Subscribe Us

header ads

Narhar Kurundkar - नरहर कुरुंदकर : समाजकारण, साहित्य, इतिहास आणि संस्कृती यावर विश्लेषण करणारे ज्येष्ठ विचारवंत,

नरहर अंबादास कुरुंदकर ( Narhar Kurundkar ): समाजकारण, साहित्य, इतिहास आणि संस्कृती यावर विश्लेषण करणारे ज्येष्ठ विचारवंत, 

15 जुलै - जन्मदिन 

10 फेब्रुवारी - स्मृतिदिन



बालपण आणि शिक्षण: 

महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मराठी साहित्यातील साहित्यिक तथा लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी परभणी जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामधील नांदापूर या ठिकाणी झाला. सध्या त्यांचे गाव हे हिंगोली जिल्ह्यांमध्ये गणले जाते. त्यांच्या वडिलांचे गाव परभणी जिल्ह्यातील कुरुंदा आहे. त्यांचे मूळ आडनाव कुलकर्णी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव अंबादासराव कुलकर्णी आणि आईचे नाव वेणूताई कुलकर्णी असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे परभणी जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी हे हैदराबाद संस्थान मधील सिटी कॉलेज या ठिकाणी त्यांनी पूर्ण केले.. जून 1947 मध्ये त्यांची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि त्यांनी इंटर ला प्रवेश केला. त्यांचे इंटरचे शिक्षण त्यांचे मामा डॉ. नारायणराव नांदापूरकर हे हैदराबाद या ठिकाणी राहत असत. त्यामुळे त्यांचे शिक्षण हैदराबाद या ठिकाणी झाले. लहानपणीच त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणी चा प्रभाव होता. वयाच्या पंधराव्या वर्षी भर रस्त्याने मोठ्या आवाजात मार्क्सवादावर चर्चा करीत चालत असतानाच त्यांना कम्युनिस्ट असल्याचा आरोप ठेवून हैदराबादच्या तुरुंगात त्यांची 14 दिवसासाठी तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यामुळे त्यांना 1948 मध्ये कम्युनिस्ट म्हणून अटक करण्यात आली. कुरुंदकर स्वतःला मार्क्सवादी म्हणून घेत असत. पण मी कम्युनिस्ट नाही असे ते स्पष्टपणे वारंवार आपल्या विचारसरणीतून सांगत असत. कुरुंदकर समाजवादाचे दोन प्रवाह मानवी तसत ते स्वतःला लोकशाही समाजवादी म्हणून घेत. हैदराबाद मुक्ती आंदोलनातील एक विद्यार्थिनी नेता म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द चांगली राहिलेली आहे. त्यावेळेस त्यांनी गोविंदभाई श्रॉफ यांच्यासोबत काम केले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समवेत सुद्धा त्यांनी काम केले. 1951 मध्ये त्यांना शारदो उत्सवात पहिले पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आणि त्यांनी डिसेंबर 1953 मध्ये आपला पहिला समीक्षा पर लेख प्रसिद्ध केला. मे 1954 मध्ये महाराष्ट्रीयन कुटुंबातील हैदराबाद या ठिकाणी त्यांच्या मामाच्या बाजूला वास्तव्यास राहणाऱ्या प्रभावती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1955 मध्ये त्यांना नांदेड या ठिकाणी प्रतिभा निकेतन विद्यालय मध्ये अध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1957 मध्ये ते इंटर परीक्षा उत्तीर्ण झाले. 1961 मध्ये ते मराठवाडा विद्यापीठाची बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. 1963 मध्ये त्यांनी एम ए मराठी हा विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पीपल्स कॉलेज नांदेड या ठिकाणी मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर एक सप्टेंबर 1977 मध्ये ते पीपल्स कॉलेज नांदेड चे प्राचार्य म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

X X

साहित्यातील योगदान :

नरहर कुरुंदकरांची समाजात खरी दोनच रूपे पाहायला मिळाली. एक म्हणजे ते लेखक आणि दुसरे म्हणजे ते वक्ते. त्यांचे बोलणे आणि लिहिणे यात कमालीचे साम्य असे. त्यांचे अर्धे अधिक लिखाण हे त्यांची भाषणेच आहेत. त्यांची भाषणे आणि लेखन ऐकणाऱ्या वाचणाऱ्या माणसाला विचार, विहार, विचार, विलास आणि विचार सौंदर्य यांची अनुभूती येते. त्यांचे लेखन वाचताना किंवा त्यांचे भाषण ऐकताना समोरच्या व्यक्तीला असे वाटते अरे ! हे तर आपल्या परिचयाचे आहे असे वाटते. त्यांचा पहिला समीक्षा पर लेखन डिसेंबर 1953 मध्ये प्रसिद्ध झाला. नरहर कुरुंदकरांनी वयाच्या 23व्या वर्षी 1956 मध्ये मुंबई या ठिकाणी मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्रावर सत्य कथेत तील लेखमालेमध्ये मराठी साहित्य संघात सौंदर्यशास्त्रावर व्याख्यान दिले. ते मुंबई मराठी साहित्य संघाकडून महानीय वक्ता म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. साहित्य संमेलनातून त्यांनी परिसंवादाचा वक्ता म्हणून अनेक वर्ष काम केली. 1960 मध्ये त्यांनी भारतीय इतिहास संशोधन मंडळ पुणे आणि वसंत व्याख्यानमाला या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट व्याख्यान दिले. कुरुंदकर यांचे साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान होते. ते या क्षेत्रामध्ये अधिकाधिक मोठे झाले याची खरी मीमांसा म्हणजे पुण्या मुंबईच्या संपादंकांना सुद्धा त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा, भीती आणि असूया अशा तीनही भावना एकाच वेळी वाटत होत्या. आदरयुक्त दरारा यासाठी की कुरुंद करांच्या विचारांची कक्षा अफाट होती. तिला कोणताच विषय वर्ज होता. त्यामुळे कोणत्याही विषयावर प्रतिवाद करायला हा व्यक्ती मागे हटणार नाही, याची जाणीव सर्व संपादकांना असायचे. असूया यासाठी होती की, कुरुंदकर इतके आणि इतक्या विषयावर लिहायचे की त्यांना समस्त नियतकालिकांचे अंगणही लहान वाटायचं ,इतका भौगोलिक स्वातंत्र्य कोणालाच नव्हतं आणि इतका वैचारिक परिघही कोणाचा नव्हता. कुरुदकरांनी अनेक विषयावर लेखन केले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, इतिहास, नाट्यशास्त्र, साहित्य, समीक्षा धर्म याखेरीज कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही दिल्या. त्यांचे वाचन चौफेर होते. बुद्धिमत्ता तीक्ष्ण होती. व्यासंग मोठा होता आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असताना त्या प्रश्नाच्या सर्व अंगांचा विचार करण्याची त्यांची पद्धत होती.

X X


साहित्य प्रकाशन/ निर्मिती:

1962 मध्ये "रिचर्डसनची कलामीमांसा" हा ग्रंथ त्यांचा प्रकाशित झाला या ग्रंथासाठी त्यांना सहलेखक म्हणून डॉ. शिवाजी गऊळकर हे होते. हा ग्रंथ मराठवाडा साहित्य परिषदेने प्रकाशित केला होता. रूपवेध, मागोवा, जागर, शिवरात्र, धार आणि काठ, वाटा :माझ्या तुझ्या, पंडित नेहरू: एक मागोवा, पायवाट, यात्रा, ओळख, छत्रपती शिवाजी महाराज: जीवन रहस्य, छाया प्रकाश, भजन, आकलन, मनुस्मृति, आरक्षणाचा प्रश्न, हैदराबाद: विमोचन आणि विसर्जन, अभयारण्य, अन्वय, वारसा, अभिवादन, परिचय, वाटचाल, रससूत्र, व्यासांचे शिल्प, रंगविमर्श, निवडक पत्रे, रंगशाळा, राष्ट्रवाद आणि समाजवाद इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत.

X X


सन्मान आणि पुरस्कार :

मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट पदावर सदस्य म्हणून 1958 मध्ये नियुक्ती झाली. 

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावावर एकही पुस्तक नसताना वयाच्या 32व्या वर्षी त्यांची निवड एप्रिल 1964 मध्ये झाली होती. 

1972 मध्ये ते वरोरा येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 

भारतीय आकाशवाणी ने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे ते वक्ते म्हणून 1974 मध्ये काम केले. 

1978 मध्ये ते बडोदा वांग्मय परिषदेचे अध्यक्ष तसेच मुंबई उपनगरीय साहित्य संमेलन बांद्रे या परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 

महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार देऊन 1979 मध्ये सन्मानित केले होते. 

X X


निधन :

महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक नरहर कुरुंदकर यांचा मृत्यू 10 फेब्रुवारी 1982 मध्ये औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी व्यासपीठावरच झाला.

इतिहासाचार्य विकास राजवाडे यांनी 1927 मध्ये महाराष्ट्रातील बुद्धिमान प्रतिभावान व कर्त्या व्यक्तींची मोजदाद या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला होता त्यात त्यांनी एकोणिसाव्या शतकातील 150 व्यक्तींची एक यादी दिली होती त्यानंतर पुणे येथील श्री गंधर्व वेद प्रकाशनाने त्या यादीमध्ये काटछाट करून शेवटी 20 व्यक्तींच्या नावांची सहमती दर्शवली या वीस व्यक्तींच्या यादीमध्ये एक नाव होते ते नरहर कुरुंदकरांचे.


X X



https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-10-day-of-special-dinvishesh.html

👆

February 10 - Day of Special (Dinvishesh)


फेब्रुवारी 10: दिनविशेष

X X



View, comment and share...


Post a Comment

0 Comments