यांनी प्रतिभाशाली तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या हाती या प्रकल्पांची जबाबदारी सोपवली.

 त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी या तरुणांना देशविदेशांच्या प्रशिक्षित संस्थांमध्ये पाठवले. 

विज्ञानशाखेतील उच्च शिक्षण व प्रशिक्षण पुर्ण करून आलेल्या तरुणांना त्यांनी आधुनिक देशाच्या कार्याला वाहून घेण्याची प्रेरणा दिली. 

बहुसंख्य शिष्यांनी गुरूच्या अपेक्षा पूर्ण केल्या . काहींनी आपली सारी कारकीर्द त्यांनी देशाच्या सेवेत घातली. 

भौतिकशास्त्रातला त्यांचा मूळचा आवडीचा प्रांत होता विश्वकिरणांचा. अवकाश संशोधनही त्यांच्या मनाला साद घालत होते. त्याचीही त्यांनी पायाभरणी केली. 

भारतीय अवकाश संशोधन केंद्राची स्थापनाही केली. त्यात त्यांना डॉ. विक्रम साराभाई यांचीही मोलाची साथ मिळाली. 

तेव्हा अंतराळ संशोधन कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवून भाभांनी परत अणू संशोधनाकडे लक्ष वळविले. या दोन्ही क्षेत्रांतील संशोधनाला इलेक्ट्रॉनिक यंत्रणांची साथ मिळणे अत्यावश्यक आहे हे समजून त्यांनी त्याही क्षेत्रातील संशोधनासाठी इलेक्ट्रॉनिक आयोगाची स्थापना केली. त्याचाही विस्तार आज अनेक शाखांमध्ये झाला आहे. 

X X

रेण्वीय जीवशास्त्र, नाभिकीय वैद्यक, अशा आधुनिक विज्ञानाच्या अनेक शाखांमधील मूलभूत संशोधनाला त्यांनीच चालना दिली. त्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांची स्थापनाही केली.

या संस्थास्थापनांसंबंधीच्या त्यांच्या कल्पनाही चाकोरीबाहेरच्या होत्या. त्यांनी आधुनिक विज्ञानातील कोणतीही शाखा वर्ज्य न मानता, त्या विषयात अत्युच्च दर्जाचे संशोधन करण्याची क्षमता असणाऱ्या वैज्ञानिकांचा प्रथम शोध घेतला आणि त्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थांची निर्मिती केली. 

प्रथम इमारत बांधा आणि मग त्यांच्यामध्ये वास करू शकणाऱ्या वैज्ञानिकांना आवाहन करा, ही नेहमीची प्रथा त्यांनी मोडीत काढली.

अणुशक्ती संशोधनासंबंधीच्या त्यांच्या सर्वांगीण योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. 1955 साली व्हिएन्ना येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांनी ती सार्थही ठरवली.

वैज्ञानिक तसेच अनेक संशोधनसंस्थांची स्थापना करणारे व्यक्ती म्हणून आज जगाला त्यांची ओळख असली तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. 

अणुशक्तीच्या अर्थशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता. अणुशक्तीद्वारे निर्माण केलेली वीज कीती किफायतशीर आहे हे त्यांनी दाखवून दिले होते. त्यांना अभिजात पाश्चात्त्य संगीताची विलक्षण आवड होती. ते उत्तम चित्रकार होते.

 त्यांनी स्वतः काढलेली आधुनिक शैलीतली अनेक चित्रे टाटा मूलभूत संशोधन संस्थेत इतर ख्यातनाम भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींसमवेत विराजमान झालेली आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या संशोधन संस्थांमध्ये त्यांनी सुंदर उद्यानेही उभी केली आहेत. उद्यानांतील झाडांची निवडही त्यांनीच केली होती. या संस्थांच्या इमारतींसाठीची जागा निवडतानाही त्यांनी त्या परिसराच्या निसर्गसौंदर्यालाही महत्त्व दिलेले आढळून येते. 


Four physicists take a walk. From left to right: Albert Einstein, Hideki Yukawa, John Wheeler and Homi Bhabha, 1954.

X X

होमी भाभा यांनी स्थापना केलेल्या संस्था :

1. 1954 मध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र म्हणजेच आताचे भाभा अणू संशोधन केंद्र 
2. इंडियन रेअर अर्थ्स
3. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड
4. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड 
5. 1948 मध्ये कॉस्मिक रे रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना
6. 1956 मध्ये भारतातीलच नव्हे संपूर्ण आशिया खंडातील एक मात्र अनुभट्टी ट्रॉम्बे येथे स्थापन केली. तिला अप्सरा हे नाव देण्यात आले.
7. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे संस्था होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली.

X X

सन्मान व पुरस्कार:

1. 1955 मध्ये व्हिएन्ना येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड.
2. 1941 मध्ये एफ.आर.एस. फेलो ऑफ रॉयल सोसायटीचा बहुमान.
3. 1942 सालीच त्यांना ऍडम्स पुरस्कार मिळाला होता. 4 4. 1951 मध्ये ते भारतीय वैज्ञानिक परिषदेचे अध्यक्ष बनले. 
4. 1955 साली आण्विक शक्तीचे शांततामय उपयोग ह्या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जिनेव्हा येथे परिषद भरली होती. त्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थानही त्यांनाच मिळाले होते. 
5. 1954 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
6. 1959 मध्ये केंब्रिज विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित केले.
7. 1948 मध्ये होमी भाभा हॉपकिन्स यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
8. होमी भाभा यांना नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन करण्यात आले होते.
9. 1955-1966 पर्यंत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष पद भूषविले
.

X X

निधन:

बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या भौतिकशास्त्रज्ञ,भारतीय अणू संशोधनाचे जनक होमी भाभा यांचे स्वित्झर्लंडमधील माँ ब्लां या पर्वतशिखरावर आदळून झालेल्या विमान अपघातात 24 जानेवरी 1966 रोजी मृत्यु झाला.




View, Comments and share...........

Post a Comment

3 Comments