Subscribe Us

header ads

Environment and my role: World Environment day -5 June

पर्यावरण आणि माझी भूमिका

(5 जुन जागतिक पर्यावरण दिना निमित्त)

Environment and my role: World Environment day -5 June 


पर्यावरण शास्त्र ही शाखा विकसित झाली ती मुळात 1960 च्या सुमारास पर्यावरण मानव सहसंबंध आणि जीवसृष्टी सहसंबंधाच्या अध्ययनाचा समावेश असणारी ही शाखा उदयास आली. पर्यावरणाचा विविध अंगाने अभ्यास केला जातो म्हणजे प्राकृतिक रसायनिक व जैविक परिस्थितीची गोळा बेरीज याला पर्यावरण सुद्धा असं म्हणतात. त्यामध्ये हवामान, जल, मृदा, प्रकाश सभोवतालच्या वनस्पती सभोवतालचे सजीव व अन्य जातीय सजीव यांचा अभ्यास या क्षेत्रामध्ये केला जातो.


 मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी विकासासाठी पर्यावरणाचा ऱ्हास केला. तो रास म्हणजे जंगलतोड , पर्यावरणात प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टी स्वतःच्या वापरासाठी मानवाने केला. पर्यावरणातील मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे या परिसंस्थांचा समतोल बिघडला व मानव जातीची झालेली अपरिमित हानी याचे उदाहरण द्यायचे झाले तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरावर टाकलेला अणुबॉम्ब हा होय.

अशा विविध मानवाने स्वतःच्या विकासासाठी प्रगतीसाठी जे पर्यावरणाचे संतुलन प्रदूषणाच्या माध्यमातून बिघडलेल आहे. त्या ठिकाणी माणूस म्हणून माझी भूमिका काय? हा प्रश्न मानवाला निर्माण झाला पाहिजे. त्या प्रश्नाचा शोध घेतला पाहिजे त्याच्यावर उत्तर शोधलं पाहिजे तरच मानवाचं अस्तित्व या सजीव सृष्टीवर आपल्याला पर्यावरणाचे संतुलन संवर्धन राखून जीवन जगता येईल ही मानव म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे.


 पर्यावरणाचा मानवाच्या जीवनावर ज्या घटकांचा परिणाम होतो ते स्थान ,भू -, हवामान ,जमीन, वनस्पती प्राणी, जलाशय, खनिज संपत्ती इत्यादी आहे. या गोष्टींचा आणि मानवांचा अंतर संबंध आहे. मानव आणि पर्यावरण यांच्या अंतर संबंधात अयोग्य प्रमाण निर्माण झाल्यामुळे ज्या विविध पर्यावरणात्मक समस्या निर्माण झाल्या. मानव हा स्वार्थी असून त्याने स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर बऱ्याच ठिकाणी पर्यावरणाचा अतिरेकी स्वरूपात वापर केल्यामुळे पर्यावरणामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. हरितगृहांचा होणारा परिणाम जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनला पडत असलेली छिद्र आम्लवर्षा इत्यादी.


जगात वाढते औद्योगिकीकरण, लोकसंख्या, नागरिकीकरण, वाहतूक व दळणवळण व्यवस्था ,सेवा व्यवसाय इत्यादी मानवाचे निसर्गावरील अतिक्रमण वाढतच गेले आहे. या हस्तक्षेपामुळे अनेक नवीन आपत्ती वाढल्या, त्याची तीव्रता वाढली आणि त्याचा परिणाम हा नकळतपणे सजीव सृष्टीवर होत आहे. हवा, जल,ध्वनी व कचरा प्रदूषण यासारख्या प्रदूषण समस्याही वाढलेल्या आहेत. दिवसेंदिवस त्याचे गंभीर स्वरूप होत चाललेले आहेत याचाही मानव म्हणून मी स्वतः काय बदल करू शकतो. मी स्वतः कोणत्या सवयी अंगीकारू शकतो, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन सुरक्षित राहील त्याचे संवर्धन होईल आणि येणाऱ्या पिढीसाठी ते फायदेशीर ठरेल. कारण भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीसाठी या संवर्धनाची खूप नितांत गरज आहे अन्यथा त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या समस्या ह्या येणाऱ्या काळात अधिक पुढच्या पिढींना निर्माण होणार आहेत.


पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम


पर्यावरणाच्या समस्येला अधिक गंभीर होऊ देता कामा नये यासाठी 5 जून 1972 मध्ये स्वीडन मधील स्टॉक होम या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद संपन्न झाली. ही परिषद संपन्न होण्यापूर्वी 1971 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाचा आर्थिक आयोग हा स्थापन झाला. हा आयोग युरोप, उत्तर अमेरिका व रशिया यांच्याद्वारे स्थापन झाला. जगात वाढत चाललेले औद्योगिकीकरण युद्ध यामुळे अनेक समस्या पर्यावरणामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्याचे संतुलन बिघडलेले आहे. जगात विकसित राष्ट्र आण्विक चाचण्या घेत आहेत अणुबॉम्ब तयार होत आहेत हे घातक अण्वस्त्र जगासाठी निर्माण होत आहेत.

पर्यावरण विषयक जागतिक परिषदेमध्ये भारताने सुद्धा सहभाग नोंदवला होता. यामध्ये पर्यावरण प्रदूषण औद्योगिक व रासायनिक प्रदूषण ,हरितगृह परिणाम, ओझोन वायूचा क्षय ,आम्लपर्जन्य इत्यादी जगाला भेडसावणाऱ्या तीव्र अशा विविध समस्यावर चर्चा झाली. या चळवळीला जगभर चालना मिळाली आणि या परिषदेची जगभर पर्यावरण समस्येवर संशोधन कार्य नियंत्रण कार्य व संवर्धन कार्य सुरू झाली.

अनेक पर्यावरणीय समस्यांमुळे निर्माण होणारे हवामानातील बदल जागतिक स्तरावर नोंदविण्यात येत होते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली, ही यंत्रणा आंतरराष्ट्रीय कायद्याची निर्मिती करून व या कायद्याच्या अंमलबजावणी च्या माध्यमांतून जागतिक स्तरावर पर्यावरणावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करून संतुलन राखण्याचा प्रयत्न निर्माण झाला . तो आजतागायत चालू आहे पण समस्या कमी अधिक प्रमाणामध्ये वाढत असून त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.


वसुंधरा शिखर परिषद


आज जगात जी साधनसामग्री उपलब्ध आहे व त्याची वापरण्याची जी पद्धती आहे, ती पर्यावरणाच्या दृष्टीने निर्माण झाली पाहिजे. नियोजनबद्ध झाली पाहिजे पृथ्वीचे हवामानाच्या बाबतीमध्ये त्याचा विचार झाला पाहिजे. पृथ्वीवर अस्तित्वात असणारे जे जीवसमूह आहेत. या जीवसमूहावर सुद्धा प्रदूषणाचा कुठल्याही पद्धतीने परिणाम होऊन ते नष्ट होता कामा नये, त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन नीट व्हावे.

 मानवाच्या जीवनपद्धतीत पर्यावरणात पर्यावरण पूरक बाबी असाव्यात ज्यामुळे जो मानव जातीवर होणारा थेट परिणाम आहे तो टाळता येणे शक्य आहे . कारण विकसित राष्ट्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जगामध्ये स्वतःच्या देशाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रगतीची माध्यम सध्या वापरत आहेत. वैज्ञानिक चाचण्या असतील, अणुबॉम्ब निर्मिती असेल, जीव रक्षक औषधांचे प्रयोग, असतील प्रलयकारी अस्त्रांचा वापर असेल ही होणारी निसर्गाची मनमुराद लय लूट थांबवण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 ते 14 जून 1992 मध्ये ब्राझील मधील रिओ डी जेनेरिओ या शहरांमध्ये वसुंधरा शिखर परिषद तिचे आयोजन करण्यात आले. ही शिखर परिषद पर्यावरणाची गंभीर समस्या घेऊन आयोजित करण्यात आली होती सदर परिषद ही बारा दिवस चालली. या परिषदेमध्ये 157 देशांनी सहभाग नोंदवला व अशा गंभीर स्वरूपाच्या समस्यांचा कशा पद्धतीने निवारण करावं यावर चर्चा झाली. कारण मानव आणि विकासाच्या वाटचालीत नैतिक सत्यांना दूर ठेवल्याचे जाणवते विज्ञानाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करत असताना निसर्गावर कुरघोडी करण्याचा पर्यावरण संपूर्णतः मानवी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आघोरी आणि अत्यंत घातक ठरत आहे. या सर्व मानवी क्रियांचा परिणाम म्हणजे आपली नैसर्गिक संसाधन संपत्ती झपाट्याने कमी होत चाललेली आहे . पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत जे आपल्याकडे जीवाश्म च्या माध्यमातून उपलब्ध आहेत ते संपण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा नवीन पर्याय उपलब्ध करता आले पाहिजे सौर ऊर्जेच्या माध्यमातून असतील , वायु ऊर्जेच्या माध्यमातून ह्या गोष्टी वर आपण पर्याय शोधले पाहिजे.या बाबींचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे.

मानव हा पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी ही शेवटी मानवावरच येते. त्यामुळे मानवाने जगभरात पर्यावरणाच्या संदर्भात जनजागृती करणे स्वतः ती अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जर्मनी, कॅनडा, स्वीडन यासारख्या देशांमध्ये पर्यावरण रक्षण हीच राष्ट्रभक्ती असा विचार अंगीकारून बालवाडी पासून उच्च स्तरावरील शिक्षणात ते प्रामुख्याने राबवितात. मुलांना लहानपणापासूनच पर्यावरणाच्या संदर्भामध्ये इत्यंभूत माहिती देणे त्याला ती अंगीकारवयास लावणे हा या देशांचा उद्देश असेल जेणेकरून भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना ही मुलं अतिशय सक्षम पणे सामना करतील. आपल्या भारतामध्ये सुद्धा पर्यावरण या विषयांमध्ये प्रदूषणाच्या बाबतीत पारंपारिक संशोधनांच्या बाबतीत खूप मोठी जनजागृती अलीकडच्या काळामध्ये राबविली जात आहे पण ती प्रत्यक्षात तिचा वापर हा स्वतःपासून करावा ही प्रेरणा भारतीयांच्या मनामध्ये रुजविणे खूप अत्यावश्यक आहे कारण आजही आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व नाही जलसाक्षरतेचे महत्व नाही. म्हणून काही ठिकाणी जलसाक्षरता न पाळल्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेच्या खूप मोठ्या समस्यांना आजही तोंड द्यावे लागते. स्वच्छतेचे महत्व आजही न काही लोकांना पटल्यामुळे अनेक आजारांना आपल्याला बळी पडावे लागते. त्यामुळे अनेकांचे आर्थिक वृक्षाने याच्यामध्ये खूप होते. दूषित पाण्यामुळे प्रदूषित हवेमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.


मानवाची व्यक्तिगत जबाबदारी


औपचारिक शिक्षण व्यवस्था मार्फत कृषीप्रधान,पर्यावरण शिक्षण सध्या दिले जात आहे .चीन सारखा देश सुद्धा लोकसंख्या वाढ प्रयत्नाने नियंत्रणात आणू शकतो तर आपणही स्वतः आपल्या देशाचा विकास व पर्यावरणाचे संतुलन ठेवायचे असेल तर वृक्ष संवर्धन, पाळीव जनावरांची देखभाल, झाडाफुलांची निगा, कचरा व्यवस्थापन, ध्वनीची पातळी, जल साक्षरता, पाण्याचा योग्य वापर ,पाणी शुद्धीकरण, स्वच्छतेचे छोटे छोटे नियम हे प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवरील योग्य मार्गदर्शन स्वतः घेणे, आपण घेऊन ते जनतेला देणे.

 आपल्या परिसरातील लोकांची पर्यावरणाचे संतुलन राखण्याची भावना त्यांच्यामध्ये जागृत करणे हे गरजेचे आहे. मी माझ्यापासून माझ्या घरापासून अगदी छोट्या छोट्या पर्यावरण पूरक अशा गोष्टींचा वापर व्यक्तिगत, सामाजिक पातळीवर कसा करेल त्याचे संतुलन कसे राखले जाईल. त्याचे संवर्धन माझ्याकडून होईल का हा सर्वस्वी विचार स्वतः माणसाने अंगीकारला पाहिजे. तरच आपण या पर्यावरण मध्ये होणाऱ्या असंतुलनास संतुलित ठेवण्याचा ध्यास घेऊ किंवा ते अंगीकारू. माझी भूमिका काय असू शकते तर मी माझ्या झाडांमध्ये किमान एक झाड लावून त्याचे संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारेल त्याची पूर्ण वाढ करेल ज्यामुळे त्यातून मला सावली सुद्धा हवा हे मिळेलच आणि हे पर्यावरण पूरक झाड पर्यावरणासाठी उपयोगात येईल ही भावना प्रथम आपल्यामध्ये जागृत होणे गरजेचे आहे. ऊर्जा स्त्रोताच्या बाबतीत मला आवश्यक असेल तेव्हाच मी माझ्या घरची लाईट लागेल पंखा लावेल जेव्हा मला गरज नसेल त्यावेळेला मी ते स्वतः उठून बंद करेल तरच ऊर्जा स्त्रोताचा वापर योग्य पद्धतीने होऊन त्याचे संवर्धन होईल व ती चिरकाल टिकेल ही भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी.

पर्यावरणाचे रक्षण हा प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे जर ही शासनाची जबाबदारी आहे केवळ असे जर आपण समजू किंवा शासनाने कायदे करून ते साध्य होईल .असा जर आपला गैरसमज असेल तर तो आपल्या मनामधून दूर केला पाहिजे . शासन पातळीवर पर्यावरणाच्या संदर्भातील कायदे अंमलबजावणी करण्यासाठी माणूसच करतो माणसासाठी करतो व मानवानेच या कायद्याची अंमलबजावणी करावी असं आपण सांगतो पण खरी गरज आहे की स्वतःमध्ये बदल करून कुठलेही कायदेशीर बाबींचा न विचार करता स्वतःच्या आत्मपरीक्षणातून आपण पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे तर पर्यावरणातल्या ज्या गोष्टी आपण नैसर्गिकरित्या वापरतो त्याच नैसर्गिक रित्या त्याचं संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे ती स्वतः केली पाहिजे, कारण या पर्यावरणामध्ये व्यक्ति म्हणून आपले स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. आपण या पर्यावरणाचे एक विश्वस्त म्हणून आपण काम करतो . आपण या पर्यावरणाचे शिल्पकार म्हणून आहोत. म्हणून हे पर्यावरण व्यक्तिगत पातळीवर कसे महत्त्वाचे आहे हे आपण ओळखले पाहिजे.

पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक प्रकारच्या चळवळी निर्माण झाल्या चिपको आंदोलन , आशिको, सह्याद्री बचाव, नर्मदा बचाव अशा अनेक चळवळी निर्माण झाल्या. ह्या चळवळी व्यक्तीनेच निर्माण केल्या आणि व्यक्ती म्हणून त्याचा अंगीकारही आपणच केला पाहिजे हे महत्त्वाचे.


पर्यावरणातील जैविक विविधता व त्यांचे संवर्धन 


जैविक विविधता ही जीवावरणातील एक बद्ध परिसंस्थेत आढळणाऱ्या जैविक विविधतेचा समावेश होतो . वैश्विक जैविक विविधता ही विषुववृत्तीय जंगलातील व जैविक विविधता तैगा आरन्यातील जैविक विविधता हवामानामुळे भिन्न दिसून येते. भारत देश हा जैवविविधतेने समृद्ध असा देश आहे. येथे अनेक प्राणी आणि वनस्पतीच्या जैविक विविधता आपल्याला आढळतात. भारतात पंचेचाळीस हजार वनस्पतीच्या आणि जवळपास आठ हजार शंभर प्राण्यांच्या विविध प्रजाती आपल्याला आढळतात. एवढ्या प्रमाणावर प्रजाती राहण्याचे मुख्य कारण म्हणजे भारताचे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती आहे. जगातल्या हवामानाचे बहुतेक सर्व हवामान विभाग भारतामध्ये पहायला मिळतात. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो. जगभरामध्ये जैवविविधतेसाठी एकूण 18 हॉटस्पॉट असून त्यापैकी दोन ते तीन हॉटस्पॉट हे भारतामध्ये आढळतात.

भारतामध्ये असणाऱ्या हॉटस्पॉटच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी अनेक संस्था कार्यरत आहे .त्यामध्ये वनस्पतींचे आणि प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करणे त्यासाठी वेगवेगळे व्यक्ती आणि संस्था जैवविविधतेसाठी काम करतात. मॅक-अर्थ फाउंडेशन ही संस्था जैवविविधतेसाठी संरक्षण व संवर्धनासाठी सर्वात पुढे आली. ह्या संस्थेने आवश्यक असणारी ज्या ठिकाणी गरज आहे अशी क्षेत्र निवडून तेथील प्राणी आणि वनस्पतीचे संगोपन आणि संवर्धन हा कार्यक्रम सुरू केला आहे. कारण जैवविविधतेत येणारी संकटे म्हणजे पूर, अवर्षण, चक्रीवादळे अशा पर्यावरणीय आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होतो.


अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने यांची आवश्यकता


भारतातील प्राकृतिक रचना व हवामान यात भिन्नता असल्यामुळे विविध जातींचे वन्य प्राणी व पशुपक्षी भारतात आढळतात. यात सुमारे 300 पेक्षा जास्त वन्य प्राण्यांच्या जाती आणि 1000 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वन्य पशुपक्षी आणि वनस्पतींना अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये पशुपक्ष्यांची झालेली फार मोठ्या प्रमाणावर हत्या आणि जंगलतोड, यामुळे हे पशु आणि वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या पशु पक्षांचे आणि वनस्पतींचे संवर्धन करणे ही काळाची गरज भासत असल्यामुळे व त्याचे संवर्धन करायचे असल्यामुळे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने निर्माण करण्यात आली. ज्यामुळे या सर्वांचे संवर्धन होईल. भारतामध्ये जवळपास 250 च्या आसपास अभयारण्य आणि 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने निर्माण करण्यात आली.


प्रदूषण समस्याचा परीणाम 


औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ, जंगलतोड, शहरीकरण, वाहतूक व इंधन ज्वलन, रासायनिक खते व जंतुनाशकांचा वापर , औद्योगिक अपघात, आणूप्रकल्प, युद्ध ह्या प्रदूषण करणाऱ्या समस्या आहेत. मानवाच्या व सजीवांच्या जीवनाला प्रदूषणापासून होणारा त्रास हा मानव निर्माण झाल्यापासून आहे. मानवाने औद्योगीकरणामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अँटी मनी आरसीनेक, कोबाल्ट व निकेल यासारखे विषारी मूलद्रव्य वातावरणात विखुरली गेली. तसाच उद्योगीकरणाचा वाढता वेग त्यानुसार झालेले हवेचे व पाण्याचे दूषितिकरण कचऱ्याचे वाढते प्रचंड प्रमाण, गलिच्छ वस्त्या, वाहनांची संख्या, आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारी अत्याधुनिक वाहने या सर्वच घटकांमुळे प्रदूषणाचा प्रश्न अतिशय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. हवेचे प्रदूषण जमिनीचे प्रदूषण ध्वनी प्रदूषण पाण्याचे प्रदूषण अशा अनेक प्रदूषणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.


पृथ्वीच्या सभोवताली असलेले हवेचे आवरण म्हणजे वातावरण यात वातावरणात मानवी क्रियामुळे निर्माण होणारी प्रदूषके मोठ्या प्रमाणावर तयार होतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण घडून येते. मानवनिर्मित प्रदूषकांमुळे वातावरणातील घटकांचे संतुलन बिघडून वेगवेगळ्या आपत्तींना समोर जाण्याची वेळ माणसावर आलेली आहे. म्हणून अशा प्रकारची हवेचे प्रदूषण नियंत्रणात आणणे हे क्रमपात झालेले आहे. त्यामुळे हवेच्या प्रदूषणामध्ये धुलीकण, धुराचे प्रमाण हे घटक आहेत. हवेचे प्रदूषण हे नैसर्गिकरित्या ज्वालामुखी ,तापमानाची विपरीत वाढ, धुळीची वादळे, वनवे यांच्यामुळे निर्माण होतात. हवेत कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी घटकांमुळे हवेचे प्रदूषण होते. ही प्रदूषके वाहनातून बाहेर पडतात या विषारी वायूंचे प्रमाण जास्त असून त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढलेले आहे. 

भारतामध्ये नवी दिल्ली, मुंबई, कलकत्ता, कानपूर, बेंगलोर, पुणे, मद्रास ,अहमदाबाद इत्यादी शहरांमध्ये हवेचे प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये आहे. पेट्रोल, डिझेल या वायूच्या ज्वलनातून हे विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे आत्ता इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय हा सर्वांसमोर खुला आहे. सौर उर्जेवर चालणारी वाहने घरासाठी लागणारे सौरऊर्जेचे पर्याय, वायु ऊर्जा व त्याचा वापर, त्यामुळे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण नवीन नवीन प्रयोगिक तत्व अंगीकारले पाहिजे ज्यामुळे प्रदूषण कमी होऊन मानवी स्वास्थ्यावर होणारा या विषारी प्रदूषणाचे परिणाम कमी होते व आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगले पाऊल ठरेल असे वाटते. त्यामुळे माझी जबाबदारी मी स्वतः स्वीकारली पाहिजे ही भावना संपूर्ण मानव जातीची असली पाहिजे व त्यासाठी सर्वतोपरी स्वतःपासून मानवाने सुरुवात करणे गरजेचे आहे.


कायदा व त्याची अंमलबजावणी 


पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी केंद्र सरकार ,राज्य सरकार ज्या वेळेला ज्या पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण होतात त्यासाठी अनेक प्रकारचे कायदे निर्माण करत असते. सर्व प्रकारचे प्रदूषण व जैविक विविधतेचे संवर्धन पारंपारिक ऊर्जाचे संवर्धन व तिचा योग्य वापर करणे. हे रोखण्यासाठी खूप कायदे शासकीय पातळीवर तयार झाले. हवेच्या प्रदूषणासाठी १९६० साली भारतात हवेच्या गुणवत्तेचे नियंत्रण राखण्याचा कायदा झाला. त्यात प्रामुख्याने सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड तसेच हवेतील तरंगत्या कणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोजना करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात झाली. प्रदूषण या घटकाची माहिती संकलित करणे त्याच्यावर नियंत्रण करणे, प्रबोधन करणे हे भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर यांच्या माध्यमातून केले जाते. देशात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे १९८५ साली देशातील प्रमुख शहरातून हवेतील प्रदूषणाची मात्रा नियंत्रण करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला. पण नियंत्रण झाले का याचे मात्र खरेच चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. खरंच मानवाने हे सर्व निर्माण केले पर्यावरणाचा ऱ्हासही मानवानेच केला आणि कायदेही मानवत बनवते खरंच कायद्याची आवश्यकता आहे का आपलं जीवन निरोगी सुंदर पर्यावरण पूरक ठेवण्यासाठी खरंच मला कायद्याची आवश्यकता आहे का माझ्या माझं अस्तित्व निर्माण करणे सुरक्षित ठेवण्यासाठी मीच स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतःला निसर्गामध्ये किती संतुलित ठेवेल ही भूमिका महत्त्वाची ही प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करून पावले उचलली पाहिजे तरच मानव म्हणून आपलं अस्तित्व या पृथ्वीतलावर सुरक्षित राहील अन्यथा असा जर पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर आपलं स्वतःच अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊन ते संपुष्टात सुद्धा येऊ शकते. वातावरणात अस्तित्वात असलेल्या व इतर विषयावर प्रदूषकांचे नियंत्रण करण्याची कुठली यंत्रणा व उपयोजना अस्तित्वात नसल्यामुळे हवेच्या प्रदूषणाच्या दर्जा निश्चित करणे हे शक्य होत नाही.

वायु प्रदूषण व नियंत्रण विषय कायदा 1981 साली अमलात आणला गेला कारण औद्योगिक प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांची उभारणी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

भारतामध्ये गोपाळ भोपाळ वायू दुर्घटना घडली. अनेक प्रदूषणाच्या बाबतीत दुर्घटना देशामध्ये नव्हे तर जगामध्ये घडल्या आणि वायू प्रदूषणामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.


माझी भूमिका माझे कर्तव्य


आपण माणूस म्हणून एक शपथ घेणे गरजेचे आहे की, मला जर माझं जीवन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुरक्षित पर्यावरण पूरक जर जगायचं असेल तर मला पर्यावरणाचा उपयोग करत ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या गोष्टीला पर्याय मला शोधता आला पाहिजे जर मी पर्यावरणासाठीच्या समस्येला पर्याय जर शोधू शकलो मी टिकेल. माझी येणारी पिढी सुद्धा टिकणार अन्यथा पर्यावरणाच्या समस्या ह्या कायमच्या राहतील आणि त्यांना सतत सामना करावा लागेल हे होऊ द्यायचे नसेल तर पहिल्यांदा मी त्याचा अंगीकार केला पाहिजे . माझी जीवनशैली पर्यावरण पूरक बनवली पाहिजे. हे माझे कर्तव्य आहे यासाठी मला कोणा कायद्याची शासनाच्या आदेशाची किंवा कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नसून मी माझ्या भूमिका सक्षम पणे अंगीकारणे गरजेचे आहे.





प्रा. डॉ. सिताराम बा. इंगोले 

प्राणीशास्त्र विभाग प्रमुख

श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव

www.insearchofknowledge.org 







View, Comments and share 





 

Post a Comment

1 Comments

  1. बहुत बढ़िया जानकारी दी गई है। आपको बहुत बहुत धन्यवाद सर जी 🙏 हमारे विषय की जानकारी दी है, इतनी मेहनत करके।

    ReplyDelete