Subscribe Us

header ads

Philosophy : Upanishade तत्वज्ञान : उपनिषदे भाग- 2

 भाग- 2

तत्वज्ञान :  उपनिषदे 

Philosophy :  Upanishade 


क्रमशः...

3. उपनिषदांचा साधनामार्ग 

सर्व विश्वाचा आधार असलेला आत्मा त्याचे दर्शन किंवा ज्ञान याचा साक्षात्कार हेच उपनिषदांनी आपले अंतिम ध्येय मानले आहे . 

आत्म्याचे ज्ञान होण्यासाठी उपनिषदांनी सांगितलेला मार्ग अधिक खडतर आहे. साध्या भक्तीने, पूजेने कर्मवीधिने किंवा तपश्चर्येने सुद्धा आत्मदान होणार नाही. तर माणसाने सर्व इच्छा-आकांक्षा सोडून दिल्या पाहिजेत. सर्वसंगपरित्याग केला पाहिजे. सर्व प्रकारच्या कामना, वासना सोडून दिल्या पाहिजे कारण त्या ज्ञान मार्गातील धोंड ठरतात.

X X

 जेव्हा मनातील सर्व इच्छा आकांक्षा गळून पडतात तेव्हा जीव अमर होतो किंवा आत्म्याला अमरत्व प्राप्त होते.

 शुद्ध चित्ताने गुरूजवळ बसून साधना केल्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते. विवेकी व वैराग्य संपन्न साधकाने गुरु मुखातून आत्मविद्या ग्रहण करावी असे उपनिषदांचे म्हणणे आहे.

 ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा गुरूही अधिकारी असणे आवश्यक आहे. तो शास्त्र संपन्न तर असलाच पाहिजे कारण त्याशिवाय शिष्यांच्या शंकांचे समाधान करता येणार नाही. जसा शास्त्र संपन्न तसाच तो ब्रह्मनिष्ठ ही असला पाहिजे. त्याशिवाय तो शिष्याला अनुभविक मार्गदर्शन करू शकणार नाही.

साक्षात आत्मदर्शनाने साधना म्हणून उपनिषदात योगाचा ही उपदेश केला आहे. योगाभ्यासाने प्राणांचे नियमन केल्याने चित्त शुद्ध होते व त्या शुद्ध चित्तात आत्मा स्वतः प्रगट होतो.

 आत्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घडविणार्‍या या योगाचा अभ्यास कसा करावा याची पद्धतशीर माहिती शेताश्वर उपनिषदात आहे.

 मनाची एकाग्रता चित्ताची निष्कंपता व अखंड ब्रह्मभावना ही यशस्वी योगाची लक्षणे आहेत.

ज्यांची बुद्धी ज्ञानाने शुद्ध व विकसित झाली आहे ते त्या आनंदरूप, अमृतमय व स्वयंप्रकाश आत्म्याला पाहतात, असे मुंडक उपनिषदात म्हटले आहे.

X X

5. उपनिषदातील नीतीकल्पना

यातील नीतिविचार मानवासाठी निश्चित ठरलेल्या उत्तम पुरुषार्थाचे साधन म्हणून केलेला आहे. आत्मा हीच जीवनाची परमगती, तीच संपत्ती, तेच परम ध्येय व तोच परम आनंद आहे.

 इंद्रिय सुखात रमणे, मद- मत्सर जवळ करणे हे पाप आहे. मनुष्याने निरनिराळे वासना-विकार त्याच्या ठिकाणी असलेल्या दिव्य शक्तीची वाढ होऊ देत नाहीत व त्याचे जीवन स्वार्थी व संकुचित बनवितात.

 जीवनाच्या विकासासाठी त्या वासना विकारांचे नियंत्रण करणे जरूर असते. इंद्रिय सुख व वासना तृप्ती म्हणजे नैतिक जीवन नव्हे .

आत्मा हा नितीचे साध्य आहे या नीती धर्मात त्याग व वैराग्य यास महत्त्व आहे. पण वैरागी म्हणजे अंगाला राख फासून संसारातून उठून गेलेला माणूस असा त्याचा अर्थ नव्हे .

सर्वच वासना निंद्य ,त्याज्य असतात. काम ही सुद्धा सर्वस्वी त्याज्य वस्तू नव्हे. फक्त त्या कामाला माणसाने आपल्यावर स्वर होऊ देता कामा नये.

 चित्तशुद्धी ने माणसाला आत्मबल प्राप्त होते. या आत्मबलाने त्याची विवेकबुद्धी जागृत होते व तो देहाच्या दास्यातून मुक्त होतो.

 जीवन हा एक यज्ञ आहे आणि तप, दान, सरलता, अहिंसा व सत्य वचन या त्या यज्ञाच्या दक्षिणा आहेत. असे छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे. 

त्यामध्ये वैयक्तिक व सामाजिक नीतीचा अंतर्भाव होतो. आत्मसंयमन हे सर्व सद्गुणांचे मूळ आहे. काम, क्रोध, लोभ हे माणसाचे शत्रू असल्यामुळे त्यांना जिंकण्यासाठी दम, दया व दान या गुणांची जोपासना करावी, असे बृहदारण्यक उपनिषदात एका कथेच्या द्वारे सांगितले आहे.

बृहदारण्यक उपनिषदात सत्यालाच धर्म असे म्हटले आहे.

उपनिषदात अध्ययन व अध्यापन सतत चालवावे आणि त्याचबरोबर व्रत, सत्य, शम, दम, यज्ञ, अतिथी सत्कार, भूतदया इत्यादी गोष्टी माणसाने आचरण आल्या पाहिजेत असा उपदेश उपनिषदात जागोजागी आढळतो.

 नैतिक जीवनाची परिणती अध्यात्मिक अनुभूतीत झाली पाहिजे असा उपनिषदांचा आशय आहे.

 धर्मश्रद्धा हा नीतीचा पाया आहे व जीवनात शांती व समाधान यांचा लाभ हे नीतीचे फल आहे.

उपनिषदामुळे वैदिक देवतांची भीती गेली, पुरोहितांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, देव आकाशात राहत नाही, मेघाबरोबर विहरत नाही, विद्यूलतेबरोबर प्रकाशात नाही, देव हा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. या देवाच्या उपासनेसाठी यज्ञ मार्गाची गरज नाही. हे उपनिषदांनी सांगितले .

X X

प्राचीन भारतीयांच्या ज्ञानविकासातील अत्यंत महत्त्वाचे क्रांतिकारक युग म्हणजे उपनिषदकाल होय. 

उपनिषदांनी समाजापुढे निराळे आदर्श निर्माण केले. धर्माचे सूक्ष्म स्वरूप त्यांना दाखवले आणि सांगितले की जीवनातील श्रेष्ठ सुख भोगत नसून त्यागात आहे.

 जीवनमरणातून सुटणे हीच मानव मात्राची खरी समस्या असून मोक्ष हे अंतिम व एकमेव उत्तर आहे. यासाठी उपनिषदांनी सदाचाराचा आदेश दिला.

 सद्गुणांची आवश्यकता प्रतिपादली, त्याग व तपस्या यांचा महिमा सांगितला आणि ब्रह्मज्ञान हीच जीवनाची कृतार्थता होय , असा उदघोष  केला.

भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक उपनिषदांनी घातली आहे.

उपनिषद तत्त्वज्ञान हजारो देशी-विदेशी व्यक्तींच्या आत्मिक शांतीचे विश्रामधाम बनले.

अनेक धर्माचे स्फूर्तिस्थान ठरले भारतीयांचे धार्मिक व अध्यात्मिक स्मारक झाले. पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा या तत्त्वज्ञानाची प्रशंसा केलेली आहे.

Will Durant म्हणतात,

 " उपनिषद तत्वज्ञान सदाच आचरणात आणलेले सर्वांनाच आदरणीय आहे ह्या स्फूर्तीपद ब्रह्मविद्याने युरोप-अमेरिकेतील लाखो एकाकी स्त्रिया व थकलेल्या पुरुषापासून तर शॉपेनहॉर व इमर्सन सारख्या विद्वानांचे चित्त वेधले." 





Comment and share..

Post a Comment

8 Comments