Fadke Narayan Sitaram: Great Novels Writer in Maharashtra
ना. सी. फडके ( फडके नारायण सीताराम): कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक
जन्मदिन : 4 ऑगस्ट
स्मृतिदिन - 22 ऑक्टोबर
बालपण आणि शिक्षण:
कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक नारायण सीताराम फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 रोजी कर्जत, जि. अहमदनगर, महाराष्ट्र येथे झाला. वडिलांची सरकारी नोकरी असल्याने निफाड, बार्शी इत्यादी ठिकाणी प्राथमिक शिक्षण.1904 मध्ये वडिलांची पुण्यात बदली झाल्यावर नूतन मराठी विद्यालयामधून शालान्त परीक्षा (मॅट्रिक) व फर्गसन महाविद्यालयात बी.ए. पदवी व एम. ए. पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. ते तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे नामवंत प्राध्यापक म्हणून काम करत होते., मराठीप्रमाणे इंग्रजीतही लेखन त्यांनी केले. अनेक कला व क्रीडा प्रकारांत लेखन केले.
X X
वैयक्तिक जीवन:
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी न्यू पुना कॉलेजात प्राध्यापक म्हणून 1016 मध्ये नौकरी केली. त्यांचा विवाह 1920 मध्ये झाला. महात्मा गांधींच्या आवाहनानुसार स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी प्राध्यापकीचा राजीनामा दिला. त्यानंतर फडक्यांनी सेन्ट स्टीफन्स महाविद्यालय दिल्ली त्या नंतर हैद्राबाद व नागपूर या ठिकाणच्या महाविद्यालयांत प्राध्यापकाची नौकरी केली होती. काही काळ सक्तीची बेकारी स्वीकारली त्यामुळे त्याच्या जीवनात अस्थिरता निर्माण झाली होती. पण त्यानंतरच कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात 1926 मध्ये नौकरीमध्ये रूजू झाल्यानंतर त्यानंतर स्थिरता आली. 1951 मध्ये सेवा निवृत्ती घेतली. 1951 पासून पुण्यातच कायमचे स्थायिक झाले.
फडके यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा विचार करता, ते स्वतःतच रंगलेले व स्थिर झालेले असून त्यांच्यात फारसा बदल झालेला नाही. त्यांचा जीवनाकडे, कलेकडे व साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्थिर नव्हता तर तो अधिक दृढ झाला होता. त्यांच्यामध्ये तत्कालीन कादंबरीकार वि.स. खांडेकर प्रदीर्घकाळ चाललेल्या 'कलेसाठी कला की जीवनासाठी कला' या वादात त्यांनी कलेची एक बाजू सतत लावून धरली होती. त्यामुळे तत्कालीन भारतातील साहित्यावरचे साम्यवादी विचारसरणीचे सावट थोडेसे दूर होऊन मराठी साहित्य व कलाप्रांतातील वातावरण मुक्त व मोकळे राहण्यास मदत झाली. साहित्य कलेच्या स्वायत्तत या कल्पनेच्या संदर्भात साहित्य क्षेत्रात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नको हा आग्रह धरला. कोल्हापूर येथे 1962 मध्ये भरलेल्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असल्याने त्यावर बहिष्कारही घातला होता. आज साहित्यक्षेत्रावर राजकारण्यांचे वर्चस्व दिसते, त्या बाबींचा विचार करता फडके यांचा त्या काळात त्यांचा बाणेदारपणा उठून दिसतो.
X X
युगप्रवर्तक कादंबरीकार:
फडके यांनी सर्वच वाङ्मय प्रकारांत विपुल असे लेखन केले आहे. कादंबरी लेखनात 'फडके-खांडेकर यांचे युग' असा एक अर्थपूर्ण प्रयोग केला जात होता. हरिभाऊं यांच्या पाल्हाळीक, काहीशा बोजड भाषेतल्या व शैलीतल्या मराठी साहित्यातील कादंबरीला त्यांनी बांधेसूद, आधुनिक व तंत्रशुद्ध रूप प्राप्त करून दिले. मराठी बोलीभाषेला जवळची वाटणारी सोपी भाषा दिली. त्यांच्या कादंबऱ्यांची संख्या जवळपास 74 एवढी आहे. या कादंबऱ्यातून त्यांनी भारतातील सामाजिक, राजकीय चळवळी व घटना यांना महत्वाचे लेखनात स्थान दिले. गांधीप्रणित स्वातंत्र्याची चळवळ ते काश्मीर, हैद्राबाद, सुभाषबाबू व सावरकर विचारप्रणाली या सर्वांवर त्यांनी 'प्रवासी', 'निरंजन' ह्या कादंबऱ्याचे लिखाण व काँग्रेसच्या विचारप्रणालीवर 'शोनान', 'तुफान', 'अस्मान' या आझाद हिंद चळवळीवरील कादंबऱ्याचे लिखाण केले. साहित्याप्रमाणेच त्यांनी संगीत, क्रिकेट, चित्रकला, शिल्पकला इ. ललित कलांचाही त्यांनी व्यासंग केला होता. मराठी वाचकांना वेळोवेळी पाश्चात्त्य साहित्यकृतींचा व अन्य कलांचा परिचय करून देऊन त्यांची अभिरुची समृद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी साहित्य निर्मिती केली.
1925 मध्ये त्यांची 'कुलाब्याची दांडी' ही पहिली कादंबरी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली होती. 1978 च्या दिवाळी अंकात त्यांची अखेरची ७४ वी कादंबरी 'हेमू भूपाली' प्रकाशित केली होती. त्यांचा 1925 ते 19944 हा पहिला कालखंड कादंबरीच्या विकासाचा होता. त्यात त्यांनी विषयाचे, साहित्य रचनेचे अनेक प्रयोग केले. तत्कालीन कालखंडातील राजकीय व सामाजिक घडामोडी, यांबरोबरच त्यांनी मानसशास्त्रीय समस्यांचाही उपयोग साहित्य निर्मिती करण्यासाठी केला. त्यातून त्यांचा 'उद्धार', 'इंद्रधनुष्य', 'खेळणी' या कादंबऱ्यांचे लेखन झाले. त्यांनी कादंबरी लेखान तत्कालीन कादंबरीकार खांडेकर व माडखोलकर यांनाही लोकप्रियतेत मागे टाकले. आपल्या तंत्राचा व रचना कौशल्याचा तत्कालीन कादंबरीवर प्रभाव टाकला होता. कादंबरी म्हणजे फडक्यांचीच कादंबरीच असे एक समीकरण त्यांनी त्यावेळेस निर्माण केले होते.
महाराष्ट्रातील गेल्या साठ वर्षांतील महत्त्वाच्या घटना, अनेक चळवळी व विविध विचारप्रणालीचा त्यांनी आपल्या कादंबरी लेखन करण्यासाठी उपयोग केला होता. त्यांनी स्वतःला काळाच्या मागे पडू दिले नाही काळासोबत जगण्याची व साहित्य निर्मिती करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. मराठी साहित्यात एकीकडून हरीभाऊ आपटे व दुसरीकडून बा. सी. मर्ढेकर यांच्यामधील महत्वाच्या टप्प्यावर फडके हे उभे असून त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा व नवी प्रेरणा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.
X X
कथालेखन:
फडक्यांच्या कादंबरीच्या दुसऱ्या कालखंडात (1944 ते 1978) त्यांच्या कादंबरीचा केवळ विस्तार झाला होता. या कालखंडातही साहित्य निर्मिती विषयाचे नावीन्य जपले. फडक्यांच्या कादंबरी-लेखनात विषयाचे नावीन्य, तंत्राची विविधता, प्रयोग व भाषेतील उत्तरोत्तर वाढत गेलेली सफाई इत्यादी गुण असूनही तिचा या कालखंडात फडके यांनी कथालेखनही विपुल प्रमाणात केले.
'मेणाचा ठसा' ही त्यांची पहिली कथा (1912). 1925 ते 1940 हा त्यांचा बहराचा काळ. 'प्रतिभासाधन' मध्ये त्यांनी लघुकथेचे मंत्र व तंत्र उलगडून दाखवले आहेत. त्यानुसार त्यांनी कथालेखन केले होते.
सुरूवातीला 'रत्नाकर', 'यशवंत' व त्या नंतर 'किर्लोस्कर' नियतकालिकांतूनही त्यांनी मराठी कथेचे पाल्हाळीक, संपूर्ण सचित्र गोष्टीचे स्वरूप बदलून त्या साहित्यकृतीला इंग्रजीतील पो, मोपांसा, ओ. हेन्री कथालेखकांच्या माध्यमातुन एक आधुनिक व रेखीव स्वरूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. कादंबरीप्रमाणेच ह्या साहित्यातील खेळकर, सुटसुटीत भाषा व शैली त्यांनी निर्माण केली होती.
X X
गंगाधर गाडगीळ यांच्या मते, "आधुनिक मराठी लघुकथेचे श्रेय खांडेकरांपेक्षा फडक्यांनाच दिले पाहिजे."
फडके यांची कथा ही "Sleek American Magazine story" होती व जीवनातील खोल दुःखे व अनुभव व्यक्त करण्याचे तिने टाळले व दोन घटका वाचकांचे हलक्या-फुलक्या मनोरंजन करण्याचे माफक ध्येय तिने डोळ्यासमोर ठेवले.
त्यांच्या सुरुवातीच्या 'माणूस जगतो कशासाठी ? सारख्या काही कथा याला अपवाद आहेत. मराठीतील संपूर्ण सचित्र गोष्टीपासून आधुनिक लघुकथेपर्यंतच्या साहित्याच्या विकासाच्या वाटेत फडके यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे.
X X
लघुनिबंध:
लघुनिबंधाचा 'गुजगोष्टी' हा वेगळा वाङ्मयप्रकार त्यांनी इंग्रजीतील 'रॉबर्ट लिंड', ई.व्ही. ल्यूकस, चेस्टरटनच्या लघुनिबंधांच्या धर्तीवर मराठीत आणला व त्याची पुढे खांडेकर, कणेकर, ते ना.मा. संतांपर्यंत एक परंपरा तयार झाली होती. पुढे त्यात प्रदर्शन वाढल्याने तो प्रकार नस्ट झाला.
लघुनिबंध या वाङ्मय प्रकाराचे विलायती रोपटे त्यांनी जाणीवपूर्वक मराठी साहित्यात रुजवले व वाढवले.
X X
समिक्षक:
फडक्यांचे समीक्षा-विचार 'प्रतिभासाधन', 'प्रतिभाविलास', 'लघुकथालेखन मंत्र व तंत्र', इत्यादी समीक्षाग्रंथांतून व्यक्त झाला होता. त्याचा प्रभाव समकालिन साहित्यिकांच्या व पुढच्या साहित्यिकांच्या दोन पिढ्यांवर पडला होता. पण त्यांची टीका 'प्रतिभासाधना'च्या वेळी बनलेल्या वाङ्मयीन व्यक्तिच्या व आवडीनिवडीच्या सभोवती फिरत राहत होती. त्यांनी साहित्यातील अन्य वाङ्मयप्रकार हाताळले असले तरी मात्र कादंबरीकार म्हणून त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
प्रा. कुसुमावती देशपांडे यांच्या मते, " फडक्यांचे प्रेमविषयक चिंतन उथळ व ठरावीक ठशाचे असले तरी त्यात खांडेकरांच्या चित्रणातील अवास्तवता व अतिरंजितपणा नाही किंवा माडखोलकरांची उग्र शारीरिकता नाही. त्यांच्या शैलीची सहजता व रुचिर सौंदर्यदृष्टी यांमुळे हे चित्रण विशेष आकर्षक होते."
उद्बोधन आणि मनोरंजन ही दोन महत्त्वाची सूत्रे फडके यांच्या पूर्व साहित्यामागे होती. त्यात पहिल्यांदाच बदल करून त्याला केवळ मनोरंजनाच्या वाटेने नेण्याचे व तिच्यावरील सर्व प्रकारची बंधने झुगारून देण्याचे महत्त्वाचे कार्य फडके यांनी केले. मराठी कादंबरीच्या निर्मितीचा व विकासाचा मार्ग सुकर केला. पण त्यामुळे तंत्रवादालाच महत्त्व मिळाले व कलेसाठी कला नव्हे तर शेवटी 'कलेसाठी जीवन' या भूमिकेत त्याची परिणती झाली.
फडके यांची तंत्रशुद्धता, आधुनिकता, अद्ययावतपणा, बांधेसूदपणा, विलोभनीय भाषाशैली या सर्वामुळे फडकेच्या नावाने मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण कालखंड भविष्यात नेहमीच ओळखला जाईल व हे त्यांचे मराठी साहित्याला दिलेले योगदान म्हणावे लागेल.
X X
ग्रंथ संपदा:
1. फडके यांच्या कादंबऱ्यांची संख्या जवळपास 74 एवढी आहे.
2. 1925 मध्ये त्यांची 'कुलाब्याची दांडी' ही पहिली कादंबरी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली होती.
3. इंग्रजीतील 'रॉबर्ट लिंड', ई.व्ही. ल्यूकस, चेस्टरटनच्या लघुनिबंध.
4. गांधीप्रणित स्वातंत्र्याची चळवळ ते काश्मीर, हैद्राबाद, सुभाषबाबू व सावरकर विचारप्रणाली या सर्वांवर त्यांनी 'प्रवासी', 'निरंजन' ह्या कादंबऱ्याचे लिखाण केले.
5. काँग्रेसच्या विचारप्रणालीवर 'शोनान', 'तुफान', 'अस्मान' या आझाद हिंद चळवळीवरील कादंबऱ्याचे लिखाण केले.
6. मानसशास्त्रीय समस्यांचाही उपयोग साहित्य निर्मितीतून 'उद्धार', 'इंद्रधनुष्य', 'खेळणी' या कादंबऱ्यांचे लेखन झाले.
7. 1912 मध्ये 'मेणाचा ठसा' ही त्यांची पहिली कथा लिहिली.
8. 'माणूस जगतो कशासाठी ? लघुकथा लिहले.
9. संपूर्ण सचित्र गोष्टीचे स्वरूप बदलून त्या साहित्यकृतीला इंग्रजीतील पो, मोपांसा, ओ. हेन्री कथालेखकांच्या माध्यमातुन एक आधुनिक व रेखीव स्वरूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
10. प्रतिभासाधन', 'प्रतिभाविलास', 'लघुकथालेखन मंत्र व तंत्र' समीक्षाग्रंथांतून व्यक्त झाला होता.
11. 1978 च्या दिवाळी अंकात त्यांची अखेरची ७४ वी कादंबरी 'हेमू भूपाली' प्रकाशित केली होती.
X X
मासिक/साप्ताहिकाचे संपादन:
1. अंजली वार्षिकाचे व प्रकाशन,
2. झंकार साप्ताहिकाचे संपादन
3.'रत्नाकर', 'यशवंत' व 'किर्लोस्कर' नियतकालिकांतूनही लिखाण.
X X
सन्मान व पुरस्कार:
1.1940 मध्ये रत्नागिरी येथील साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष.
2. 1962 मध्ये भारत सरकारने 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
X X
निधन:
पद्मभूषण. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक नारायण सीताराम फडके यांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1978 रोजी पुण्यात झाला.
X X
View, Comments and share.....
0 Comments