वने व प्राणी या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी माझी भूमिका
My role in protecting the wildlife of forest and animals
( Wildlife Protection Week)
2 -8 ऑक्टोबर 2024
"सहजीवनाद्वारे वन्यजीव संरक्षण"2024
"आमच्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणे 2024"
"Partnership with Wildlife Protection 2023"
भारत हा वनांचा देश आहे या ठिकाणी भरपूर प्रमाणात मुबलक अशी वनसंपदा उपलब्ध आहे. या वनसंपदेचा उपयोग पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी होत असतो. निसर्ग चक्रानुसार या वनांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा संपूर्ण सजीवसृष्टीला मिळतो व त्यातून सजीव सृष्टी मध्ये असणाऱ्या ज्या काही जे काही चक्र आहेत ते चक्र व्यवस्थित पूर्ण होतात व सजीव सृष्टीमध्ये असणारे जे काही प्राणी वनस्पती आहेत .त्यांचे जीवन व्यवस्थित निसर्गाचे संतुलन राखत अन्नाची उपलब्धता होत असते. भारतामध्ये 600 पेक्षा जास्त वन्यजीव अभयारण्य आणि 106 राष्ट्रीय उद्याने आहेत. भारतात जिम कॉर्बेट काझीरंगा आणि रणथंबोर यासारखे राष्ट्रीय उद्याने आपल्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे भारतीय गेंडा हेमतेंद्वाआ यासारख्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वन्य जीव सप्ताह हा वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून राबवला जातो. 2024 ची थीम ही "सहजीवनद्वारे वन्यजीव संरक्षण" वन्यजीवांसमोरील गंभीर आव्हाने या अमूल्य संसाधनांचे जतन करण्यासाठी ही एक सामूहिक कृतीची तातडीची गरज आणि त्याबद्दलची जागरूकता प्रत्येक नागरिकांमध्ये राबवणे ही काळाची गरज आहे. हा केवळ एक राष्ट्रीय उत्सव नसून प्रत्येक व्यक्तीने आपले नाते निसर्गाशी जोडले पाहिजे. त्यावर विचार केले पाहिजे चिंतन करून वन्ययजीवांच्या संरक्षणासाठी कृतिशील पाहुणे उचलणे गरजेचे आहे. या वन्ययजवांचा सन्मान करून येणाऱ्या आपल्या पुढील पिढीसाठी एक नैसर्गिक वर्षाचे रक्षण करण्यासाठी आपण वचनबद्ध राहण्यासाठी ही आपल्याला एक खूप मोठी संधी आहे. त्यामुळे त्याची जागरूकता शिक्षण आणि सामुदायिक सहभाग याद्वारे आपण भारताच्या वन्यजीवांचे भविष्य उज्वल आणि सुनिश्चित करू.
X X
राष्ट्रीय वन्य जीव सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे ह्या जगातील जे पर्यावरण आहे जीवन आहे. त्यामधील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करणे व त्यांचे संवर्धन करणे हा उद्देश सफल करण्यासाठी अशा कार्यक्रमांचा आयोजन केल्या जातं. 1997 मध्ये पहिला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला आणि त्यानंतर 1955 मध्ये वन्यजीव दिन साजरा केला गेला. यावर्षी युनायटेड नेशन यांनी जी थीम दिली ही आहे . "वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी 2013" "Partnership with Wildlife Protection 2023" या सप्ताहाच्या निमित्ताने पशुंचे आणि वनस्पतींचे संरक्षण करण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी निरीक्षण करणे परिसंवाद आयोजित करणे, परिषदांचे आयोजन करणे कार्यशाळा, व्याख्यानांचा आयोजन करणे किंवा या सप्ताहाच्या निमित्ताने लोकांमध्ये शिक्षणाची प्रगती झाली पाहिजे शैक्षणिक प्रगती आणि त्याचे प्रशिक्षण हे आवश्यक आहे. ही संकल्पना 1952 मध्ये जेव्हा भारतीय वन्यजीव मंडळाची स्थापना झाली आणि या मंडळाच्या माध्यमातून असा अहवाल दाखल करण्यात आला, की धोक्यात आलेल्या आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या रक्षणासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट स्थापन करून यावर काम करण्याची खूप आवश्यकता आहे. म्हणून 1956, 1972 वन्यजीव अधिनियम कायदा तयार करण्यात आला कारण आपल्या भारतीय पुरातन संस्कृतीमध्ये मानव व वन्यजीवात मैत्री असणे ही पृथ्वीची गरज आहे. ही गरज आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अशा कार्यक्रमांची संरक्षणाची आणि संवर्धनाची नितांत गरज आहे. माणूस हा नैसर्गिक रित्या पाहिलं तर तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे म्हणजे तो या निसर्गसृष्टीतला ग्राहक आहे. तो उत्पादक नाही मानवाला अन्न व प्राणवायूसाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. म्हणून माणूस जेव्हा वनस्पती सारखे स्वतःचे अन्न जेव्हा स्वतः तयार करील तोपर्यंत तरी त्याच्या स्वार्थीपणामुळे तरी किमान या वनसंपदेचा या जीवनाचा निसर्गाचे रक्षण करणं त्याचं जतन करणं त्याचा संवर्धन करणं ही विविध अभयारण्य राष्ट्रीय उद्याने वनक्षेत्र संरक्षित करून त्यावर काम करणे अतिशय गरजेचे आहे.
X X
जगामध्ये एकूण पंचवीस संपन्न प्रदेश आहे ज्याला आपण हॉटस्पॉट म्हणतो .त्यातील महत्वपूर्ण तीन हॉटस्पॉट व संपन्न अशी ठिकाणे भारतामध्ये आहेत. ती साधारणत ईशान्य भारत, पश्चिम घाट आणि अंदमान आणि निकोबार द्वीपसमुह यावर मुबलक आणि भरपूर प्रमाणात प्राण्यांची आणि वनस्पतींची जैविक विविधता आपल्याला पाहायला मिळते .कारण जैविक विविधता ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी असून मानवाच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे. मानवाच्या सभोवताली विविध प्रकारच्या वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो आणि या सर्व सजीवांचा आकार-प्रकार ,संरचना यामध्ये भिन्नता दिसून येते तरी देखील एका विशिष्ट वातावरणात विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या संख्येचे सजीव दिसून येतात सजीवांच्या या एकत्रित अधिवासास आज आपण जैविक विविधता असं म्हणतो. जैविक विविधता ही पर्यावरणाचा आत्मा असून वन व वन्यजीव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे संतुलित पर्यावरणासाठी जैवविविधतेचे संरक्षण करणे ही सध्या काळाची गरज आहे. वाढती लोकसंख्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर वृक्षतोड भूमीच्या वापरात होत जाणारे बदल यामुळे सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत व बऱ्याच प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर सुद्धा आहे. सध्या जैवतंत्रज्ञान हे शास्त्र विकसित झालेले असून यामुळे मानवाला हवे ते अनुवंशिक बदल घडवून आणता येत आहेत. पारंपारिक पैदास पद्धतीने जे शक्य नव्हते ते तंत्रज्ञानाने शक्य केले आहे.म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या जातीतील जनुकांची आदलाबदल ही या तंत्रज्ञानाने आज शक्य झाली आहे.
जैविक विविधतेच्या प्रकारांमध्ये आनुवंशिक विविधता ,प्रजातींची विविधता ,परिसंस्था विविधता अशा प्रकारांमध्ये त्याची विभागणी केली जाते आणि त्याचा अभ्यास या शास्त्रांमध्ये केला जातो . एकाच जातीच्या समूहामध्ये एकच प्रकारचा जनुक आढळतो. त्यामुळे एकाच जातीच्या प्राण्यांमध्ये साम्य दिसून येते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचा अधिवास ही एकच असतो. परंतु अशा अधिवास पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढल्यास अनेक सजीव त्या ठिकाणी गोळा होतात. त्यात इतर अधिवासात आननाले सजीव ही असतात. सजीव घटक व पर्यावरणातील घटक यांच्यातील क्रमबद्ध आंतरक्रिया यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजेच परिसंस्था अशी आपण ढोबळमानाने व्याख्या करतो आणि या प्रत्येक परिसंस्थेमध्ये पर्यावरण अधिवास व त्यातील सजीव प्रजातींचे प्रकार ठराविक असतात. या परिसंस्थेच्या बदलाबरोबर हे सर्व घटकही बदलतात. त्यामुळे याला परिसंस्थेतील विविधता सुद्धा असे म्हणतात.
X X
जैविक विविधतेचा आपल्याला काय महत्त्व आहे. तर मानव प्राचीन काळापासून वनस्पती आणि प्राण्यांच्या शोषण करत आलेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मानवाच्या जीवनामध्ये ज्या उपयोगाच्या वस्तू आहेत त्या अनेक वस्तू प्राणी जगतावर अवलंबून आहे. या विविधतेतून मानवाने स्वतःसाठी खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यात्मक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्व आहे. म्हणजे उपभोगता उत्पादकता सामाजिकता आणि व्यवहारिक तिच्या दृष्टीनं अतिशय महत्त्व या जैविक विविधतेचा आहे.
आपल्या भारतामध्ये नैसर्गिक साधन संपदा जी आहे त्यात वनसंपदा ,वन्यजीव संपदा त्यातील मानवाने वनसंपदेचे प्रत्यक्ष उपयोग शेतीची अवजारे असतील वाहने, इंधन म्हणून लाकडाचा वापर कोळसा व त्यापासून वीजनिर्मिती, घरबांधणीसाठी, कागद तयार करण्यासाठी असा केला आहे. या वनसंपदेचा अप्रत्यक्ष उपयोग हा हवामान थंड राहण्यासाठी, पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी, जलसंवर्धनासाठी आणि धूप नियंत्रणासाठी होत असतो .त्याबरोबरच जंगलामध्ये पशुपक्ष्यांना संरक्षण व त्यांना अभय मिळत असते. ही वनसंपदा म्हणजे वन्यजीवांची आश्रयस्थाने आहेत.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी ज्या वनसंपदेचा नैसर्गिक रित्या वापर होतो. त्या वनांचा ऱ्हास होत आहे आणि यासाठी कारणीभूत नेमकी कोणता घटक आहेत तर पर्यावरणातील तापमान वाढलेला आहे .ज्याला आपण ग्लोबल वार्मिंग असे म्हणतो. वातावरणात हरितगृह वायूचे प्रमाण वाढले आहे. वाहनातून आपण जीवाष्म इंधन वापरतो त्यामुळे त्यातून कार्बन डायऑक्साइड ,कार्बन मोनॉक्साइड सारखे घातक वायू बाहेर पडत आहेत. तेल शुद्धीकरण कारखान्यातून किंवा रासायनिक कारखान्यातून वेगवेगळी वायू बाहेर पडतात. शीत गृहामध्ये तयार होणारा क्लोरोफ्ल्युओरोकार्बन हा बाहेर पडतो. दगडी कोळसा आणि खनिज तेल उत्पादनातून नायट्रोजन ऑक्साइड बाहेर पडतो. जगामध्ये अणू चाचण्या घेतल्या जात आहेत .त्यामुळे तापमानाचा प्रमाण हे अतिशय जास्त वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून व अन्य वायुमुळे ओझोनच्या ठरला छिद्र पडत आहेत .त्यामुळे या वाढत्या तापमानामुळे वनस्पती व प्राण्यांच्या जाती नामशेष होत आहेत. काही प्रजातींचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे .बिघडत आहे व यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
X X
वन्यजीवांच्या जैवविविधतेमध्ये भारताचे 1867 मध्ये हूकर आणि थामसन या अभ्यासकांनी दहा वीभागांमध्ये विभागणी करून पश्चिम हिमालय, पूर्व हिमालय, वाळवंटी भाग ,गंगेचा मैदानी भाग, पश्चिम घाट ,दख्खनचा भाग, पूर्वांचलचा भाग, समुद्रकिनाऱ्यावरील भाग आणि द्वीपसमूह वरील भाग असे विभाग ने केली आणि या वेगवेगळ्या भागात तेथील वातावरणानुसार त्या ठिकाणी असणाऱ्या वनसंपदा नुसार ठराविक ठिकाणी विविध प्रकारचे ठराविक प्राणी आणि वनस्पती यांची वाढ होते. त्यांचे जीवन चक्र त्या वातावरणामध्ये व्यवस्थित आणि सुरळीत चालतं. म्हणजे आपणास एक शिंगी गेंड्याची प्रजाती पाहण्यासाठी काझीरंगा अभयारण्य आसाम या ठिकाणी भेट द्यावी लागेल. हिमालया चित्ता पाहायचा असेल तर हिमाचल प्रदेश मध्ये जावे लागेल. नील माकडे पाहायचे असेल तर निलगिरी जंगलात जावे लागेल .अशा प्रकारच्या ठराविक प्रजाती ठराविक ठिकाणी ठराविक विभागांमध्ये वाढतात व आपले वास्तव्य करून राहतात .जर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले तर त्या ठिकाणी वेगळ्या वातावरणात या वनस्पती वाढणार नाही किंवा प्राणी आपल्या जीवन सुरळीत जगणार नाहीत. मग ही देशातील जैविक विविधता आणि वेग वेगळे जैविक विविधतेचे विभाग यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो. तेव्हा असे लक्षात येते की, ज्या भागात मोसमानुसार ज्या वनस्पती व प्राणी आपलं जीवन जगताप त्यांना त्या ठिकाणाहून स्थलांतरित न करणे व त्यांचे त्याच ठिकाणी संरक्षण आणि संवर्धन केले तर त्यास आपण मूलस्थानी संरक्षण असे म्हणतो. ते त्यांचे तिथेच करणे कारण वन्य प्राण्यांच्या प्रजाती आणि वनस्पतींच्या प्रजाती ह्या संरक्षित राहतील व त्याचे संवर्धन करणे सोपे होईल. त्यांचे परस्थांनी संरक्षण संवर्धन करणे अवघड आहे जे प्राणी आणि वनस्पती वर परस्थानी संरक्षित होऊ शकतात त्यांनाच त्याठिकाणी ठेवणे उचित असते. कारण ज्या विभागाचा आपण अभ्यास करतो त्या परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटकांना खूप मोठे महत्त्वाचे स्थान आहे .कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसंस्था आपल्याला पाहायला मिळतात. भू परिसंस्था ,जल परिसंस्था ,गवताळ परिसंस्था, वाळवंटी परिसंस्था या ठिकाणी अजैविक आणि जैविक घटक घटक मिळून आपलं जीवन चक्र त्या ठिकाणी व्यतीत करतात ही अन्नसाखळी सुरळीत राहिली तरच वनस्पती आणि वन्य प्राणी हे जिवंत राहतील अन्यथा साखळी मधला एकही घटक जर नष्ट झाला तर संपूर्ण अन्नसाखळीत बाधा निर्माण होते व पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ही पर्यावरणाचे संतुलन नीट ठेवायचे असेल सुरळीत ठेवायचे असेल तर आपल्याला अन्नसाखळी ही संरक्षित करावी लागेल.
X X
भारतात 45000 वनस्पती आणि प्राणी यांच्या अंदाजे 8100 प्रजाती ह्या अभ्यासलेलल्या आहेत. देशात वनस्पती आणि वन्य प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काही उद्यानांची निर्मिती केलेली आहे. काही अभयारण्य आहेत .काही राखीव वनक्षेत्र आहे .प्राणी संग्रहालय आहेत, वनस्पती गार्डन निर्माण केलेली आहेत. या सर्वांची निर्मिती त्याचे संरक्षण आणि संवर्धन यामध्ये वास्तव्य करणाऱ्या वन्य प्राण्यांचा आणि वनस्पतींचे संवर्धन वन विभागाच्या माध्यमातून नियमित होत असते. त्यासाठी काही सेवाभावी संस्था हे काम करण्यासाठी पुढे येत आहेत मेक अर्थर फाउंडेशन ही पहिली संस्था व अशा अनेक संस्था जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतात 8100 प्रजाती पैकी 1500 प्राण्यांच्या प्रजाती या संकटात आहे. जगाच्या क्षेत्रफळापैकी भारताचे वनक्षेत्र हे दोन टक्के आहे आणि जगातील एकूण जीवजंतू पैकी 65 टक्के हे भारतामध्ये निवास करतात.
भारतातील या जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज का निर्माण झाली 1972 मध्ये स्टॉकहोम या ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषद झाली पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे .प्रदूषणाची वाढ झालेली आहे .तापमानाची वाढ झालेली आहे. ओझोनचा थर नष्ट होत आहे. असे अनेक विषय या परिषदेमध्ये घेण्यात आले व त्यानंतर ब्राझीलची राजधानी रिओडी जानेरो याठिकाणी 1992 मध्ये वसुंधरा शिखर परिषद संपन्न झाली. जैविक विविधतेचे संरक्षण संवर्धन करण्याची गरज आहे कारण पर्यावरणाचा रहास चालू आहे. पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे. त्यासाठी 2010 हे वर्ष जैविक विविधता वर्ष म्हणून साजरे करण्यात आले आणि 22 मे हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस म्हणून साजरा करतो .यासाठी निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून परिसंस्थेतील अन्नसाखळी नीट चालले पाहिजे. तरच सजीव सृष्टी संतुलित राहील. तसेच जनुक बँक ही संकल्पना सुद्धा गरजेपोटी निर्माण झाली नवीन संकरित जात तयार करण्यासाठी महत्त्वाचे संवर्धन माध्यम म्हणून याकडे पाहिले जाते. त्यासाठी जैवतंत्रज्ञान वापरून संरक्षण व संवर्धन केले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय उद्याने अभयारण्य वने प्राणी संग्रहालय यांना शैक्षणिक सहलीतून भेटी देणे संरक्षित व संवर्धन करणारे प्राणी आणि वनस्पती यांचे निरीक्षण आणि अभ्यास यातून मिळेल व विद्यार्थ्यांचे आणि पर्यटकांचे या जंगलातून विहार करताना वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती लोकांना आकर्षित करतील त्यांचं मनोरंजन होईल. या मनोरंजनातून सुद्धा खूप मोठा ज्ञानार्जन घडेल वेगवेगळे पशुपक्षी वेगवेगळी फुलांची जाती असतील वनस्पतीचे प्रकार अशा सहली मधून आपल्याला पाहायला मिळेल. हे एक खूप मोठे प्रबोधनाचे माध्यम आहे. संरक्षण आणि संवर्धनाचा सुद्धा खूप मोठा साठा जतन करून ठेवता येईल.
वनांचे आणि वन्य जीवांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने विभागाची स्थापना करून या जंगलांचा आणि वन्यजीवांचा त्रास होऊ नये .ती संरक्षित व्हावी त्यासाठी काही कायदे तयार केले. त्यामध्ये वनसंवर्धन कायदा 1980 पासून लागू करण्यात आला. यामध्ये जंगल तोडी वर नियंत्रण आणि जंगलांचे संवर्धन व्हावं ज्या जमिनीची नोंद जंगल म्हणून झाली तिचा उपयोग दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी होऊ नये. म्हणजे शहरीकरण, औद्योगीकरण यासाठी म्हणजे केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कुठलाच फेरफार यामध्ये करता आला नाही पाहिजे. तसेच वन्य जीव संरक्षण कायदा 1972 व 1991 मध्ये तयार करण्यात आला. या कायद्याअंतर्गत जंगलातील वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्या त्या स्थानिक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात या कायद्याअंतर्गत वेगळी सल्लागार मंडळी असावी. त्यामध्ये पर्यावरण तज्ञ, प्राणी तज्ञ, हवामान तज्ञ व इतर अभ्यास अभ्यासक व काही सेवाभावी संस्थेचे सदस्य असावेत व त्यामुळेही अभयारण्य ही राष्ट्रीय उद्यान व त्यात असणारे जे काही वन्य प्राणी, पशुपक्षी आहेत यांच्या शिकारीवर बंदी घालने. प्राण्यांची हत्या करून त्यांच्या व्यापारावर बंदी, प्रतिबंध करणे व संकटग्रस्त प्राण्यांच्या जाती आणि प्रजाती ह्या संरक्षित करणे यासाठी सल्लागार मंडळीची , वनविभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडले जाते.
आज भारतामध्ये वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने व स्थानिक राज्य सरकारने जी राष्ट्रीय अभयारण्य राष्ट्रीय उद्याने व स्थानिक उद्याने प्राणी संग्रहालय यांची निर्मिती केली. काही वने राखीव ठेवली त्यामुळे आता गरज नेमकी काय आहे. तर या वन्य प्राण्यांचं संरक्षण व संवर्धन करणे कारण पृथ्वीवर असे काही प्राणी नष्ट झाले ज्या प्राण्यांची कुठेही नोंद नाही .कुठल्याही अभ्यासकांना त्या प्राण्याला पाहिलेले नाही. पण जे प्राणी ज्ञात आहेत ज्या प्राण्यावर संशोधन, निरीक्षण झालेला आहे. अशा प्राण्यांना तरी आपण संरक्षित कराव. त्याचं संरक्षण करावं. ही काळाची गरज आहे .
X X
औद्योगिकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठी जंगल कटाई होत आहे. त्यामुळे त्या वनांमध्ये असणारी जी काही वनस्पती आहे. त्यासुद्धा प्रजाती नामशेष होत आहेत. कारण वनस्पती या उत्पादक आहेत. तसेच नैसर्गिक हवेचे शुद्धीकरण करणारी ही यंत्रे सुद्धा आहेत. म्हणून अशा नष्ट होणाऱ्या वनस्पतींना संरक्षीत करावं हीसुद्धा आपली महत्वपूर्ण जबाबदारी आहे.
वन्यजीव सप्ताह साजरे करणे म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. कारण एका सप्ताहामध्ये कुठल्याही वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या संवर्धनासाठी चा कालावधी पूर्ण होऊ शकत नाही. कारण हजारो वर्षापासून या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. पर्यावरणाचे संतुलन मानवाने त्याच्या स्वार्थासाठी अन्नासाठी, प्राण्यांच्या हत्या केल्या शिकारी केल्या पैसा कमावण्यासाठी प्राण्यांची शिंगे ,कातडी ,नखे, हस्तीदंत यांचा व्यापार केला. वनस्पती पासून मिळणारे जे काही पदार्थ आहेत त्यात मध, डिंक, मसाल्याचे पदार्थ, फळे, औषधी वनस्पती त्यांचा व्यापार केला. त्यामुळे नष्ट होणारी नैसर्गिक साधनसंपदा हीच संरक्षण करणे पहिलं माझं कर्तव्य आहे. ही भावना जोपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये येत नाही .तोपर्यंत समूहामध्ये ही भावना येणार नाही. जर समूहामध्ये भावना निर्माण झाली तर संपूर्ण राज्य आणि देश इतकच नव्हे तर जगातील सजीव सृष्टी सुरळीत व्हायला, संतुलित हायला वेळ लागणार नाही आणि हे काम सप्ताहाचे नसून अखंडपणे चालू ठेवणे गरजेचे आहे. तरच आपण एक समृद्ध जैवविविधता येतो विविधतेत वास्तव्य करून राहू आनंदी राहू स्वच्छंद पर्यावरणाचा आनंद घेऊन निरोगी आणि निकोप जीवन निश्चितच जगू यात शंका नाही.
प्राणीशास्त्र विभाग प्रमुख
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव
X X
View, Comments and share...
1 Comments
👍👍
ReplyDelete