Janapadas -4: Mahajanapadas and the rise of Magadha-4
जनपद व महाजनपदे आणि मगधचा उदय: 4
'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई.
अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत.
मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत, जैन भगवती सूत्रात १६ महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात ७ महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत.
'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात १६ महाजनपदांची माहिती आहे. या १६ महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे.
१६ महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल.
११) पांचाल :
आजच्या रोहिलखंडात हे महाजनपद होते. त्याचे उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल असे दोन भाग होते व त्याच्या अनुक्रमे 'अहिछत्रा' व 'काम्पिल्या' या दोन राजधाल्या होत्या, उत्तर व दक्षिण पांचाल यांच्यातही सत्तेसाठी संघर्ष होता.
उत्तर पांचाल व कुरू यांच्यातही वर्चस्वाचा लढा चालू होता. महाभारतातील अर्जुनाची पत्नी द्रौपदीचा "पांचाली' असा उल्लेख आहे. बौद्ध कालखंडात मात्र पांचाल हे प्रभावशून्य राज्य बनले होते.
१२) अश्मक:
अवंतीच्या दक्षिणेला व गोदावरी नदीच्या खोऱ्यात नांदेड व आंध्र प्रदेशातील निझामाबाद जिल्हा या प्रदेशात हे जनपद होते.
अश्मकांचा उल्लेख पाणिनीने केला. त्यांची राजधानी 'पोतन' महणजे निझामाबाद जिल्ह्यातील बोधन होय असे मत डॉ. बी. सी. लॉ यांनी व्यक्त केले आहे.
महाभारतातील उल्लेखानुस्सर राजर्षी अश्मकने पोतनानगरीची स्थापना केली.
महाभारतात तसेच बौद्ध व जैन वाङ्मयात अश्मकांचा 'अस्सक' असा उल्लेख आहे.
१३) गांधार:
आधुनिक काश्मीर व तक्षशिलेच्या परिसरात गांधाराचे राज्य होते. गांधारची राजधानी तक्षशिला होती.
तक्षशिला हे व्यापारी केंद्र व विद्येचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. प्रारंभीच्या काळात तक्षशिला हे वैदिक विद्येचे केंद्र होते तर कालांतराने बौद्ध विद्येचे केंद्र असा तक्षशिलेचा लौकिक होता.
डॉ. रायचौधरी यांच्या मते, गांधारचे राजे धार्मिकदृष्टया उदारमतवादी होते. कारण जैन साहित्यात गांधारचे राजे जैन धर्माचे अनुयायी आहेत असे म्हटले होते.
ब्राह्मण साहित्यात ते ब्राह्मण धर्माचे अनुयायी आहेत असा त्यांचा उल्लेख आहे. तक्षशिला येथील उत्खननात बौद्ध अवशेष सापडले आहेत.
इ. स. पू. ६ व्या शतकात पुष्कर सारिन हा राजा तेथे राज्य करीत होता. त्याने मगधचा राजा बिंबीसार याच्या दरबारी आपला वकील पाठवला होता.
१४) शूरसेन :
मत्स्यालगतच शूरसेन सेनी याचे राज्य होते. मथुरा हि राज्याची राजधानी होती.
वैदिक साहित्यात शूरसेन किंवा मथुरेचा उल्लेख सापडत नाही, परंतु महाभारत व पुराणग्रंथात मात्र या महाजनपदांचे उल्लेख सापडतात.
१५) कंबोज:
आधुनिक पाकिस्तान व गुजरातचा काही प्रदेश यात कंबोजचे राज्य होते. द्वारका ही कंबोजची राजधानी होती.
वैदिक काळात कंबोज हे वैदिक शिक्षणाचे केंद्र होते. कंबोज हे व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.
ह्युएनत्संगच्या प्रवासवर्णनात कंबोजचा उल्लेख आला आहे.
महाजनपदाच्या सत्तासंघर्षात कंबोज फारसे सक्रिय नव्हते. इतर राज्यांप्रमाणे हे राज्यही मगधच्या अधिपत्याखाली गेले असावे.
१६) मगध :
आधुनिक बिहारमधील पाटणा व गया परिसरात हे गणराज्य उदयास आले.
वैदिक आर्याच्या काळात मगध प्रदेश वैदिक संस्कृतीच्या बाहेर होता.
सोळा महाजनपदांत श्रेष्ठत्वाचा जो लढा झाला त्यात मगध विजयी झाले. मगधचे श्रेष्ठत्व व सार्वभौमत्व सर्व छोट्या-मोठ्या संतांनी मान्य केले होते.
भारताच्या राजकीय इतिहासातील पहिले प्रबळ साम्राज्य म्हणून मगध पुढे आले.
पुराणग्रंथ, जैन व बौद्ध ग्रंथातून मगध महाजनपदांचा इतिहास व मगधवर राज्य केलेल्या राजवंशांच्या वंशावळी दिल्या आहेत.
जैन ग्रंथात मगधला पवित्र जनपद मानले आहे. मगधामध्ये जैन ज्ञान व जैनाचार यांचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे महावीर वर्धमानने म्हटले होते.
मगधवर नंद वंशाचे राज्य येण्यापर्वी ८ राजवंश सत्तेवर आले होते असे पुराणात म्हटले आहे.
त्यापैकी इतिहासाला ज्ञात वंश खालीलप्रमाणे आहेत.
१) ब्रहद्रथ वंश
२) हर्षक वंश
३) शिशुनाग वंश (इ. स. पू. ५४३ ते ४२३
४) नंद वंश ( इ. स. पू. ४२३ ते ३२३
५) मौर्य वंश (इ. स. पू. ३२३ ते इ. स. पू. १८७).).).श.श.
Comment and share
3 Comments
Useful information sir
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete