सम्राट अशोक: जगाच्या इतिहासातील एक श्रेष्ठ राजा
Samrat Ashok: The great king in the world history
(इ.स.पू. 272 ते इ. स. पू. 236)
सम्राट अशोक बिंदुसारच्या मृत्यूनंतर सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्याच्या सत्तेवर आला.
मौर्याच्या साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण इतिहासात सम्राट अशोकाचे स्थान श्रेष्ठ दर्जाचे आहे.
अशोकाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक श्रेष्ठ राजा या शब्दांत युरोपियन इतिहासकारांनी गौरविले आहे.
एच. जी. वेल्स यांनी अशोकाचे मूल्यमापन "इतिहासाच्या पानापानांवर व परिच्छेदा परिच्छेदांतून गर्दी करून असणाऱ्या लक्षावधी राक्षांच्या नावांमध्ये अशोकाचे नाव एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे चकाकते आहे" असे केले आहे.
X X
सम्राट अशोकाच्या अभ्यासासाठी विपुल साधने आतापर्यंत उपलब्ध झाली आहेत. सम्राट अशोकाचे शिलालेख, स्तंभलेख याशिवाय बौद्ध, जैन या धर्माच्या ग्रंथांतही त्याची विपुल माहिती आहे.
सम्राट बिंदुसारने अशोकाला अवंती प्रांतांची राजधानी उज्जैन येथे राज्यपाल म्हणून पाठवले होते. राज्यपाल म्हणून त्याने उत्कृष्ट काम केले.
त्याचा भाऊ सुशीम हा तक्षशिला प्रांताचा राज्यपाल होता. सुशीमच्या अकार्यक्षम व अयोग्य कारभारामुळे जनतेने त्याच्याविरुद्ध जे बंड केले ते सम्राट अशोकाने सत्तेवर येण्यापूर्वीच बिंदुसारच्या आदेशानुसार मोडून काढले. त्यामुळे तक्षशिला प्रांताचे राज्यपालपदही बिंदुसारने अशोकाकडे दिले.
‘दिव्यावदान' या बौद्ध ग्रंथानुसार बिंदुसारला १६ राण्या व १०१ पुत्र होते. सर्वात वडील मुलगा सुशीम व सर्वात छोटा अशोक.
बिंदुसारच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र सुशीम हा सिंहासनारूढ झाला; पण अशोकाने त्याच्या 99 भावांना ठार मारले व मगधची गादी बळकावली.
'दीपवंश' व 'महावंश' या दोन ग्रंथांतही हीच कथा आहे.
सिंहली इतिहासकारांच्या मते, अशोकाला 99 भाऊ होते व त्याने सर्व भावांचा वध करून मगधची गादी बळकावली. बौद्ध ग्रंथातील ही कथा इतिहासकारांना मान्य नाही.
इतिहासकरांच्या मते, अशोक हा प्रारंभी क्रूर, कपटी होता हे दाखवण्यासाठी ही दंतकथा बौद्ध ग्रंथात लिहिली आहे.
अशोकाच्या एकाही शिलालेखात अशोकाने त्याच्या बंधूंचा खून केला असा उल्लेख नाही. बिंदुसारला 99 पुत्र असणे हे पूर्णतः खोटे आहे.
अशोकाचे राज्यारोहण इ. स. पू. 272 मध्ये झाले तर राज्याभिषेक इ.स.पू. 269 मध्ये झाला. अशोकाच्या राज्याभिषेकाला चार वर्षे उशीर का झाला यासंबंधी माहिती बौद्ध ग्रंथात आली आहे.
या चार वर्षांच्या काळात सत्तेसाठी भावाभावांत संघर्ष झाला असावा व भावांचा निःपात करण्यात हा काळ गेला असावा.
अशोकाचा साम्राज्यविस्तार
अशोकाच्या साम्राज्यविस्ताराची कल्पना तत्कालीन साहित्य व शिलालेखांवरून येते. चंद्रगुप्त व बिंदुसारच्या काळात काश्मीर हा मौर्य साम्राज्यात सामील नव्हता. परंतु नंतर अशोकाने काश्मीर जिंकून घेतला.
X X
कलिंगचे युद्ध (इ.स.पू. 261) :
अशोकाच्या राज्याभिषेकानंतर 8 व्या वर्षी झालेले कलिंगचे युद्ध ही अशोकाच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासावर परिणाम करणारी एक महत्त्वाची घटना आहे.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कलिंग (ओरिसा) हा एक स्वतंत्र देश, जो समर्थ व संपन्न होता. तेथील लोक लढवय्ये होते.
चंद्रगुप्त मौर्याच्या ताब्यात सर्व भारतीय भूप्रदेश असला तरी कलिंग मात्र एक स्वतंत्रच देश होता.
बिंदुसारानेही कलिंग जिंकण्याचा विचार केला नाही.
कलिंग देश जिंकण्यासाठी अशोकाने मात्र मोहीम हाती घेण्याचे ठरवले. कलिंग जिंकल्यामुळे मौर्याच्या भारतातील साम्राज्याला पूर्णत्व प्राप्त होणार होते.
मौर्याच्या प्रचंड लष्करी सामर्थ्यापुढे कलिंगच्या युद्धात कलिंग देशाचा पूर्ण पराभव झाला.
कलिंगच्या युद्धाचे परिणाम :
सम्राट अशोकाच्या 13 व्या शिलालेखात कलिंगच्या युद्धातील मनुष्यहानीचा उल्लेख आहे. कलिंगच्या युद्धात किमान १ लक्ष लोक मृत्यू पावले व दीड लक्ष लोक कैदी म्हणून पकडले गेले.
युद्धातील जखमी किंवा अपंगांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त होती.
कलिंग युद्धात वित्तहानीही प्रचंड झाली. कलिंग देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कटली.
कलिंगच्या युद्धात जी मनुष्यहानी झाली त्याचा अशोकाच्या मनावर परिणा मझाला. त्याचे हृदयपरिवर्तन झाले. युद्धभूमीवरच त्याला खूप दुःख झाले.
संपूर्ण जगाच्या इतिहासात युद्धभूमीवर मारलेल्या लोकांबद्दल अश्रू ढाळणारा अशोक हा एकमेव सम्राट होय.
X X
Dr. R. K. Mookerji च्या मते,
"The horros of Kalinga war worked a revolution in his character."
डॉ. रायचौधरींच्या मते,
"The Kalinga war had proved a turning point in the career of Ashoka and produce results of far reaching consequences in the history of India and of the whole eastern world."
कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाच्या मनात विविध विचारांचे काहूर निर्माण झाले. तो विचारमग्र अवस्थेत असतानाच बौद्ध भिक्षू उपगुप्ताची त्याची भेट, झाली.
उपगुप्ताच्या उपदेशानंतर अशोकाच्या आचार-विचारांत क्रांती झाली. तो शांततेकडे झुकला. शस्त्रास्त्राने प्रदेश जिंकता येतो, मानवी शरीर जिंकता येईल; पण मन जिंकतायेणार नाही याची त्याला जाणीव झाली. रक्तपात पाहून त्याची आक्रमक महत्त्वाकांक्षा शमली.
कलिंग जिंकल्यामुळे भारतातील मौर्याच्या साम्राज्याला एक प्रकारचे पूर्णत्व प्राप्त झाले.
कलिंग युद्धानंतर अशोकाचा जीवनक्रम व व्यक्तिमत्त्व यात मोठा बदल झाला. दया, क्षमा, शांती, अहिंसा इ. विचारांवर त्याची श्रद्धा बसली. तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला.
कलिंगच्या युद्धानंतर अशोकाने युद्धाचा कायमचाच त्याग केला. या धोरणाचा परिणाम मौर्याच्या परराष्ट्रधोरणावर झाला. मौर्य लष्कर निष्क्रिय बनले.
मौर्याकडून आक्रमण होणार नाही हे मौर्याच्या शत्रुराज्यांनी गृहीत धरले. मौर्य सत्ता भविष्यकाळात कमकुवत झाली.
त्याला सम्राट अशोकाचे कलिंगचे युद्ध अप्रत्यक्षपणे कारणीभूत आहे. कलिंगचे युद्ध अशोकाचे शेवटचेच युद्ध ठरले.
सम्राट अशोकाने दिग्विजयाऐवजी 'धर्मविजया'चे धोरण स्वीकारले.
Comment and share
4 Comments
👍🏼👍🏼👍🏼
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice sirji
ReplyDelete