June 4 - Day of Special (Dinvishesh)
जुन 4 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
राष्ट्र सेवादल दिवस
हुतात्मा दिन
विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
4 जून हा दिवास फिनलंड या देशात सेनादिन म्हणून साजरा केला जातो.
4 जून हा दिवास टोंगा या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
X X
4 जून 1039 रोजी हेन्री तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी विराजमान झाला.
4 जून 1674 रोजी मराठा साम्राज्य – राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
4 जून 1792 रोजी कॅप्टन जॉर्ज व्हॅनकूवरने प्युजेट साउंड हा अखात ग्रेट ब्रिटनच्या नावे जाहीर केला.
4 जून 1794 रोजी ब्रिटिश सैन्याने हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिंस जिंकली.
4 जून 1804 रोजी आपल्या पत्नीच्या मृत्यूने व्यथित असलेल्या सार्डिनियाच्या राजा चार्ल्स इम्मॅन्युएल चौथ्याने पदत्याग केला. त्याचा भाऊ व्हिक्टर इम्मॅन्युएल राजेपदी विराजमान झाला.
X X
4 जून 1862 रोजी अमेरिकन यादवी युद्ध – दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट पिलोतून पळ काढला. उत्तरेने मेम्फिस, टेनेसीवर चाल केली.
4 जून 1876 रोजी न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी 83 तास 39 मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
4 जून 1878 रोजीऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
4 जून 1896 रोजी हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण करण्यात आले.
4 जून 1912 रोजी मॅसेच्युसेट्स कामगारांचा लघुत्तम पगार ठरवणारे पहिले अमेरिक राज्य झाले.
4 जून 1920 रोजी ट्रायानॉनचा तह झाला.
X X
4 जून 1928 रोजी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष झ्हाँग झुओलिनची हत्या करण्यात आली.
4 जून 1926 रोजी अमेरिकन उद्योगपती व ईस्टमेन कोडक कंपनीची संस्थापक जॉर्ज ईस्टमैन यांनी पहिल्या रंगीत चित्रपटाचा नमुना सादर केला.
4 जून 1939 रोजी ज्यूंचे शिरकाण – युरोपमधून 963 ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली. यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.
4 जून 1940 रोजी दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले होते.
4 जून 1942 रोजी दुसरे महायुद्ध-मिडवेची लढाई सुरू झाली.
4 जून 1943 रोजी आर्जेन्टिनामध्ये लश्करी उठाव, रमोन कॅस्टियोची हकालपट्टी करण्यात आली.
4 जून 1944 रोजी अमेरिकेच्या हंटर किलर प्रकारच्या पाणबुड्यांनी जर्मनीची यु-505 ही पाणबुडी पकडली होती.
4 जून 1944 रोजी दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले होते.
X X
4 जून 1959 रोजी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय नागरिक सी राजगोपालचारी यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
4 जून 1967 रोजी ब्रिटिश मिडलँड विमान कंपनीचे विमान कोसळले. विमानातील 72 प्रवासी ठार झाले.
4 जून 1970 रोजी टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
4 जून 1979 रोजी घानामध्ये लश्करी उठाव करण्यात आला.
4 जून 1989 रोजी आयातोल्ला रुहोल्लाह खोमेनीच्या मृत्यूनंतर आयातोल्ला अली खामेनेई इराणच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
4 जून 1993 रोजी आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण करण्यात आले.
4 जून 1994 रोजी मजरुह सुलतानपुरी – यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
4 जून 1994 रोजी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटु ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
X X
4 जून 1997 रोजी इन्सॅट-२डी – या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
4 जून 1997 रोजी नासाचे मार्स पाथफाइंडर प्रोब मंगळावर उतरले होते.
पाथफाइंडर प्रोब
4 जून 2001 रोजी नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर विराजमान झाला.
4 जून 2008 रोजी हरियाणा राज्य सरकारकडून 25 वर्षांखालील मुलींना कौटुंबिक पेन्शनचा लाभ जाहीर करण्यात आला.
4 जून 2010 रोजी स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट – पहिले उड्डाण केले.
4 जून 2016 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आश्रम घणी यांनी अफगाणिस्तानमध्ये हरीरुद्र /चीस्त ए शरीफ नदीवर भारताने 1700 कोटी रुपये खर्च करून सलमा आहे धरण बांधले. या धरणाचे नामकरण अफगान भारत मैत्री धरण असे करण्यात आले त्याचे उद्घाटन झाले. या धरणातून 42 मेगावॅट जलविद्युत निर्मिती व 75 हजार हेक्टर शेतीस जलसिंचन केले जाणार आहे. हे धरण अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतात उभारले आहे.
4 जून 2016 रोजी जगातील प्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांचे अमेरिकेत निधन झाले. ते अमेरिकेतील कृष्णवर्णीय बॉक्सर होते ते जन्माने ख्रिश्चन होते .नंतर त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला." द ग्रेटेस्ट "हे त्यांचे आत्मचरित्र त्यांना " पार्किन्सन्स " हा आजार होता .त्यांचे मूळ नाव कॅशियस क्ले ज्युनियर होते.
4 जून 1738 रोजी इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 29 जानेवारी 1820 मध्ये झाला होता.
4 जून 1904 रोजी भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी पद्मश्री भगत पूरण सिंग त्यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 ऑगस्ट 1992 मध्ये झाला.
4 जून 1910 रोजी होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 जून 1999 मध्ये झाला.
4 जून 1915 रोजी माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 मे 1977 मध्ये झाला.
X X
4 जून 1916 रोजी अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट एफ. फर्चगॉट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 19 मे 2009 मध्ये झाला.
रॉबर्ट एफ. फर्चगॉट
4 जून 1931 रोजी भारतीय रंगहीन हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्या बिना राय यांचा जन्म झाला.
4 जून 1936 रोजी चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 फेब्रुवारी 1991 मध्ये झाला. 21 फेब्रुवारी 1991 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नूतन बहल हिचा मृत्यू झाला. तिचा जन्म 4 जून 1936 रोजी मुंबईत झाला होता. दिग्दर्शक आणि कवी कुमार सेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या त्या थोरल्या कन्या होत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी 1952 मध्ये त्यांनी मिस इंडिया हा किताब जिंकला. 1945 मध्ये जनक पिक्चरच्या बॅनरखाली आणि वडील कुमार सेन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या नल दमयंती या चित्रपटाद्वारे त्यांनी बालकलाकार म्हणून पडद्यावर पदार्पण केले. तिचा 1950 मध्ये आलेला पहिला सिनेमा हमारी बेटी हा होता. त्यांना 1955 मध्ये रिलीज झालेला सीमा या चित्रपटात सुधार गृहातील कैद्याची भूमिका साकारली होती त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन आणि मै तुलसी तेरे आंगन की या पाच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यकर्तीबद्दल 1974 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
4 जून 1931 रोजी भारतीय रंगहीन हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्या बिना राय यांचा जन्म झाला.
4 जून 1936 रोजी चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 फेब्रुवारी 1991 मध्ये झाला. 21 फेब्रुवारी 1991 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नूतन बहल हिचा मृत्यू झाला. तिचा जन्म 4 जून 1936 रोजी मुंबईत झाला होता. दिग्दर्शक आणि कवी कुमार सेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या त्या थोरल्या कन्या होत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी 1952 मध्ये त्यांनी मिस इंडिया हा किताब जिंकला. 1945 मध्ये जनक पिक्चरच्या बॅनरखाली आणि वडील कुमार सेन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या नल दमयंती या चित्रपटाद्वारे त्यांनी बालकलाकार म्हणून पडद्यावर पदार्पण केले. तिचा 1950 मध्ये आलेला पहिला सिनेमा हमारी बेटी हा होता. त्यांना 1955 मध्ये रिलीज झालेला सीमा या चित्रपटात सुधार गृहातील कैद्याची भूमिका साकारली होती त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन आणि मै तुलसी तेरे आंगन की या पाच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यकर्तीबद्दल 1974 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
नूतन बहल
4 जून 1946 रोजी भारतीय चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक तथा पद्मभूषण, पद्मश्री एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म झाला त्यांचे निधन 25 सप्टेंबर 2020 मध्ये झाले.
4 जून 1946 रोजी भारतीय चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक तथा पद्मभूषण, पद्मश्री एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म झाला त्यांचे निधन 25 सप्टेंबर 2020 मध्ये झाले.
4 जून 1947 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी चित्रपट सृष्टीतील व नाट्यसृष्टीतील तथा हिंदी चित्रपटातील लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म झाला.मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला.गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या.लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला.चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोकमामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी मी बहुरूपी हे आत्मचरित्र लिहिले आहे.ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.1' हे अशोक सराफ यांचे काही उल्लेखनीय चित्रपट.अशोक सराफ यांनी बँकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने अशोक सराफ यांना 2024 सालचा जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. 14 जून 2024 रोजी यशवंतराव चव्हाण संकुल, माटुंगा- माहीम येथे गो. ब. देवल पुरस्कार या समारंभात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
अशोक सराफ
4 जून 1974 रोजी भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 नोव्हेंबर 2012 मध्ये झाला.
4 जून 1974 रोजी भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 नोव्हेंबर 2012 मध्ये झाला.
4 जून 1975 रोजी अमेरिकन चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म झाला.
4 जून 1990 रोजी जेत्सुन पेमा वांग्चुक, भूतानाची राणी तिचा जन्म झाला.
4 जून 1918 रोजी प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कवी व भाषांतरकार रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचे निधन झाले.
X X
4 जून 1947 रोजी बौद्ध धर्माभ्यासक, पंडितधर्मानंद दामोदर कोसंबी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला होता.
4 जून 1962 रोजी अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब (चित्रित) याचा मृत्यू झाला.
4 जून 1998 रोजी भारतातील सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अश्विन दासगुप्ता यांचे निधन झाले.
4 जून 2014 रोजी अमेरिकन बेसबॉल खेळाडू, व्यवस्थापक आणि मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) चे प्रशिक्षक डॉन झिम्मर यांचे निधन झाले.
4 जून 2015 रोजी सकू सुप्रसिद्ध अमेरिकन विन्स्टन चषक मालिका कार रेस ड्रायव्हर जबे थॉमस यांचे निधन झाले.
4 जून 2020 रोजी भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बासु चटर्जी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1930 मध्ये झाला होता.
4 जून 2024 रोजी भारताच्या लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या नंतर त्या निवडणुकींचा निकाल लागला. त्यामध्ये एकूण 543 जागांसाठी 543 मतदारसंघात उमेदवार उभे होते. त्यात भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मिळून (एनडीए) 294 जागा जिंकल्या. (भाजपाला 239) आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्र पक्ष (इंडिया) यांना 231 जागा मिळाल्या. (काँग्रेस पक्ष 99) इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 18 उमेदवार निवडून आले. लोकसभेसाठी महाराष्ट्रात एकूण 48 मतदार संघात 48 उमेदवार उभे होते. त्यामध्ये भाजपने 9 जागा जिंकल्या. शिवसेना शिंदे गट यांनी 7 जागा जिंकल्या. अजित पवार राष्ट्रवादी गट यांनी 1 जागा जिंकली. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 9 जागा जिंकल्या. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी 8 जागा जिंकल्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 13 जागा जिंकल्या. इतर अपक्ष उमेदवार 1 महाराष्ट्रामध्ये निवडून आला.
भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत एकूण ४८ मतदारसंघांमध्ये विजयी झालेले उमेदवार.
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर - शिंदे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग बप्पा - शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
X
X
👆
June 3 - Day of Special (Dinvishesh)
जुन 3 : दिनविशेष
www.insearchofknowledge.org
👆
Visit
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधीX
X
X
X
X
X
View, Comments and share
0 Comments