Subscribe Us

header ads

Chandragupta Maurya: Imperial Expansion and Administration

Chandragupta Maurya: Imperial Expansion and Administration

चंद्रगुप्त मौर्य : साम्राज्यविस्तार व प्रशासन

 (इ.स.पू. 322 ते इ.स.पू.298)



चंद्रगुप्त मौर्याच्या विजयास कोठून प्रारंभ झाला, चंद्रगुप्ताने पंजाब प्रथम जिंकला की मगध जिंकले याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. 

'मुद्राराक्षस' या नाटकातील वर्णनानुसार चंद्रगुप्ताने प्रथम पंजाब जिंकला व नंतर मगध जिंकले. 

डॉ. रायचौधरी व डॉ. व्ही. ए. स्मिथ यांच्या मतानुसार," चंद्रगुप्ताने प्रथम मगध जिंकले. चंद्रगुप्ताच्या लष्करात शक, यवन, किरात, कंबोज, पारसिक आणि भाल्लेक असे निरनिराळे लोक होते." असा उल्लेख 'मुद्राराक्षस' नाटकात आहे.


 पंजाब व सिंधवरील विजय :

अलेक्झांडरच्या लष्कराची निर्दयता व त्यांनी केलेली मनुष्यहत्या यामुळे सिंध व पंजाबमध्ये असंतोष होता. या असंतोषाला तीव्र स्वरूप देण्याचे काम चंद्रगुप्त मौर्य व कौटिल्याने केले. 

जस्टिन या ग्रीक इतिहासकाराच्या मते, चंद्रगुप्ताने नंदाविरोधी अलेक्झांडरची मदत मिळते का म्हणून भेट घेतली; पण त्यात त्याला अपयश आले होते. 

ग्रीक सेनानायक अलेक्झांडरचे साम्राज्य आपापसांत वाटून घेण्यासाठी लढले. 

ग्रीक सेनानायकांना भारतीय जनतेनेही विरोध केला. 

ग्रीक सेनानायक (क्षत्रप) निकानोरची हत्या झाली. 

डॉ. आर. के. मुखर्जी यांच्या मते, "फिलिपच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता व ही योजना तयार करण्यासाठी चंद्रगुप्तं व चाणक्याने महत्त्वाची भूमिका बजावली."

सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक सेनापतीत सत्तेसाठी सुरू झालेल्या संघर्षाचा फायदा घेऊन पंजाब व सिंध हे दोन प्रांत ग्रीकांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यात त्याला यश मिळाले. 

सिंधचा ग्रीक क्षत्रप पियानाचा चंद्रगुप्ताने पराभव केला होता.

X X

पाटलीपुत्र शहरावर विजय (मगध विजय): 

चंद्रगुप्ताने मगध जिंकले. मगधची राजधानी पाटलीपुत्र हे शहरही त्याने जिंकले.

 धनानंदाचा वध करून त्याने मगधची गादी मिळंवली. लष्करी शक्तीबरोबरच साम, दाम, दंड व भेद या कूटनीतीचा त्याने उपयोग करून नंद सत्तेचा शेवट केला. 

मगधवर मोहीम हाती घेण्यापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्याचा राजा पर्वतक याच्याशी मैत्रीकरार केला. 

त्याची व इतर काही लढाऊ जमातींची मदत घेऊन त्याने मगध जिंकले. पाटलीपुत्र शहर जिंकले. 

परंतु मगध जिंकल्यानंतर चंद्रगुप्ताने चाणक्याच्या कूटनीतीचा वापर करून 'पर्वतक' या राजास ठार केले.


सेल्युकस निकेटरचा पराभव : 

चंद्रगुप्ताने नंदाचे मगधचे साम्राज्य जिंकून पंजाबपासून मगधपर्यंतच्या प्रदेशाचा तो सम्राट बनला. 

चंद्रगुप्त साम्राज्यस्थापनेत व साम्राज्यविस्ताराच्या कार्यात गुंतलेला पाहून ग्रीकांचा राजा सेल्युकस निकेटर याने भारतावर आक्रमण केले. मुळात तो अलेक्झांडरचा नामांकित सेनापती होता, तो अलेक्झांडरच्या विशाल साम्राज्याचा स्वामी बनला होता. 

भारतातील ग्रीकांच्या ताब्यात पूर्वी असलेला प्रदेश जिंकावा व सिंधूच्या पूर्वेकडचाही प्रदेश नव्याने जिंकावा या महत्त्वाकांक्षेने तो भारताकडे निघाला; परंतु सेल्युकसला चंद्रगुप्ताने सिंधू नदीपलीकडेच अडवले.

 चंद्रगुप्त व सेल्युकस यांच्यात युद्ध झाले. सेल्युकसचा पूर्णपणे पराभव झाला.

 चंद्रगुप्ताने त्याच्यावर तहानुसार खालील अटी लादल्या. 

1) काबूल, कंदाहार, बलुचिस्तान, हिरात हे प्रांत चंद्रगुप्ताला देण्यात आले.

2) सेल्युकसने आपली मुलगी हेलेना चंद्रगुप्तास द्यावी व त्याद्वारे उभयतांत मैत्रीचे संबंध जोडले जावेत. 

3) मॅगेस्थेनिस हा ग्रीक वकील चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला.

4) चंद्रगुप्ताने 500 हत्ती सेल्युकसला भेट म्हणून द्यावेत. प्रस्तुत तहामुळे चंद्रगुप्ताचा दरारा, राजकीय प्रतिष्ठा यात भर पडली. चंद्रगुप्ताचे साम्राज्य भारताबाहेर इराणपर्यंत पसरले.

X X

चंद्रगुप्त मौर्य व दक्षिण भारतावरील विजय:

चंद्रगुप्त मौर्याने दक्षिण भारत जिंकला होता की नाही याबाबत इतिहासकारांत मतभेद आहेत. 

दक्षिण भारतातील कोणकोणते प्रदेश त्याने जिंकले होते याबद्दल निश्चित कोणताही लिखित पुरावा नाही. 

प्लुटार्क या ग्रीक इतिहासकाराच्या मते, चंद्रगुप्ताने ६ लाख सैन्याच्या जोरावर संपूर्ण भारत जिंकला होता. 

डॉ. व्ही. ए. स्मिथच्या मते, चंद्रगुप्तापूर्वीच बिंबिसारने दक्षिणेत साम्राज्यविस्तार केला होता. 

डॉ. रायचौधरींच्या मते, नंदांचा साम्राज्यविस्तार दक्षिण भारतातही झाला होता व नंदांचा पराभव केल्यामुळे आपोआपच तो प्रदेश चंद्रगुप्ताच्या ताब्यात आला. 

डॉ. आर. के. मुखर्जी, डॉ. त्रिपाठी या इतिहासकारांनी त्यास दक्षिणेचा विजेता म्हटले आहे. 

जैन व तामिळ साहित्यात चंद्रगुप्ताने दक्षिण भारत जिंकला होता असे म्हटले आहे.

X X

पूर्व व पश्चिम भारतावरील विजय: 

कलिंग (ओरिसा) राज्य वगळता संपूर्ण पूर्व भारत, बंगाल वगैरे प्रांतांवर चंद्रगुप्ताची सत्ता प्रस्थापित झाली होती.

महास्थान अभिलेखावरून बंगालवर समुद्रगुप्ताचे राज्य असल्याचे दिसते. 

डॉ. रायचौधरी यांच्या मते, चंद्रगुप्ताने सौराष्ट्र आपल्या साम्राज्यात सामील करून तेथ  त्याने  पुुुष्पगुप्त  नावाचा वैश्य राज्यपाल नियुक्त केला होता.

रुद्रदामनच्या जुनागढ येथील शिलालेखात प्रस्तुत उल्लेख आहे.

एकंदरीत चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतात व भारती मौर्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. 

त्याचे साम्राज्य हिंदुकुश पर्वतापासून ते बंगालपर्यत व हिमालया पासुन उत्तर मौसूरपर्यंत होते. 

त्याच्या साम्राज्यात काबूल, कंदाहार, अफणिस्तान, हिरात के भारताबाहेरचे प्रांत, त्याशिवाय पंजाब, सिंध, नेपाळ, गुजरात, माळवा, मगध, बंगाल, मैसूर एवढे प्रांत होते. 

ठाण्याजवळ सोपारा येथे सापडलेल्या शिलालेखावरूनही महाराष्ट्रात मौर्यांचे राज्य होते असे दिसते.







Comment and share

Post a Comment

3 Comments