साप एक निसर्ग मित्र: समज गैरसमज आणि नागपंचमी
Snake A Nature Friend: Misconceptions and Nagpanchami
निसर्गात साप हा मानव मित्र व निसर्ग मित्र म्हणून वावरतो. पण सापाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये जी भीती आहे जे गैरसमज आहे ते दूर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सापाचे महत्त्व व अन्नसाखळीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याकडे पाहिले जाते. साप हा पाण्यात, जमिनीवर वास्तव्य करून राहतो. साप हा साधारणतः पाठीचा कणा (Chordata Vertebrate)असलेल्या विभागात आणि सरपटणाऱ्या ( Reptiles )प्राण्यांमध्ये त्याची गणना होते. सापाच्या जाती विनाशाच्या उंबरठ्यावर आहेत. जैवविविधतेमध्ये त्याचे संवर्धन करणे हे जैवविविधतेत त्याचे व्यवस्थापन करणे आणि त्याचा शाश्वत विकास करणे अत्यंत काळाची गरज आहे. सापाची उत्क्रांती ही सरड्यापासून एका विशिष्ट वर्गाच्या झाली असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. नागपंचमीला साप ज्या ठिकाणी वारूळ मध्ये राहतो त्या ठिकाणी पूजा केली जाते. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये त्याचे वास्तव्य आहे. नागदेवतेचे अनेक मंदिरे भारतामध्ये आहेत. त्या मंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी पूजा आरत्या केली जाते. हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नऊ नागांच्या नावाचा उल्लेख आहे.
अनंत वासुकी शेष पद्मनाभच कंबल I
शंखपाल ध्रुतराष्ट्र तक्षक का कलिया तथा II
एतानी नव नामानी नागाणा च महात्मना II
सायंकाले पाठेनीत्ये प्रातःकाले विशेषतः II
तश्य विषभय नास्ती सर्वत्र विजयी भवेत I
X X
अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिय ही नऊ नावे नागांची आहेत.
संयुक्त राष्ट्र संघटनेने 2011 ते 20 जैव विविधतेतील दशक या कार्यक्रमांतर्गत जगातील जैविक विविधता यांचे संरक्षण संवर्धन यांची जनुकीय विविधता संरक्षित करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. आणि त्या दृष्टीने संपूर्ण जगामध्ये जैवविविधतेचे संरक्षण व्यवस्थापन आणि शाश्वत विकास ठेवण्यासाठी सर्वतोपरी देशात प्रयत्न चालू आहेत.
सापांचा अभ्यास हा ऑफिऑलॉजी (Ophiology)आणि हरपेटोलॉजी (Herpetology) या विषयांतर्गत केला जातो.
सापाला मानवाचा मित्र किंवा निसर्ग मित्र म्हणण्यामागचा उद्देश घरामध्ये उपद्रव करणारे जे प्राणी असतात. ज्यामध्ये उंदीर, घुशी, कीटक, आळ्या यांचा बंदोबस्त अन्नसाखळीमध्ये साप हा नियंत्रित करतो. जगामध्ये सापांच्या जाती आणि उपजाती अशा एकूण 3970 आहे त्यापैकी भारतामध्ये 275 जातींचे साप आढळतात. त्यामध्ये जागतिक वाटा हा 8.7% एवढा आहे. भारतात सापडणाऱ्या सापांच्या जाती पैकी 60 जाती ह्या विषारी आहेत आणि 215 सापांच्या जाती ह्या बिनविषारी आहेत. सापाच्या आकारमानाचा लांबीचा विचार करता वाळा नावाचा साप हा सर्वात लहान लांबीने जवळपास 15 सेंटीमीटर एवढी त्याची लांबी असते. सर्वात मोठा साप हा जाळीदार अजगर हा आहे. त्याची लांबी साधारणतः 11 मीटर लांबी एवढे असते. पण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान किंग कोब्रा हा साप सापडला. त्याची लांबी 18.8 मीटर एवढी होती आणि वजन 12 किलो एवढे हा जगातला एकमेव असा साप आहे, जो अंडी घालण्यासाठी घरटे बांधतो. साप हा शीत रक्ताचा प्राणी आहे कारण तो आपल्या शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलतो. त्यामुळे तो थंड प्रदेशात वाळवंटात जंगलात पाण्यात सर्वत्र आढळतो. कारण वातावरणातील उष्णतेचा बदल आपल्या शरीराला तो साजेसा बदल करून घेतो. तसे पाहिले तर साप हा खूप आळशी प्राणी आहे. पण तो जेव्हा बाहेर निघतो. तो फक्त अन्न शोधण्यासाठी निघतो. एकदा का अन्नपूर्णा पोट भरून खाल्ले की मग तो अनेक दिवस एका जागेवरुन हलत नाही किंवा एका वारुळात जाऊन जर बसला तो बाहेर काही दिवस येत नाही. भारतीय अजगर हा दोन ते नऊ महिने एकदा अन्न खाल्ल्यानंतर किंवा अन्नाशिवाय राहू शकतो. साप हा थंडीच्या दिवसांमध्ये उन्हात बसतात उष्णता घेतात. त्यांच्या शरीरामध्ये अन्न कमी आणि पाणी चे प्रमाण जास्त असते. जवळपास 70 टक्के त्यांचे शरीर हे पाणी युक्त असते त्यामुळे त्यांची हालचाल आतड्यांची हालचाल आणि मलविसर्जन हे सहज होते. 45 डिग्री ते 8 डिग्री सेंटीग्रेड तापमान पेक्षा कमी अधिक काही सापांना घातक ठरू शकते. त्यामुळे अंटार्टिका ध्रुवीय प्रदेश वगळता सापांचा सर्वत्र वावर आपल्याला आढळतो. साप हे सर्वाधिक वास्तव्य करणारा प्रदेश म्हणजे उष्ण कटिबद्ध समशितोषण किंवा वाळवंटात थंड रेती खाली गाडून स्वतःला घेतात.
X X
सापाची शरीर रचना :
सापांच्या शरीर रचनेचा विचार केला तर वाळा हा साप बारीक निमुळते शरीर असते. आपण अजगराच्या बाबतीमध्ये आकारमानात विचार केला तर अजगर आणि घोणस हे जाड शरीराचे असतात. मन्यार हा साप त्रिकोणी शरीराचा असतो. तस्कर हा साप लांब लचक शरीर असते. आणि समुद्र सर्पाचे बाजूने चपटे शरीर असते. त्यामुळे निरनिराळ्या जाती प्रजातीप्रमाणे शरीरातील आकारमानात फरक असतो. त्यांचे वास्तव्य कोणत्या भागात जगातील किंवा देशाच्या भागांमध्ये राहतात त्यानुसार त्यांची शरीर रचना असते. सापांच्या रंगाचा जर विचार केला शरीराच्या तर आपल्याला गव्हाळ पिवळसर रंग, तपकिरी रंग, तांबूस रंग किंवा काळा रंग असे अनेक रंगांचे साप आपल्याला सभोवताली पाहायला मिळतात. सापामध्ये अंडी घालणारे साप ओवीपॅरिस (Oviparus )असे त्यांना म्हणतात. ज्यामध्ये नाग, अजगर इत्यादी येतात. काही सर्प हे पिलांना थेट जन्म देतात त्यांना विवीपॅरिस ( Viviparus)असे म्हणतात. त्यामध्ये घोणस,चापडा, हरणटोळ इत्यादी साप येतात. सापांच्या जबड्याचा विचार केला तर खालचा जबडा आणि वरचा जबडा हा जोडलेला नसतो. त्यामुळे साप हा मोठ्यातले मोठे भक्ष सहज गिळंकृत करू शकतो. बिनविषारी साप हा भक्ष्याला विळखे घालून मारून टाकतो आणि नंतर गिळंकृत करतो. विषारी साप हा आपल्या विषाचा वापर भक्षाला मारण्यासाठी करतो आणि नंतर त्याला गिळंकृत करतो. साप हा भक्ष पकडताना त्याच्या उष्मा संवेदनाग्राहक खाचांचा वापर करतो. ज्यामुळे उष्ण रक्ताचे भक्ष ची दिशा व उष्ण हृदयाचे अचूक स्थान त्याला कळते. त्यामुळे तो अचूक हल्ला करून भक्ष पकडतो. भारतीय सर्प तज्ञांच्या अभ्यासांती त्यांनी असे निष्कर्ष लावले की साप हा एकटोथर्मल( Ectothermal )आहे. कारण तो शीत रक्ताचा प्राणी असल्यामुळे सभोवतालचे तापमान नुसार स्वतःच्या शरीराचे तापमान बदलतो.
X X
विषारी साप :
नाग, नागराज, समुद्र साप, मन्यार, ओवळ, घोणस, फुरसे, चापडा, पट्टेरी मण्यार, समुद्री मण्यार. इत्यादी
निमविषारी सर्प :
हरणटोळ, उडतासोन सर्प, मांजरा साप, पट्टेरी रेतीसर्प, इत्यादी.
X X
बिनविषारी साप :
भारतीय अजगर, जाळीदार अजगर ,मांडूळ, धामण, वाळा, पट्टेरी धुळ नागिन, रसेल कुकरी, गवत्या साप, कवड्या साप, पट्टेरी कवड्या. इत्यादी.
सापांच्या शरीरावर खवले असतात. ज्यामुळे त्यांचे अतिनिल किरणांपासून (Ultraviolet rays) शरीराचे संरक्षण होते. त्यामध्ये खरखरीत खवले, गुळगुळीत खवले, चामखिळी खवळे अशा अनेक प्रकारचे खवले आपल्याला पाहायला मिळतात. सापामध्ये आपल्याला कात पाहायला मिळते. जी अर्ध पारदर्शक असते. ही कात त्वचेच्या मृत्तपेशींचा थर असतो जो दोन ते तीन महिन्याला साप शरीराच्या बाहेर टाकून देतो. जेव्हा तो कात टाकतो. त्यावेळेस तो अन्न घेत नाही. जेव्हा त्याची कात टाकायची वेळ येते त्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर पांढरा पडदा तयार होतो. त्यामुळे त्याला अस्पष्ट दिसते आणि त्याचा स्वभाव हा रागीट चिडचिडेपणाचा निर्माण होतो. कात बाहेर टाकण्यासाठी किंवा सुट्टी करण्यासाठी तो आपले डोके खडबडीत जागेवर घासतो. तोंडाजवळची कात निघते. त्यानंतर उर्वत शरीराची कात दगड झाडांची फांदी यांच्या सपाटीतून पलीकडे जातो आणि अलगद आतील बाजू बाहेर व बाहेरची बाजू आत, कधी पाण्यात कात टाकतो. ही कात टाकण्यासाठी त्याला दहा दिवसाचा कालावधी लागतो.
X X
सापाच्या शेपटीचे अनेक प्रकार आहेत. वाळा आणि पट्टेरी मण्यार यांची शेपटी गोल व आखूड असते. रूका सर्प यांची शेपटी लांब सडपातळ असते. डुरक्या घोणस याची शेपूट आखूड आणि खडबडीत असते. खापर खवल्या या सापाची शेपूट तिरकस छटांची असते. आणि समुद्र सापाची शेपटी ही वल्हा सारखी असते.
सापांची डोळे :
सापांच्या डोळ्यावर पापण्या नसतात. डोळ्यांच्या संरक्षणासाठी त्यांना पारदर्शक (Nictitatine Membrane) एक पडदा असतो. त्यावरून साप हा दिनचर ( Diurnal) आहे की निशाचर ( Nocturnal )आहे हे त्याच्या डोळ्यावर अवलंबून असते. जर त्याची मोठी डोळे असतील त्यातील बाहुली मोठी असेल तर तो दिनचर समजावा आणि ज्याचे डोळे छोटे असतील तर तो निशाचर समजावा. सापाच्या डोळ्यातील बाहुली ही उभी असेल तर तो निशाचर असतो आणि त्याला रात्री चांगले दिसते. आणि जर बाहुली गोल असेल तर त्याला दिवसा चांगले दिसते ज्यामध्ये धामण, तस्कर इत्यादी साप येतात.
X X
सापांच्या उष्मसंवेदनाग्राहक खाचा :
या प्रकारच्या खर्चा सापाच्या तोंडाच्या आसपास नाकाच्च्या आसपास वेटोळे घालून किंवा अजगरासारख्या सापाच्या वरील जबड्याच्या समोर उष्मसंवेदनाग्राहक खाचा ( Thermoreceptor or Pits ) असतात. या खचांचा उपयोग सभोवतालच्या तापमानातील सूक्ष्म बदल जाणवतो त्यामुळे अंधारात सापांना भक्ष शोधणे यामुळे सोपे होते. चापड नावाचा साप 10 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला सुद्धा डोळे झाकून उंदरावर सहज हल्ला करतो. या खाचाना 0.0003 डिग्री सूक्ष्म बदल तापमानातील लक्षात येतो जे दिसत नाही. त्याचे ज्ञान या खाचांद्वारे त्यांना स्पष्ट होते. सापांना थंडीच्या दिवसात उबदार जागा शोधण्यासाठी सुद्धा या खाचांचा ते उपयोग करतात.
X X
सापांची दाते (Teeth):
सापाच्या तोंडात अनेक दात आतून वळलेले असतात. जे भक्ष्य पकडण्यासाठी करतात. कारण साप भक्षाला चावत नाही तर तो पक्षाला गिळंकृत करतो. भक्ष पकडताना त्यांची अनेक दात तुटतात पण ते पुन्हा येतात. विषारी सापामध्ये या दाताव्यतिरिक्त विषदंतांची (Poison Teeth) जोडी वरच्या जबड्यात पुढील भागामध्ये असते. निमविषारी सापात विषदंताची जोडी ही वरील जबड्यात मागच्या बाजूला डोळ्याच्या खालच्या बाजूला असते.
X X
विषारी सापाचे विषदंत :
वरच्या जबड्याच्या पुढील भागात खालच्या बाजूने आतून पोकळ व न हलणारे छोटे विषदंत हे आपल्याला नाग या विषारी साप मध्ये आढळतात. तोंड बंद झाल्यावर आत मध्ये मिटवून ठेवलेले स्थितीमध्ये मोठे विषदंत आढळतात ते भक्ष पकडते वेळेस बाहेर येतात हे विषदंत घोणस चापडा या सापांमध्ये आढळतात. विषारी दात हे वरच्या जबड्यावर विषयाची पिशवी असते त्यास एका वाहिनेने (duct) जोडलेले असतात.
सापाचे विष :Snake Poison
साप हा आपल्या विषाचा उपयोग स्व संरक्षणार्थ भक्षावर हल्ला करतो. किंवा पचनास उपयोगी होण्यासाठी तो करतो. सापाच्या विषाला कुठलाही गंध नसतो, स्वाद नसतो. सापाचे हे विष तीन प्रकारांमध्ये असते नाग आणि मण्यार यांच्या विषाचा परिणाम दिमाकावर होतो. शरीर हे नियंत्रणा बाहेर जाते अर्धांग वायू सारखे शरीर होते. हे विष न्यूरोटॉक्सिन ( Neotoxin ) या प्रकारात मोडते. घोणस फुरसे चापडा या सापाचे विष हिमोटॉक्सिन ( Haemotoxine) या प्रकारात मोडते. ज्यामुळे रक्तामध्ये विष गेल्यास रक्ताच्या आठळ्या तयार होतात. समुद्र साप 520 हे मायोटॉक्सिक (Myotoxin) या प्रकारामध्ये मोडते. शरीरातील सर्व स्नायू निकामी होतात. सापाचे विष हे कॉम्प्लेक्स प्रोटीन किंवा एन्झाइम्स ( Complex Protein and Enzyme) या प्रकारामध्ये मोडते.
X X
सर्पदंशाची लक्षणे:
साप जेव्हा चावतो त्यावेळेस चावलेल्या जागी तीव्र वेदना होतात, सूज येते, अंग जाड पडल्यासारखे वाटते, हातपाय गळाल्यासारखे वाटतात, डोळ्यांच्या पापण्यावर नियंत्रण राहत नाही, त्या मिटतात, तोंडातून लाळ गळते, मळमळ होते, उलट्या होतात, श्वास घेण्यासाठी त्रास होतो, बोलता येत नाही ही लक्षणे नाग चावल्यावर आपल्याला आढळून येतात.
घोणस चावल्यानंतर शरीरात तीव्र वेदना होतात, सूज येते, कधी फोड येतात, नाडी अनियंत्रित होते, तोंडावाटे नाकावाटे लघवीवाटे रक्त येते, ही लक्षणे दिसतात.
फुरसे हा साप चावल्यानंतर शरीरातील तीव्र वेदना निर्माण होतात, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, लघवी आणि हिरड्यातून रक्त येते,अशी लक्षणे दिसून येतात.
चापडा हा साप चावल्यानंतर रक्त पातळ होऊन शरीरात गोठते हे लक्षात दिसून येते.
समुद्री सर्प दंश केल्यानंतर स्नायूमध्ये शरीराच्या अत्यंत तीव्र वेदना निर्माण होतात आणि लघवी वाटे लाल रक्त येते.
जर एखाद्याला विषयाचा दंश झाला नाही, पण सर्पदंश झाला तर त्यास ड्राय बाईट /शुष्क दश (Dry bite) म्हणतात त्याचा धोका कमी असतो.
सर्पदंश आणि प्रथमोपचार :
एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास तो विषारी साप आहेकिंवा बिनविषारी आहे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपण सांगू शकत नाही. आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे असते.
सर्पदंश ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी कुठलेही काप घेऊ नये शरीराचे त्यामुळे शरीरातील रक्त जास्त जाण्याचे प्रकार उद्भवतात कारण कधी कधी बिनविषारी साप सुद्धा चावू शकतो.
सर्पदंश ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणची जखम स्वच्छ धुवावी आणि रुंद क्रेप बँडेज फळीचा आधार घेऊन त्यावर बांधावी.
ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला असेल त्याची मानसिक दृष्ट्या जी मानसिकता असते. त्याला आधार देण्याची गरज असते.
सर्पदंश झाल्यानंतर डॉक्टर कडे घेऊन गेल्यानंतर जर त्या व्यक्तीला एखाद्या औषधाची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांना तशी संपूर्ण माहिती द्यावी. ज्यामुळे अचूक औषधोपचार करून जर विषारी साप चावला असेल तर तो बरा करता येईल.
X X
X X
सर्पदंशावरील औषधे :
सापाच्या विषापासून अँटीवेनम ( Antivenum ) असे औषध तयार केल्या जाते. त्या औषधाला न्यायालॉक्सिन ( Nailoxin)आणि कायॉक्सीन (Kaoxine ) अशी आहे या औषधाची किंमत हिऱ्यापेक्षाही महाग असते दोन ते पाच लाख रुपये ला ही साधारणता 1 ग्रॅम एवढे औषध मिळत. सध्या अँटिव्हेनम ( Antivenum ) ची औषधे सर्वत्र आपणास मिळतात. सुरुवातीला थायलंड आणि भारता मध्ये ही औषधं तयार केली जात असंत. सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( Central Research Institute of India) या ठिकाणी ही औषधे तयार केली जातात.
X X
सर्पदंश कसे टाळावे :
दरवर्षी जगामध्ये 46 हजारापेक्षा जास्त माणसे सर्पदंशांनी मरतात. सापांचा वावर हा साधारणतः दाट जंगल झाडी, डोंगरकपारी, शेतातील गवतात, सरपण ,लाकडे,रस्त्यावरील ओडके, दगडाच्या खाली, घरातील अनावश्यक वस्तूंच्या ढिगार्यात, वीट, फरशा यांच्या खाली, थंड जागेमध्ये, बागेतल्या झाडांच्या फांद्यावर, वेलीवर इत्यादी ठिकाणी साप आढळतात. त्यामुळे आपण वावरत असताना काळजी घ्यावी. डोंगरकपारी हातपाय न धालने. शेतात काम करत असताना, गवत कापत असताना होणारी हालचाल यावरून, सरपण, अनेक ठिकाणी होतात रस्त्यावरील ओडके दगड आपण ओलांडतो. त्यावर पाय ठेवतो ते टाळले पाहिजे. अनवाणी पायाने बूट न घालता मोठ्या प्रमाणात जंगलामधून किंवा गवतामधून पायी जाणे हे टाळले पाहिजे. आपल्या घरातील खरकटे अन्न दूर फेकणे. ज्यामुळे उंदीर येणार नाही आणि उंदीर आला तर त्याला खाण्यासाठी साप येतो. त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होतो, हे सर्व टाळले पाहिजे. शेतामध्ये सरपण ,लाकडे गोळा करताना काळजी घेतली पाहिजे.
X X
साप अंधश्रद्धा समज गैरसमज :
समाजामध्ये असा गैरसमज आहे की, नागाजवळ नागमणी असतो. पण प्रत्यक्षात नागमणी हा नसतो. बेनझाईनचे खडे करून लोक विकतात आणि गैरसमज पसरवतात.
सापाला कान नाहीत त्यांना ऐकू येत नाही. गारुड्याच्या पुंगीच्या हालचालीवरून तो संरक्षणासाठी लक्ष ठेवतो. पण तो ध्वनी त्वचेने ग्रहण करतो. जबड्याच्या खालच्या हाडापासून एक हाद्दी आत शेवटपर्यंत असते. त्याला अंतरकर्न म्हणतात. त्यामुळे जमिनीतले आवाज व त्याची दिशा त्याला अचूक कळते.
सर्पदंश झाल्यास त्याला वेगवेगळ्या बुवा बाबांकडे घेऊन गेल्या जाते पण सर्प दंशावर प्रतिसर्पविष अँटिव्हेनम हे एकमेव औषध आहे. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तात्काळ आणि लवकरात लवकर दवाखान्यांमध्ये दाखल करणे गरजेचे असते.
सापाला दूध पाजवतात कारण सस्तन प्राण्याचे दूध हे अन्न नाही. तो भक्ष पकडूनच गिळंकृत करतो.
हरणटोळ नावाचा डोक्याला चावा घेतो असा गैरसमज पसरवला जातो तसे काही नसते.
सापाच्या संरक्षणासाठी कायदा :
पर्यावरणातील सर्प हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. अन्नसाखळीमध्ये त्याचा खूप मोठा वाटा असल्यामुळे त्याचे संरक्षण व्हावे व अन्नसाखळी टिकून राहावी. यासाठी शासकीय पातळीवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अमलात आणला आणि या कायद्याच्या अंतर्गत सापांचे संवर्धन संरक्षण आणि व्यवस्थापन व्हावे हा उद्देश या पाठीमागचा आहे. जर एखाद्या व्यक्तीने साप मारल्यास त्याला 6 वर्षाची शिक्षा ही होऊ शकते अशी कायद्यात तरतूद केलेली आहे. तसेच शासनाच्या 1975 च्या निर्यात धोरण या कायद्याअंतर्गत वन्यजीवांचे उत्पादन करण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे सापांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.
X X
नागपंचमी उत्सव :
साप हा निसर्ग मित्र किंवा मानव मित्र जरी असला तरी हिंदू संस्कृतीमध्ये त्याला देवताचे स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागदेवतेची पूजा केली जाते आणि मोठ्या उत्साहात भारतात आणि भारताच्या बाहेरील काही देशात हा सण साजरा होतो. महाराष्ट्रातील परभणी गंगाखेड येथील श्री क्षेत्र हरंगुळ या ठिकाणी नागपंचमीनिमित्त यात्रा ही तीन दिवस असते. या यात्रेसाठी नागपंचमीच्या उत्सवासाठी राज्यातून आणि परराज्यातून अनेक भाविक येतात.
नागमंचमी उत्सवात झोके बांधले जातात, पारंपारिक गाणी म्हणली जातात,पारंपरिक खेळ खेळले जातात आणि विशेषता नागपंचमीला मुलींचा सण सुद्धा असे म्हणतात. काही मुली आपल्या सासर होऊन माहेरी येतात. झोके खेळून गाणी म्हणून टिपऱ्यांचा महोत्सव साजरा करून वेगवेगळी वेशभूषा व त्यातून मिरवणूक करून हा सण आनंदात साजरा केला जातो. भारतामध्ये नागदेवतेचे अनेक मोठमोठे मंदिरे आहेत भाविक अन्नदान करतात, महिला रिंगण करून गाणे गातात अशा पद्धतीने हा सहन भारतामध्ये साजरा केला जातो.
X X
X X
View, Comments and share
1 Comments
nice
ReplyDelete