उत्तर वैदिक काळातील विवाह पद्धती
Post-Vedic Period: Marriage Practices in the Post-Vedic Period
उत्तर वैदिक काळात विवाह हा पवित्र संस्कार समजण्यात येत होता.
मुला मुलींना वयात आल्यावर विवाह करणे आवश्यक असे. जीवनाला विवाहाशिवाय पूर्णता येत नसे.
पत्नी ही पुरुषाची अर्धे अंग (अर्धांगी) समजण्यात येई. सामाजिक व धार्मिक विधी मुळे विवाह अनिवार्य झाला.
धर्म ,अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी माता पिता व गुरू यांचे ऋण फेडण्यासाठी आणि वंश चालू ठेवण्यासाठी विवाह करणे आवश्यक होते. पत्नी शिवाय कोणताही धर्म विधी अपूर्ण समजला जात होता.
विवाह संस्थेचे नियम उत्तरोत्तर कडक झाले.
x x
गोत्रबाह्य विवाह मान्यता पावून सगोत्रविवाहास बंदी होती.
दोन भिन्न गोत्रातील तरुण तरुणीचा विवाह म्हणजे गोत्र बाह्य विवाह होय .
याउलट एकाच गोत्रातील मुला-मुलींचा विवाह म्हणजे सगोत्रविवाह होय.
विवाहाचे अनुलोम विवाह व प्रतिलोम विवाह असे दोन प्रकार त्याकाळी होते.
1. अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाचा वर वहीं वर्णाची वधु .
उदा. क्षत्रिय मुलगा तर शूद्र वधू याउलट
2. प्रतिलोम विवाह म्हणजे हिन वर्णाचा मुलगा व उच्च वर्णाची मुलगी .
उदा. शूद्र मुलगा व क्षत्रिय मुलगी .
ह्या विवाह पद्धती अयोग्य असून सुद्धा जर झालाच तर फक्त अनुलोम विवाहास मान्यता मिळाली. तरी प्रतिलोम विवाह यांची संतती हीन मानली जाई.
ऋग्वेदकाला प्रमाणेच उत्तर वैदिक कालखंडात वधू-वरांना एकमेकांची निवड करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पिता स्वकन्या स्वेच्छेने कुणालाही देत असे.
विवाहविधी वधूगृही होई. कन्यादान, विवाहहोम ,पाणिग्रहण ,अग्नीपरीनयन , अष्मारोहन ,लाजाहोम, सप्तपदी वगैरे विधी विवाह प्रसंगी करण्यात येत असत.
x x
उत्तर वैदिक कालखंडातील विवाहाचे आठ प्रकार
उत्तर वैदिक कालखंडात विवाहाचे आठ प्रकार रूढ झाल्याचे दिसते .त्यापैकी चार विवाह पद्धती समाजमान्य होत्या व नंतरच्या चार विवाह पद्धती समाजास अमान्य होत्या.
1. समाजात मान्यता असलेले विवाहाचे चार प्रकार
1. ब्राह्म विवाह 2.दैव विवाह 3. आर्ष विवाह 4. प्रजापत्य विवाह
1. ब्राह्म विवाह
या विवाहात पिता विद्वान सदाचारी व आपल्या मुलीस सर्व अर्थाने अनुरूप असा वर शोधून त्याच्याशी मुलीचा सालंकृत विवाह करून देत होता.
हा विवाह सर्वश्रेष्ठ समजले जात होता.
2. दैव विवाह
यज्ञात पौरोहित्य करणाऱ्या वराला वधूपिता आपल्या मुलीचा सालंकृत विवाह या प्रकारात करून देत असे. हा विवाह प्रकार प्रामुख्याने ब्राह्मण वर्ग पुरताच मर्यादित होता.
यज्ञ संस्थेच्या अस्ता बरोबरच हा विवाहही मागे पडला.
3. आर्ष विवाह
या विवाह प्रकारात वरपासून धर्मानुसार गाई-बैलांच्या एक किंवा दोन जोड्या घेऊन वधूपिता आपली कन्य अर्पण करतो .
प्राचीन काळातील कन्याविक्रयाचे हे एक सुसंस्कृत रूप होते.
4. प्रजापत्य विवाह
कोणत्याही प्रकारचे कन्या शुल्क ( हुंडा) न घेता व न देता हा विवाह होत असे . या विवाह प्रकारात दोघांनी एकत्र राहून धर्माचरण करावे असा उपदेश वधूपिता वधू-वरास करीत असे.
या ठिकाणी वराने दुसरी पत्नी करू नये अथवा वानप्रस्थाश्रम स्वीकारू नये अशी शपथ देण्यात येते.
x x
2. समाज मान्यता नसलेले विवाहाचे चार प्रकार
1. आसुर विवाह 2. गांधर्व विवाह 3. राक्षस विवाह 4. पिशाच्च विवाह
1. आसुर विवाह
वधु पित्यास पैसे देऊन वराला वधू मिळवावी लागे. हा कन्याविक्रयाचाच एक प्रकार होता.
धर्मसुत्रकार यांनी या विवाह पद्धतीचा निषेध केला .कारण अशा स्त्रीला धर्मपत्नीत्व प्राप्त होत नाही .असे त्यांचे मत होते .
कन्याविक्री करणार्यांचे तोंडही पाहू नये असे पद्मपुराणात म्हटले आहे.
2. गांधर्व विवाह
तरुण-तरुणींच्या तन-मन-धन संगमातून झालेला विवाह म्हणजे गांधर्व विवाह होय. प्रेम व प्रेमचाळ्यांचे रूपांतर विवाहात (प्रेम विवाह ) होत असे. वधू-वराची प्रीती व संमती आवश्यक असून आई-वडिलांच्या पूर्व संमतीची गरज नसे .
जेव्हा प्रौढ विवाहांची पद्धत होती तेव्हाच गांधर्व विवाह होत.
3. राक्षस विवाह
पित्याच्या घरातून वधूला जबरदस्तीने नेऊन किंवा युद्धभूमीवरून स्त्रीला पळवून नेऊन सक्तीने तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करणे म्हणजे राक्षस विवाह होय.
विशेषतः क्षत्रियामध्ये ही पद्धत रूढ होती .अशा पद्धतीने विवाह करणे हे क्षत्रियांना अभिमानाचे वाटे.
4. पिशाच्च विवाह
या विवाहात वर वधूला मद्य वगैरे पाजवूनन पिशाच्च संचारल्या सारखी तिची अवस्था केल्यावर तिला दिशाभूल करून तिच्याशी विवाह करी किंवा स्त्री झोपली असता तिचे शील भ्रष्ट करून नंतर तिच्याशी विवाह करणे म्हणजे पिशाच्च विवाह होय.
हा विवाह अत्यंत हीन प्रतीचा समजण्यात येत असे.
Comment and share
6 Comments
Very nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteVery nice
ReplyDelete