Subscribe Us

header ads

Mauryan Administration-2: Empire Founder Chandragupta Maurya An Excellent Administrator (Part-2)

Mauryan Administration: Empire Founder Chandragupta Maurya An Excellent Administrator (Part-2)

2.मौर्य प्रशासन : साम्राज्य संस्थापक चंद्रगुप्त मौर्य एक उत्कृष्ट प्रशासक (भाग-2)



 महत्वपूर्ण खाती :

अ) दळणवळण खाते : 

रस्तेबांधणी, दुरुस्ती, विहिरी व धर्मशाळा बांधणे, रस्त्यावर पूल बांधणे इ. कामांसाठी दळणवळण खाते होते. चंद्रगुप्ताने विविध खाती व खात्याची निर्मिती अत्यंत काळजीपूर्वक केली होती असे दिसते.

V. A. Smith म्हणतात,

 "The Mauryan state was organised elaborately with full supply of departments and carefully graded officals with defined duties. 

ब) जनगणना खाते : 

लोकसंख्येच्या सर्वांगीण पद्धतीची मोजदाद करण्याचे काम हे खाते करी, जात, लिंग, वय, उद्योग, उत्पन्न, चारित्र्य इ. ची सविस्तर माहिती हे जनगणना खाते ठेवी. 

करनियोजन, आरोग्य, राष्ट्रीय उत्पन्न, संरक्षण इ. कारणांसाठी लोकसंख्येची गणना ते करीत असत.

क) आरोग्य खाते:

दवाखाने, औषधालये यांची व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेची काळजी ही कामे हे खाते करी. 

ड) जंगल व खाणी खाते:

 खाणी व जंगले यांचे संरक्षण-संगोपन करण्याचे काम या खात्याकडे होते.

इ) लोककल्याण खाते : 

जुगारी, मद्यपी, चोर, गणिक इ. लोकांवर देखरेख ठेवण्याचे काम या खात्याकडे होते. वेश्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गणिकाध्यक्ष, द्युतावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांताध्यक्ष, दारूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुराध्यक्ष हे अधिकारी त्यांनी नेमले होते.

वेतन व सार्वजनिक बांधकामे यावर प्रामुख्याने खर्च होई. राजदरबार व राजकुटुंब यावरही खर्च होई. 

राजकोषात जमा होणाऱ्या पैशातून अधिकाऱ्यांचे वेतन दिले जात असत. एकूण महसुलाचा चौथा हिस्सा त्यासाठी खर्च होत.

X X

लष्कर खाते : 

मौर्यानी विशाल साम्राज्य निर्माण केले याचे एक कारण म्हणजे सुनियंत्रित अशी लष्कराची उभारणी होय. 

राजा हाच लष्कराचा प्रमुख होता. सम्राटाला मदत करण्यासाठी तीन सदस्यांचे एक युद्धमंडळ होते. या युद्धमंडळाच्या 6 समित्या होत्या व प्रत्येक समितीला 5 सदस्य होते. लष्कराचे 6 प्रमुख विभाग होते.

1) पायदळ समिती:

 चंद्रगुप्ताजवळ 6 लक्ष पायदळ होते. प्रत्येक सैनिकाजवळ भाला, तलवार, धनुष्यवाण ही हत्यारे होती. पायदळ भरती, प्रशिक्षण, सैनिकांचे खाणे, शस्त्रपुरवठा ही कामे ही समिती करी.

2) घोडदळ समिती : 

मौर्याजवळ 30,000 घोडदळ होते असे प्लिनी लिहितो. घोडेस्वाराजवळ भाले, ढाली व तलवारी असत. घोड्याची निवड, निगा, प्रशिक्षण हे काम या समितीकडे होते. प्लुटार्क याने तर चंद्रगुप्ताजवळ 80,000 घोडदळ होते असे लिहिले आहे..

3) हत्तीदल समिती : 

चंद्रगुप्ताजवळ 9,000 हत्ती होते. हत्तीला युद्धाचे प्रशिक्षण दिले जाई. राजा व नामांकित योद्धे हत्तीवर बसून युद्ध करत.

 युद्धसाहित्याच्या वाहतुकीसाठी हत्तीचा उपयोग केला जाई. हत्तीची निगा, प्रशिक्षण हे काम या समितीकडे होते.

4) रथदल समिती:

 रथांची संख्या 8,000 होती. राजघराण्यातील प्रतिष्ठित योद्धे रथात बसून युद्ध करीत. रथ सुस्थितीत ठेवणे, सर्व शस्त्रानिशी सज्ज ठेवणे हे काम या समितीस करावे लागे. रथदलाचा प्रमुख रथाध्यक्ष अधिकारी होता.

5) नाविक दल समिती:

 चंद्रगुप्ताच्या साम्राज्यात पश्चिम व पूर्व किनारा येत असल्यामुळे त्याने नौदलाकडेही लक्ष पुरविले होते.

 युद्धप्रसंगी नद्या ओलांडण्यासाठी आरमाराचा उपयोग केला आई. नौका व जहाज बांधणे व समुद्रकिना किनाऱ्यांचे संरक्षण करणे ही या विभागाची कामे होती.

6) रसद किवा रसद विभाग : 

युद्धात जखमी झालेल्यांना उचलून नेणे, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे, सैनिकांना शस्त्रास्त्रे व धान्याचा पुरवठा करणे, लष्कर व रथांच्या वाहतुकीला रस्ते तयार करणे ही कामे या विभागाकडे होती. सैनिकांचे वेतन रोख पैशात दिले जाई.

लष्करात क्षत्रियांचे महत्त्व जास्त होते.

 कौटिल्य म्हणतो, "ब्राह्मण सैनिक म्हणजे खोगीरभरती तर क्षत्रिय म्हणजे उत्तम लढवय्ये होत." 

राजा स्वतः युद्धाचे नेतृत्व करी. सैन्याचे शिक्षण, शिस्त व मनोधैर्य याकडे विशेष लक्ष दिले जाई. प्रांतीय प्रशासन राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे विभाग पाडण्यात आले होते. 

चंद्रगुप्त व अशोकाच्या साम्राज्याचे पुढील विभाग होते. 

X X

 राज्य   :  राजधानी  

1) मगध (पूर्व प्रांत): पाटलीपुत्र

2) मध्य प्रांत :उज्जैन (उज्जयिनी)      

3) कलिंग : तोसली

4) दक्षिणपथ : सुवर्णगिरी

5) वायव्य प्रांत  : तक्षशिला

सामान्यपणे प्रत्येक विभागाचा कारभार कुमारमहामात्र यांच्याकडे सोपवला जाई. हे कुमारमहामात्र राजपुत्र किंवा राजधारण्यातील व्यक्ती असत. कुमारमहामात्रांना अंतर्गत स्वायत्तता होतीच. 

राजपुत्र हे धोक्याचे उगमस्थान होऊ शकते आणि एखाद्या प्रांताचा पूर्ण ताबा त्याच्याकडे दिल्याने तो बेजबाबदार कृत्यास प्रवृत्त होऊ शकतो असा इशारा कौटिल्याने 'अर्थशास्त्र' या ग्रंथात दिला आहे. 

त्यांना सल्ला देण्यासाठी प्रांतिक मंत्रिपरिषद असे. प्रांतप्रमुखास मदत व सल्ला देण्याचे काम प्रांत परिषद करी.

प्रत्येक प्रांताचे प्रदेश, जिल्हे (आहार, विषय) महाल व गावे असे विभाग होते. त्यावर अनुक्रमे प्रादेशिक, स्थानिक, गोप व ग्रामिक असे अधिकारी होते. 

'स्थानिक' हा आजच्या सहायक जिल्हाधिकाऱ्यासारखा तर प्रादेशिक हा आजच्या जिल्हाधिकाऱ्यासारखा होता.

 'ग्रामिक' हा गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून निवडला जात असे. ग्रामिकाकडे ग्रामरक्षण खजिना असे. ग्रामिकाला त्या गावाची आर्थिक व सामाजिक सर्व प्रकारची माहिती असे. गावाचा कारभार तोच पाही.

नगर प्रशासन : 

मॅगस्थेनिसच्या 'इंडिका' व कौटिल्याच्या 'अर्थशास्त्रा' वरून मौर्यकालीन प्रशासनव्यवस्थेची माहिती मिळते. मॅगेस्थेनिसने पाटलीपुत्र शहराचे सुंदर वर्णन केले आहे. 

X X

पाटलीपुत्र या शहराचा कारभार पाहन्यासाठी प्रत्येकी 5 सदस्य असलेल्या 6 समित्या होत्या,

1) शिल्प व औद्योगिक समिती: 

मजुरीचे दर ठरवणे, कच्च्या माला शुद्धता राखणे ही कामे या समितीकडे होती, कारागीर व कलाकारांना संरक्षण देण्याचे काम ही समिती करी, उत्पादनाचा दर्जा कायम कसा राहील हे काम ही समिती पाही.

2) परदेशी नागरिकांवर देखरेख व नियंत्रण ठेवणारी ही दुसरी समिती होती.

3) जन्म-मृत्यूच्या नोंदी व लोकसंख्येची खाणेसुमारी करणे यासाठी तिसरी समिती होती. ठरावीक कालानंतर लोकसंख्येची खाणेसुमारी करणारा चंद्रगुप्त हा भारतीय इतिहासातील पहिलाच सम्राट होय.

4) मालाचे उत्पादन, उद्योगधंदे व कारखाने यावर देखरेख यासाठी चौथी समिती होती.

5) शहरात विक्री होणाऱ्या सर्व मालावर कर गोळा करण्याचे काम एका समितीकडे होते.

6) वजने व मापे, व्यापार, विक्री इ. ची देखरेख करण्यासाठी एक समिती होती. 

या 6 समित्यांशिवाय आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, उद्याने, मनोरंजन इ. कामे नियामक मंडळ सामूहिकपणे पार पाडी. 

डॉ. व्ही. ए. स्मिथ यांनी मौर्याच्या शहर प्रशासनाचे कौतुक केले आहे.

पाटलीपुत्र शहर विद्या व कलेचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होते. शहराची लांबी 9 मैल व रुंदी 2 मैल होती. या गावाला 64 वेशी व 570 बुरुज होते. शहराच्या संरक्षणासाठी 600 फूट रुंद व 50 फूट खोल खंदक होता. शहरात 9 ते साडेतीन त्या वेळात संचारबंदी होती. गुन्हेगार, समाजकंटक, दरोडेखोर यांना हालचालीस बाब मिळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. शहराच्या संरक्षणासाठी नेहमीच खड़े सैन्य ठेवलेले होते.

चंद्रगुप्ताने निर्माण केलेली शासनयंत्रणा अत्यंत उत्कृष्ट व कार्यक्षम होती. केवळ कर घेऊन प्रजेचे संरक्षण करणे हा मर्यादित हेतू मौर्याच्या शासनव्यवस्थेचा नव्हता तर त्यांनी त्यांच्या शासनास कल्याणकारी राज्याचे स्वरूप दिले होते.

 मुलकी च लष्करी व्यवस्था स्वतंत्र ठेवली. सेनाधिकाऱ्यांना मुलकी शासनाचे अधिकार दिले नाहीत. नोकरांना अधिकाऱ्यांना सेनाधिकाऱ्यांना रोख पगार दिला. न्यायदेवतेचे स्वातंत्र्य व पावित्र्य सांभाळले.

X X

डॉ. मुजुमदार म्हणतात, 

"The Mauryan govt. was highly orgnised and throughly effcient autocracy capable of controling an empire more extensive thun Akbar's It anticpated in many respects of the institutions of modern times."






Comment and share

Post a Comment

3 Comments