Subscribe Us

header ads

Biodiversity: International day for Biodiversity: 22 May

22 मे :जागतिक जैवविविधता दिन.

International day for Biodiversity: 22 May 

 जैवविविधता व त्याचे संवर्धन 

Biodiversity and it's Conservation 


जैवविविधता हे एक नैसर्गिक संसाधन मानले जाते. निसर्गाने मानवाला दिलेल्या विविध देणग्यापैकी एक देणगी असून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्याच्या काळात जैवविविधतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. 

वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर, वृक्षतोड, भूमीच्या वापरात होत जाणारे बदल यामुळे सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत व बऱ्याच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

उष्ण तापमान पट्ट्यातील वनामध्ये पृथ्वीवरील सजीवांच्या 50% पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याचा दर नैसर्गिक रित्या नष्ट होण्याच्या दराच्या सुमारे 1000  पटीने जास्त आहे असे शास्त्रज्ञ मानतात.

जैवविविधता पर्यावरणाचा आत्मा असून वन व वन्यजीव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्यामुळेच  संतुलित पर्यावरणासाठी जैवविविधतेचे  संरक्षण करणे आवश्यक आहे.

X X

जैवविविधता ( Biodiversity)

जैवविविधता ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी असून मानवाच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे.

 मानवाच्या सभोवताली विविध प्रकारच्या वनस्पती ,प्राणी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो .या सजीवांचा आकार ,प्रकार, संरचना यामध्ये भिन्नता दिसून येते .तरीदेखील एका विशिष्ट वातावरणात विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या संख्येचे सजीव दिसून येतात. सजीवांचा या एकत्रित आधिवासास "जैवविविधता" असे म्हटले जाते.

रिओडी जानेरो या ब्राझीलमधील राजधानीमध्ये सन 1992 मध्ये "वसुंधरा शिखर परिषद "संपन्न झाली त्यावेळपासून" जैवविविधता" हा शब्द जास्त प्रचलित झाला.

वॉल्टर डी. रोसेन यांच्यामते,

"एकाच परिसंस्थेत किंवा परिसंस्थेची संबंधित क्रियांमध्ये भिन्न जातींच्या भिन्न संख्यांच्या सजीवांचे एकत्रीकरण म्हणजे जैवविविधता होय".

"पृथ्वीवरील सजीव सृष्टी मध्ये विविध प्रकारचे सजीव विविध परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रदेशात भिन्न आकाराचे, आकारमानाचे, संरचनेचे आणि निरनिराळ्या गुणसूत्रांचे ,कमी ,अधिक आयुष्य मानाचे व आंतरसंबंध असलेले आढळतात यालाच त्यांनाच जैवविविधता असे म्हणतात." 

जैवविविधतेचे प्रकार :

Types of Biodiversity

सध्या जैविक तंत्रज्ञान हे शास्त्र विकसित होत आहे. जैवतंत्रज्ञान शास्त्राच्या विकासामुळे मानवाला हवे ते अनुवंशिक  बदल घडवून आणता येत आहेत . पारंपारिक पैदास पद्धतीने जे शक्य नव्हते ते तंत्रज्ञान या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे . दोन वेगवेगळ्या जातीतील जनुकांची आदलाबदल ही या तंत्रज्ञानाने आज शक्य झाली आहे .

जैवविविधतेत विविधतेत विविध प्रकार आढळतात. त्यातील तीन मुख्य प्रकार खालील प्रमाणे आहेत .

1.अनुवंशीय विविधता 

Genetic Diversity

प्राणी आणि वनस्पती च्या दृष्टीने फार महत्वाचा सूक्ष्म घटक म्हणजे जनुक किंवा जीन एकाच प्रजातींच्या प्राणी आणि वनस्पती या जनुकांची विविधता म्हणजे अनुवंशीय विविधता किंवा गुणसूत्रीय विविधता किंवा जनुकीय  विविधता . 

प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती या जनुकाचा ठराविक संच असतो या संचात थोडाही बदल झाला तर त्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या गुणात, आकारात बदल होतो . जनुकात होणारा बदल त्याच प्रकारच्या सजीवातील समूहात होत राहतो व त्यामुळेच जातीसमूह तयार होत राहतात.

गुणसूत्रीय विविधता ही निरोगी संकरासाठी आवश्यक असते व अन्य जातींच्या विविधतेतून आपणास अन्नधान्यांच्या व पाळीव प्राण्यांच्या विविध जाती हजारो वर्षांच्या संकरातून मिळालेल्या आहेत .अनुवंशिक विविधतेचा व गुणसूत्रांचा अभ्यास करून संशोधन करून मानवाने वनस्पती व प्राण्यांच्या गुणसूत्रांमध्ये बदल घडवून पूर्वीपेक्षा जास्त सक्षम अशा सजीवांची निर्मिती केली. 

अशा प्रकारे एकाच जातीच्या प्राण्यांच्या "जीन" मध्ये दिसून येणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय.

X X

2.प्रजातीची विविधता 

Species Diversity

एकाच जातीच्या समूहामध्ये एकाच प्रकारचा जनुक (जीन) आढळतो. 

त्यामुळे एकाच जातीच्या प्राण्यांमध्ये साम्य दिसून येते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचा अधिवास ही एकच असतो. परंतु अशा अधिवासात पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढल्यास अनेक सजीव त्या ठिकाणी गोळा होतात. त्यात इतर अधिवासातून आलेले सजीवही असतात. 

एकाच अधिवासात विविध प्रकारचे व विविध जातींचे सजीव वेगवेगळ्या संख्येने राहतात त्यालाच प्रजातीय विविधता असे म्हणतात.

प्रजातीय विविधता नैसर्गिक परिसंस्था आणि कृषी परिसंस्थेमध्ये जास्त दिसून येते . नैसर्गिक स्वरूपातील जंगलामध्ये वनस्पतींच्या विविध प्रजाती आढळून येतात . विविध प्रजातींच्या वैविध्यामुळे जंगल संपदेचे महत्त्व आहे.

ब्रिटनमधील एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आत्तापर्यंत मासे , इतर जलचर, अपृष्ठवंशीय प्राणी, पक्षी व सस्तन सजीवांच्या 724 प्रजाती संपूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तसेच 22530 सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .अनेक प्रजाती दुर्मिळ होत आहेत त्यांचे संरक्षण मानवाने केले पाहिजे.

पर्यावरणातील बदलानुसार सुद्धा सजीवांच्या काही प्रजाती नष्ट होतात. तर काही नवीन सजीव उत्पन्न होतात.

 3.परिसंस्था विविधता

 Ecosystem Diversity 

सजीव घटक व पर्यावरणातील घटक यांच्यातील क्रमबद्ध आंतरक्रिया यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजेच परिसंस्था होय. प्रत्येक परिसंस्थेतील पर्यावरण अधिवास त्यातील सजीव प्रजातींचे प्रकार ठराविक असतात. परिसंस्था बदलाबरोबर हे सर्व घटकही बदलतात यालाच परिसंस्था विविधता असे म्हणतात.

प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती यांचे ठराविक प्रकार असतात. 

उदा. जंगल परिसंस्था ,गवताळ परिसंस्था त्यातील ठराविक प्रजातींचे सजीव सापडतात .

गवताळ परिसंस्थेत साप, उंदीर, सरडे इत्यादी प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती तर गवताचे प्रकार एकत्र राहतील तर 

गोड पाण्याच्या परिसंस्थेत कासव, मासे,  झिंगे वगैरेसारखे प्राणी व पानवनस्पती एकत्र राहते राहतात. म्हणजे प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक, विघटक हे ठरावीक असतात.

 म्हणजेच प्रत्येक परिसंस्थेत सजीवांच्या प्राप्तीची विविधता आढळते. यालाच परिसंस्था विविधता असे म्हणतात. 

 जैवविविधतेचे महत्त्व 

 Importance of Biodiversity

 

निसर्गात किंवा पर्यावरणात आढळणारे प्राणी वनस्पती मानवाला अनेक रूपाने लाभदायक आहेत. मानव प्राचीन काळापासूनच वनस्पती आणि प्राण्यांच्या शोषण करत आला आहे. सध्याच्या परिस्थितीत जीवनात उपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू प्राणी जगतावर अवलंबून आहेत. जैविक विविधतेत मानवासाठी खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यात्मक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर परिसंस्थेच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहेत. 

जीवावरनाच्या निकोपपातेसाठी आणि समृद्धीसाठी जैवविविधतेची गरज आहे. उपभोग्यता (Consumptive) उत्पादकता ( Productive ) सामाजिकता ( Social)आणि व्यवहारिकतिच्या दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व खालील प्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. 

1. उपभोग्यतेच्या दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व (Consumptive Importance of Biodiversity )

जैवविविधतेमुळे "जीन "चा अभ्यास सहज शक्य झाल्यामुळे पिकांचे गुणधर्म बदलणे शक्य झाले आहे. या माध्यमातून कीड नियंत्रण करणारे जीन पिकात संकरीत केल्याने कीड नियंत्रण पीक तयार झाली आहेत. 

गांडूळ सारखा प्राणी शेतजमीन भुसभुशीत करतो म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.

2. उत्पादकता दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व (Productive Importance of Biodiversity )

मानवासाठी आवश्यक असलेले अन्न सजीव व पासून प्राप्त होते. विविध प्रकारच्या वनस्पतींचा वापर मानव अन्न म्हणून करतो. प्राण्यांचे मांस ,दूध ,अंडी यांचा मानवाच्या आहारात समावेश आहे. 

कापड उत्पादनासाठी कापूस वनस्पतीपासून मिळतो, रेशमाचे उत्पादन रेशमाचा किड्यापासून होते , मध मधमाशांच्या पोळ्या पासून प्राप्त होतो .प्राण्यांच्या कातडीचा वापर अनेक वस्तू तयार करण्यासाठी होतो.

जैवविविधतेमुळे अनेक औषधी विविध प्रकारच्या वनस्पती व वृक्षांमुळे प्राप्त होतात. मोर्किन हे वेदना वेदनाशक औषध, मलेरियावर उपयुक्त असलेले औषध क्यूँनीन ,कर्करोगाविरोधी टॉझोल, विविध वनस्पती पासून मिळते. 

आयुर्वेदिक उपचार पद्धतीत कोरफड, कडूलिंब ,जास्वंद, जांभूळ, सदाफुली या वनस्पतींचा वापर औषध म्हणून केला जातो.

3. सामाजिक दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व (Social Importance of Biodiversity )

भारतीय संस्कृतीमध्ये काही वनस्पतींना व वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान आहे. 

दुर्वा आणि लाल जास्वंदीच्या फुलांचा उपयोग गणेश पूजेसाठी केला जातो .

वडाची पूजा ,पिंपळाची पूजा, तुळस पूजा, हिंदू संस्कृतीत महत्त्वाची मानली जाते. 

शंकराच्या पूजेसाठी बेलाची तर मारुतीच्या पूजेसाठी रुईची फुले व पाने वापरली जातात . 

घरांमध्ये धार्मिक कार्य असेल तर आंब्याच्या पानाचे तोरण दरवाजांना बांधले जाते .

वनस्पती प्रमाणेच काही प्राणी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत पूजनीय आहेत.

पोळ्याला बैलाची पूजा केली जाते . दीपावली वसुबारसमध्ये गाईची पूजा केली जाते . 

कासवाला वैभवाचे प्रतीक मानले जाते .

 प्राण्यांनी उत्सर्जित केलेल्या मल-मूत्र ,शेन इत्यादी पदार्थांचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. शेणाचा वापर करून गोबर गॅस इंधन निर्मिती सुद्धा होते.

4. व्यापारी दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व (Commercial Importance of Biodiversity )

जैवविविधतेचे व्यापारी दृष्टीकोनातून महत्त्व आहे. हस्तिदंत, मध, मेन, कात ,वेत ,रबर इत्यादी उत्पादने लघुउद्योगासाठी कच्चामाल म्हणून वापरले जातात. 

भारतातील जंगले ही औषधी वनस्पतींची माहेर घर आहेत. व्यापारी दृष्टीने हिरडा, बेहडा ,कोरफड वनस्पती महत्त्वाच्या आहेत.

5. पर्यावरण समतोल दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व  (Environmental Balance Importance of Biodiversity )

पशुपक्ष्यांच्या जैवविविधतेमुळे परिसंस्था समृद्ध असल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पशुपक्षी यामुळे बीजप्रसार होऊन वनस्पतींची वाढ होते.

X X

6. हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व (Natural Air Purification Importance of Biodiversity )

वनस्पती ह्या उत्पादक आहेत . स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ह्या वनस्पती बऱ्याच प्रमाणात प्राण्यांचे अन्न असतात. 

कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र यामध्ये वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावतात.

 हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण करण्याची महत्त्वाची भूमिका वनस्पती करतात व वनस्पतीमुळे तापमान नियंत्रित होते .

ध्वनी प्रदुषणाची तीव्रता कमी  होते .कार्बन-डाय-ऑक्‍साईड नियंत्रणात ठेवून हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण वनस्पती करतात.

प्रत्येक प्राण्याला निसर्गाने विशिष्ट काम ठरवून दिले आहे. विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती व मानवी जीवनाला सहाय्य करतात. 

मातीत असणारे अझोटोबॅक्टर नावाचे विषाणू हवेतील नायट्रोजनच स्थिरीकरण करून जमिनीचा कस वाढवितात. इतर सूक्ष्म जिवाणू मार्फत मृत प्राणी ,वनस्पती तसेच टाकाऊ पदार्थांचे विघटन होते. 

जंगले जमिनी चे अच्छादन म्हणून काम करतात .जंगलामुळे जमिनीची धूप थांबते . पर्जन्यमान वाढण्यास मदत होते. वाळवंटीकरण याला आळा बसतो. वन्यजीवांना आसरा मिळतो. 

जिवाणूंचा वापर करून जैविक खतांची निर्मिती करता येते. रासायनिक खते कीटकनाशके ,तणनाशके यांचे दूरगामी परिणाम लक्षात घेता जैविक खते उपयुक्त ठरतात. 

संकरित प्राण्यांची निर्मिती केली जाते. हे संकरित प्राणी मूळ जातीपेक्षा जास्त दूध देतात. 

संकरित बियाण्यापासून अन्नधान्यांचे भरघोस उत्पादन मिळते. संकरित प्राणी व संकरित वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही मूळ जातीपेक्षा असलेल्या  रोगप्रतिकारक शक्ति पेक्षा जास्त असल्याने या वनस्पती व प्राणी सहसा रोगांना बळी पडत नाहीत व भरपूर उत्पन्न देतात. 

उदा. भारतातील भाताच्या मूळ जातींचा संकर घडवून भाताची एक नवीन संकरित जात निर्माण केली गेली .जी मुख्य चार प्रकारच्या रोगांपासून मुक्त आहे. या भाताच्या नवीन संकरित जातीचीची लागवड आता आशिया खंडामध्ये बहुतेक ठिकाणी केली जाते. निसर्गातील विविध जीव व त्यांच्या प्रजाती पर्यावरणात अत्यंत महत्त्वाचे काम करीतच राहतात. कोणताही जीव बिनकामी किंवा टाकाऊ नसतो. म्हणून ही निसर्गाने दिलेली जैवविविधतेची देणगी मानवाने जतन करावयास हवी आणि ती काळाची गरज मानली जाते. 


भारतातील जैवविविधता संपन्न ठिकाणे (Hot Spots of Biodiversity in India ):


संपूर्ण जगात एकूण 25 जैवविविधता प्रदेश आहेत. भारतातही काही ठिकाणी असे हॉटस्पॉट (अनुकूल क्षेत्र ) आढळतात. त्याचे तीन विभाग आहेत.

1.  ईशान्य भारत

2.  पश्चिम घाट 

3. अंदमान व निकोबार बेटे 

या प्रदेशात समृद्ध असे प्राणी आणि वनस्पतींच्या जीवजाती आढळतात. 

अंदमान निकोबार बेटा मध्ये सुमारे 2200 फूल वनस्पतींच्या जाती, 120 नेचे वनस्पतींच्या जाती. 

ईशान्य राज्यात 63 टक्के सस्तन प्राणी 1500 स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. 

पश्चिम घाटामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींचे प्रमाण जास्त आहे तसेच 1500 वनस्पतींच्या प्रजाती येथे आढळतात.

 मानवी हस्तक्षेपामुळे सर्व क्षेत्रातील जैवविविधता 2-3% पर्यंत खाली आलेली आहे .त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  याचे नुकसान म्हणजे मूळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मानवी स्थलांतर व लोकसंख्या वाढ हे मुख्य कारण, जैवविविधतेच्या क्षेत्राच्या नाशास कारणीभूत आहे. 

PAI च्या अभ्यासानुसार जागतिक लोकसंख्येच्या 20 % लोक हे या हॉटस्पॉट क्षेत्रात राहतात व याची वार्षिक वाढ 1.8 % इतकी आहे म्हणजे जगाच्या 1.4 % एवढी लोकसंख्या.

हॉटस्पॉट चे संरक्षण आणि संवर्धन 

Protection and Conservation of Hot Spots

या कामासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यात वनस्पतीचे आणि प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी " मॅकअर्थर फाउंडेशन" ही पहिली संस्था संरक्षण व संवर्धनासाठी पुढे आली आहे .त्यांनी अशी क्षेत्रे निवडले आहेत त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे संगोपन आणि संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. अशा अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत.

जैविक विविधतेवरील संकटांची कारणे (Causes of Threats to Biodiversity)

निसर्गाने जैविक विविधता दिली आहे. पण तिचा ऱ्हास हळूहळू होत आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे भूकंप ,ज्वालामुखी, अवर्षण ,वादळे त्यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. पण या ऱ्हासाला सर्वात जास्त जबाबदार मानवच आहे . मानवाने निसर्गावर  वेळोवेळी आक्रमण केलेले आहे .जंगल तोडणे, नद्या अडवणे ,डोंगर पोखरणे, मोकळी राने सिमेंटच्या जंगलात रुपांतर करणे असे नानाविध उपक्रम मानवाने करून जैविक विविधतेवर संकट आणले आहे.

X X

1. अधिवासांचा विनाश (Habitat Distruction)

पृथ्वीवरील जैविक विविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण म्हणजे मागील काही वर्षात त्यांच्या अधिवासाचा मानवाकडून केला गेलेला विनाश आहे .तीव्र गतीने जंगलांचा नाश करून वन्य जीवांना  एकाकी पाडले गेले आहे .त्यांना एकाकी गटात विभागले गेल्यामुळे ते संकटाचा सामना करण्यास सक्षम नाहीत. वन्यजीवांचे अधिवास याचा विनाश करून आपण फक्त प्रमुख प्रजातीच विनाश केला नाही तर ज्या प्रजाती आपणास ज्ञात नव्हत्या त्या आपण प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत.

2. बेकायदा वन्यजीवांची शिकार (Poaching of Wildlife)

जगामध्ये वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार मोठ्या प्रमाणात केली जात आहे .म्हणून बरेच वन्य प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत . बरेच नामशेष पण झाले आहेत . वन्यजीवांचा अन्न म्हणून उपयोग केला जात आहे. त्या शिवाय त्यांच्यापासून इतर उत्पादन देखील  लोक मिळवत आहेत. 

उदा. फर गोळा करणे, कातडी मिळवणे, सिंग( Horns) दात इत्यादी. याशिवाय अनेक वन्यजीवांचा संशोधनासाठी पण उपयोग केला जात आहे. काही देशात वन्यजीवा पासून तयार केलेल्या वस्तूंची मागणी युरोपीय, उत्तर अमेरिका देश व काही आशियाई देशात वाढली आहे. जपान, तैवान, हॉंगकॉंग यात मांजर आणि सापांच्या जागतिक आयात पैकी 3/4 आयात करतात. भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाघांची तस्करी केली जात आहे .परिणाम म्हणून गेल्या पन्नास वर्षात वाघांच्या संख्येत खूप घट झाली आहे. त्यांची शिकार करून त्यांची हाडे व कातडी यांची यांची तस्करी भारत-नेपाळ , तिबेट मध्ये करण्यात येते.

3. जंगल तोड (Deforestation)

मानवाने इंधन, चारा ,इमारती लाकूड यासाठी जंगलांची कटाई केली त्यामुळे वनात राहणाऱ्या प्राण्यांची घरे नष्ट झाली. ससा, हरिण ,कोल्हा ,वाघ वगैरे यांचे अन्नसाखळी नष्ट झाली. त्यामुळे हे प्राणी वन सोडून गेले व काही नष्ट झाले.

4. वाढती लोकसंख्या (Population Growth )

जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे मानवाला निवाऱ्यासाठी घरे कमी पडू लागली. त्यामुळे त्यांनी जंगलांचा नाश केला. तेथील जागा स्वत: राहण्यासाठी वापरली . मोठे मोठे वृक्ष तोडणे त्याचा उपयोग इमारतीच्या लाकडासाठी करणे त्यामुळे त्या वृक्षावर राहणारी वानरे, वटवाघळे, कावळे ,चिमण्या व इतर पक्षी या बेघर झाले व त्यांचा नाश झाला.

5. औद्योगिक औद्योगिकीकरण (Growing Industrialisation)

 उद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा लागते. त्यासाठी मानवाने जंगल तोडून ती मिळवली. कारखाने सुरू केले. पण त्यामुळे प्रदूषण वायू आणि प्रदूषित पाणी निर्माण झाले व हे वायू आणि प्राणी  अनेक जैविक संपत्तीचा नाश करणारे ठरले.

6. नद्या- धरणे काम  (River-Dam Projects)

अनेक नद्यांवर धरणे बांधली गेली. त्यामुळे नद्यांचा प्रवाह खंडित झाला .या खंडित प्रवाहाचे वाळवंट झाले. त्यामुळे पाण्यात राहणारे मासे, कीटक व इतर जलचर प्राणी यांचा नाश झाला.

7. खाणकाम (Mining )

मानवाने लोह, तांबे, कोळसा ,डिझेल ,पेट्रोल, गॅस यासाठी अनेक खाणी खोदण्याचे काम केले. त्यामुळे अशा जागेखालील बिळे करून राहणारे असंख्य साप , बेडुक, कोल्हे  इत्यादी प्राण्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

8. किटकनाशके व रोगनाशके  (Insecticide and Pesticides)

मानवाने आपल्या अन्नधान्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक किटकनाशके व रोगनाशके फवारली. त्यामुळे फळे ,पाने विषारी झाली. हे खाणारे पशुपक्षी, कीटक यांना मात्र विष पचवता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

X X

9. अणूचाचण्या स्फोट (Atomic Explosion)

अणूचाचणी ह्या बऱ्याच वेळा वाळवंटी प्रदेशात व समुद्राच्या तळावर घेतल्या जातात .या चाचण्यासाठी जमीन खोदावी लागते. या अनुदानामुळे समुद्रातील व वाळवंटी भागातील  सजीवांची आधिवास क्षेत्रे सजीवांसह नष्ट  होतात.

10. लष्करी तळ (Military Camps)

लष्करी हेतूसाठी बर्‍याचदा जमिनीवर लष्करी तळ उभारले जातात. यामुळे सुद्धा त्या जमिनीवरील सजीवांची  अधिवास क्षेत्रे नष्ट होतात.

11. स्थलांतरीत शेती (Shifting Agriculture)

 स्थलांतरित शेतीमुळे जंगलांचा नाश झाला. म्हणून सजीवांची राहण्याची ठिकाणी नष्ट होण्यास मानवाकडून केली जाणारी स्थलांतरीत शेती सुद्धा कारणीभूत आहे.


 जैविक विविधतेचे संवर्धन : Conservation of Biodiversity


भारतामध्ये प्राचीन काळापासून विपुल आणि समृद्ध जैवविविधता आढळून येते. विविध वनस्पती व प्राण्यांच्या जाती मध्ये विविध भागात विविधता आढळून येते .

उत्तरेकडील उंच हिमालय ,ईशान्य भागातील घनदाट जंगले, देशाच्या पूर्व पश्चिमेला असलेला पूर्व व पश्चिम घाट ,गंगेचे मैदान, राजस्थानातील वाळवंट ,खारफुटीची जंगले ,विस्तृत पठारी भाग, अति घनदाट जंगल असलेले अंदमान निकोबार बेटे ,उष्ण कटिबंधातील सदाहरित व निम सदाहरित जंगले ,हिमालयातील सूचिपर्णी वृक्षांची आलाइन फॉरेस्ट , दमट व कोरडी पानगळी जंगले, काटेरी वने, खारफुटीची जंगले अशा विविध जंगलांमध्ये सजीवांची विविधता आढळून येते .

जगातील अतिसंवेदनशील 25 भूभागापैकी पश्चिम घाट हा भूभाग भारतात आहे .

भारतात आढळणाऱ्या वनस्पती व जंगल संवर्धन व संरक्षणासाठी इ. स. 1980 मध्ये जंगल संरक्षण तर इ. स. 1972 मध्ये वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण कायदे पास करण्यात आले .

आज भारतात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी 23 व्याघ्र प्रकल्प, 92 राष्ट्रीय उद्याने, 490 अभयारण्य आणि  15 राखीव जंगले तयार करण्यात आली आहेत.

 आज भारतात वरील प्रकल्पासाठी एक लाख 55 हजार हेक्‍टर जमीन वनाच्छादित आहे. त्यात वन्यजीवांना अभय मिळते आणि त्यांची संख्या त्यामुळे वाढत आहे. 

जैवसंवर्धनासाठी संकरित पद्धतीने नवीन जाती तयार केल्या जातात. परंतु त्यासाठी लोकल जंगली जातींचा खूप उपयोग होतो. त्या जातीतील जनुक  हा सर्वात महत्त्वाचा अनुवंशिक भाग म्हणून जंगली प्राणी व वनस्पतींचे जनुक जपण्यासाठी अशा सजीवांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यालाच "जीन बँक" किंवा "जनुक बँक "असे म्हणतात .

अलीकडे नैसर्गिक जनन प्रक्रियेला डावलून "क्लोनिंग" पद्धतीने सजीव प्रयोगशाळेत तयार केले जातात .त्यामध्ये ही जनुकांचा संबंध येतो त्याला जणूक संवर्धन असे म्हणतात.

परिसंस्थामधील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य हे जैवविविधता संवर्धन व करमणुकीची महत्त्वाची साधने आहेत .

वन्यजीव संवर्धनासाठी " वन्यजीव संरक्षण कायदा" 1972 ( Wild life Protection Act-1972 ) मध्ये पास करण्यात आला .

वरील कायद्यातील भाग 29 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे या देशातील कोणताही वन्यजीव मारता येणार नाही. भले तो वन्यजीव जंगलात असो अभयारण्यात असो किंवा इतरत्र त्यासाठी वन्यजीव संवर्धन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते . मारण्यासाठी सबळ कारण असावे लागते. वन्यजीव विभागाला त्या कारणची खात्री पटल्यावरच संबंधित वन्यजीव पकडला जातो किंवा मारला जातो. 

X X

एकविसाव्या शतकातील जैवविविधता संवर्धन धोरण : (Policy of Conservation of Biodiversity in Twenty first Century)

जगामध्ये जैवविविधता टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होताना आढळून येतात .

उष्णकटिबंधातील दमट भागांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो व नेमक्या त्याच ठिकाणी जगातील निम्म्यापेक्षा जास्त जैवविविधता आढळून येते .

अलीकडे मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचा ऱ्हास होताना आढळून येत आहे . 

हा ऱ्हास निसर्गऱ्हासपेक्षा हजार ते दहा हजार पटीने जास्त असतो.

 युरोपमधील अनेक विकसित देशांमध्ये तसेच उत्तर अमेरिकेत प्रचंड प्रमाणात वनांचा नाश झाला .

सर्वसाधारणपणे भूतलावर 50 लाख सजीव जाती आढळून येतात .त्यापैकी 15 लाख प्रजातींचा अभ्यास केला गेला आहे.

मोठ्या प्रमाणावरील सजीवांचा नाश हा त्यांच्या वसतिस्थान च्या नाशामुळे झाला आहे. 

अनेक जंगली प्रजातीमध्ये चांगली जनुक आढळतात. त्यामध्ये रोगप्रतिकारक ,अन्नातील सत्वपक्वता गुणवत्ता असणार्‍या अशा प्रकारची जनुक असतात. 

त्यासाठी सर्व वन्य जीव वाचविणे हा आजकालचा खरा लढा आहे .

अलीकडे जगातील अनेक संस्था वनस्पती जनुक संवर्धनासाठी झगडताना आढळून येतात .

जगामध्ये FAO ही आंतरराष्ट्रीय कमिशन त्यासाठी बहुमोल काम करीत असते .

भारतामध्ये अनेक संस्था वन व वन्यजीव संवर्धनाचे काम करीत आहे ग्रामीण यांच्या सहभागातून संयुक्त वन व्यवस्थापन व कुऱ्हाडबंदी तून वन संरक्षण व संवर्धन करत आहे.

 आज भारतामध्ये IN-PGRT (The Indian National plant Genetic resource system) ही संस्था ICAR (Indian Council of Agricultural Research ) या संस्थेच्या अंतर्गत जनुक संवर्धन GBC (Gene Bank Conservation ) चे काम करीत आहे.

X X

जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती आणि उपाय :

 Methods and Remedies of Conservation of Biodiversity 

1. जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती : (Methods  of Conservation of Biodiversity) 

जैवविविधतेच्या  नाशामुळे भविष्यकाळात संपूर्ण मानवजातीसमोर अनेक संकटे निर्माण होणार आहेत .याची जाणीव झाल्यामुळे त्याचे संरक्षण करण्यासाठी जागतिक ,राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर  संरक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. मूलस्थानी संरक्षण आणि परस्थानी संरक्षण  असे दोन प्रकार आहेत.

1. मूलस्थानी संरक्षण 

In-Situ Conservation

या पद्धतीत सजीव ज्या जंगलात किंवा ठिकाणी राहतात. त्यात अधिवासात त्याला वाढविले जाते . त्याला जपले जाते व त्याचे संरक्षण केले जाते. या पद्धतीत अनेक नैसर्गिक जंगलातून वनस्पतींना वाढू देण्यात येते व त्यांची नैसर्गिक परिस्थिती न बदलता त्यांचे संरक्षण केले जाते . 

उदा. अरण्यात हिरडा, बेहडा अशा प्रकारचे वृक्ष वाढतात. त्यामुळे वाघ ,सिंह वगैरे ज्या जंगलातून राहतात त्या जंगलांची कटाई होत नाही.

 उदा. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात" पाल" हरणाचे अभयारण्यात ज्या हरणांना लागणारी नैसर्गिक स्थिती वृक्ष, टेकड्या, झरे यांची निर्मिती केली जाते .तसेच माणसांची ये-जा बंद केली जाते.

 आशियाई सिंहासाठी गुजरातमधील " गीर " अभयारण्य प्रसिद्ध आहे .तर गेंड्या साठी "काझीरंगा " चे अभयारण्य प्रसिद्ध आहे.

 त्यांचे प्रजनन, त्यांची वाढ, जैविक घटक ,खाण्याच्या पद्धती यामध्ये कोणताच बदल केला जात नाही .त्यामुळे सारेच सुरक्षित राहतात.

2. परस्थानी संरक्षण 

Ex-Situ Conservation

या पद्धतीत सजीवांना त्यांच्या मूळ अधीवसापासून दूर करून नव्याने निर्माण केलेल्या अधिवास क्षेत्रात सोडले जाते. त्यासाठी जैविक उद्याने ,वनस्पती उद्याने ,प्राणीसंग्रहालय ,हरणांच्या बागा, जीन बँका ,मत्स्यालय यांची उभारणी केली जाते .अशा परस्थाणी संरक्षण क्षेत्रात काही प्रयोगशाळा कार्यरत असून सजीवांवर निरनिराळे प्रयोग केले जातात व त्यांच्या प्रजाती संरक्षित ठेवल्या जातात. 

X X

2. जैवविविधतेच्या संवर्धनाचे उपाय :

Remedies of Conservation of Biodiversity 

1. कायदे (Acts )

भारतामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विविध असे कायदे केलेले आहेत. त्यातील काही मोजकेच कायदे .

1. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 

हा कायदा पर्यावरणाच्या संरक्षणाच्या उपाययोजनाशी संबंधित आहे.

 उदा. विशिष्ट भागात औद्योगिक आणि इतर प्रक्रियावर निर्बंध, धोकादायक पदार्थांचे उत्पादन ,वापर इत्यादीवर प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली व त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर नियमित होत असते.

2. मासेमारी कायदा 1987 

या कायद्याने मासेमारीसाठी स्फोटके किंवा विषारी पदार्थ वापरण्यास प्रतिबंध केला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच मासेमारी हा व्यवसाय करावा. अन्यथा त्याच्यावर  कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असेही कडक निर्बंध या कायद्यात केलेले आहेत.

X X

3. वन कायदा 1927 

राखीव, संरक्षित आणी गाव वनांचे नियोजन आणि व्यवस्थापन इत्यादी विषयी माहिती या कायद्यात आहे.

4. वनसंवर्धन कायदा 1980

 जंगला खेरीज इतर कारणांसाठी जंगल जमिनीचा वापर करण्यास प्रतिबंध करणे किंवा असा वापर  नियमबद्ध करणे यासाठी या कायद्याचा वापर केला जातो.

5. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1991 

प्राण्यांच्या शिकारीना प्रतिबंध करणे किंवा निर्बंध घलने तसेच काही विशिष्ट वनस्पतींचे संरक्षण करणे या संबंधी कायदे हे  वन्यजीवांचा व्यापार त्यांच्या पासून बनवलेल्या वस्तू आणि विजयचिन्ह  यांच्या विक्रीचे नियंत्रण करतात. 

2. जैव तंत्रज्ञान (Biotechnology ) 

जैविक उत्पादने आणि प्रक्रिया यांच्या मूल्यवर्धन यासाठी जैवतंत्रज्ञान वापरले जाते. भारत सरकारने जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगासाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. जैवतंत्रज्ञान हा संवर्धन आणि जनुकीय वैविध्याचा चिरस्थायी वापर यातील एक महत्त्वाचा दुवा आहे.

 राष्ट्रीय जैवविविधता कृती योजनेची रचना करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. जैवविविधतेचे जतन, संवर्धन आणि तिचा सातत्यपूर्ण वापर करण्याचे तंत्र अमलात आणणे व त्यामध्ये निगडित असलेल्या परिस्थितिकीय प्रक्रिया आणि प्रणाली यांचे व्यवस्थापन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अनेक शासकीय वन सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या सहभागातून या योजनेचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

3. स्थानिक ज्ञानाची नोंद करणे: (Record of the Local Knowledge )

स्थानिक लोकांची जीवन पद्धती आणि पर्यावरण यांचे घनिष्ठ संबंध दिसून येतात. स्थानिक रहिवासी त्यांच्या गरजांसाठी पर्यावरणातील संसाधनांवर अवलंबून असतात. त्यांच्याकडे असलेल्या वनस्पती आणि प्राणी या विषयाच्या ज्ञानाचा समृद्ध साठा जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरतो. हे ज्ञान बहुतांशी तोंडी स्वरूपातच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला दिले जाते. म्हणून हे ज्ञान नष्ट होण्यापूर्वीच त्याची नोंद होणे आणि जतन होणे आवश्यक आहे. अनेक संघटनांनी अशी माहिती संकलित करून त्यांची नोंद ठेवण्यास सुरुवात केलेली आहे.

X X

4. जैवविविधता संवर्धनातील जनसहभाग: (Public Awareness in Conservation of Biodiversity )

जैवविविधता संवर्धन कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन आणि निरीक्षण यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणत्याही कायदेशीर तरतुदी प्रभावी ठरू शकत नाहीत. यासाठी शासकीय आणि स्वयंसेवी संस्था अनेक उपक्रम हाती घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने गावानजीकच्या निकृष्ट जंगल जमिनीवर जंगलांचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्यासाठी गावातील लोकांच्या सहभागावर भर दिला जातो. 

जैवविविधता संवर्धन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकांचा विश्वास आणि सहभाग असणे आवश्यक आहे. याची जाणीव आता निर्माण झालेली आहे.

5. कृत्रिम संग्रह: (Artificial Stocking )

ज्या जिवांच्या जाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा जातींचा संग्रह करून ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा संग्रह अशाच ठिकाणी केला पाहिजे. जर संग्रहित जीवांची संख्या अति जास्त  झाली तर परत समस्या निर्माण होतात. अशा प्रकारच्या समस्या ऑस्ट्रेलियात सशांचे संग्रहण केल्यामुळे निर्माण झाली होती.

6. शिकारीवर प्रतिबंध: (Restricted Hunting )

सद्यपरिस्थितीत शिकार हा व्यवसाय करणे अशाच ठिकाणी शक्य आहे की जेथे वन्यजवांची घनता जास्त आहे. त्याच बरोबर त्याचा जनन दर उच्च आहे. अन्यथा वन्यजीवांचा त्रास होतो. म्हणून वन्यजीवांच्या शिकारीवर प्रतिबंध घालावा लागतो. कारण वन्य जीव निसर्गातील जैविक विविधतेचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.

X X

7. वन्यजीव संवर्धन कायदा: (Wildlife Conservation Act )

भारत सरकारने वन्यजीवांच्या आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धनासाठी विविध कायदे केले आहेत.

 वन्यजीवांच्या संरक्षण संदर्भात शिक्षण देण्यासाठी डेहराडून येथे " भारतीय वन्यजीव संस्थेची" स्थापना केली आहे.

 या संस्थेचा उद्देश अभयारण्य व वन्यजीवांच्या व्यवस्थेसंबंधी लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवसायिक शिक्षण देणे हा आहे.

8. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची स्थापना: (Establishment of National Park and Sancturies) 

भारतात वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणाच्या व संवर्धनाच्या हेतूने 566 अभयारण्ये व 86 राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली गेली आहे.

 सन 2003 -04 च्या आकडेवारीनुसार त्यांचे एकूण क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 4.66 टक्के इतके आहे.




View,Comment and share..

Post a Comment

1 Comments