Republic Day of India
26 January
प्रजासत्ताक दिन
26 जानेवारी
भारताचा 'प्रजासत्ताक दिन' दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला साजरा केला जातो.
आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमंलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा "राष्ट्रीय दिन" आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहले व संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.
जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.
त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.
या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.
भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.
या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.
या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे व विवीध कार्यक्रमांचे आयोजित केले जाते.
इतिहास:
भारताला ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे.
तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे मात्र हे भारतीय राज्यशासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.
29 ऑगस्ट 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी "मसूदा समिती" ची स्थापना केली गेली.
या समितीने "संविधानाचा मसुदा" तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला.
या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला आणि 2 वर्ष,11 महिने आणि 18 दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम तयार केला.
बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या.
दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.
भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा "प्रजासत्ताक दिन" हा साजरा करण्यात येऊ लागला.
X X
प्रजासत्ताक दिन उत्सव:
दर वर्षी 26 जानेवारी रोजी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते.
हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे केले जाते.
संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक," अमर जवान ज्योती", येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात.
भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात.
त्याचवेळी प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते.
राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते.
त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात.
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.
प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात.
भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे.
नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते.
प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते.
X X
प्रजासत्ताक दिनाची राष्ट्रीय सुट्टी:
26 जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.
प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः 15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन व 2 ऑक्टोबर- म. गांधी जयंती ).
ह्या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
चित्ररथ :
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते.
त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.
त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात.
या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.
ध्वजवंदन:
भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.
विशेष संचलन:
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत 1950 साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते.
भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती.
2016 साली 67 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन ड्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख अतिथी:
1950 पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.
प्रथम 1950 ला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना बोलविव्यात आले होते.
X X
भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि लोकशाही:
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातच (Preamble) भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक राज्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घटनेचा सरनामा हा राज्यघटनेतील ध्येयधोरणांचा गोषवारा आहे.
सरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा, पूजा, उपासनेचे स्वातंत्र्य, समानता बहाल केले आहे.यातून भारतीय राज्यघटनेचा आत्मा लोकशाहीवादी असल्याचे स्पष्ट होते.
भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे. याचा अर्थ असा होतो की, भारतात सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या द्वारे निर्वाचित केलेले प्रातीनिधिक शासन आहे. हे शासन आपल्या कारभारासाठी जनतेला जबाबदार असेल.
घटनेच्या सरनाम्यात गणतंत्र या शब्दाचा जो उल्लेख आहे तो भारत देशाला अनुवंशिक राज्यकर्ता नसल्याचे दर्शवितो.
22 जानेवारी 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरू घटना समितीमध्ये ऐतिहासिक ध्येय धोरणाविषयीचा ठराव ( जो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन (Objective Resolution) म्हणून ओळखला जातो.) मांडला होता.
घटना समितीने हा ठराव एकमताने मंजूर केला. या ठरावातील तरतुदी भारत हा लोकशाहीवादी असल्याचे स्पष्ट करतो.
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/january-26-day-of-special-dinvishesh.html
👆
January 26 - Day of Special (Dinvishesh)
जानेवारी 26: दिनविशेष
Comment and share
10 Comments
Nice information
ReplyDeleteखुप सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे.
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteGood information 👍
ReplyDeleteNice
ReplyDeletePrem khetri....Very nice
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete