उत्तर वैदिक संस्कृती
Later Vedic Culture
राजकीय परिस्थिती
या संस्कृतीचा प्रचार पूर्वेकडे यमुना व गंगा यांच्या खोऱ्या पर्यंत व दक्षिणेकडे विंध्य पर्वतापर्यंत झाला होता .या संस्कृतीला ब्राह्मणकाल वैदिक संस्कृतीची उत्तर अवस्था सुद्धा म्हणतात.
ऋग्वेद कालीन भरत वगैरे बलिष्ठ वशांचे प्राबल्य व प्रभुत्व नष्ट होऊन कुरू-पांचाल वंश व उशिनगर सारख्या बलिष्ठ नवीन मोठी राज्य उदयास आली.
कालांतराने आर्यांनी सप्तसिंधू प्रदेशातून पूर्वेकडे मध्य देशात प्रवेश केला .सरस्वती व गंगा या नदी मधील प्रदेशास मध्य देश असे म्हणत. यालाच ब्रम्हावर्त व कुरुक्षेत्र असेही म्हणत.
तसेच विदेह ,काशी, मगध, अंग इत्यादी प्रादेशिक राज्य मध्य देशाच्या पूर्वेस होती. त्यांची खालील प्रमाणे थोडक्यात माहिती.
X X
1. कुरू
ऋग्वेदकालीन भरत -पुरू व इतर लहान मोठ्या वंशातून कुरुवंश हा तयार झाला. इतरांच्या तुलनेने अधिक शक्तिशाली सुसंस्कृत व सुधारलेली होती.
सरस्वती ते गंगा नदी च्या विशाल प्रदेशात कुरू चे राज्य होते. त्यावरून कुरुक्षेत्र हे नाव पडले.
कुरू चा पहिला राजा कुरुश्रवण असून त्याची राजधानी आसंदिवत असावी.
परीक्षित व जनमेजय राजांचे कारकीर्दीत कूरूं ची सत्ता, वैभव, प्रतिष्ठा, सर्वोच्च शिखरावर पोहोचली .त्याच्या उत्तरेस नाग व गंधर्व या जमातीची राज्य होती .
नागराजा तक्षक हा नेहमी कूरू वर आक्रमण करे. म्हणून ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी कूरु नरेश परीक्षित नाग नरेश तक्षकावर चालून गेला व पण तो तक्षका कडून ठार मारला गेला .
त्यानंतर जनमेजय सिंहासनारूढ झाला व त्याने नाग राज्यावर स्वारी केली व त्यांचा पराभव केला. नगवांशाला त्यांना पळून जावे लागले .जनमेजय यांनी नागांची राजधानी तक्षशिला काबीज करून तेथे कुरू ची राजधानी नेली.
जन्मेजया नंतर शातनिक गादीवर बसला. त्यानंतर कूरू चे राजे दुर्बल निघाल्यामुळे ते राज्य लयास गेले .त्यांचे वंशज कुरुक्षेत्र सोडून आलाहाबाद जवळ कोशांबी येथे राहू लागले.
X X
2. पांचाल
क्रिवि, सृजय, तूर्वस इ.ऋग्वेदकालीन वंशज यांच्या संमिलनाने पांचाल हा वंश कुरू सारखीच शक्तिशाली व सुसंस्कृत होती.
कुरू च्या पूर्वेस पांचाल राज्य करत होते. त्यांची कपिल ही राजधानी होती. क्रव्ये, सत्रासह, दुर्मुख व प्रवाहनजैवाली हे पांचालांचे प्रसिद्ध पराक्रमी राजे होत.
3. वश , उशीनगर व मात्स्य
आर्यांच्या लहान लहान जमातींच्या टोळ्या मध्य देशात होत्या विशेष म्हणजे कुरू-पांचाल या सरख्या मोठ्या राज्यांच्या कृपेवर त्यांचे अस्तित्व अवलंबून असे.
4. इतर प्रादेशिक राज्य
1. कोशल
पांचाळ यांच्या पूर्वेस आयोध्या प्रदेशात कोशल राज्य होते . कोशल नरेश पारा याने विदेहा वर सुद्धा राज्य करून अश्वमेध यज्ञ केला.
2. विदेह
कोशल च्या पूर्वेस बिहारमध्ये विदेह हे राज्य होते .
मिथिला नगरी विदेहा ची राजधानी होती.
जनक विदेहाचा प्रसिद्ध राजा होता. तो ब्रह्मविद्या विषयी प्रसिद्ध होता ,तत्त्वज्ञ होता. त्यामुळे ब्राह्मण सुद्धा त्यांच्याकडे शिकायला येत असत .
याज्ञवल्क्य व श्वेतकेतू हे त्याचे विद्वान शिष्य होते.
जनकाने आपल्या दरबारी कुरू-पांचाल राज्यातील विद्वान रत्ने गोळा करून विदेहा चे वैभव व कीर्ती वाढवली.
3. काशी
काशीचा अजातशत्रू हा प्रसिद्ध विचारवंत राजा होऊन गेला. विदेह ,कोशल व काशी यांचे सख्यसंबंध होते. कोशल व विदेह यांच्यातील विवाहांचे उल्लेख रामायणात आहेत.जलाजातूकर्ण हा एकच तिन्ही राजांचा पुरोहित होता.
X X
4. मगध
कोशल, विदेहा च्या पूर्वेस दक्षिण बिहारमध्ये मगध राज्य होते.
गिरीव्राज ही त्याची राजधानी होती.
जरासंध हा मगधचा प्रसिद्ध राजा होऊन गेला . मगध कोण होते याबद्दल मतभेद आहेत. ते आर्य नसून त्यांची संस्कृतीही निराळी होती. त्यात वैदिक संस्कृतीचा प्रवेश झाला नव्हता. आर्यांशी त्यांचे वैमनस्य होते.
वैश्य व क्षत्रिय यांच्या संबंधातून मगधांची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे .
मगधाना व्रात्य समजण्यात येई. व्रात्यस्तोमविधी केल्या नंतर त्यांना आर्य समज देण्यात येत होते. मगध लोक उत्तम गायक होते.
5. अंग ,वंग, वगाध व चेर
ह्या अनार्य यांची राज्ये मगधच्या आसपास असून मगध यांचेशी त्यांचे सख्य होते.
6. केकय, उत्तरकुरु, उत्तरमद्र
यांची राज्ये मध्य देशाच्या उत्तरेस होती. याशिवाय विदर्भ , बाल्हीक वगैरे राज्ये होती.
Comment and share
7 Comments
Nice information 👍
ReplyDelete👍🏻
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery good
ReplyDeleteNice
ReplyDelete