Subscribe Us

header ads

Shaddarshane -2 Patanjali yog षड्दर्शने - 2. पतंजलीचे योगदर्शन

 Shaddarshane - Patanjali yog 

पतंजलीचे योगदर्शन : षड्दर्शने - 2. 


21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.

योग दर्शनाचा प्रणेता महर्षी पतंजली हे आहेत. 

योग दर्शनाचे चार भाग आहेत.

1. समाधिपाद 

2. साधनपाद 

3. विभूतीपाद 

4. कैवल्यपाद 

योगदर्शन सांख्य मताला पूरक मानले जाते.

योग म्हणजे जोडणे. आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करण्याचा हा मार्ग मी जड नसून चेतन आहे हे समजून घेण्याची प्रयोगशाळा म्हणजे योग.

योग म्हणजे समाधी, योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध अशी योग्य शब्दाची व्याख्या महर्षी पतंजली च्या  "योगसूत्रात" करण्यात आली आहे.

योगविषयाचा विचार सर्वच्या सर्व 108 उपनिषदात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतोच. 

पतंजलीचे योगसूत्र पूर्णपणे सांख्य प्रक्रियेवर आधारलेले आहे.

X X

योग साधना अष्टविध आहे:

1. यम :

1. अहिंसा

2. सत्य

3. अस्तेय

4. ब्रह्मचर्य 

5. अपरिग्रह 

या पाच यमाच्या (व्रतांच्या) पालनाने शरीरशुद्धी प्राप्त होते.

अहिंसा मनांधध्ये निर्माण झाला की, इतराबद्दलची निष्ठूर्ता कमी होते.

वाचेच्या माध्यमातुन हिंसा होऊ नये. कोणी दुखावला गेला नाही पाहिजे.

सत्य मनाच्या अंतकर्णतून सांगावे. जीवनात नेहमी सत्य बोलावे.

आवश्यकतेपेक्षा अधिक न घेणे म्हणजे अस्तेय. परद्राव्यांची इच्छा न कारणे.

आकर्षणाचं मोह आवरला जाणे म्हणजे ब्राह्मचर्य.

अपरिग्रह विषयांचा अनावश्यक संग्रह न करणे.

2. नियम:

पवित्रता, स्वच्छ्ता, स्थितप्रद्यंता, संतोष, तप, 

चांगल्या सवयी  अंगवळणी पडल्या पाहिजेत.

अन्नाचा आणि मनाचा संबंध आहे.


3. आसने :

स्थिर सुखम आसनम. अनवष्याक स्नायुवर ताण न देणे.

पद्मासन, भद्रासन, वज्रासन, सिद्धासन, सिंहासन, स्वस्तिकासन इत्यादी असणे महत्त्वाची मानली जातात. 

आसनांमुळे सहनशीलता वाढते, आरोग्य सुधारते.


4. प्राणायाम :

श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे, दीर्घ प्राणायामाची आवश्‍यकता असते. श्वासनिरोध केला म्हणजे मन स्थिर होते. महाभारतात अनेक ठिकाणी प्राणायामाची प्रक्रिया वर्णन केली आहे. 

प्राणायामाहून श्रेष्ठ असे दुसरे तप नाही.

 ज्याप्रमाणे भट्टीत घातलेल्या धातूतील मळ जळून जातात त्याच प्रमाणे इंद्रिया पासून उत्पन्न होणारे मळ प्राणायामा द्वारा जळून जातात.

चंद्रनाडी वजन कमी करते.

सूर्यनाडी वजन वाढवते.

कुंभक योग आवघड आहेत.

X X

5. प्रत्याहार :

प्रत्याहार हा  इंद्रिय नियंत्रित करण्याचा उपाय आहे. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना विषयापासून हेतुपूर्वक दूर करून आत्मनिष्ठा करण्याचा अभ्यास होय. 

ध्यान, धारणा, समाधि या शेवटच्या तीन अंगाच्या सिद्धीसाठी प्रत्याहार आवश्यक आहे.इच्छा शक्ती , 


6. धारणा :

शरीराच्या आतील एका भागावर अथवा बाहेरील एका भागावर चित्त एकाग्र करणे म्हणजे धारणा होय.

पृथ्वीतत्त्वाची धारणा, जलतत्वाची धारणा, अग्नीतत्वाची धारणा, वायुतत्वाची धारणा, आकाश तत्त्वाची धारणा या पाच धारणा आहेत.

संवेदना मुक्त, चंचलता. एकाग्रता,


7. ध्यान :

 एकाच गोष्टीचे खंडन चिंतन करणे यास ध्यान म्हणतात.


8. समाधी :

 निर्विचार समाधी ही योग्याची अंतिम स्थिती आहे. या अवस्थेत जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य होते. ही अवस्था परमानंदस्वरूप असते.

धारणा, ध्यान व समाधी या संयमत्रयाच्या अभ्यासासाठी षटचक्रांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

X X

चक्रांची संख्या सहा ही सर्वमान्य आहे. ही सहा चक्रे म्हणजे,

1. मूलाधार चक्र 

2. स्वाधिष्ठान चक्र 

3. मणिपूर चक्र 

4. अनाहत चक्र 

5. विशुद्ध चक्र 

6. आज्ञाचक्र

योगदर्शन ही मानवी मनाची  सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे.

 योगसिद्धीच्या मार्गात येणारे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, आणि अभिनिवेश हे पाच क्लेश आहेत.

योगाभ्यास एकांतस्थळी ( अरण्य गुंफा समुद्रकिनारा) केला पाहिजे, म्हणजे चित्ताची एकाग्रता साधण्यात मदत होते.

योगदर्शनामध्ये ईश्वराला विशेष स्थान नाही. तथापि समाधी साधनेसाठी ईश्वराचा उपयोग होतो. 

त्यामुळे योगशास्त्र ईश्वराचे अस्तित्व मानते. ईश्वर हा नित्य, विभू, सर्वशक्तिमान सर्वज्ञ जीव आहे. ईश्वर भक्ती हा समाधी साधनेचा उत्तम मार्ग आहे. असे पतंजली सांगतात.







Comment and share.....

Post a Comment

5 Comments