Mauryan Emperor Bindusara
मौर्य सम्राट बिंदुसार
(इ. स. पू. 298 ते इ. स. पूर्व 272)
चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर बिंदुसार हा गादीवर आला.
त्याने इ. स. पू. 298 ते इ. स. पू. 272 म्हणजे 25 वर्षे राज्य केले. त्याच्या कारकीर्दीविषयी फारशी माहितीही उपलब्ध नाही.
पुराणग्रंथात त्याचा उल्लेख बिंदुसार, भद्रसार व नंदसार असा आहे.
जैन व बौद्ध साहित्यात बिंदुसारचा उल्लेख 'बिंदुसार' असा आहे तर ग्रीक लेखकांनी 'अमित्रचारेस' या शब्दात त्याचा उल्लेख केला आहे.
मूळ संस्कृत शब्द "अमित्रघात' असून त्याचा अर्थ 'शत्रूचा नाश करणारा असा होतो.
X X
पूर्व व पश्चिम समुद्राच्या मध्यंतरीच्या राजधान्या त्याने मौर्याच्या राज्यात समाविष्ट केल्या असे बिंदुसारसंबंधी तत्कालीन ग्रंथात उल्लेख आहेत.
बिंदुसारच्या काळात विशेष घटना घडल्या नाहीत. त्याने मौर्यांचे कोणतेही प्रदेश गमावले नाहीत. यावरून तोही समर्थ सम्राट असावा. त्याने ग्रीक सम्राटांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते.
सेल्युकस निकेटरचा पुत्र सिरियाचा ग्रीक राजा अँटिओकस प्रथम याच्याशी बिंदुसारचे संबंध मैत्रांचे होते.
मॅगेस्थेनिसनंतर ग्रीकांनी डायमेकस हा राजदूत बिंदुसारच्या दरबारात पाठवला होता. बिंदुसारने इजिप्तचा राजा टाल्मी फिलेडेल्फस यांच्याशी मित्रत्व केले. त्याचा वकील बिंदुसारच्या इजिप्तच्या दरबारात होता.
एथिनिअस या ग्रीक लेखकाने बिंदुसार याने ग्रीक सम्राटांना मंदिरा, अंजिर व फिलॉसॉफर (तत्त्वज्ञ) पाठवण्याची विनंती केली होती अशी नोंद केली आहे.
बिंदुसारने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता हे सांगता येत नाही. त्याच्याही काळात चाणक्य हाच प्रधानमंत्री होता.
'परिशिष्टपर्व' या ग्रंथातील नोंदीनुसार बिंदुसारने चाणक्याच्याच सांगण्यावरून 'सुबंधू' नावाच्या एका मंत्र्याची नियुक्ती केली.
X X
कालांतराने सुबंधू चाणक्याचा अपमान द्वेष करू लागला. त्याच्याच सांगण्यावरून बिंदुसारने चाणक्याचा अपमान केल्यामुळे चाणक्याने मगधचे राज्य कायमचे सोडून दिले.
प्रशासकीय कार्यात बिंदुसारला मदत करण्यासाठी ५०० सदस्यांची एक समिती होती, असा उल्लेख 'दिव्यावदान' या बौद्ध ग्रंथात आहे.
बिंदुसारच्या काळात जनतेने भ्रष्ट अधिकाऱ्यांना कंटाळून चंडे केली. तक्षशिला येथे प्रथम बंड झाले तेव्हा त्याचा बीमोड करण्यासाठी बिंदुसारने अशोकाला पाठवले.
तक्षशिला येथे दुसऱ्यांदा बंड झाले तेव्हा बिंदुसारने त्याचा दुसरा पुत्र सुशीमला पाठवले होते.
X X
काही इतिहासकार दक्षिण दिग्विजयाचे श्रेय बिंदुसारला देतात. दक्षिण भारतात चंद्रगुप्ताने नव्हे तर बिंदुसारने मौर्याची सत्ता प्रस्थापित केली होती असा युक्तिवाद केला जातो. पण तो चुकीचा आहे.
बिंदुसारच्या दक्षिण दिग्विजयाची नोंद समकालीन साहित्यात कोठेही नाही.
एस. आर. त्रिपाठी व बहुतांश इतिहासकारांनी दक्षिण विजयाचे श्रेय चंद्रगुप्तालाच दिले आहे.
Comment and share
3 Comments
Very nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete