Subscribe Us

header ads

Mother Teresa: Indian-Albanian Catholic Nun

मदर टेरेसा (अगनेस गोंझा बोयाजिजू ) - महान समाज सेविका

 26 ऑगस्ट: जन्मदिन 

5 सप्टेंबर:  स्मृतिदिन

“जर जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही”


 मदर टेरेसा मुळात भारतिय वंशाच्या नव्हत्या परंतु त्या ज्यावेळी भारतात आल्या तेव्हां त्यांना येथील लोकांकडुन इतके प्रेम आणि स्नेह मिळाला की त्यांनी आपले उरलेले आयुष्य भारतात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, ईतकेच नव्हें तर भारतिय समाजात त्यांनी महत्वपुर्ण योगदान देखील दिलं.

मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी वडील निकोला बोयाजू आणि आई द्रना बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू 26 ऑगस्ट 1910 साली या मुलीचा जन्म झाला होता. या मुलीला पुढे मदर टेरेसा म्हणुन सर्व जग ओळखु लागले.

गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. 

त्या ज्यावेळी 8 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. 

आई एक धार्मिक आणि आदर्श गृहीणी होती, मदर टेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा प्रभाव पडला. 

त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर टेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय व गरीब परिस्थीतीत गेले.

मदर टेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्च मधे जाऊन धार्मिक गीत गायन करीत असे. ती ज्यावेळी केवळ 12 वर्षांची होती.

 तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेली असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा तिने मनोमन निश्चय घेतला होता.

1928 साली ज्यावेळी मदर टेरेसा फक्त 18 वर्षांची होती तेव्हां त्यांनी नन चा समुदाय 'सिस्टर्स ऑफ़ लोरेटो' त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. 

पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण  "लोरेटो" च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे कार्य करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले.

नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी टेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत करत्या झाल्या.

X X

मदर टेरेसाचे भारतात आगमन:

मदर टेरेसा इन्स्टीटयुट मधील इतर नन समवेत 1929 मध्ये भारतातील दार्जिलींग येथे आल्या. या ठिकाणी नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली.

 त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षीका म्हणुन पाठविण्यात आले. 

कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. 

मदर टेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. 

त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, 

त्यावेळी त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. 

ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या. तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती. 

हे पाहुन मदर टेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजवंतांची सेवा करण्याचा निश्चय केला.

X X

मिशनरी ऑफ चॅरीटीची स्थापना :

गरीब आणि गरजवंतांची मदत करण्याच्या हेतुने मदर टेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले व पुढे 1948 ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत आपल आयुष्य झोकुन दील.

त्याच्या अथक प्रयत्नांनी 7 ऑक्टोबर 1950 ला मदर टेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी "मिशनरी ऑफ चॅरिटी" ही संस्था स्थापन करण्याची परवानगी मिळाली.

 या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, गरजवंत, रूग्णं, आणि लाचारांची सहाय्यता करणे आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करणे हा होता.

 मदर टेरेसा यांनी "निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले.यात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात. अनाथ व बेघर मुलांची मदत केली जात असे.


निधन :

मदर टेरेसा त्यांना आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

1983 वर्षी त्या रोम ला पॉप जॉन पॉल व्दितीय यांच्या भेटीकरता गेल्या तेंव्हा पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला.

त्यानंतर पुन्हा 1989 साली हृदयविकाराचा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे सेवाकार्य सुरूच ठेवले.

 त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली,1991 ला त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला.

1997 ला मदर टेरेसा यांनी "मिशनरीज ऑफ चॅरिटी" च्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली व 5 सप्टेंबर 1997 ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला.

X X

सन्मान/पुरस्कार :

 गरीब असाहाय्य लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

1. मानवतेच्या सेवेला पाहुन भारत सरकारने त्यांना 1962 साली "पद्मश्री" पुरस्काराने गौरविलं.

2. 1980 मध्ये देशातील सर्वोच्च असा "भारतरत्न " हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.



 3. मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरीता 1979 ला "नोबेल शांतता पुरस्कार" देण्यात आला. या दयासागर हृदयाच्या मातेने नोबेल पुरस्काराची 192,000 डाॅलर धनराशी देखील गरीबांच्या मदतीकरता उपयोगात आणली.

4. 1985 साली त्यांना "मेडल ऑफ फ्रीडम अवार्ड" ने देखील गौरवान्वित करण्यात आले.

5. 1971 - पोप 23 वे जॉन शांतता पारितोषिक व नेहरू अवॉर्ड, मॅगसेसे पुरस्कार.

सर्वांनीच मदर टेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.






XX


https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html

👆

Bharat Ratna: India's highest honor award

भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार




View, comments and share 



Post a Comment

2 Comments